बॅंग बॅंग- बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन

बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन

निर्देशक सिद्धार्थ आनंद चे आगामी आकर्षण असलेला ‘बॅंग बॅंग’ हा चित्रपट, ट्रेलर आउट होण्याआधीच चर्चेत आहे. कारण ही तसेच आहे. बॉलीवूड चा सूपरहीरो हृतिक, त्याच्या डोक्याला मागे झालेला अपघात, बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन तसेच हॉलीवुड एक्शन डायरेक्टर एंडी आर्मस्‍ट्रांग याचे निर्देशन. बॅंग बॅंग ह्या चित्रपटाचे चित्रीकरण अबुधाबी येथे सुरू असून चित्रपटील सर्व सीन रोमांचक बनवण्यासाठी हृतिक ने फार मेहनत घेतली आहे. हृतिक चा पाठलाग करणार्‍या एका सीन साठी 120 गाड्या वापरण्यात आल्या आहेत. या सीन साठी हृतिक ने खूप वेळा कर चालवुन बघितली. परंतु तो कुठल्या कंपनीची कार चालवत होता हे समजू शकले नाही. या चित्रपटा बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे कुठलेही फोटो, माहिती मिळत नाही. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हृतिक मागील वर्षी जखमी झाला होता आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे शूटिंग बंद करावी लागली होती. त्या सोबत या चित्रपटात कतरिना कैफ असणार आहे. हा चित्रपट बॉलीवूड चा सर्वात मोठा एक्शन सीक्वेंस आहे.

बुलडाण्यात बिबट्याचा सहा तास थरार

बुलडाणा जिल्यातील नांदुरा तालुक्यातील पोटळी शिवारात आज सकाळपासून एका बिबट्याने सहा तास उच्छाद मांडला. कुत्र्याची शिकार केल्यानंतर बराच वेळ हा बिबट्या झाडावर बसून होता. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

गावातील वडोदे यांच्या शेतातील झाडावर बसलेल्या ह्या बिबट्याने जमवातील रमेश राजाराम तागडे (५५) या मजुरावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानतर एका वृद्धावरही हल्ला केला. त्यानंतर तो बांबूच्या झाडात शिरला. याबाबत पोलिस व वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यावरून प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी पोहचले. सुमारे सहा तासापर्यंत पोटळी शिवारात ह्या बिबट्याचा थरार कायम होता.

बहुगुणी काकडी. वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

बाजारात फिरताना किंवा रस्त्यावरून जात असताना एखाद्या हातगाडीवर आपण नेहमीच हिरवी, थोडी पिवळसर गारेगार काकडी बघत असतो. ह्या काकडीचे उपयोग आपण बघुया. उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पचनक्रिया मजबूत करण्यासोबत काकडी गॅस्ट्रिक आणि छोट्या आतडीचा अल्सर झालेल्या रुग्णांसाठी औषध म्हणून काम करते. काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असतं, जे की कोणत्याही कंपनीच्या बंद बाटलीच्या पाण्यापेक्षा चांगलं आणि शुद्ध असतं. काकडी खूप कमी कॅलरी असणारं पदार्थ आहे. १०० ग्राम काकडीमध्ये ५४ कॅलरी ऊर्जा असते. म्हणूनच काकडी खाल्ल्यानं वजन वाढत नाही. काकडी ब्लड प्रेशरलाही कमी करते, मात्र ब्लड प्रेशरचा त्रास असणारे रुग्ण काकडीला मीठ लावून खाऊ नये. काकडी शरीरातील विषारी पदार्थ यूरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढते.

ताप आल्यास काकडीचा ज्यूस प्यावा. त्यामुळं शरीराचं तापमान नियंत्रणात राखतं. जर अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणासोबत सलाद म्हणून काकडी खावी. काकडी गोल कापून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते. दररोज सलाद म्हणून काळं मीठ, कालीमिर्च आणि लिंबू पिळून काकडी खावी. काकडीची कोशिंबिरही बनवून आपण खावू शकता. काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. जर तुम्हाला पाणी पिण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही काकडी खाऊ शकता. यामध्ये ९० टक्के पाणी असते.

हृतिक रोशनची हॉलीवुड एंट्री

बॉलीवुड चा सूपरहीरो हृतिक रोशन लवकरच हॉलीवुड च्या चित्रपटात एंट्री करण्याच्या मागे असून ‘क्रिश३’ च्या यशानंतर त्याला हॉलीवुड कडून ऑफर येत आहेत.’द फास्ट एंड द फ्यूरियस’, ‘xXx’ और ‘ड्रैगनहार्ट’, सारख्या सूपरहिट चित्रपटाचे निर्देशक रोब कोहेन मुंबई मध्ये ऋतिक आणि राकेश रोशन सोबत रात्री जेवण करताना आढळून आले.

हृतिकच्या कामाला बघून कोहेन आपल्या मेगा एक्शन चित्रपटासाठी हृतिक सोबत या प्रोजेक्ट वर चर्चा करताना आढळून आले. परंतु अजुन या प्रोजेक्ट संदर्भात कुठल्याच प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु निर्देशक कोहेन या प्रोजेक्ट साठी कित्येक वेळा मुंबईला येताना दिसले आहेत. लवकरच याचा खुलासा होईल. जर हॉलिवूडपटात हृतिक काम करणार असेल तर ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल.

गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन

आज सकाळी दिल्ली येथून बीडला जाण्यासाठी विमानतळावर जात असताना भारतीय जनता पक्षाचे(भाजप) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन झाले आहे. मुंडे यांच्या निधनाची अधिकृत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
सकाळी सहा वाजता बीडकडे रवाना होण्यासाठी नवी दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना मोती बाग परिसरात मुंडे यांच्या गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर मुंडे यांना त्वरित नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बेशुद्ध अवस्थेत होते. उपचारादरम्यान, मुंडे यांना हृद्यविकाराचा झटका आल्याचेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप ला मुंडेच्या निधनाने जबरदस्त झटका बसला आहे. गोपीनाथ मुंडे मुंडे हे खरे लोकनेते होते. लोकांसाठी न थकता सातत्याने काम केलं अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी दिली असून त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यानी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या गावी बीड येथे आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकूल वातावरण आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे.