खाली पोट चहा पिण्याचे दुष्परिणाम

Side Effects of Tea

चहा हा भारतीयांचा आवडता व सकाळचा पहिला पेय आहे. याच्या शिवाय सकाळचे बरेच कार्य देखील होत नाही. ही सवय तर काहींचे व्यसन झाले आहे. चहा हा भारतीय नसून तो जेव्हा ब्रिटिश भारतात होते तेव्हा त्यांनी भारतात आणलेले पेय आहे.

अशा या चहा पासूनच दिवसाची सुरुवात लहान मुलांपासून तर वयो वृद्धांपर्यंत दिसून येते. काही तर बेड टी देखील घेतात. ही सवय व व्यसन फार वाईट आहे. हे शरीरासाठी व स्वास्थ्यासाठी फार नुकसान दायक आहे. चहा मध्ये कैफिन, एल थायनिन व थियोफाइलिन हे जे घटक आहे जे आपल्या शरीराकरता नुकसान दायक आहेत. चहाचे विविध प्रकार आहेत परंतु खाली पोट चहा पिणे नुकसान दायक आहे. जेव्हा काळी चहा मध्ये दूध टाकल्या जाते त्यामधील एंटीऑक्सीडेंट नष्ट होते ते स्वास्थ्यासाठी अपायकारक आहे.

खाली पोट सकाळी चहा पिण्याचे दुष्परिणाम पुढील प्रमाणे.

१) उलटी होणे : सकाळच्या वेळी पोट पूर्णतः खालीच असते अस्या वेळी जर चहा पिला की पोटामध्ये विपरीत प्रोसेस होते त्यामुळे उलटी होणे आणि अस्वस्थता वाटणे हे विकार होतात.

२) एसिडिटी : चहा मध्ये टैनिन नावाचा घटक आहे जो पोटात एसिड वाढवतो त्यामुळे पाचक रसावर याचा प्रभाव पडतो. खाली पोट काळी चहा घेणे हानिकारक आहे कारण त्यामुळे पोट फुगणे ही समस्या निर्माण होते. जास्त गरम अद्रकची चहा खाली पोटी पिल्यास एसिडिटी ची समस्या होते.

३) शरीरावर होणारा दुष्परिणाम : बरेच लोक सकाळी खाली पोटी दुधाचा चहा घेतात. असे केल्याने थकल्या सारखे व चिडचिड होणे असे दुष्प्रभाव दिसून येतात. तसेच खाली पोट चहा घेतल्याने प्रोटीन जे रोज आपण घेतो ते जेवढे पाहिजे तेवढे शरीराला मिळत नाही. हेच नास्ता केल्यावर चहा घेतल्यास चांगले व फ्रेश वाटेल.

४) प्रोस्टेसट कैंसर : अभ्यासानुसार पुरुषांमध्ये सकाळी खाली पोट चहा पिल्याने प्रोस्टेनट कैंसर मुळे वाढतो. त्यामुळे सकाळी खाली पोट चहा पिने हे व्यसन सोडणे अत्यावश्यक आहे.

५) पोटाच्या समस्या : सकाळी खाली पोटी चहा पिल्याने अल्सर सारख्या समस्याला सामोरे जावे लागेल. असे केल्यास पोटामध्ये व श्वशन नळी मध्ये जळजळीची समस्या निर्माण होते. तसेच भूकेवर पण प्रभाव पडतो.

६) पाचन तंत्र : नियमित खाली पोटी गरम चहा पिल्याने पाचन तंत्र खराब होते. कधी कधी चहा पिल्याने अशी समस्या होत नाही.

७) गळ्याचा कॅन्सर : नियमित गरम चहा पिल्याने गळ्याचा नळी मध्ये गळ्याचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. याच चहा मध्ये गळ्यातील टिशू वर विपरीत प्रभाव पडतो.

अशा विविध समस्या ह्या खाली पोटी चहा पिल्याने निर्माण होत असते.

अंगसंचालन

Angsanchalan

आपण पूर्वी पहिले योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. आज आपण पाहणार आहोत अंगसंचालन. आसनाला सुरुवात करण्या पूर्वी आपणास काही क्रिया करावी लागते त्यास अंगसंचलन म्हणतात. अंगसंचालनामध्ये आपणास आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक विशिष्ट पद्धतीने हाल चाल करावी लागते. ते आता आपण पाहूया.

अ) हाताचे संचलन
१) सर्व प्रथम हाताची मूठ बनवा, ती उघडा हि क्रिया १० वेळा करा.
२) हाताची मूठ बंद करून ते गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
३) आता दोन्ही हात हे खाद्यां पासून गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
४) आपले हात खांद्यांच्या समांतर ठेवा व हाताला फोल्ड (जवळ) करून हाताचे पंजे खांद्यावर ठेवा, पुन्हा हात समांतर ठेवा हि क्रिया १० वेळा करा.

ब) मानीचे संचलन
१) आपली मान हरूवार पणे समोर घ्या, आता मान मागे जाऊ द्या असे ५ वेळा करा.
२) आपली मान उजव्या बाजूने झुकवा आता मान डाव्या बाजूने झुकवा असे ५ वेळा करा.
३) आपली मान हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

क) डोळ्यांचे संचलन
१) डोळे मोठे करत हरूवार पणे दूरचे पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोळे लहान करत जवळचे पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
२) स्वतःच्या उजव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा, आता डाव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
३) डोळ्यांनी स्वतःची हनुवटी पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोक्यांचे केस पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
४) आता डोळे उजव्या बाजूने हरूवार पणे (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

ड) कंबरेचे संचलन
१) आपली कंबर हरूवार पणे (५) समोर झुकावा, आता कंबर (५) मागे झुकावा असे १० वेळा करा.
२) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) झुकवा आता कंबर डाव्या बाजूने (५) झुकवा असे १० वेळा करा.
३) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

इ) गुडघे यांचे संचलन
१) खाली वाकून दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा उजव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.
२) आता गुडघे डाव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.

उ) पायाचे संचलन
१) उजवा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
२) डावा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
३) पायांची बोटे वर खाली करा हि क्रिया १० वेळा करा.

हि पूर्ण क्रिया केल्याने सर्व शरीराचे अंग आसन करण्यासाठी तयार होते. आसन करण्यास मदत होते. आसन करण्याचा अत्याधिक लाभ देखील आपणास मिळतो. त्यामुळे आसन करण्यापूर्वी सर्वप्रथम अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे.

औरंगाबाद डेपोच्या कर्मचाऱ्यांमुळे नाशिक ते बुलडाणा बस २. ३० तास लेट

ST bus nashik to buldhana

पंक्चर झालेल्या एसटी बसचे चाक दुरुस्त करून देण्यास उशीर केल्याने थोडा नव्हे तर तब्ब्ल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा होऊन मानसिक त्रास होण्याची घटना औरंगाबाद येथे घडली. रविवार दि. २४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे नाशिक येथून बुलडाणा येथे जाण्यासाठी निघालेली बस औरंगाबाद स्थानकात पोहोचली. दुपारी १२ वाजता ही बस बुलडाणा कडे निघाली असतांना बस स्थानका बाहेरच बसच्या मागील उजव्या बाजूचे टायर पंक्चर असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे बस प्रवाशांसह पुन्हा बस स्थानकात घेऊन जाण्यात आली. त्याठिकाणी औरंगाबाद आगारात बस पंक्चर साठी घेऊन गेले असतांना दुसऱ्या डेपोची बस असल्याने कर्मचाऱ्यांनी त्वरित काम करून देण्यास नकार दिला.

नाशिक ते बुलडाणा ही लांब पल्ल्याची बस असून ती प्रवासात असतांना पंक्चर झाली होती. त्यामुळे सदर बस पंक्चरसाठी औरंगाबाद आगारात नेली. त्या ठिकाणी गाडीचे पंक्चर काढण्यास प्राधान्य न देता; आगारातील कर्मचाऱ्यांनी इतर कामासाठी डेपोमध्ये थांबलेल्या गाड्यांकडे लक्ष दिले. यामुळे नाशिक ते बुलडाणा जात असलेल्या गाडीस १०-१५ मिनिटे नव्हे तर तब्बल २. ३० तास औरंगाबाद मध्ये उशीर झाला. अखेर पावणे तीन च्या सुमारास बस पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. याठिकाणी औरंगाबाद येथील आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर सुद्धा विलंब केला. अखेर वैतागलेल्या नाशिक ते बुलडाणा बसच्या चालक आणि वाहकांनी स्वतः गाडीचे चाक खोलून दिले परंतु कर्मचारी त्या नंतर जेवणास निघून गेल्याने बसचे पंक्चर राहून गेले. कर्मचारी जेवून आल्यानंतर पंक्चर काढण्यात आले . त्यामुळे २. ४५ च्या सुमारास बस बुलडाणा कडे मार्गस्थ झाली. परंतु कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे, ३.३० ला बुलडाणा येथे पोहोचून पुन्हा नाशिक कडे जाणाऱ्या ह्या बसला बुलडाणा येथे पोहोचण्यासच संध्याकाळचे ६. ३० वाजले होते.

ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत भरती

Gramin Jivonnati Abhiyan

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत बीड येथे विविध पदांच्या भरतीचे आयोजन केले आहे. या अंतर्गत प्रभाग समन्वयक, प्रशासन सहाय्यक, प्रशासन / लेखा सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई असे एकंदरीत ६४ जागा जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०१८ आहे.

पद क्र. पदाचे नाव : रिक्त जागा
पद क्र. १) प्रभाग समन्वयक : 43 जागा
पद क्र. २) प्रशासन सहाय्यक : 01 जागा
पद क्र. ३) प्रशासन / लेखा सहाय्यक : 10 जागा
पद क्र. ४) डाटा एन्ट्री ऑपरेटर : 06 जागा
पद क्र. ५) शिपाई : 04 जागा

पद क्र. : शैक्षणिक पात्रता
पद क्र. १) A) पदवीधर B) BSW / BSc (कृषी) / MBA / PG रूरल डेवलपमेन्ट / PG रूरल मॅनेजमेंट C) संगणक ज्ञान D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. २) A) कोणत्याही शाखेतील पदवी B) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. C) MS-CIT D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. ३) A) वाणिज्य शाखेतील पदवी B) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. C) MS-CIT D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. ४) A) १२ वी उत्तीर्ण B) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. C) MS-CIT D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. ५) A) १० वी उत्तीर्ण B) ३ वर्षे अनुभव

वयाची अट : १० जानेवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://beed.gov.in/htmldocs/pdf/umed/MSRLM_DMMU_Beed_Support_Staff_Advertisement_2017-2018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://msrlmbeed.govbharti.in/

अडुळसा औषधी वनस्पती

Adulsa Aushadhi Vanaspati

आज आपण पाहणार आहोत अडुळसा या औषधी वनस्पतीचे महत्व. अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.

औषधी गुणधर्म : अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.

अडुळसा या औषधी वनस्पतीचा उपयोग विविध रोगांवर उपचार म्हणून केला जातो, ते कसे हे पाहूया.

१) क्षय रोग : आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.

२) खोकला : अडूळसाची ३ पाने घ्यावी एक ग्लास पाणी घेऊन त्यात हे पाने कापून टाकावे. त्यानंतर हे पाणी अर्धे होत परंत कमी तापमानावर गरम होऊ द्या व एका कपात गाळून घ्या. व रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या किमान २ तास अगोदर व पूर्वी हा काढा प्या. १ हप्ता हा प्रयोग केल्यास आपला खोकला दूर होईल.

३) पोटातील जंत : पाने, खोड आणि मुळाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी १ चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा. याचा चांगलाच लाभ मिळतो.

४) जुलाब आणि आव : जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस २ ते ४ ग्राम घ्यावा.

५) त्वचारोग : ताज्या जखमा, खांद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पान बांधून ठेवल्यास चांगलाच लाभ होतो. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.

७) वापरण्याची पद्धत आणि प्रमाण : पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेळी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण २ ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.

