शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना- अजिंठा लेणी

tourist spot near buldana

जगविख्यात असलेली अजिंठा येथील लेणी पर्यटकांचे आवडीचे स्थान राहील आहे. देशविदेशातून हजारो लोक याठिकाणी भेट देत असतात. बुलडाणा पासून फक्त ५0 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोणत्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.

अजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे. औरंगाबादहून दिवसभर बसेस असतात. तसेच बुलडाणा येथून सुद्धा जाण्यासाठी भरपूर बसगाड्यांची सोय आहे. अजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. याशिवाय वेरुळयेथील लेणी सुद्धा अप्रतिम आहेत. वेरुळहे औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत आहे. दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशातील एकमेव लेणी आहे.

खाली बसून जेवण्याचे काय फायदे

eat food on sitting on floor

दिवसेंदिवस प्रगती होत आहे असं म्हणतात. जुनं तेच सोन असं फक्त वाक्यप्रचारा पुरतं मर्यादित राहील. बदलत्या जीवनशैलीला आज नययुग म्हटल्या जाते किंवा प्रगती होत आहे असं म्हटल्या जाते. जग बदलत आहे त्याचप्रमाणे मनुष्यही स्वतः मध्ये बदल करीत आहे. माणसाचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. स्वतः साठी सुद्धा वेळ काढणे कठीण. चालता फिरता काहीही खाणे, कशीतरी भूक भागवायची.  बऱ्याच ठिकाणी असे बघायला मिळते. कुणी उभे राहून जेवण करतात तर कुणी टेबल खुर्चीचा वापर करतात. म्हणे, सुशिक्षिततेचा प्रश्न आहे. बहुतेक ठिकाणी विविध प्रकारचे डायनिंग टेबल दिसून येतात कारण ती प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. लग्न असो वा घरगुती,. सामाजिक कुठलाही कार्यक्रम असो पंगत (जमिनीवर बसून जेवणे) कालबाह्य होताना दिसून येत आहे. लग्न किंवा कुठल्याही कार्यक्रमात टेबल खुर्ची वर बसून जेवणे, बुफे पार्टी म्हणजे उभे राहून जेवणे या गोष्टी तर प्रतिष्ठा दर्शविणाऱ्या झाल्या आहेत. परंतु असे करणे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते

आपली जी संस्कृती आहे, जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहे त्याला आपण जुन्या गोष्टी म्हणतो पण हा विचार करीत नाही की, ते जुनं आहे पण सोनं आहे. त्या पद्धतीमुळेच आपली ओळख आहे. पण आजची बदलती जीवनशैली विचार करायला भाग पाडते. या बदलत्या जीवनशैलीमुळे स्वास्थावर परिणाम होत असतात.  आपल्या संस्कृतीनुसार खाली बसून जेवल्याने काय फायदे होतात ते आपण आज बघणार आहोत.

जास्त जेवणापासून दूर राहता येते
सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसने आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण करण्यापासून वाचता येते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो . त्यामुळे पचन तंत्र सुरळीत चालते आणि लठ्ठपणा कमी करण्यास सहाय्य्यता करते व व्यक्तीचे व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते. पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीचे रोग पण दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की आपले पोट भरले. खुर्ची वर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे पण जात असतो. त्यामुळे जेवण करीत असताना आवश्यक नसतो त्यामुळे पाचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जाते.

पचन व्यवस्थित होते

मांडी घालून बसणे योगाचीच एक क्रिया आहे. या प्रकारे बसून जेवल्याने जेवण योग्य प्रकारे पचन होते. खाली बसून जेवण करताना घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि नंतर पुन्हा आपण ताठ होतो. असे जास्त वेळा केल्याने पोटातील स्नायू ऍक्टिव्ह होतात त्यामुळॆ पचण्याची गती वाढते.

कॅलरी कमी होते
जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येते. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगले असते. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.

गुढघे दुखीची समस्या दूर होते
जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, अशा समस्या दूर राहतात.

हृदयाला स्वस्थ ठेवते
योगासनांच्या या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असते आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहते. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.

अशाप्रकारे इतरही फायदे यापासून होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की, आपली भारतीय संस्कृती आहे तर आपण ही भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूया व यापासून मिळणाऱ्या विविध फायद्यांचा लाभ स्वतः साठी करून घेऊयात.

रस्त्यावर फेकलेला कचरा

रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माघे वळून बघितले तर समजले तो गाय छाप मळत होता!!

गंगीचा उपचार

ghost story

झपाटलेली गंगीचा पुढील भाग

आणि आजोबा सुद्धा तिथे आले व त्यांनी सांगितले की बाळ्या…. ए … पोरा. हे अमानवीय दिसतया गड्या हा सगळा खेळ त्योच आहे… आणि ते घरात निघून गेले. मामा उठले आणि एवढ्या रात्रीच निघाले मामीने विचारले अव कुठी चालले इतक्या राती ? तर मामा काई बोलले नाई. आज्जी बोलली की जा बाळ्या यळ झाली आता त्या माय ले बोलवायची तेच लावीन आता एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष. मी तस आईला वीचारलं की आज्जी कुठल्या माय बद्दल बोलतेय. आईचा सुद्धा स्वर मंद झाला आई सुद्धा बोलली सोनू बाळा तू खरच यात पडू नकोस ती माय महाकालीची एकनिष्ठ भक्त आहे. तीला खूप काही समजते. मी लहान होती तेव्हा पासून तिला बघते एकदा आजोबांना भूत दिसलं होत तेव्हा घर गावात होत आणि आजोबा रात्री शेताहून पाणी देवून येत होते तेव्हा त्यांना नाल्यातून येताना एक माणूस भेटला होता आणि त्याने चक्क आजोबांना तंबाखू मागीतली होती आजोबांनी तंबाखू दिली तर त्याने ती घेतली आणि खाल्ली आणि आजोबांसोबत गप्पा करू लागला जेव्हा वेस जवळ आली तेव्हा तो बोलला की थांबा थोड मी पाणी पेतो मले तहान लागली आजोबांनी त्याला सांगीतले की एवढ्या रात्री कुठे दोर-बकेट शोधणार आणि पाणी काढणार…. घर जवळच आहे घरी चला चहा प्या, तसाच तो खीदी-खीदी हसायला लागला आणि त्याने आजोबांना वेसीजवळच्या वीहरीत ढकलले आणि झाडावर जाऊन बसला असे काहीतरी घडले होते तेव्हा आजोबा खूपच आजारी पडले होते काहीही केले तरी त्यांची तब्येत सुधारत नव्हती तेव्हा याच मायने त्यांचा उपचार केला होता.
ठीक आहे सोनु बाळा तू झोप आता रात्र फार झाली आहे. व आई झोपली पण मला कशाची झोप येते माझी उत्सुकता आणखी वाढली.आणि रात्र कल्पना करण्यातच गेली.
सकाळ झाली थोडा काळोखच होता मामा एका काळ्या कपड्यावाल्या बाईला घेऊन आले त्यांच्या गळ्यात काही वेगवेगळ्या मण्यांच्या माळा होत्या त्या काळोखात सुद्धा चमकत होत्या. हातात भारी वजनाची वाकडी तिकडी काडी होती. त्यांच्या खांद्यावर झोळी होती. मी दुरूनच हे सर्व पाहत होतो. मामा आले तसे घरातील सर्व तसे रात्रभर जागीच होते ते सर्व ओसरी मध्ये जमा झाले त्या मायने आजी-आजोबांना जय मा काली म्हटलं आणि ओसरीच्या बाहेरच उभी राहली आणि बोलू लागली हे जागा आवेशीत होयेल हाये….. आठीसाक काई असल्याचा मले भास हुन रायला…. . बाहीरच हाये बंद…. उपरी हवा वायते आठीसाक…. डाक… डाक…. डाक… डाकीण शाकिन काई बी असू शकते. लय बेक्कार हालत होयेल हाये ढोरायची. हूंम…. हुं…. नाय नाय अशी काही विचित्रच ती माय बोलत होती…. म्या काई वस्तू सांगते त्या आताच्या आता मायाजोळ आणून द्या अन आज्जी-आजोबा मामा सोडून बाकीचे बंदे घरात निगुन जा… आम्ही सर्व तीथून घरात गेलो मी खीडकीतून सर्व बघत होतो त्या माय ने एक ठिकाणी चार लिंबू ठेवले त्यावर काही तरी उच्चार करत ते घराच्या चारही कोपऱ्यात जमिनीत दाबायचे सांगीतले. मामाने तसे केले. मग त्यांनी काही लाकडे पेटवली व तिथे बसल्या आणि विस्तव तयार केला आणि तो विस्तवावर राय टाकली आणि धूप घेऊन फिरत असतानाच त्यांना चिंचेच्या झाडाखाली काहीतरी दिसलं आणि अचानक त्या झाडाखाली थांबल्या आणि मोठं-मोठ्याने ओरडू लागल्या बाळ्या….ओ….बाळ्या…. पोरा हे पाय रे…. तसे मामा तिकडे धावत गेले.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

महापुरुषाची विटंबना करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सोशल मीडियावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

व्हाट्सऍपच्या एका क्रमांकावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले असून सदर कृत्य हे निंदनीय आहे. तसेच नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  त्याचा संग्रामपूर तालुका माळी समाज आणि सावता परिषद यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबद्दलची तक्रार संग्रामपूरचे तहसीलदार आणि तामगाव पो.स्टे चे ठाणेदार बी.आर गीते यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आणि माळी समाजातील महिलांची टिंगल उडविण्यात आली.  या गीतामुळे समाजातील महिलांचा व मुलींचा अपमान करण्याचे काम करण्यात आले असून या दोन्ही प्रकरणात संबंधित व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी साहेबराव बोदडे, गजानन ढोकणे, राम निमकर्डे, नारायण सावतकार, विनोद राजनकार, अनंता वानखडे, अनंत खिरोडकार, संदीप मानकर, आकाश मेहेत्रे, गणेश वानखडे, सुरेश सातव यांनी केली आहे.

