दिल्ली मेट्रो रेल मधे विविध पदांची भरती

Delhi Metro Recruitment

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मधे कार्यालयीन आणि तांत्रिक पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मधे पदांच्या एकूण १८९६ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cdn3.digialm.com/per/g21/pub/1891/EForms/image/ADVT%20NO%20DMRC%20%20OM%20%20HR%20II%202018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cdn3.digialm.com/EForms/html/form54929/Instruction.html

राष्ट्रीय एकता

National Integration

खुद प्रस्तोने लगाई अपने देशमे आग |
एकता सेही बुझ सकती है ये जो लगी है आग || धु ||

सुभाष के नरोने जोश हमको दिलाया है |
आझादी को हम सबने मिलकेही पाया है ||
देखके हमारी विरता अंग्रेज गये है भाग || १ || एकता सेही बुझ—

खाये हुवे है धोका एक बार हम किसीसे |
टकरायेंगा जोकोई मिट जायेगा हमीसे ||
देश के अपने प्राण वोरोने किया है त्याग || २ || एकता सेही बुझ—

किस्मत ने हमारे जब ये दिन दिखाया है |
इमान पडोसीका हर पल डगमगाया है ||
जज्बात हमारे देखो अबभी रहे है जाग || ३ || एकता सेही बुझ—

हर कोई चल रहा है सतरंजकी देखो चाल |
यारो जामानेका अब बदल चुका है “खयाल” ||
लाखोंके उजड रहे है इस धरती पे सुहाग || ४ || एकता सेही बुझ—

 

एकनाथ उर्फ़ खयाल चिंतले
मो : +९१ ८४८५००५५४८

SBI मध्ये लिपिक पदासाठी भरती

State Bank Of India

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘क्लार्क / लिपिक’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपिक या पदाच्या एकूण ८३०१ जागा भरण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीधारक २० ते २८ वयोगटातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/1516358303086_SBI_CLERICAL_ADV_ENGLISH.pdf

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/sbijacsjan18/

शहराचं येडं

Shaharach Yed Kavita

शहराले जायचं येडं करी भल्याभल्याले येडं,
मशिनीगत धावणाऱ्या शहरापरीस बरं आपलं खेडं ।
दोन घडीक बोल्याले न्हाई कोण्याले फुरसत,
पैका कमावतात लोकं पर आयुष्यात न्हाई बरकत ।। १ ।।

इमारती येवढ्या उंच नजर पुरत न्हाई,
मानसायची गर्दी येवढी पाय ठेव्याले जागा भेटत न्हाई ।
नुसतं दिव्यानं चाकाकणार जग हे,
पण माणुसकीचा राजा पत्त्याचं दिसत न्हाई ।। २ ।।

दंगली, खून, दरोडा, अक्सिडेंट हे तं रोजचंच झालं,
त्याशिवाय लोकायलेबी चैन पडत न्हाई ।
परत्येक माणूस जगण्यासाठी एकदुसऱ्याचा गळा कापतो,
इमानदारी, संस्कृती, सभ्याचाराचं इथं दर्शन बी घडत न्हाई ।। ३ ।।

माणसाचं मशिनीबिगर काम अडतं,
पर माणसाचं माणसाबिगर काम अडत न्हाई ।
माणसाचा मशिनिवर जीव जडतो,
पर माणसाचा माणसावर जीव जडत न्हाई ।। ४ ।।

इथं राजा शेजारी शेजाऱ्याले वयखत न्हाई,
मारून बी टाकलं शेजाऱ्याले तारिबीन कोण्यालेच हरकत न्हाई ।
माणसाच्या या रानात खोट्या परतिष्ठेचं बी पेरल्या जातं,
पर मनाच्या शांतीची हिरवय इथं कधीच उगवतचं न्हाई ।। ५ ।।

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

कॅनरा बँकेत भरती..

Canara Bank Recruitment

कॅनरा बँक मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ४५० जागा जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.canarabank.com/media/6524/rp-2-2017-web-advertisement-english-08012018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/canpojmjan18/

पद्मासन

Padmasana

आता पर्यंत आपण पाहले आहे अष्टांग योग, योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी व अंगसंचालन. आज आपण पाहणार आहोत आसन. ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्या शुद्धी होते त्या मुळे आपली तब्बेत चांगली राहते, तण व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

पद्म म्हणजे कमळ. या आसनामध्ये शरीराला कमळासारखा आकार प्राप्त होतो. त्यामुळे या आसनास पद्मासन म्हणतात. हे आसन ध्यान आणि जप करण्यासाठी केला जातो. हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. गौतम बुद्धांनी देखील ध्याना करता पद्मासन या आसनाचा वापर केला होता.