केंद्रीय विद्यालयात भरती

Kendriya Vidyalaya Recruitment

केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयामध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय विद्यालयात सहाय्यक / वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपालसह इतर विविध ‘शिक्षकेतर’ पदांच्या एकूण १०१७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://kvsangathan.nic.in/GeneralDocuments/ANN(Short)18-12-2017.PDF

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://kvsangathan.nic.in/

योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी

Important Thing Before Yoga

योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. ज्यामुळे आपल्याला अत्याधिक फायदा मिळतो. योगासनचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा त्याला योग्य पध्द्तीने व सावधतेने केल्या जाते.

१) योगासन प्रात विधी व आंघोळ झाल्यानंतरच सुरुवात करावी.
२) योगासन करण्यासाठी बसण्याची जागा ही समांतर असावी.
३) योगासन करतांना कपडे साहिल / मोकळे / ढिले असावे.
४) योगासन खुल्या ठिकाणी जेथे हवा खेळती राहील अस्या ठिकाणी करावे.
४) हे विशेषतः लक्षात असु द्या की बंद खोली मध्ये योगासन करू नये.
५) योगासन करत असतांना अतिरिक्त शक्ती लावू नये. जोर जबरदस्ती योगासनमध्ये करू नये.
६) मासिकपाळी, गर्भावसस्थे मध्ये, आजारी असणाऱ्याने योगासन करू नये.
७) आपला आहार हा सामान्य व सात्विक असावा.
८) योगासन करण्याच्या ४ घंट्या पूर्वी कुठलाही आहार घेतलेला नसावा.
९) दोन आसनाच्या मधात अंतर असणे आवश्यक आहे.
१०) दोन आसनाच्या मधात थोडी विश्रांती आवश्यक आहे.
११) आसन करीत असतांना विधिवत करावे त्यात फेर बदल करू नये.
१२) कुठल्याही आसनाने शरीराला त्रास होत असेल अथवा दुखत असेल तर आसन करू नये.
१३) जर आपली वात प्रकृती असेल अथवा आपल्या शरीरात जास्त उष्णता असेल तर शीर्षासन व ज्या आसनाने रक्त प्रवाह डोक्याकडे जातो असे योगासने करू नये.
१४) योगासन करण्या पूर्वी अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे शरीरातील संपूर्ण मास पेशी मोकळ्या (Relax) होतात व शरीर योगासन करण्यास तयार होते.

वरील दिलेल्या नियमाचे पालन केल्यास आपणास योगासन करण्याचा योग्य व अत्याधिक लाभ मिळेल.

गिरडा पर्यटन क्षेत्र

Girda Tourist Place

बुलडाणा शहरापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी या मार्गावर गिरडा हे निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमधे वसलेले पर्यटन क्षेत्र व धार्मिक क्षेत्र देखील आहे. हे क्षेत्र डोंगरदऱ्यांमधे असल्याने येथे मोर, माकड व असे अनेक जंगली पशु, पक्षी व प्राणी येथे पाहण्यास मिळतात.

गिरडा येथे प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे.तसेच स्वयंप्रकाशबाबांची येथे समाधीस्थळ देखील या गावात आहे. एका आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. त्यातून पाच झरे निर्माण झाले त्याचेच पाणी गोमुखातून आजपर्यंत निरंतर बाहेर पडत आहे. या परिसराच्या लगतच जवळपास आठ हजार लोकांची लोकवस्तीचे गाव देखील आहे.

गिरडा येथे पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्‍त्व लक्षात घेत गजानन महाराज शेगांव संस्‍थानाने गिरडा हे गाव दत्तक घेतले. स्वयंप्रकाशबाबा ज्या झोपडीत राहत होते तो परिसर आणि त्यांच्या समाधीस्‍थळावर एका मंदिराची स्‍थापना संस्‍थानच्या मार्फत करण्यात आली. परिसराच्या विकासासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी गणेश ठाकूर यांच्या सहकार्याने संस्‍थानाने पाच एकर जमिनीवर जलसंधारण व वृक्षारोपणाचे मोठे कार्य हे पूर्ण केले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगांव संस्थानच्या मदतीने या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली करण्यात येत आहे. यामुळे गिरडा या निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राला व धार्मिक क्षेत्राला अनेक पर्यटक भेट देतात तसेच या परिसरात शाळांच्या सहलींचे आयोजनही केले जाते.

पुस्तकांची निगा…

Pustakanchi Niga

पुस्तक या सोबतचे संबंध हे मनुष्य लहान असतो तेव्हा पासुन तर वृध्दा अवस्थे पर्यंत येत असतो. पुस्तकं घरात नसणारी घरे जणु फारच दुर्मिळ आहे. फक्त काहींच्या घरी अगदीच थोडी पुस्तकं असता तर काहींच्या घरी खूप पुस्तकं असतात. पुस्तकं एक प्रकारे संपत्ती आहे, परंतु त्याला जपणे हे फार आवश्यक आहे. याची सुरुवात होते ती व्यवस्थित ठेवण्यापासून. आज आपण पाहूया आपल्या पुस्तकांची काळजी कशी घ्यावी. पुस्तकं ठेवायची कशी ?

१) पुस्तकं त्यांच्या आकाराप्रमाणे ठेवू शकता. लहान प्रथम, त्यापेक्षा मोठी व सर्वात मोठी या क्रमाने पुस्तकांची मांडणी करता येऊ शकते.

२) पुस्तकांच्या नावाच्या आद्याक्षरा प्रमाणेही पुस्तकांची मांडणी होऊ शकते. जसेकी अ, ब, क, ड, इ,… क्रमाने पुस्तकं ठेवता येऊ शकता.

३) आवडीच्या लेखकांच्या क्रमानेही पुस्तकांची मांडणी करता येऊ शकते.

४) एकाच लेखकांची विविध शैली, संदर्भ असलेली पुस्तकं समूहाने तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या समूहात दुसऱ्या लेखकाची विविध पुस्तकं असे समूह बनवूनही पुस्तकं ठेवू शकता. लहान मुलांची पुस्तकं, पाककृती पुस्तकं, मासिकं यांची विभागणी देखील याप्रमाणे तुम्ही करू शकता.