तसेच एमएच २८.इन बुलडाणा सुद्धा या घटनेचा निषेध करीत आहे. 

प्रतिनिधी: आकाश पालीवाल पातुर्डा

कंडक्टर आणि पहेलवान

marathi vinod

एक ६ फूट उंच पहेलवान माणूस एस टी मधून जात
होता.

कंडक्टर :- काहो भाऊ तिकीट घेता काय ?

पहेलवान :- मीनं आजलोक एस टी मंदी कधीच तिकीट नाई घेतलं ………

कंडक्टर घाबरला.. ही गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली की त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बॉडी मस्त झाली तो ही पहेलवान झाला..

एके दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..

पहेलवान : नाही

कंडक्टर :- तुया बापाची गाडी हाये का बे, की तू तिकीट नायी घेत तं ?

पहेलवान :- पास हाये मायाजोय… 😛

झपाटलेली गंगी

horror story in marathi

माझे वडील नोकरीला असल्यामुळे आम्ही शहरात राहतो. आजकाल दैनंदीन जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे आणि त्यामध्ये निवांत वेळ फारसा मिळत नाही. आणि मिळलच तर तो जीवनावश्यक कामे करण्यात, कुटुंबाला वेळ देण्यातच निघून जातो. त्यामुळे भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणे हे अशक्यच झालेले आहे. असे विषय आजही ग्रामीण भागात फार चवीने बोलले जातात.

मी १० वी ला शिकत होतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मजा मारण्यासाठी माझ्या मामाच्या गावाला जायचो. मामाचे घर तसे धाब्याचे होते. जुन्या पद्धतीने बांधलेले. त्यातल्या त्यात ते शेतातच बांधलेले खूप मोठे, एकत्रित कुटुंब पद्धती माझ्या आजोबांना आवडायची, त्यामुळे आजी,आजोबा, ३ मामा, मामी, आत्या असे एकंदरीत शेतात काम करणारे गडी माणूस पकडून, १५ जण तिथे राहायचे. घराच्या समोरच थोडा बागबगीचा बनवलेला. बाजूलाच गुरांचा गोठा. आणि त्यात भरपूर गाई-म्हशी आणि बैल होते.

आम्ही शहरात राहणारे म्हटल्यावर छोट घर आणि त्याच छोट्टया जागेत वावरायचं-खेळायचं पण इकडे मामा कडे मोठ्ठ घर ते ही शेतात, त्यात आमच्यासाठी बनवलेली बाग, खेळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात मोकळ शेत. दिवसभर तिथेच उनाडक्या करायचो. माझ्या मामाला दोन मुल आणि मावशी, आत्या, या सर्वांची मुले-मुली आणि या सर्वांत मी मोठा  आणि सर्वाचा लाडाचा. खेळताना सकाळ ते संध्याकाळ कशी होऊन जायची कळायचं सुद्धा नाही. मामा सुद्धा मला विविध शेतीचे कामे,शेतीची माहिती द्यायचे तसेच बैलगाडी चालवायला शिकवायचे, आणि संध्याकाळी गाईचे दुध काढायला शिकवायचे. मी जेव्हा तिथे गोठ्यात जायचो तेव्हा त्या म्हशी पाहून भीती वाटायची कारण त्यातली एक म्हैस माझ्याकडे काही तीव्र आवेशाने बघायची जसकाही मला शिंगणे फेकून देणार. मी मामाला सांगितले की ही म्हैस इतर गुरांपेक्षा थोडी वेगळीच दिसते. त्यावेळी मामाने सांगितले की या गोठ्यात सर्वांत जास्त दुध देणारी व माझ्या परिस्थितीला बदलणारी हीच गंगी आहे. काही महिन्यापासून ती काही विचलित असते दोनदा तिचे रेडकू मरण पावले. सध्या बी ती गाभण आहे काय हुईल या काई दिवसात ते पांडुरंगच जाणो बाबा. तेव्हा पासून काही तिचे लक्ष ठीक दिसत नाहीत गड्या. तिला कुणी काही केल असाव, अंगावरून गेल असाव काई किंवा काई बाहेरच असाव… मला कळाल नाही की बाहेरच म्हणजे काय ? मी तसाच आजी कडे गेलो व आजीला विचारले की आज्जी मामा असे असे बोलले की बाहेरच म्हणजे काय हे मला कळाल नाही ग. जसे विचारले तसे आजीने मला जवळ बसवले व सांगू लागली बाळा तू यात पडू नकोस आणि गप्प झाली जा तू बाहेर खेळ. तरी माझी जिज्ञासा काही शांत होत नव्हती तसे मी आबा कडे गेलो ते आराम करत होते. तसा मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो, त्यांनी माझ्या कडे बघितल आणि बोलले की कसल्या विचारात आहेस सोन्या. मी त्यांना सर्व सांगितले तेव्हा त्यांनी तर मला तंबीच दिली की, तू आज नंतर त्या गोठया कडे जाणार नाहीस. आणि या प्रकारा पासून दूरच राहशील. ती लोक मला जेवढी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती तेवढा मला ते बाहेरच नेमक काय हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली. दिवस जात होते माझे सवा लक्ष तिच्या प्रसूती कडे लागून होते आणि एक दिवस संध्याकाळी तिला परत रेडकू झाल आणि सर्व खुष झाले. पण मामा कुठल्या तरी टेंशन मध्ये दिसत होते मी राहवून विचारलं, काहो मामा आता झाल ना तिला रेडकू आणि बघा तिच्या जवळच आहे ते.  आता तर खूष व्हा तर मामा बोलले की मला ही तुफान येण्यापूवीची मशान शांतता दिसते गड्या.  ते पिल्लू काई अलगच दिसून रायल. तुमी जाऊन झपा मी येतोच. माझी आई मला घेऊन गेली आम्ही जाऊन झोपलो. तेवढ्यात काही वेळाने ती म्हैस कावऱ्या-बावऱ्या सारखी करायला लागली तिने हंबरायला सुरवात केली तिचा आवाज आणि तो आक्रोश त्यामुळे सर्वांची झोप उडाली. आम्ही अंगणात जाऊन बघितलं तर मामा सुद्धा रडायला लागले आणि बोलत होते की गंगे यावेळी पण म्या काईच नाई करू शकलो जे व्हायचं नव्हत ते घडल.

क्रमश :

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

एस टी होणार वायफाय

wifi in MWRTC Buses

एसटी बसेस मध्ये नेहमी काही ना काही प्रयोग होत असतात. मागेच टपावरील कॅरियर काढून टाकण्यात आले होते आणि सामानासाठी एसटी च्या दोन्ही चाकामध्ये जागा करण्यात आली. यावेळीसुद्धा एसटी ‘वायफाय‘ होणार असून एसटी मध्ये फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजन करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एसटी आगारामध्ये ही सुविधा प्रथम सुरु करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ही सुविधा सर्वत्र चालू होणार असून या वायफायचा वापर कसा करायचा याबद्दलच्या सूचना एसटी बसच्या सीटच्या मागे देण्यात आल्या आहेत. या सेवेद्वारे एसटी सुद्धा हायटेक होत आहे.

अनेक आजारांवर एकमेव उपाय – इलायची

health beenefits of cardmom

हायपर टेंशनशी लढत असलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात. जर आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये थोडे बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. आणि औषधांपासून मुक्ती देखील मिळू शकते.

