बुलडाणा : येत्या एप्रिल ते जून या कालावधीत कार्यकाळ पूर्ण करणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राखीव जागांवर मानांकन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. मंगेश कांबळे यांनी यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १0 (१)(क) अनुसार राखीव जागेसाठी नामांकन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.