कृती :
सर्व प्रथम जमिनीवर बसून पाय लांब करून ताठ बसावं. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. काहींना जर पहिले डावा पाय उजव्या पायाच्या माडीवर व उजवा पाय हा डाव्या पायाच्या माडीवर ठेवू शकता (जे सोपे जाईल तसे करा). नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीच्या टोकाला लावावेत व हात गुडघ्यावर ठेवा. डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठ आणि मान ताठ ठेवावी. डोळे बंद ठेवावेत.
आसनाची सुरुवात करताना प्रथम सुरुवातीस पाच मिनिटे या आसनात बसावं. या आसनात बसल्यास मनाला शांती मिळते. सुरुवातीस काही दिवस दोन ते तीन मिनिटं बसावं व हळूहळू वेळ वाढवावा.

अनुभव :
पद्मासन या आसनात बसल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. त्यामध्ये जर या परिस्थिती मध्ये आपण जर डोळे बंद केलेले असेल व मन एकाग्र असेल तर आपले मन हे अंगठा व तर्जनी जेथे स्पर्श करतात तेथे न्या. तुम्हाला येथे एक अनुभूती होईल हि अनुभूती प्रत्येकाची वेग वेगळी व सारखी देखील येऊ शकते. तुम्हाला असे जाणू शकते कि दोन्ही बोटे ऐक मेकाला ढकलत आहे, हुद्यावर हात ठेवल्या नंतर ज्या प्रमाणे ठोके जाणवतात तसे तुम्हाला येथे अनुभूती होईल तुम्हाला या व्यतिरिक्त हि अनुभव येऊ शकता.

घ्यावयाची काळजी :
सुरुवातीस हे आसन काहींना जमणार नाही. हे आसन करताना मांडया खूप दुखतील. तेव्हा या आसनात १० सेकंदच राहावं.
काहींचे जर पाय दुखत असतील तर हे आसन करूं नये.

फायदे :
या आसनामुळे शरीराचा लठ्ठ पणा कमी होते.
या आसनाचा उपयोग ध्यान, धारणा, प्राणायाम, जप आणि समाधीसाठी केला जातो.
या आसनामुळे दमा, निद्रानाश यासारखे रोग नाहीसे होऊ शकतात. ईतरही भरपूर फायदे या आसनाचे आपणास मिळतात.

सिंडिकेट बँकेत भरती.

Syndicate Bank

सिंडिकेट बँक मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिंडिकेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ५०० जागा जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.syndicatebank.in/RecruitmentFiles/PGDBF_ADVERTISEMENT_2018-2019_27122017.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.syndicatebank.in/english/Career.aspx

औरंगाबाद येथे तणाव आणि संचारबंदीची अफवा

aurangabad riot in osmanpura

भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभास अभिवादन करताना घडलेल्या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद येथे सुद्धा पाहावयास मिळाले. औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक भागासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरात संचारबंदी लागू झाल्याही अफवा सुद्धा पसरली होती. परंतु तसे काही झाले नाही.
औरंगाबाद शहरातील सर्व मुख्य चौकात आणि ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असून सर्व परिस्थितीवर आयुक्त यशस्वी यादव नजर ठेवून आहेत. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी आणि कुठलेही अनुचित कार्य न घडण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांतर्फे १ जानेवारी हा शौर्य दिनम्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी भीमा कोरेगावात हजारो लोक जमले होते. . १ जानेवारी १८१८ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या घटनेला आज २०० वर्ष पूर्ण झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम दरम्यान काही समाजकंटकांनी आज गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद मध्ये सुद्धा पहावयास मिळाले.

थोडा तणाव उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी परिस्थिती तांबडतोड नियंत्रणात आणली. दरम्यान शहरातील अनेक दुकाने संध्याकाळपासूनबंद होती तर क्लासेस आणि ऑफिस ला लवकर सुटी देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येत होता.

मलकापूर आगाराचा वाली मिळेल काय ?