हायपर टेंशनने लढत असणारे लोकानी नियमित रूपाने फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच जेवणात मिठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये प्राकृतिक उपाय म्हणजे इलायची आहे. हो खरच आहे, इलायची फक्त स्वादासाठीच च नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

इलायचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील इलायची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही इलायचीचा वापर करू शकता. इलायची पाचन क्रियेला दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते. ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार इलायची चे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

इलायची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक इलायची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी इलायची ने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी इलायची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास इलायची यातून तुमची सुटका करते. तीन इलायची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते. इलायची मध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एकइलायची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या. अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर इलायची उत्तम. त्यासाठी इलायची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास इलायची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात इलायची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

जाणून घेऊया आपण वेबसाईट चे फायदे कोणते ?

buldana online websites

मित्रांनो, सध्याचे युग डिजिटल बनत चालले आहे. आधी आपल्याला बस तिकीट काढण्यासाठी बस स्टॅन्ड अथवा एजंट कडे जावं लागायचं. बँकेचे व्यवहार करण्यासाठी रांगेत तासंन तास उभे राहावे लागायचे, कुठलीही वस्तू खरेदी साठी बाजारात जाणे आणि वेळ आणि पैसे खर्ची घालणे असं करावं लागायचं परंतु आता काळ बदलत चालला आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या बोटाच्या एका क्लिक वर आल्या आहेत. हे सर्व आपण वेबसाईट आणि एप द्वारे करू शकतो.

आज जाणून घेऊया आपण वेबसाईट चे फायदे कोणते ?
आपण कुठल्याही प्रकारे वेबसाईट बनवू शकतो. इतरांसाठी, स्वतः साठी, संस्था, कंपनी साठी. माहिती देण्याची देवाण घेवाण करण्यासाठी किंवा पैसे कमविण्यासाठी सुद्धा आता वेबसाईट हा चांगला पर्याय आहे. आपले दुकान आणि जागा असलीच पाहिजेत आणि त्यासाठी सकाळ ते संध्याकाळ असा वेळेचा नियम यामध्ये नाही. आपण हवे तेव्हा आणि ग्राहक पण त्याच्या वेळेनुसार काहीही खरेदी करू शकतो किंवा माहिती मिळवू शकतो हा सर्वात मोठा फायदा. याशिवाय तुम्ही कुठंही असले तरी तुम्ही दूरदूर पर्यंत तुमचं उत्पादन पोहोचू शकता. तुम्हास मर्यादा आड येत नाहीत. घरबसून, किंवा कुठल्याही ठिकाणाहून, इतकंच नाही तर आपण वापरत असलेल्या मोबाईलवरून सुद्धा आपण आपला व्यवसाय करू शकतो किंवा कुठलीही माहिती मिळवू शकतो. वेबसाईट मुळे जग अतिशय जवळ आले आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात होत असलेल्या घडामोडी आपल्याला सेकंदात समजतात. असे अनेक फायदे आहेत. त्यासोबतच इतर माध्यमांचा विचार केला तर वेबसाईट ही प्रिंट जाहिरातीं पेक्षा स्वस्त आहे आणि वर्षभर त्याद्वारे आपल्या प्रोडक्टस् आणि सर्विसेस् ची जाहिरात कमी खर्चात करु शकतो. (वर्तमान पत्रामधली जाहिरातींचा कालावधी फक्त १ दिवस असतो पण त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात.) २४ तास आपला प्रोडक्टस् आणि सर्विसेस् विकणारी सेल्स एक्झिक्यूटिव म्हणजे आपली वेबसाईट! इकडे आपलं दुकान २४ तास चालू असत आणि या दुकानात जगभरातली माणसं येतात , अगदी आपण झोपलेले असताना आपले प्रोडक्टस् विकले जातात. वेबसाईट मार्फत तुम्ही थेट ग्राहकांशी संपर्क साधू शकता. म्हणजे तुमचे ग्राहक तुमच्या प्रोडक्टस् बद्दलचे त्यांचे मत तुमच्या समोर मांडू शकतात. वेबसाईट मुळे आपला बिझनेस आपण वाढवू शकतो आपल्या इन्वेस्टरला आपल्या कंपनी बदल माहिती, आपण काय मिळवलं ?
आणि भविष्यात काय मिळवणार आहोत? ते दाखवू शकतो. असे भरपूर फायदे आपल्याला वेबसाईट द्वारे मिळतात. आज आपण फायदे
काय ते बघितले पुढच्या भागात किती प्रकारच्या आणि वेबसाईट कशा प्रकारे कार्य करतात ते बघूया.

बछडे खाणारे रक्तपिपासू पिशाच्च

आजकाल जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किंवा आपण ही कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टींमध्येच उरले आहेत . असो, आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडला आहे. तेव्हा मी ८ वीला शिकत होतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो. मामा , मामी , आजी असे सर्व जण तिथे असायचे सोबत मामाची मुले त्यामुळे मज्जाच मज्जा असायची. मामीचे घर जुने होते परंतु खूप मोठे , समोर छोटीशी बाग, आणि बाजूला गुरांचा वाडा. तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले की गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो २ दिवसात मरतो. आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंग मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं की हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतरी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात. मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला. तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येतो आणि काय करायचं ते बघतो . दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी जागीच होतो कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहिरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहिरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत. बछडे मरत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्यावर तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्याचेच तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली की सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं की पूजा आता चालू करू. पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची यादी मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो जोरजोरात कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . त्यावेळी ज्या घटना झाल्या त्याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुद्धा! आम्हाला वाटल की कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच, लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला. मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरी सुद्धा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रि
काने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले की यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . पूजा करताना अनेक विघ्न पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय. ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला. उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला आणि अचानक चक्कर येऊन तिथेच पडला. लोकांनी त्याला उचलले आणि तोंडावर पाणी मारले. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यावर तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा. त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या. त्या नंतर पुन्हा कधीच गायीच्या बछड्याचा मृत्यू झाला नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

काही तांत्रिक कारणामुळे एप मध्ये अडचण

buldana mobile application

सर्वाना सूचित करण्यात येते की, आपल्या एमएच २८.इन च्या सर्वर मध्ये काही काम चालू असल्याने वेबसाईट वर आणि एप वर काही अडचणी येत आहेत. तरी आपणा सर्वानाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित तुम्हाला ‘अपडेट’ मिळत नसतील. तसेच आपल्याला मोबाईल\मध्ये “null rsponse” मेसेज मिळत असेल. काम चालू असल्याने अशी अडचण येऊ शकते. तात्पुरती खंडित झालेली सेवा पूर्ववत सुरु झाली असून काम प्रगतीपथावर आहे. तरी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. अधिक वेगवान आणि जलद सेवा देण्यासाठी एमएच २८ टीम कार्यरत असून त्यास थोडा कालावधी लागू शकतो.

धन्यवाद !
– टीम एमएच २८

बुलडाणा येथील एटीएम वर मिळते ‘झेड सेक्युरिटी’

बुलडाणा शहरात किमान २० एटीएम मशीन असतील. त्यामध्ये अनेक मोठ्या बँकासोबत इतर पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांचे एटीएम आहेत. २ महिन्याआधी झालेल्या नोटबंदीमुळे ही सर्व एटीएम भरलेली असायची. पैशानी नव्हे तर गर्दीने. पैसे असो वा नसो परंतु एक जण आत शिरला की त्यामागे इतर जण असे करता करता रांगच लागायची ती अजून सुद्धा कमी झालेली नाही. बुलडाणा शहरात असलेल्या या एटीएम मशीन पैकी फक्त काहीच मशीन मध्ये पैसे मिळतात तर काही अनेक दिवस तसेच पडलेले असतात. अनेक एटीएम सकाळ ते संध्याकाळ आपली “ड्युटी” बजावतात. संध्याकाळी त्यांचे ‘शटर डाऊन’ होत असते. त्यामुळे लोकांच्या समस्येत अजूनच भर पडते.

प्रत्येक एटीएम मध्ये एक सूचना लिहिलेली असते “एका वेळी एकाच व्यक्तीने प्रवेश करावा” इ. ही सूचना मनुष्यासाठी असते. ती सूचना वाचून तिथे पैसे काढण्यासाठी येत असलेली लोक त्याचे तंतोतंत पालन करतील अशी ‘खोटी आशा’ ती सुचना लिहिणाऱ्यास वाटली असावी. परंतु त्याचा घनघोर अपमान करण्याचा विडा काही सुशिक्षित नागरिकानी उचलला आहे. सुचना असलेली ती पाटी/फलक समोर असून सुद्धा खिशात एटीएम मशीन चे कार्ड घेऊन फिरणारे अनेक बहाद्दर एटीएम असलेल्या खोलीत गर्दी करतात. पैसे काढत असलेल्या व्यक्तीभोवती गर्दी करून उभे राहतात जणू काही त्याला ‘झेड सेक्युरिटी’ पुरवीत आहेत. तर काही जणांना मोबाईल वर बोलण्याचा मोह एटीएम मशीन कक्षात सुद्धा आवरला जात नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतो परंतु तो सुद्धा कुठे निघून गेलेला असतो तो संध्याकाळ पर्यंत कळत नाही.