५) तुमच्या संग्रहातील काही पुस्तकं तुम्हाला कोणी भेट म्हणून दिली असतील तर त्यांचा एक स्वतंत्र असा विभाग तुम्ही करू शकता.

६) पारंपरिक पद्धतीचं कपाट आपण पुस्तकं संग्रह करण्यासाठी वापरत असतो. परंतु सध्या स्तितीत मार्केट मधे उपलब्ध असलेली बुकशेल्फचा वापर देखील तुम्ही करू शकता. त्यामधे तुम्हाला विविध व्हेराइटी देखील उपलब्ध आहे.

७) पुस्तकं ठेवल्या नंतर त्यावर धूळ बसणार नाही याची दक्षता वेळोवेळी घेणे अत्यावश्यक अशी बाब आहे. त्यासाठी तुम्ही पारंपरिक पद्धतीचा वापर देखील करू शकता अथवा व्हॅक्युम क्लीनरचा वापर देखील करू शकता.

८) तुमच्याकडील पुस्तकं तुम्ही कोणाला वाचण्यासाठी देत असाल तर थोडीशी काळजी घ्यावी, अन्यथा तुमच्या आवडीचे पुस्तक तुमच्या कपाटात दिसेल की नाही याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी एक नोंदवही ठेवा, त्यात कोणत्या तारखेस, कोणाला पुस्तक दिले त्याचे नाव संपर्क क्रमांक लिहून ठेवू शकतात.

९) कपाटातून एकदा पुस्तक काढले की पुन्हा ते कपाटात ठेवल्या जात नाही. ते पुस्तक टेबलावर, गादीवर ठेवलेले दिसून येते. यासाठी घरातील सर्वांना पुस्तकं एकाच जागी ठेवण्याची शिस्त लावणे आवश्यक आहे.

स्पर्शगंध प्रीतीचे

Sparshgandh Pritiche Poem

मी ओठांनी काहीही न बोलता,
तुझे तु समजून घ्यावे |
निर्बोल निरागस प्रेम माझे,
डोळ्यातून तूजला केव्हा कळावे || १ || मी ओठांनी…

स्वप्नफुलांचा तुझ्या गं मनी,
फुलला वसंत तूज केव्हा कळावे |
प्रेमात शब्दांचा संबंध येतोच कुठे,
हे तर प्रेमींच्या नजरेत दिसावे || २ || मी ओठांनी…

तुझ्या आयुष्याच्या स्वप्नवेलीवर सखे,
माझ्या प्रीतीचे सुमन फुलावे |
पाषाणरूपी हृदयात तुझ्या,
माझ्या प्रेमाचे झरे खुलावे || ३ || मी ओठांनी…

एकच इच्छा वसे मनात माझ्या,
हसतखेळत तुझसंगे आयुष्य जगावे |
प्रीतीच्या ह्या पहिल्या सरींचे,
स्पर्शगंध तूज केव्हा कळावे || ४ || मी ओठांनी…

माझ्या वेडेपणाचे स्थान मनी काय तुझ्या,
नयनातून सखे तु व्यक्त करावे.
मी ओठांनी काहीही न बोलतो,
तुझे तु समजून घ्यावे || ५ || मी ओठांनी…

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

गण्या व चायनीज

गण्या व माणूस

एकदा गण्या रेल्वे स्टेशन वर बसलेला होता. समोर बसलेला माणसाला बराच वेळ एकटक पाहिल्यावर त्याला तो बोलला.

गण्या : तुम्हाला एक विचारू का ? रागावणार तर नाही ? तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : नाही मी भारतीय आहे. इथलाच आहे मी.

(थोडया वेळाने गाण्याने परत विचारले)

गण्या : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : (त्रासून) सांगितल ना एकदा…नाही.

(थोडया वेळाने गाण्याने पुन्हा त्याला विचारले)

गण्या : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : (रागावून) अहो काय हे…….नाहीए मी चायनीज किती वेळा सांगू ?

(गण्याने पुन्हा विचार करत परत त्याला विचारले)

गण्या : खरं सांगा…..ना तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : (ओरडून) हो….आहे मी चायनीज. बोला…

गण्या : काहीतरीच सांगताय…..चायनीज म्हणे…..चेहे-यावरून अजिबात वाटत नाही !!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

Brihanmumbai Municipal Corporation

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सरकारने विविध पदासाठी भरतीचे आयोजन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार / कक्ष परिचर / श्रमिक / हमाल / बहुउद्देशीय कामगार / आया / स्मशान कामगार ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १३८८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in/PDF/MCGM%20Final%20Adv.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

मनाचं स्वातंत्र

Mind Independence Poem.

अर्ज विनंत्या करून मिळालेली,

कोणतीच गोष्ट मला नको.

अपयशाची लढता लढता,

मरणे मला आवडेल.

परंतु कोणाचीही दया,

घेऊन जगणे मला नको.

आयुष्याच्या वाटेवर एकटाच जिद्दीने जगेल,

परंतु कोणाच्या मदतीचा हात मला नको.

काही क्षनजरी जगलो तरी स्वाभिमानाने जगेल,

परंतू कोणासमोर नतमस्तक होऊन जगणे मला नको.

मी कोणावरही अत्याचार करणार नाही,

परंतू मला सुद्धा कोणाचा त्रास नको.

कोणाच्या गुलामगिरीने जीवन जगण्याचा,

आभास सुद्धा मला नको.

माझ्या मनाच्या स्वातंत्र्यावर,

मला कोणाचा हल्ला नको.

जसा आहे तसाच मी जीवन जगणार,

कोणाचाही फूकट सल्ला मला नको.