Buldana latest news

बुलडाणा जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेले आगार म्हणजे मलकापूर आगार. मलकापूर बस स्थानकाहून राज्यभरात अनेक बसेस सुटत असतात. लांब पल्ल्याच्या फेऱ्यासाठी मलकापूर आगार ओळखल्या जाते. फलटण (सातारा) पासून तर देवास, नांदेड पासून मुंबई पर्यंत मलकापूर आगारातून बसेस उपलब्ध आहेत. परंतु बस स्थानकाची अवस्था मात्र लाजिरवाणी झाली आहे.

मलकापूर बस स्थानकातून दिवसभरातून अनेक बसेस धावत असतात तर विदर्भ आणि खान्देश ला जोडणारे महत्वाचे ठिकाण आहे. याशिवाय मध्य प्रदेश कडे आणि मराठवाड्यात जाण्यासाठी बस स्थानकावर तोबा गर्दी असते. असे असले तरी अनेक वर्षांपासून या स्थानकाचा कायापालट होत नाही. कुणी बस स्थानकाकडे लक्ष देत नाही आहे. एक तर बसेस ची गर्दी आणि त्यातही फलाट संख्या कमी आहे. त्यामुळे बसेस इतर ठिकाणी उभ्या असल्याचे चित्र पहावयास मिळते. येथील फरशी आणि फ्लोरिंग सुद्धा उखडले असल्याने बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. सोबतच प्रवाशांसाठी उभारलेले गेलेले ‘उपहार गृह’ सुद्धा कसे तरी थोड्याशा जागेत ठाण मांडून बसले आहे. एकंदरीत मलकापूर आगारचा व्याप बघता बस स्थानकाचे नूतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या मलकापूर आगाराचा कायापालट कधी होणार याकडे प्रवाशी जनतेचे लक्ष लागून आहे. अनेक जण बुलडाणा ते मलकापूर रोज प्रवास करीत असतात. त्या प्रवाशांशी संवाद साधल्यावर त्यांनी बस स्थानकाच्या परिस्थिती विषयी नाराजी व्यक्त केली.

बस स्थानकाची जी दुरवस्था झाली आहे. त्या कडे कुणी तर लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

मोठ्या बगीच्यातील मुंजा

Ghost In A Garden

एका शहरातील गोष्ट आहे. त्या शहरामध्ये एक मोठा बगीचा होता तो फार पुरातन इंग्रजांच्या काळात बनवलेला होता. बगीचा फार सुंदर, भव्य, विविध जंगली प्राणी, एक तलाव, एक विहीर, मोठाले वट वृक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी तेथे होत्या. अशा या बगीच्यात एक मोठी विहीर आहे त्याच्याच जवळ एक खूप मोठे पिंपळाचे झाड होते. तेथील लोक सांगतात की त्या झाडावर मुंजा राहतो. तो तेथे येणाऱ्या लोकांना त्रास देतो, खोड्या करतो तर कधी लहान मुलांचा जीव देखील घेतो.

एके दिवशी त्या शहरातील त्या बगिच्या पासुन दूर एका नगरातील तिन कुटुंब आपल्या मुलांनसह तेथे सुट्टी घालविण्यास आले. तो दिवस होता रविवार व विशेष म्हणजे अमावस्या ची पहिली रात्र व वेळ हा संध्याकाळचा होता. तिनी कुटुंब एकाच ठिकाणी बसलेले होते व त्यांची मुले तेथे आजू बाजूला खेळत होती. काही मुले व मुली झोक्या वर झुलत होती तर काही इतर खेळ खेळीत होती पण त्यांच्यातील एक लहान मुलगा घसरगुंडी खेळत होता. तो खेळत असताना वर गेला व खाली आला. त्या मुलाने रडत रडत येऊन आपल्या बाबाला सांगितले की बाबा बाबा कोण तरी मला खेळत असतांना लोटले. बाबाने विचारले तुझ्या मागे कोण होते ? मुलगा म्हणाला बाबा कोणीच नव्हते पण मला कोणीतरी खरच लोटले होते. बाबा म्हणाले बाळा असे कसे शक्य आहे तुझा पाय सटकला असेल व तु पडला असेल. मुलगा नाही ना बाबा मी खर खर बोलतो. त्या मुलाच्या वडलांनी त्याच्या मुलाच्या बोलण्या कडे नंतर लक्ष दिले नाही. दोघे मुल पकडा पकडी खेळत होती त्यातील एक मुलगा पडला व तो म्हणाला तूच मला लाथ मारून पाडले त्यांचे भांडण झाले दुसरा मुलगा म्हणाला मी नाही लाथ मारली. तेथे त्यांचे आई वडील आले व दोघांना घेऊन गेले. एका ठिकाणी हे तिन्ही कुटुंब बसलेले होते तेथे लहान मुलीला घेऊन येत होती ती जवळ आली व ती पडली. तिचा पती धावत आला व म्हणाला पाहून चालत जा. तेव्हा ती म्हणाली मला कोणीतरी लाथ मारून पाडले. तिचा पती म्हणाला मुर्खा सारखे काही पण बडबडू नको तू व सोनू शिवाय आणखी कोणीच नाही आजू बाजूला. त्या नंतर तिन्ही कुटुंब गप्पा मारत तेथेच बसले. तेथील सगळ्यांना असे काय होत आहे हे कळतच नव्हते.