हा वृत्तांत जवळपास सर्वच ठिकाणचा आहे. काही एटीएम याला अपवाद असतीलही परंतु पोलीस मैदाना जवळ असलेल्या एसबीआय च्या एटीएम वर हमखास दिसून येतो. अशा सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक हवा आणि त्याने तिथे येत असलेल्या लोकांना मार्गदर्शन करून शिस्तीचे पालन करायला मदत केल्यास परिस्थिती बदलू शकते.

पातुर्डा येथे भरदिवसा चोरट्याचा डल्ला

नितीन खंडेराव, प्रतिनिधी: संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे आज दुपारी ३:३० श्री लतिश ज़ुम्बरलाल भूतड़ा यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातून १० हजार रुपायांची रोकड त्यांच्या घरातून लंपास केली. पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय जवळ श्री. भुतडा यांचे घर आहे. त्यांच्या घरी आज दुपारी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून घरातील १० हजार रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनचे श्री. शेळके आणि साळवे हे तपास करीत आहे.

आता एटीएम मधून १० हजार रु. काढता येतील

नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून आता २ महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. शहरी भागात काही प्रमाणात वातावरण पूर्ववत होत असले तरी ग्रामीण भागात अजूनही म्हणावा तो फरक पडलेला नाही. आधीच ग्रामीण भागात एटीएम नाहीत. जिथे आहेत तिथे सुद्धा गर्दी दिसूनच येते. त्यातच पैसे काढण्याला मर्यादा होत्या. त्या वाढून आता १० हजार पर्यंत करण्यात आल्या आहेत.

नोटबंदी केल्यानंतर देशभरात पैशाची टंचाई निर्माण झाली होती. सकाळी भरलेली एटीएम २-४ तासांतच खाली होत होती. २ हजार रु. पर्यंतची मर्यादा असल्याने आणि दिवसातून एकदाच पैसे काढता येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्या नंतर ही मर्यादा साडेचार हजार आणि आता १० हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मात्र बँकेतून अजूनही आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम आहे.

चालू खात्यातून आता १ लाख रु.पर्यंत काढू शकतो. ती मर्यादा आधी ५० हजार होती. बँकेनं एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा दिला आहे.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन शेगाव येथे संपन्न.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन वर्ष २३ वे.

माळी सेवा मंडळ खामगांव, माळी समाज बहुउद्देशीय मंडळ शेगांव व युग पुरुष महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन शेगांव येथे दि. १४ ते १५ जानेवारी २०१७ दोन दिवसीय आयोजित केले होते. आयोजनाचे स्थळ महात्मा ज्योतिबा फुले मंगल भवनाची नियोजित जागा, संत श्री सावता नगर, नवोदय विद्यालयाजवळ, खामगांव रोड शेगांव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र येथे संपन्न झाले.
येथे प्रमुख मान्यवर म्हणुन माजी. आमदार श्री. कृष्णरावजी इंगळे जळगांव जामोद,
माजी. आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे बाळापुर, मा. अध्यक्ष श्री. संजय अवधुतराव वानखेडे अकोला, इंजी. श्री. सुभाष नामदेवराव निखाडे खामगांव आणि इतरही अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.
महासंमेलनाची सुरुवात दिप प्रज्वलनाने मा. प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर मान्यवरांचे पुष्प हाराने स्वागत करण्यात आले. येथे प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. त्यानंतर राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री कमल तायडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी.आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे, उद्योजक मनोज महाजन हे हि उपस्थित होते. उदघाटन पर कमल तायडे यांनी आपले विचार मांडले मुला – मुलींनी रंग रूप न पाहता एक मेकांचे गुण पाहावे. असे करणार तरच संसारात सुख व सौख्य मिळेल. मुलींनी मुलाची नौकरी न पाहता निर्व्यसनी, गुण व त्याचे विचार पहावेत असे केल्यास तुम्ही महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार व एका चांगल्या समाजाची निर्मिती होईल. एवढे बोलून त्यांनी आपल्या विचारांना पूर्ण विराम दिला. व इतर मान्यवरांनी हि आपले विचार व्यक्त केले. तसेच ना. श्री. भाऊसाहेब फुंडकर, आ. श्री.आकाशजी फुंडकर व आ. श्री. बळीरामजी सिरस्कार यांनी हि महासंमेलनाला भेट दिली. त्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. माळी समाज सभागृहा साठी १५ लाख रुपये दिलेले असून आ. श्री आकाशजी फुंडकर यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयचा निधी दिला जाईल अशी घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली. या महामेळाव्यात चि. राहुल सदानंद खंडारे तसेच दिशा खंडारे यांचा विवाह योग जुळला. या राज्यस्तरीय महामेळाव्यात ८५७ युवक युवतींचा परिचय संपन्न झाला. या महामेळाव्याचे आभार प्रदर्शन श्री अनिल गिऱ्हे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घोषण वनिता उंबरकर, नीलिमा इंगळे व कल्पना तायडे यांनी केले. अशा प्रकारे १४ ते १५ जानेवारी २०१७ रोजी चे २३ वे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन संपन्न झाले.

विविध गुणांनी युक्त एक कल्पवृक्ष- कडुनिंब

कडुनिंब हा वृक्ष आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. रस्त्याच्या कडेला, शेतात, जंगलात, तर अंगणात सुद्धा याने स्थान प्राप्त केलेले आहे. या जंगलातील वृक्षाला घराच्या परिसरात अंगणात स्थान प्राप्त झाले ते याच्या विशिष्ट गुणांमुळेच. तर आज आपण या कल्पवृक्षाची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
कडुनिंब हा अंदाजे ३०-४० फूट सहज वाढणारा दाट सावली देणारा वृक्ष आहे, त्याची हिरव्या रंगाची करवतीसारखी पाने, आणि सुगंधित पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले या वृक्षाचे सौंदर्य खुलवतात. याची फळे हिरव्या रंगाची व पिकल्या नंतर पिवळ्या रंगाची, कडू चवीची फळे असतात. हि निंबोळी म्हणजे लहान मुलांचा खेळातील आंबा.
या झाडाची निर्मिती बऱ्याच ठिकाणी नैसर्गिकरित्याच होते. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत .
विविध गुंणांनी युक्त असा हा वृक्ष. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. या पासून उत्तम प्रकारचा डिंक मिळतो. याच्या अनेक गुणांमुळे हा सर्वांचा आवडता आहे. हा जंतुनाशक असल्यामुळे मनुष्य, पशु, पक्षी, पीक, इ. सर्वांच्या उपयोगाचा आहे. धार्मिक दृष्टीने गुढीपाडवा हा महत्वपूर्ण दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आणि नववर्षारंभ या दिवसापासून होतो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सेंधव मीठ, ओवा, गूळ, हिंग, हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खाल्ल्या जाते. गुढी उभारताना गुढी वर याचा वापर करतात. तसेच गुढीला कडूनिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात.. घरातील थोर-मोठी लोक नेहमीच सांगत असतात हा वृक्ष म्हणजे ब्रम्हदेव आणि जगन्नाथाचे प्रतिक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाहि तो प्रिय आहे.यावर भैरवाचा निवास असतो. या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. हे झाड तोडणे म्हणजे एकाद्या तरुण मुलीची हत्या करण्या इतके अशुभ मानतात. ग्रामदेवतेच्या पूजेत या वृक्षाच्या डहाळ्याना विशेष महत्व आहे. या झाडाचे सरपण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात. असे ऐकण्यात आहे.
तसेच या झाडाचे लाकूड टिकाऊ असते इमारती साठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. तसेच शेतीची अवजारे तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. झाडाच्या फळांपासून तेल काढतात आणि उरलेला चोथा झाडांना कीड लागू नये म्हणून मातीत मिसळतात. तसेच. धान्याला कीड लागू नये म्हणूनही ह्याची पाने धान्यात घालतात. हि पाने जाळल्यास त्या धुराने डास मरतात. घराच्या बांधणीत दारे किंवा खिडकीच्या चौकटीत या लाकडाचा उपयोग करतात कारण त्यामुळे अनिष्ट शक्ती दूर राहते असा समज आहे.
तसेच साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने अशा विविध गोष्टींसाठी कडुनिंबाचा वापर होतो. यापासून विविध औषधी बनवल्या जातात.
रोजच्या दैनंदिन जीवनातील याचे महत्व:
अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आजही बहुतेक ठिकाणी सकाळी दात घासण्यासाठी याच्या काडीचा वापर होतो. याने दात व हिरड्या मजबूत होतात.
कडुनिंबाची पाने रोज चावून खाल्ल्यास शरीराला फायदा होतो याने रोगप्रतिकार शक्ती वाढते असे म्हणतात.
कडुनिंबाच्या पानांचा रस घेतल्यास रक्तर शुद्ध होते. मान्य आहे हा रस अतिशय कडू असतो, पण निरोगी आरोग्यासाठी याचा उपयोग अवश्य करायला हवा.
कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ कमी करण्यास मदत होते. तसेच श्वसना संबंधित विकारांवर याचा उपयोग होतो.
पोटाच्या विविध आजारांवर कडुनिंब उपयोगाचा ठरतो.
मधुमेहसाठी तर उत्तमच शर्करा नियंत्रण ठेवण्याचे काम करतो.
चांगल्या प्रकारे अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे.
जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्याि कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो.
याच्या फळांमधून तेल निघत ते जंतू नाशक असते व्रण, खरूज, इ. त्वचाविकारांवर तसेच संधिवातावरही गुणकारी आहे.
सांधेदुखीवर याच्या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो.
याच्या पानांच्या अति सेवनामुळे कामवासना कमी होते.
याच्या सालीचा उगाळून केलेला लेप सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर उपयुक्त आहे म्हणूनच याचा वापर उटण्यांमध्ये करत असावा.
रक्तअशुद्धी करणारा हा रस प्यायल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांपासूनही सुटका होते.
याची पाने पाण्यात टाकून उकळल्यास व त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा रोग दूर होतात.
केस गळत असल्यास कडुनिंबाचा वापर करावा.
कावीळ झालेल्या रुग्णाला सुद्धा कडुनिंबाचा रस दिल्या जातो.
अश्या विविध गुणांनी युक्त हा कल्पवृक्ष आहे तरी प्रत्येकाने घराच्या परिसरात याला स्थान दिले पाहिजेत आणि एक तरी वृक्ष जोपासला पाहिजेत. आज काळाची गरज आहे वृक्ष जगवणे…. म्हणून आजच सुरुवात करा आणि वृक्ष हेच मित्र समजून यांचे संघटन करा हेच वृक्षांचे संघटन उद्याच्या पिढीला सहाय्यक ठरेल.