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

पैसा

Money Poem

पैसा रे पैसा,
तूने इन्सान को बना दिया कैसा ?
आज पैसा ही सबका दाता है,
पैसे से ही सबका नाता है || १ ||

पैसा ही सबका पिता है,
पैसा ही सबकी माता है |
आज पैसा कमाने के लिए,
हर कोई रात रातभर जागता है |
जिसने जिसने जनम लिया इस धरती पर,
हर वो पैसे के पीछे भागता है || २ ||

आज पैसा ही सबके रिश्ते है,
पैसेसे ही सबके नाते है |
पैसा नही जिसके पास,
उसे उसके अपने भी छोड जाते है || ३ ||

जनम से लेकर मौत तक,
पैसे के ही लिए है जागना और सोना |
पैसे पर ही निर्भर है जिंदगी सबकी,
पैसे के लिए है जिंदगी भर का रोना || ४ ||

पैसा सबकी जान है,
पैसेसे ही आज इन्सान की पहचान है |
पैसे की किसे जरुरत नही,
पैसा सबके लिए भगवान है || ५ ||

मीठा जहर है ये पैसा,
सबपर छा गया नशा जैसा |
पैसा रे पैसा,
तूने इन्सान को बनादिया भिकारी जैसा || ६ ||

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

क्षण हे प्रेमाचे

क्षण हे प्रेमाचे

क्षण हे आनंदाचे,
जपून ठेवण्याचे.

क्षण हे फुलांचे,
सुगंधी होण्याचे.

क्षण हे स्वप्नांचे,
साकार करण्याचे.

क्षण हे दिव्यांचे,
अप्रतिम स्वप्नांचे.

प्रेमरूपी दिव्यांनी उजळी,
स्वप्न दोन मनांचे (मित्रांचे).

क्षण हे मैत्रीचे,
एकमेकात विरून जाण्याचे.

क्षण हे सुखदुःखाचे,
हसत हसत जगण्याचे.

क्षण हे कर्तव्यांचे,
पूर्ती करण्याचे.

क्षण हे प्रेमाचे,
सप्तरंगी स्वप्नांनी आयुष्य सजवण्याचे…

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

गाण्याचा दूर द्रुष्टीकोन

Ganya & TC Jokes

एकदा गण्या रेलवेत प्रवास करत होता. तेवढयात तिकीटचेकर डब्यात आला व त्याने गण्याकडे तिकीट मागितले. गण्याने डोक्यावरची टोपी काढून त्यात खोचलेले तिकीट दाखवले.

तिकीटचेकर : तिकीट टोपीत का ठेवले ? अशाने हे तिकीट हरवले असते तर ?

गण्या : डाव्या पायातल्या मोज्यात खोचलेले दुसरे तिकीट काढून दाखवले व बोलला. हे पहा.

तिकीटचेकर : आणि हे सुद्धा हरवले असते तर ?

गण्या : तेव्हा गाण्याने उजव्या पायातल्या मोज्यात खोचलेले तिकीट काढून दाखवले.

तिकीटचेकर : आणि हे तिसरे सुद्धा हरवले तर ?

गण्या : गाण्याने चोर खिशात लपवून ठेवलेले तिकीट काढून दाखवले.

तिकीटचेकर : पुन्हा म्हणाला हे सुद्धा हरवले तर ?

गण्या : लगेच पर्समधला पास काढून दाखवतो व बोलतो मग हा पास का उगाच काढलाय का ?

भारतीय डाक विभागात भरती २०१७

Post Office Recruitment

भारतीय डाक विभागात मार्फत राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर डाक विभागात ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या २८४ जागा भरण्यासाठी दहावी पास उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०१७ आहे.

 

Community wise Consolidation of Posts

Community  No of Posts
OBC                    72
PH-HH                  6
PH-OH                  4
PH-VH                   4
SC                        26
ST                        24
UR                      148
Total                   284

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://appost.in/gdsonline/

चेहरे दिखावे के

चेहरे दिखावे के

ऐ दिल ना बन इतना सेंटी,
क्योंकी लोगोकी नही कोई गॅरंटी |
मुस्कूराकर पहचान बनाकर चले आते है,
अगले ही दिन मगर उनके चेहरे बदल जाते है || १ ||

हर किसीको अपना समझने की,
गलती कभी नहीं करना |
वर्णा पछतावेकी अंगार में,
खुदही होगा जलना || २ ||

एक चेहरा दिखाकर चलते है लोग,
और एक चेहरा छुपाकर |
दुश्मनी करते है यहाँ लोग,
दोस्ती का मुखौटा लगाकर || ३ ||

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

युट्यूबवर पहिला व्हिडिओ कुठला अपलोड करण्यात आला ?

fact about you tube

नेटकऱ्यांची आवडती वेबसाईट आणि दररोज आणि प्रत्येक सेकंदाला पहिली जाणारी वेबसाईट म्हणजे ‘युट्यूब’. युट्यूब ची सुरुवात १७ सर्वापेक्षा जास्त काळ लोटला आहे.  आता गुगलच्या अधिपत्त्यात असलेली आणि सर्वाधिक बघितली जाणारी जाणारी व्हिडिओ स्ट्रीमिंग वेबसाईट म्हणजे युट्यूब ! एमएच २८.इन कडून आज आम्ही तुम्हास युट्यूब बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

१. आजवर युट्यूब वर सर्वात जास्त  ‘How to kiss’  सर्च केले गेले आहे.

२. युट्यूब वर रोजच काहीना काही अपलोड होत असतं. त्यामध्ये अनेक व्हिडिओ ताबडतोब हिट होतात तर काहींना दर्शक नापसंती दर्शवितात.  तुम्हास माहिती आहे. सर्वात जास्त डिसलाईक कुठल्या व्हिडिओ ला मिळाले आहेत ? अमेरिकन गायक ‘जस्टिन बायबर’ चा गाजलेला अल्बम ‘बेबी’ ह्या व्हिडिओस सर्वात जास्त डिसलाईक मिळाले आहेत.  तब्ब्ल ८ दशलक्ष डिसलाईक या व्हिडिओस मिळाले आहेत.

३. युट्यूब वर सर्वात आधी म्हणजे २३ एप्रिल २००५ रोजी पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. युट्यूब चे सह संस्थापक जावेद करीम यांनी सॅन डिएगो येथील प्राणिसंग्रहालायचा व्हिडिओ अपलोड केला होता.

४.  युट्यूब इतिहासात आजवर सर्वात बघितल्या गेलेला व्हिडिओ म्हणजे ‘गंगनम स्टाईल’. या व्हिडिओने युट्यूब च ‘व्हयू काउंटर’ ब्रेक केलं होत. ते नंतर पुन्हा सुधारण्यात आलं.