काही वेळा नंतर एक मुलगी त्या पिंपळाच्या झाडा जवळील विहिरी जवळ गेली हे पाहून तिथे तिचे वडील देखील गेले. ते त्याच्या मुलीला म्हणाले बाळा काय विहीर पाहते. हो बाबा लगेच तिचे बाबा पाण्यात पडले ति मुलगी ओरडली व लगेच ती मुलगी देखील त्या विहिरीत पडली. इतर लोक धावत आले व त्यांना बाहेर काढले. त्या काकांना पोहता येत होते त्या मुळे त्यांना काहीच झाले नाही व मुलीला पडतांना पाहून त्यांनी तिला खाली झेलून घेतले. तेथील लोकांनी विचारले की कसे काय पडलात तुम्ही तेव्हा ते म्हणाले कोणी तरी माझा एक पाय उचलून मला विहिरीत पाडले. ती लहान मुलगी म्हणाली बाबा मला तर कोणी तरी उचलून फेकले. त्या मुलीची आई म्हणाली इथे तर तुमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. तेव्हा त्याच वेळी एक आजी तेथे आली तिने हे बोलले वाक्य ऐकले व ती म्हणाली, एक मुलगा होता. नंतर ती आजी काही मंत्र म्हणत होती. त्या आजीने तेथील सगळ्यांना दूर एका ठिकाणी घेऊन गेली, तेथे सगळ्यांना बसायला सागितले. त्या आजी खूप वयस्कर होत्या.

आजी म्हणाली मी एक गोट सांगते पण तुम्ही घाबरू नका म्या आहे तुमच्या संग. आजीला सगळे म्हणाले सांगा आजी आम्ही नाही घाबरत. आजी म्हणाली मी तेव्हा बोलली होती की एक मुलगा होता म्हणून. सगळे म्हणाले हो आजी. आजी म्हणाली तो मुलगा म्हणजे मुंजा भूत व्हय. तेव्हा सगळे घाबरले व बाया ओरडल्या. आजी म्हणाली ओरडू नको व बाये म्या हाये अठी तो इकडे आता येणार नाही. त्यातील एक मुलगा म्हणाला आजी मुंजा भूत काय असते. आजी म्हणाली जेव्हा एखांदा पोर लहान पणि मरते तो मुंजा बनते व पिंपळाच्या झाडावर जाऊन बसते. आजी पूढे बोलली लय जुनी गोट हाय इकदा तिन पोर अठी खेळायले आलते. तव्हा या विहिरीत तो पोऱ्या पडला त्याच्या सोबतचे जे पोर होती त्यांणले पोहता येत नव्हते. त्यामुळे ते त्याले वाचू शकले नाही व ते पोर मेल. तेव्हा पासनं ते पोर मुंजा बनून इथच भटकते व पिंपळाच्या झाडावर रायते. तुम्ही ज्या विहिरीत पडलते त्याच विहिरीत तो मेलता. तुम्ही या गावात नवीन दिसता. सगळे म्हणाले हो आजी. आजी म्हणाली इथ अमावस्येला आदल्या दिवशी व नंतरच्या दिवशी कुणी भी येत नाही. तुम्ही आले म्हणून तुम्हाले त्रास झाला. म्या अठी असती तर तुम्हाले अठी येऊ दिल नसत. आता रात्र होत हाय चला म्या तुम्हाले सोडून देते. या नंतर अठी हे तिन दिवस चुकून बी यायचं नाय लक्षात ठेवा पोरहो.