अम्याचा दिमाख..

गुरुजी: कारे बॉ हुंडा म्हंजे काय ?

अम्या: ज्या वाक्ती एखांदा पोऱ्या एखांद्या पोरीले जिंदगीभर पोश्यासाठी तयार व्हतो,
त्याले प्रोत्साहन म्हणून त्याले जे काई रक्कम दिल्या जाते त्याले हुंडा म्हणत्यात.

गुरुजीन घरदार सोडलं अन वैरागी झाले..

कडक मास्तर

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो….
चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
गण्या- “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

मकर संक्रांत

सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. मकरसंक्रांत तशी तीन दिवस साजरी केल्या जाते भोगी,संक्रांती,किंक्रांती. स्त्रियांसाठी महत्वाचा उत्सवाचा दिवस.

भोगी:-
संक्रांतीच्या आधीच्या दिवशी म्हणजे आज भोगी आहे. भोगीच्या दिवशी रोज पेक्षा थोडे वेगळे पदार्थ करण्याची पध्दत आहे. मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, व दोन तीन भाज्या एकत्र करून भाजी बनवल्या जाते. प्रत्येकाचे श्रद्धास्थान व सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवितात. या दिवशी घरातील सर्व स्त्रिया डोक्यावरून पाणी घेतात अर्थात केस धुतात.
भोगी देणे- भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करून सुवासिनीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
संक्रांत:-
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण’ असे म्हणतात.
हा सण पौष महिन्यात येतो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
संक्रांतीस घरातील सर्व लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतात.घरातील स्त्रियांची सकाळ पासूनच लगबग सुरु होते. प्रत्येक घरातील स्त्री तिच्या नवऱ्या जवळ हट्ट करते कि मला यावेळी एवढ्याची साडी पाहिजेत, अशी साडी तशी साडी आणि तिचा हट्ट ती पूर्ण करतेच. घराची साफ-सफाई करणे. घराचा पूर्ण परिसर स्वच्छ करतात.अंगणात सडा टाकतात, त्यावर दारात सुशोभीत रांगोळी काढल्या जाते, नित्य नियमाने तुळशीची पूजा करणे,देवपूजा करणे हे त्यांचे नित्याचेच. शेजारी-पाजारी तिळगुळ वाटल्या जातो.. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिल्या जातात जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. आणि स्त्रियांची प्रतीक्षा सुरु होते दुपारच्या हळदी कुंकवाची. छान तयारी करून नवऱ्याने घेऊन दिलेली साडी नेसून,झक-पक तयारी करून, गंध,टिकली,पावडर लावून, वेणी-फणी करून केसांत गजरा गुंफून तयार होते. जसे एक सात्विकतेचे वातावरणच निर्माण होते…. उत्साहित होऊन हळदी कुंकवाची तयारी जोमात सुरु होते, तशी आपली संस्कृती ही कृषी संस्कृती असल्याने या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण अगोदरच्या दिवशीच वाणाच्या सर्व वस्तू आणून सुरीने कापून छोटे छोटे तुकडे करून ठेवल्या जातात. कारण त्यांचे म्हणणे आहे कि संक्रांतीच्या दिवशी काही चिरू येत नाही. तीळ गूळ वाटून विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. एकमेकींच्या घरी जातात, एकत्र येऊन प्रत्येकीला वाण वाटतात. वाणा मध्ये प्रामुख्याने हरभरे,वाटाणे,गाजर,बिब्याची फुले,ऊस,गहू,बोर,तीळ, आणि एखादी विशेष वस्तू प्रामुख्याने असतेच जसे कुंकाचा करंडा, टिकल्यांचे पाकीट याप्रकारे, अश्या कित्येक वस्तू एकत्रित करून सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. आणि एकमेकींना वाटल्या जातात. आणि उखाणे घेण्यात येतात प्रत्येक स्त्री आपल्या ‘प्राणप्रिय नवऱ्याचे’ लयबद्ध पद्धतीने नाव घेते.
उदा. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात ‘मुन’…….. रावांचे नाव घेते. मी आहे……….घराण्याची ‘सून’ अशे यमक जुळवून नाव घेतल्या जाते.

जणू हि प्रथाच आहे. यादिवशी सर्वत्र पतंग उडवण्याची प्रथा आहे सर्व मुले लगबगीने सकाळ पासूनच पतंग उडवण्याचे काम अगदी नचुकता करतात. भूक लागली म्हणजे तीळ-गुळाचा लाडू खायचा तसा तो आईच्या हातचा प्रेमाने बनवलेला लाडू चवीला खूपच छान लागतो त्यामध्ये गुळाची मिठास तर असतेच पण आईची ममता पण त्या गुळासोबत असतेच. आणि संध्याकाळी घरचे सर्व एकत्र येऊन गुळाची पुरण पोळी आणि लोणी लावून यथेच्छ भोजन करतात. .याच दिवसात एक वर्षा पर्यंतच्या लहान मुलांची लूट केली जाते अर्थात लहान मुलाला चौरंगावर किंवा पाटावर बसवून त्याच्या वयाची व थोडी मोठी बालगोपाल यांना घरी बोलवून मुलांची हौस म्हणून मुरमुरे,गोळ्या,चॉकलेट,बत्तासे,बोर,रेवड्या,अश्या विविध गोष्टी त्याच्या अंगावर टाकल्या जातात त्यावर जणू खाऊचा वर्षाव होतो. आस-पासची सर्व मुले तिथे उपस्थित राहून खाऊ गोळा करतात व त्यांचा आनंदोत्सव साजरा होतो.
तसे थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. कारण दिवस थंडीचे असल्यामुळे प्रत्येकाला उब हवी असतेच

आपणा सर्वांना मकरसंक्रांतीच्या एमएच २८. इन परिवारा तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा…….. तीळ गूळ घ्या व गोड गोड बोला…….

तिच्या मिलनाची आतुरता…….