५. युट्यूब चा वापर करणाऱ्यांची संख्या अब्जावधी आहे.  सरासरी इंटरनेट वापरणारा प्रत्येक तिसरा जण युट्यूब ला युजर आहे.

६.  एवढं सगळं युट्यूब बद्दल समजलं. मग युट्यूब चे निर्माते कोण असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का ? नसेल पडला तरी त्याचं उत्तर म्हणजे, जगात लोकप्रिय असलेली, पैशाची देवाणघेवाण करण्यास सहाय्य्क आणि सर्वांच्या विश्वासाची असलेली साईट ‘पेपाल’ च्या तीन माजी कर्मचाऱ्यांनी युट्यूब ची निर्मिती केली.  जावेद करीम, चाड हर्ली आणि स्टीव्ह चेन अशी त्यांची नावे.

७.  युट्यूब ची निर्मिती झाल्यानंतर केवळ १८ महिन्याच्या आत ‘गुगल’ ने युट्यूब ला १. ६५ अब्ज अमेरिकन डॉलर मध्ये विकत घेतले.  हे युट्यूब निर्मात्यांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.  त्या नंतर आजपर्यंत अनेक बदल युट्यूब मध्ये झालेत आणि आज ते लोकप्रिय झाले. किंबहुना त्याचा फायदा गुगल सारख्या कंपनीस झालाच.

८.   इंटरनेटचा वापर करणाऱ्या ९५ टक्के लोकांसाठी युट्यूब ७५ भाषामध्ये बनलेलं आहे.  तुम्ही ७५ पैकी कुठलीही भाषा निवडू शकता.

९.  युट्यूबचं ‘लॉस अँजेलिस’ मध्ये प्रोडक्शन हाऊस असून एकावेळी १०००० सभासद ते वापरू शकतात.

१०. सर्च इंजिन मध्ये युट्यूब हे गुगल नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं.  इतर ‘बिंग’, ‘आस्क’ आणि याहू सारखे सर्च इंजिन एकत्र केल्यावरही युट्यूब ची बरोबरी करू शकत नाही.

११. युट्यूब वर प्रसिद्ध असलेल्या ‘ग्रांपी कॅट’  ने २०१४ साली केलेली कमाई ही त्यावेळेसची ऑस्कर विजेती अभिनेत्री ग्वेनेथ पॅल्ट्रो हीच्या कमाईपेक्षा अधिक होती.

१२. युट्यूब लोकप्रिय व्हिडिओचा व्हयु काउंट ३०१ असतांना थांबवून ठेवत. त्यावेळी युट्यूब व्हिडिओचे  व्हयु काउंट वैध आहे की नाही हे तपासतो.

१३. युट्यूब ची निर्मिती ही व्हिडिओ डेटिंग साईट साठी करण्यात आली होती.  तिचं आधी नाव ‘Tune in Hook Up’ असं होत.

१४. मोजायचे झाल्यास महिन्यात ६ अब्ज तास इंटरनेट वापरकर्ते फक्त युट्यूब वर घालवतात.  म्हणजे सरासरी प्रत्येक मनुष्य आपला १ तास युट्यूब ला देतो.

ही आहे काही  रंजक माहिती आपल्या आवडत्या युट्यूब बद्दल.

जळगाव जा. येथे एसटी बस- कंटेनर अपघात

ST bus accident in buldana

आज दुपारी एसटी महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे प्रवासी घेऊन येत होती. दरम्यान येरळी येथे येताच पूर्णा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने बसला दिली. यामध्ये कंटेनर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे.

नेहमीप्रमाणे आज दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे निघाली होती. येरळीतील पूर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. नदीवरील पूल अरुंद असल्याने भरधाव कंटेनर बसला धडक देवून थेट नदीपात्रात कोसळला. उंचावरून कोसळल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे. कंटेनरने धडक दिल्याने बसचा मागील भाग पुलाखाली गेला. परंतु पुलावरील दगडांमुळे बस पुलाखाली कोसळली नाही आणि सुदैवाने जीवीतहानी टळली. बसमध्ये ५५ प्रवाशी प्रवास करीत होते. कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांच्या वतीने बस पुलावरून काढण्याचे सुरु होते.

व्हॉट्सअॅप च्या फालतू यूजर्स ला आता लगाम लागणार

whatsapp new feature

आता फालतुगिरी करणाऱ्या व्हॉट्सअॅप यूजर्स ला लगाम लावण्यात येणार आहे. हो, तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. प्रत्येक ग्रुप किंवा फ्रेंडलिस्ट मध्ये काही ना काही जण असे असतात की जे नुसते इकडून तिकडे मेसेज फिरवत असतात. त्यांना आता लगाम लागणार असून. व्हाट्सअप च्या पुढच्या अपडेट मध्ये हे फिचर येणार आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल असा अंदाज आहे. यामध्ये अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो.

धार्मिक, जातीविषयक, कुणाची निंदा अथवा तेढ किंवा अश्लील मेसेज वारंवार एखाद्या ग्रुप मध्ये काही लोक पोस्ट करीत असतात. त्याचा इतरांना त्रास होतो की नाही याची पर्वा सुद्धा अशा व्यक्ती करीत नाहीत. तसेच काही व्हॉट्सअॅप यूजर्स आलेला मेसेज खरा आहे की खोटा याची खातरजमा न करता जसा आहे तसा आपल्या दुसऱ्याला फॉरवर्ड करणे आपले आद्यकर्तव्य समजून शेयर करीत असतात. यामुळे अनेकवेळा मनस्ताप तर काही ठिकाणी वाद सुद्धा झाल्याची उदाहरणे सुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे अशा मेसेज ला आता आळा बसणार आहे. त्यामुळे तेच तेच गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज बंद होऊ शकतील असं म्हणण्यास हरकत नाही. मात्र याची जबाबदारी सर्वथा ग्रुप ऍडमिन ची असणार आहे. व्हॉट्सअॅप आता “Restricted Groups” नावाचे फिचर घेऊन येत असून यामुळे ग्रूपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल. अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. बंदी घातलेल्या ग्रूपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