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीवचा – दुसरा भाग

तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती ….. आता पुढे

तो तिच्याकडे सरकला पण त्याने कधी कल्पना सुद्धा केलेली नसावी कि असे काही होऊ शकते म्हणून. जसा तो तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरसावला तसाच त्याच्या घराजवळ राहणाऱ्या आजीबाईने त्याला थांबवलं….. “आजी बाई बोलल्या पोरा कुठं रे चालला… दिसत नाई व्ह्यय पुढं नाला हाय त्यो” जा बाबा जा थकून आला असशीन तू काई खाल्लंय कि नाई सकाय पासन. आणि आजीबाई निघून गेल्या. हा सुद्धा घरात आला फ्रेश झाला आणि विचार करू लागला कि ती आली होती कि हा आपला भास आहे, तेवढ्यात त्याला घरात रोजप्रमाणे मांजरींचे रडणे एकू आले. एका मांजरीने त्याच्यावर झेप घेतली तो दचकला. तेवढ्यात आजीबाई आल्या पोरा हा घे च्या…… पी. काई खाल्ल की नाइ आणि तवा कुठ रे चालला होतास ? पुढ नाला वायतो हे बी दिसलं नाय व्हय तुला……….. पडला असता त्यात अन काई झाल असत मंग……. काई इचार-बिचार त कराचा की चाल्ल आपलं कुठ बी…….. तो आजीला सांगू लागला की आजी मला इथे या काही दिवसात काही सुचत नाही काय होतंय माझ्या सोबत तर. मला वाटते की गावाकडे जाऊन याव. आजी बोलली मंग जा की लेकरा…… तुझे आई-बाप पण याद करत असतीन बग तुझी, जा कर तयारी. तो पण मनाशी बोलला येऊ २ दिवस राहून थोडं फ्रेश वाटेल व जे घडतेय यावर पण काही उपाय निघेल म्हणून तो गावी जाण्यासाठी तयारी करू लागला त्याने बॅग भरली आणि आजी ला सांगितले कि मी दोन दिवस गावी जाऊन येतो. तो गावी जाण्यासाठी निघाला….. बस ने गावाकडे निघाला बस मध्ये त्याला त्याच्याच गावचे एक बाबाजी भेटले त्यांनी स्वतःहून त्याला येणाऱ्या संकटाचे पूर्वसंकेत दिले त्याच्या गप्पा रात्रभर रंगल्या त्याला सुद्धा थोडा धीर आला तो त्याच्या घरी गेला… गेल्या बरोबर त्याच्या आईच्या गळ्यात पडला व रडू लागला त्याने त्याच्या घरी तिकडे घडत असलेला सर्व वृत्तांत सांगितला तसे त्याच्या आईने तर त्याला तिकडे परत जाण्यास मनाई केली कारण शेवटी ती आई तिची ममता आड आली…… पण त्याच्या वडिलांनी मुलाच्या जीवनाचा विचार केला कि हातची नोकरी सोडून कस चालेल. इथे गावात परत उनाडक्या केल्या पेक्षा बरा आहे तिकडे दोन पैसे तरी कमावतोय. शेवटी ते वडील त्यांना सर्व जबाबदारी बघावी लागते…… त्यांनी सांगितले कि घाबरायचे कारण नाही गावातील बाबाजी यावर काही तोडगा नक्कीच काढतील मग तो दोन दिवस त्याच्या मित्रांना भेटला आणि त्यांना तिच्या बद्दल विचारू लागला त्यांनी ते आधी जिथे भेटायचे त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी केली. शेवटी तो दिवस आलाच सकाळ झाली तशी जाण्याची तयारी करू लागला. तशी त्याची आई बोलली बाळा उद्याची तर अमावस्या आहे तू ती झाल्यावर जा पण तो बोलला की सुट्टी संपली मला कामावर जावच लागेल. त्याची आई म्हणे ठीक आहे आम्ही पण येतो मग तिकडे. तेव्हा त्या बाबाजींनी सांगितले कि गड्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेव. घरात सकाळ संध्याकाळ तरी देवपूजा करत जा. आणि तुला ताईत दिला तो गळ्यात ठेवत जा. बेटाईम कुठे हि फिरत नको जाऊ. निर्जन जागी जाण्याचे शक्यतो टाळावे, आणि इकडे जसा उनाडक्या करायचा,घरच्यांचं एकत नव्हतास पोरांसोबत कुठेही केव्हाही रानमाळात फिरणे,नदी-नाल्यात पोहायला जाणे असे धंदे बंद करायचेत आता. दोन दिवसाने तुझे लग्न करावे लागेल लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार करत जा. त्याचे बाबा बोलले तुला आताच्याच गाडीने जायचं तू जा पण आम्ही व बाबाजी दुपारच्या गाडीनं येतो घरची सर्व काम निपटून. मग बघू तिकडे आल्यावर काय करता येईल ते. तो हो बोलला (पण हा कसला देवपूजा आणि बाकीचे सांगितलेले करतो हा पक्का नास्तिक माणूस,या सर्व गोष्टीला न मानणारा, लोक आपल्याला काय म्हणतील या विचाराने ग्रासलेला) आणि निघाला गाडीत बसला आणि पोहचला तिकडे दुपारी. दरवाजा उघडला घर आवरले थोडा आराम केला आणि उठल्यावर बघतो ते काय त्याला एक चिट्ठी दिसली
त्याने ती उचलली आणि वाचू लागला त्यात लिहिलं होत कि मला तुला भेटायचे आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. मी तुझी या ठिकाणी वाट बघेल. त्याने तिला भेटायला जाण्याचा निश्चय तर फार पूर्वीच केलेला होता. मनोमन एवढा खुश झाला की उघड्या डोळ्याने तिच्या मिलनाचे स्वप्न रंगवू लागला. त्याने विचार केला कि दोन तासात तिला भेटून येऊ तो पर्यंत आई-बाबा काही येत नाहीत. आलेच तर आजी जवळ चिट्ठी देऊन ठेऊ आणि आजीला सांगून पण ठेवले की आई-बाबा आले तर त्यांना तुझ्या जवळ बसवून ठेव मी येतोच बाहेर जाऊन व तिथे तिला भेटायला जाण्याची तयारी केली. घराच्या परसबागेतून गुलाबाचे फुल सोबत घेतले. थंडीचे दिवस असल्याने उबदार व पावसा पासून रक्षण करणारे कपडे घातले,गवतातून जाव लागेल म्हणून चांगले बूट घातले, मोठा टॉर्च सोबत घेतला,सिगारेट चे पाकीट आणि सोबत लायटर तर होतेच पठ्ठयाकडे. सिगारेट साठी पण होते आणि काही काम पडले तर उपयोग पण होते.
वेळ संध्याकाळची होती त्याला फक्त तिचाच ध्यास कि एकदा तिला कधी भेटतो असं झालेलं तो निघाला पावसाळ्याचे दिवस त्यात सर्वत्र पाऊस पडून गेलेला आणि आजू बाजूने ठीक ठिकाणी डबके साचलेले त्यामधील बेडकांचा डराव….डराव आवाज, काजव्यांचे चमकणे, लाइटावरील किड्यांचा तो नकोसा वास,वातावरणातील गारवा,झाडाखालून जातांना अंगावर पडणारे पाण्याचे थेंब हे सर्व त्याला तिला भेटण्याचा उत्साह वाढवत होते, पण त्याला माहित नव्हते कि हे सर्व त्याच्यावर येणाऱ्या संकटा पूर्वीची शांतता आहे. हातात टॉर्च आणि गुडघ्या पर्यंत वाढलेल्या गवतातून वाट शोधत तो निघाला, गवतातून सळसळणारा आवाज जीवाचा थरकाप उडवत होता. तरी देखील नदी-नाले ओलांडत त्याचे पावलं सरसावत होती. नियोजित जागी पोहचला तेव्हा रात्र झाली होती पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरलेले. तिथे दूर दूरवर कुणीच नव्हते तो त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबला बघतो तर आजूबाजूला कुणी चिट-पाखरू सुद्धा दिसत नाही मनातच पुटपुटला हिला पण काय हीच जागा मिळाली भेटायला. मस्त बागेत भेटलो असतो. तेवढ्यात त्याच्या पाठीला कडक स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले. त्याला एखाद्या वजनदार माणसाचा मोठा पहाडी आवाज त्याला आला, थोडा तो घाबरला. त्याचे मागे वळून पहायचे धाडस होईना पण त्याने हिम्मत करून मागे वळून बघितले. तर एक कुणी स्मशानात काम करणारा भला मोठा धिप्पाड माणूस तिथे उभा दिसला. तो बोलला कि ए……….. पोरा…….. इतक्या रातच्यान….या म्हसनात काय करून रायला ?
भ्याव वाटत नाई काय तुले…… एकट्या-दुकट्या न आस रातच्या बेरात्च्या फिरू नाइ……….. हे जागा कशी कोणी चीट-पाखरू बी दिस्ते काय तुले अठी, जागा पाय्न नाई……………टेम पाय्न नाइ…………दिस बी पावसायाचे अन चाल्ला मारे फिरयाले………… अरे लेका माय-बाप, घरची लोक वाट पायत असतीन न तुई…………..अठी बाजून नाला वाय्ते हातभर गवत वाढेल हाये………..इषारी जीव-जंतू असत्यात इचू-काटा काई निंगला त मंग कस करशीन……………..अठून जंगल चालू व्हते……………गाव संपल……….. अन आजची त्यातल्या त्यात अमावश्या आहे लेका……… अमावश्याच्या दिशी अस कोणी फिरते काय बाबू……..तुले काई कयते की नाइ……अठी जंगली कुत्रे, रानमाजरी असत्यात वटवाघुळ रायतात, त्या घुबळा पाय कश्या बोंबलुन राय्ल्या…… लगन-बिगन व्हयल आहे की संटया हायेस लेका…… अमावसेचा अंधार चांगला नसते, या दीशी कोणीच अस कुपा-काट्यात हिंडत नसते बॉ………………तू त काई अलगच धुंदीत दिसू रायला मले…… मी अठीच जरा दूरवर म्हसंखाईत काम करतो म्या बी म्हणून त चाल्लो लोकर घराकड……..चालतु काय………ओ…………..पोऱ्या चाल मी चाल्लो घराकड……………अबे लेका इतक्या टेम चा मी बोलू रायलो तू जरसाक बी घन घनत नाइ बे………………….तू बी चाल माया संग………एकाले दोन सोब्ती बरे रायतात. एवढ समजवल्या वर पण हा कशाचा ऐकतो. बोलला जा काका तुम्ही कशाला फालतू डोक लावता मी काय लहान आहे, काही झाल तर माझ मी बघून घेईल. तशी त्याची टरकलेलीच होती. पण याने बनावट हिंमतीचे प्रदर्शन केले. याने इथे पण स्वताच्या स्वभावाला महत्व दिले कुणाचे एकून न घेण्याचा स्वभाव आड आला. याने त्यांच्या कडे लक्ष दिले नाही व आपला तिथेच बसला तिची वाट बघत.
वेळ झाली असावी अकरा ची बरीच रात्र झालेली हा तिच्या विचारात बुडालेला अधून मधून वटवाघुळांचा किलकिलाट जो मनाला कधीच भावात नाही, किर्रर्र.करणारे कीटक, त्यात पंख फुटलेल्या मुंग्या अंगावर पडायच्या यामुळे तो परेशान झाला, वरून थंडी व कधीही पाऊस पडेल अशी स्थिती, सिगारेट वर सिगारेट फुकन सुरूच. त्याचा पूर्ण मूड ऑफ झाला होता, त्याला भूक पण जोराची लागली होती, त्याने घराकडे निघायचे असे ठरवले तितक्यात कुणीतरी समोरून धावत आणि कर्कश…अजिब आवाजात हूंह्ण ही ही हीही हीहिं ह्रो व्ह्या हूंह्ण हीहिं ही ही ही हीहिं ही ह्रो असे विचित्र स्वर त्याला कानी पडत होते…त्याला कोणी धावत आहे असे जाणवले. तसा तो थबकला त्याची तर पूर्ण “टांगा पलटी घोडे फरार” अशी अवस्था झाली होती……….कुठे पळाव…………काय कराव काही सुचेनास झाल……….कोण असाव ओरडणार ? का ओरडत असाव ? आपल्या मागे का लागल ते ? पूर्ण घाबरला….पळता पळता….ओल्या गवतावरून किती वेळा घसरून पडला. बघतो तर आवाज येन बंद झाला होता. त्याच्या हातातील टॉर्च पण कुठेतरी पडला. इकडे तिकडे बघत होता त्याच्या लक्षात आल की आपण तर खूपच दूर आलो तिने दिलेली जागा कुठे आहे ती पण दिसत नाही. आणि तेवढ्यात राज्या….ओ…..राज्या…… असा आवाज आला. आवाज हा ओळखीचा वाटतो असे त्याला वाटले पण ओरडण्याचा व भेदरलेला आवाज कुणाचा असावा ? त्याने आवाजाच्या दिशेने जायला पावलं उचलले……..थोडा समोर गेला तेव्हा त्याला ती दिसली एका पडक्या वाड्याजवळ उभी….. तिथे त्याला झाडे रंगीबेरंगी प्रकाशाने उजळलेली दिसली तो विचारात पडला की त्या काकाने तर सांगितले होते की आज अमावस्या आहे मग इथे एवढा प्रकाश कसा काय ?
आणि झाड सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे वाटते म्हणून हे दृश्य अनुभवायला मिळत असेल असा तो मनाशीच पुटपुटला…..आज तर ती आणि मी दोघच आहोत आज कुणीच नाही थांबवू शकत आमच्या मिलनाला……पण भयावह रात्र त्याची प्रतीक्षा करत होती याची त्याला कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात…..

अत्यंत गुणकारी तुळस

तुळस हि तशी सर्वांच्या परिचयाची. तुळशीचे रोप दिसायला लहान पण गुणांनी महान आहे. तुळशीचे रोप पूजनीय तर तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. पण ती एक औषधी चे सुद्धा काम करते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय मानाचं स्थान आहे. तुळस हि मंगलतेचे,पावित्र्याचे,सात्विकतेचे प्रतीक आहे. बहुतेक सर्व हिंदू घरांच्या अंगणात तुलसी वृंदावन असतेच. स्त्रिया सकाळ-संध्याकाळ नित्य नेमाने तुळशीची पूजा करतात. तसेच तुळशीची माळ गळ्यात घातली जाते. तुळशी हि भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे.जिथे तुळस आहे तिथली हवा शुद्ध असते.या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळस हि एक आयुर्वेदातील महत्वाची वनस्पती आहे. परंतु तिच्या पवित्रते मुळे, तिच्या गुणांमुळेच तिला अंगणात स्थान प्राप्त झालेले आहे. आयुर्वेदात तिला महत्वाचे स्थान आहे. अशा या बहुमूल्य तुळशीचे आज आपण औषधी महत्व व उपयोग बघुयात

या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. वातावरण शुद्ध करण्यास मदत करते.
इथे शुद्ध हवा वाहते म्हणून तुळशीच्या जवळ बसून प्राणायाम केल्याने चांगले फायदे होतात.
सकाळी अनशापोटी २-३ पाने पाण्याबरोबर गिळल्यास स्मरणशक्ती वाढते असे म्हणतात.
तुळशीची पाने हि अंग दुखणे, डोकेदुखी,सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत.
तुळस कफ दूर करण्यास सहाय्यक ठरते.
सांधेदुखी मध्ये तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात.
तुळशीची पाने चहात टाकून बनवलेला चहा छान तर लागतोच पण याने सर्दी – खोकला बारा होण्यास मदत होते.
तुळस, अदरक वाटून मधासोबत घेतल्यास सर्दी आणि ताप या आजारात आराम मिळतो.
थंडी वाजत असेल, हात-पाय थंड पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेतल्याने आराम मिळतो.
त्वचारोगा मध्ये खाज,पुटकुळ्या असलेल्या जागी तुळशीच्या पानांचा रस लावल्याने काही दिवसात आराम पडतो.
तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते म्हणून तिच्या पानांचे सेवन करायला पाहिजेत.
दात दुखत असल्यास,हिरड्यातून रक्त येत असल्यास तुळशीची पाने दाताखाली दाबून ठेवावी आराम मिळतो.
स्त्रियांच्या विकारात ही तुळस उपयोगी आहेच. गरम पाण्यात लिंबाचा रस, किंवा आल्याचा रस, थोडी तुळशीची पाने आणि थोडी पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, सुरकुत्या वगैरे जाण्यास मदत होते.
किडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, अर्धा कप काढा एक चम्मच मधासोबत काही दिवस घेतल्यास आराम मिळतो
तुळशीचा रस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते.
आयुर्वेदात विविध विकारांवर तुळशीच्या पानांचा,मंजुळांचा,खोडाचा,मुळांचा वापर केला जातो. अशी हि बहुगुणी वनस्पती सर्वांनी आपल्या अंगणात लावायला हवी.