WABetaInfo च्या माहितीनुसार, अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये हे फिचर समाविष्ट करण्यात येणार आहे. सोबतच ‘व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच’ हे फिच सुद्धा व्हॉट्सअॅप आणणार आहे. या फिचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल. विशेष म्हणजे या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

गणप्याचं भुतांशी युध्द

ghost stories in marathi

पिंपळवाडीत गणप्या हाच खरा मार्गदर्शक आहे. कुणाला नोकरीसाठी, तर कुणाच्या आजारावर उपचारासाठी. गावातील लोक म्हणतात की, त्याच्यावर वेशिवरल्या श्री महादेवाचं पाणी आहे. आता पाणी असणं हे सर्वांनाच माहित नसेल, म्हणून सांगतो. पाणी असणं म्हणजे एखादा देव माणसाच्या अंगात येऊन लोकांच्या व्यथा दूर करण असा समज आजही गावातील लोकांचा आहे.गावात आजही कुणाला ना कुणाला भुतबाधा झाली की आधी गणप्याच्या घरीलोकांची झुंबड लागते.

आमच्या आजोबांचा मी एकुलता एक नातू. माझे नाव देवांशु . पण मला सारे आवडीने देव्या म्हणतात. मी जेव्हा जेव्हा सुट्टीतगावी जातो तेव्हा ते नेहमी मला त्यांनी पळवलेल्या भुतांच्या खऱ्या गोष्टी सांगतात. अशीच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मला सांगितलेली ही कथा आज एमएच २८. इन च्या माध्यमातून वाचकांसमोर मांडत आहे.

दिवस पावसाळ्याचे होते. बाहेर मुसळधार पाऊस तांडव घातली होता आणि त्यातच रात्रीचे नऊ वाजले होते. वेळ खूप तरीही आजोबांची गुरं घरी आली नव्हती. नेहमी गुरं चरवून रानातून सातच्या सुमारास घरी येणारे गणप्या आजोबा आज अजून घरी कसे आले नाहीत म्हणून आजीने डोक्यावर खोलडा घेतला. हातात बॅटरी घेतली आणि आजोबांना शोधण्यासाठी त्या मुसळधार पावसात एकटी बाहेर पडली. आमची आजी गंगाबाईम्हणजे वाघीणच. एरव्ही तिला कधी आजोबांबद्दल काळजी वाटत नसायची पण , आज मात्र तिला जास्तच काहूर लागला होता. म्हणतात ना एखाद्या संकटाची चाहूल लागली की, आपल्या जवळच्या व्यक्तीला कळते, की आपल्या आप्तगणवार किंवा सग्या जिवलगावर संकट येणार आहे, कदाचित तसंच होतं त्या दिवशी बहुदा. आजोबांवर येणाऱ्या संकटाची चाहूल कदाचित आमच्या आजीला लागली होती, म्हणूनच आजी ताडताड त्या मुसळधार पावसात ‘माडवण्यात’ {एका जागेचे नाव, जिथं गुरं चरवण्यासाठी आमची भली मोठी कुंपण केलेली जागा होती}. आजोबांना शोधायला गेली. काही वेळाने आजी माडवण्यातून आजोबांच्या नेहमीच्या परतीच्या वाटेने घरी पोहचली तरी आजोबांचा काहीच पत्ता लागला नाही व गुरेही कुठे दिसली नाहीत. आता रात्रीचे दहा वाजले तरी आजोबांचा ठाव ठिकाण नाही म्हणून पिंपळवाडीतील सारी लोकं गोळा झाली. सर्वांनी आजीशी बोलणे केले आणि सर्वांनी रानात शोधायला जायचं असं ठरवलं. तेवढ्यात आजीच्या काय मनात आले कुणास ठाऊक, तिने घरीजाऊन एक नारळ आणला आणि अंगणाच्या उत्तरेकडे जाऊन जोराने ओरडली… “ए म्हादेवा… अरं असा कसा झोपलास रं बावा? कुटं हायेस कुटं? अरं हा बग नारल देताय तुज्या नावानं, येउ दे तुज्या भक्ताला सुकरूप घरात!” आणि दाणकन् नारळ फोडून टाकला. सारी पिंपळवाडी आजीकडे नुसती बघतच राहिली. नारळ फोडून झाल्यावर तिने लोकांना थोडा वेळ वाट बघूया असे सांगितले. आजीच्या मनात जरी धिटाई होती तरी चेहऱ्यावर अत्यंत्य काळजी दिसत होती. आजीला धीर देण्यासाठी सारी पिंपळवाडी आमच्या अंगणातच बसली होती.

रात्रीचे बारा वाजले होते आणि पाऊस काही कमी होण्याचा नाव घेत नव्हता. एवढ्यात सर्जा राजाच्या गळ्यातील घंटा वाजल्या आणि आजी वाड्याकडे धावली. तिच्या बरोबर गावही वाड्याकडे धावले. घराच्या दोनच मिनिटावर आमचा वाडा होता. सारेजण जाऊन बघतात तर वाड्याच्या पायरीवर आमचे आजोबा बसले होते. काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाले होते ते. घाबरलेही होते आणि त्यावर धिटाईने न घाबरल्याचे उसने अवसान ही आणून दाखवत होते. वाड्या बाहेर सर्जा राजा तांबू गाय आणि पवली गाय आणि छोटा पिंक्या अशी सारी गुरं काळजीनं आपल्या धन्याकडं बघत होती. आजीने गुरं बांधली आणि आजोबांना काहीच न विचारता घरी घेऊन गेली. त्या रात्री आजीने आजोबांना काहीच विचारले नाही आणि गाववालेही आजोबांची तब्बेत विचारून सारे झोपायला गेले. पण आजीने मात्र आजोबांना झोपताना आमच्या देवघरातील महादेवाचा अंगारा लावला होता आणि झोपायच्या आधी महादेवाचे मनोमन आभारही मानले होते.