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीव

Horror story in buldana

राज्या हा गावचा मुलगा. घरची परिस्थिती उत्तम. घरच्या सर्वांचा हा लाडका नेहमी हसत खेळत राहणारा, रोज मित्रांसोबत पारावर गप्पा टप्पा करणारा अतिशय बोलक्या स्वभावाचा. नेहमी स्वप्नातील परीला वास्तव्यात शोधण्याच्या प्रयत्नात, मित्रांसोबत उनाडक्या करणे मनाला भावेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकायचे नाही आपले तेच खरे. बाकी कुणी काहीही बोलो आपण आपल्या मनाप्रमाणेच वागणार असे त्याने त्याचे ठरवलेले. कुठेहि भांडणे होवोत त्यात याचा पहिला नंबर, अभ्यासा कडे फारशे लक्ष नाही. शाळेत असतांनाच प्रेमात पडला. कॉलेजात असताना तिला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती मिळाली आणि काही दिवस तो खूप खुश होता पण काही दिवसानेच त्याच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कुणास ठावूक ? एक दिवस रोज प्रमाणेच पारावर आला आणि रडू लागला, म्हणे तिला तिच्या घरच्यांनी बाहेरगावी पाठवले. त्या दिवसा पासून बोलका राज्या अशांत झाला अबोला झाला. आणी बाहेर गावी गेला काही दिवसासाठी तिकडून परतला कुणाला काही कळायच्या आतच त्याने सर्वांना सांगितले की मी पण मोठा होणार चांगला पैसा कमवणार स्वतःचे स्वप्न आणि तिला मिळवण्यासाठी कसे-बसे शिक्षण पूर्ण केलेले होतेच. घर सोडले, मी बाहेरगावी एका मिल मध्ये नोकरी शोधली.
त्याने त्याच्या उनाडक्या करणाऱ्या मित्रांना सांगितले की, मला बाहेर गावी नोकरी मिळाली मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय आहे. मला सकाळच्या गाडीने निघावं लागेल. ठरल्या प्रमाणे तो त्याच्या प्रवासाला निघाला तिथे पोहोचला तर यक्ष प्रश्न पडला इथे राहायचे तर कुठे ?
त्याने राहण्यासाठी घर शोधणे सुरु केले फार प्रयत्नांती त्याला घर मिळाले. घर अशा ठिकाणी मिळाले की घराबाजूला एक नाला वाहायचा घरा जवळ स्मशान शांतता पसरलेली होती अर्थात तुरळक वस्ती त्याने पूर्ण घर बघितले त्याला ते आवडले कारण ते त्याचे भाडे त्याला परवडणारे होते. त्याने ते घर भाडयाने घेतले आणि तिथे तो एकटाच राहू लागला. त्याचा त्या घरातील पहिला दिवस. संपूर्ण दिवसभर साफ सफाई करण्यात गेला. रात्री घरातील कामे आटपून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु नवीन जागा असल्याने त्याला शांत झोप येईना. हे रोज असं चालायचं. कसातरी तिथे तो रूळला. तसा त्याला शेजार पण चांगला मिळाला होता शेजारीच आजीबाई आणि त्यांचा मुलगा राहायचा. आजीबाई मन मिळाऊ होत्या त्यांनी त्याला पहिल्याच दिवशी मदत केली होती, अधून मधून त्याच्याकडे यायच्या त्याच्याशी बोलायच्या त्यामुळे त्याला आपलं कुणी आहे असे वाटायचे. तो त्याचा निवांत वेळ आजीबाईच्या गोष्टी ऐकण्यात घालवायचा.
त्या दिवशी घरी यायला जरा उशीरच झाला. शांत वातावरण आणि अंधाराचे साम्राज्य त्यातच कुत्र्यांचे भुंकणे अजूनच काळजात धस्स करायचे. सोबतीला घरा जवळून वाहणाऱ्या नाल्याचा घाणेरडा वास घरात डोकावू पाहत होता. एकंदरीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होत. आज अमावस्या आहे हे नंतर कळून आलं आणि त्याची अजून टरकली.
घर आवरुन तो जेवायला बसला तर पुन्हा कुत्र्यांचे रडणे सुरु. तो जेवण सोडून कुत्र्याला हाकलायला निघाला तर समोर एकही कुत्रा नाही. अचंबित होऊन तो घरात आला आणि पुन्हा जेवायला बसला. थोडक्यात जेवण उरकून हातावर तंबाखू मळत असतानाच घराच्या छतावर ठक…ठक असा ठोकण्याचा आवाज आला पण त्याने दुर्लक्ष केले. झोपण्यापूर्वी त्याच्या मनात आले कि आपण हे आजीबाईंना सांगावं का ? पण त्या आपल्याला काय म्हणतील या विचाराने तो शांत बसला.
झोपण्यासाठी अंथरुणात शिरला तेव्हा त्याच्या मनात न राहवून येत होते कि आज रोज पेक्षा काहीतरी वेगळं घडतंय, रात्रीचे २ वाजले त्याला झोप येत नव्हती घरात काही वेगळाच भास त्याला होत होता त्याला जवळ कुणी असण्याची जाणीव होत होती, जशी जशी रात्र वाढत होती तसा तसा तो भिंतीचा व घराच्या छताचा आवाज वाढत होता जणू कोणी घर ठोठावतेय…त्यात त्याच्या हृदयाचे पण ठोके वाढत होते त्या असह्य जाणिवेतच हा झोपी गेला. सकाळी नेहमी प्रमाणे उठून घरात झाडू मारत असतांना त्याला एक लांबच लांब… काळा… केस दिसला त्याने तो केस उचलून बघितला तर तो घाबरला कि आपण इथे एकटे राहत असतांना हा एवढा मोठा केस इथे आला कुठून ? इथ तर आजूबाजूला कुणी मुलगी राहत नाही मग घरात केस कसा काय? यावेळी त्याने पक्का विचार केला कि आपण आजीबाईंना विचारू त्या आपल्याला काहीही म्हणो…. तसाच तो आजीकडे गेला व त्याने घडत असलेले सर्व सांगितले… त्यावर आजीबाई बोलल्यात … पोरा असं काई बी नसत… तुला भास झाला असावा…. आपुन कि नाई दिसभर जे काई मनात इचार करतो तेच आपल्याले सप्नात दिसते. म्हणून तर म्हणत्यात ना “जे मनी वसे ते कल्पी दिसे” आजीबाई ने त्याची समजूत काढली व त्याला मस्त चुलीवरचा च्या दिला प्याला. मस्त बशीतून च्या पिला अन मनातच विचार करत घरी आला तयारी केली अन कामाला गेला.
हे रोजच व्हायला लागलं. त्याचे दिवस रात्र या विचारताच निघून जायचे आणि रोज त्या घरात काहींना काही विचारांच्या पलीकडे घडायचे, कधी त्याला झोपल्यावर आपल्या बाजूला कुणाचे अस्तित्व जाणवायचे तर कधी मांजरींचे रडण्याचे आवाज ऐकू यायचे असेच दिवस जात होते तशी तशी त्याची चिंता वाढत होती. एकदा सकाळी तो कामावर जायची तयारी करत असताना दरवाज्यावर थाप पडली….. पाहतो तर काय एक सुंदर मुलगी त्याच्या दृष्टीस पडली…तिचे ते लांब रेशमी केस…त्या केसांच्या लटा चेहऱ्यावर येत होत्या एक सुंदर असे प्रतिबिंब. तिची छाप त्याच्या मनावर कोरल्या गेली, जणू त्याला त्याची तीच परी भेटावी…!
असा त्याला आनंद झाला होता. त्याचे मन सारखं तेच तेच खुणवत होत कि हि आपलीच आहे इथे अचानक कशी आली, शोधत आली असावी आपल्याला. पण दरवाज्या जवळ जाताच ते प्रतिबिंब काहीसे अस्पष्ट होतांना त्याला जाणवले व एकाएकी नाहीसे झाले त्याला वाटले भास झाला असावा. स्वताशीच बडबडत आपण जास्तच मूर्खपणा करायला लागलो. तो कामावर निघाला एका पानपट्टी वर थांबला चहा पीत-पीत सिगारेट ओढत असतांना त्याला तीच परत एका झाडा खाली उभी दिसली पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस सुरु आहे म्हणून उभी राहिली असावी असे त्याच्या मनात वाटले. तसे त्याने तिच्या कडे जाण्यासाठी पावलं उचलले तेवढ्यात तिथून एक गाडी गेली आणि बघतो तर काय ती दिसे-नाशी झाली. पण मनात सारखे अंतर्द्वंद्व सुरु होते की का कुणास ठाऊक आपल्याला हे का दिसते ? कोण असावी ती मुलगी ? आपली तीच असती तर असे का वागली असती घरच्यांची भीती वाटत असेल कदाचित. पण आपल्याला पाहून का दूर झाली. असे कित्येक प्रश्न त्याच्या मनात सुरु होते. परत तो त्याच्या मार्गी लागला कामावर पोहचला काम सुरु झाले पण कामात लक्ष लागत नव्हते दिवसभर सारखे ते प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात तरळायचे. तिच्या त्या आठवणीत तो जगत होता. त्याला ती जाणीव अस्वस्थ करायची. संध्याकाळी सुट्टी झाली तेव्हा रिम झिम पाऊस सुरु होता तरी तो निघाला वाटेत असतांनाच पाऊस थांबला. पंख फुटलेल्या मुंग्या सर्वत्र उडत होत्या, त्याला कुणीतरी मागे असल्याचा भास झाला पण त्याने दुर्लक्ष केले घरी पोहचला.
वेळ रात्रीची होती गेट जवळ जाताच त्याला वाटले कुणी तरी बाजूला आहे त्याने न राहवून बाजूला बघितले तर चिंब पावसाने न्हाहून निघालेली नवतरुणी त्याच्या दृष्टीस पडली…. त्याला खूप आनंद झाला की तू आलीस मला भेटायला असा तो पुटपुटला…..तिचे ते लांब केस पाण्याने ओले झालेले आणि आंब्याच्या मोहोरा सारखी मोहरून निघालेली ती तरुणी तिचे लावण्य जणू मोहवून टाकत होते, तिचे आरक्त डोळे त्याला जणू काही सांगत होते…तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि तो अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात ….

संग्रामपूर येथे पत्रकार दिन संपन्न

sangrampur

बुलडाणा जिल्ह्यात नुकताच पत्रकार दिन संपन्न झाला. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जागतीक पत्रकार दिना निमित्ताने आज संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्याम सावतकर यांचा सत्कार करण्यात आला. पळशी झाशी येथील शंकरगिरी महाविद्यालय येथे आयोजीत या कार्यक्रमासाठी संघटनेचेे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार केशवरावजी घाटे, श्याम देशमुख, रामेश्वर गायकी, प्रल्हाद दातार, विजय दादा पोहनकार, प्रल्हाद सावतकर, अभयसिंह मारोडे, संतोषभाऊ देऊकार, पंजाबराव ठाकरे, युसूफभाई तसेच सामाजिक कार्यकर्ते व समस्त पत्रकार बांधव उपस्थित होते.