दुसऱ्या दिवशी गणप्या आजोबांचे जिवलग मित्र आणि सख्खे मामा आणि सतत आजोबांची सावली बनून राहणारे पांडू आजोबा घरी आले. कालचा काय प्रकार बाबु असं फक्त विचारलं आणि आजोबांनी रात्रीचा प्रकारसांगायला सुरुवात केली. “पांडू मामा… ते परत आलेत…” “ते परत आलेत…” “मो बोललो व्हतो त्यांना अशी सोडू नका. नशीब काल मीच व्हतो आणि माजी गुरा माज्या सोबतीला व्हती आणि तो म्हादेव माज्यापाटीशी व्हता, नायतर आज मी जिवंत नस्ता मामानू!” काय बोलतोस काय गणप्या? पांडू आजोबा पुन्हा बोलले. “होय.. तो चेटूक आणि ती सोमी जखीण…” पुन्हा आलेत गावात… तेव्हाच त्यांचा बंदोबस्त केला असता तर आज ते परत गावात आले नसते. चक्क त्या रात्री दोन भयानक भूतांशी दोन हात करून माझे आजोबा घरी परतले होते. गुरं घेऊन येत असताना आजोबांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज पांढऱ्यापाण्याशी आला. पांढऱ्या पाण्याचा ओढा ओलांडल्यावर मुळूमुळू रडण्याचा कुठून आवाज येतोय हे बघण्यासाठी आजोबांनी ओढ्याच्या दिशेने मागे वळून पाहिले. आजोबा मागे वळून बघतात तर काय एक लहान मुलं उलट्या पायाचं ज्याचं अख्खं अंग आगीनं जाळून खाक झालं होतं. अंगातून चामडीच्या चिंध्या टपटप गळत होत्या. आजोबांनी मागे वळून बघताच ते मुलं जोराने अक्राळ विक्राळ हसायला लागलं. आजोबा लगेच समजून गेले. काहीतरी व्हायकल झाली. त्यांनी लगेच मनात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. तितक्यात ईईईईईईई हीहीहीहीहीही करत सोमी जखनीनं आजोबांवर उडी घातली. आपल्याला समोर भूत आलं की काही केल्या मंत्रांचा घोष मुळीच बंद पडू द्यायचा नाही असं नेहमी आजोबा सर्वांना सांगायचे. सोमी चेटकीण आजोबांवर उडी मारत आहे हे त्यावेळी आजोबांना कळले नव्हते. ते एकटक त्या जळालेल्या चित्रविचित्र हसणाऱ्या मुलाकडे बघत होते. सोमीची अक्राळविक्राळ किंकाळी मात्र आजोबांनी ऐकली होती पण ती बाई आजूबाजूला आजोबांना कुठंच दिसत नव्हती. पण त्या चेटकिणीची चाल बहुदा आमच्या सर्जा बैलाने पहिली होती. जवळ येऊन आजोबांवर ती झडप घालणार एवढ्यात सर्जाने आपल्या जोरदार डोक्याच्या टक्करीने चेटकिणीला दूर उडवले होते. जेव्हा तिला सर्जाने टक्कर मारली तेव्हा तिचे ते भयानक कुरूप आजोबांच्या नजरेस पडले. म्हणतात ना जनावरांना भूतं दिसतात, येणाऱ्या संकटांची चाहूल लागते. आज त्याची अनुभूती आजोबांना आली होती आणि सर्जाने आजोबांचे प्राण वाचवले होते. अंगातून किडे आणि पातळ घाण वाहत होती त्या चेटकिणीच्या. आज जणू ती माय लेकरं आजोबांचा जीव घ्यायलाच तिथं आली होती. पण वेळीच आजोबांनी सावध होऊन आपल्या प्रिय देवतेच्या मंत्राचा जाप सुरु केला. एवढ्यात त्या चेटूकाने पुन्हा आजोबांवर दहाड मारली यावेळी पुन्हा सर्जाने त्यालाही अडविले. पण आजोबा मात्र त्या धकाधकीत खाली पडले. आजोबांचे डोके बाजूला असलेल्या एका दगडावर जोराने आदळले, त्यामुळे आजोबा तिथे बेशुद्धावस्थेत पडले. त्याच संधीचा फायदा घेऊन चेटकिणीने आणि चेटूकाने आळीपाळीने आजोबांच्या अंगात प्रवेश करून आधी सर्व गुरांनां बेदम मारले आणि नंतर आजोबांना त्रास देण्यासाठी काट्यांच्या जाळींमध्ये तर मोठं मोठ्या खड्ड्यात जोर जोराने आजोबांच्या शरीरासह स्वतःला झोकून दिले. तर स्वतःच्याच नखांनी सर्वांगावर ओरबाडे काढले. पण आजोबांना सिद्धी प्राप्त असल्याने त्या दोन्ही भयंकर भुतांना त्यांचा मनावर ताबा करता आला नव्हता. परंतु त्यांची जीभ वळत नसल्याने त्यांना मंत्र बोलणे अशक्य होते. तरीही मनातून त्यांचा महादेवाचा जाप करणे मात्र थांबले नव्हते. पण शरीर भुताच्या काबूत असल्यामुळे त्यांची प्रार्थना महादेवांपर्यंत पोहचत नव्हती. काही वेळाने आजोबांचा जीव मेटाकुटीला आला होता. आजही ते लिहिताना माझ्या अंगावर शहरे उमटले आहेत. म्हणतात न देवावर अपार श्रद्धा असली की तो आपल्या प्रत्येक प्रसंगात आपण न बोलावताच आपली मदत दुसऱ्याकडून करून घेतो. तसेच आमच्या आजोबांच्या बाबतीत त्यावेळी झाले. आजोबा संकटात आहेत याची चलबिचल आजीच्या मनात होते आणि तिचे आपोआप महादेवाच्या नावाने नारळ फोडणे हे सुद्धा त्या परमेश्वराने करवून घेतलेले कार्यच होते व न सांगता केलेली मदत होती. त्या घनघोर संकटातून आजोबांचा जीव वाचला होता. लोकांची भूतबाधा दूर करणारे आज स्वतः भुतांच्या तावडीतून सुखरूप घरी पोहचले होते. परंतु संकट अजून टळले नव्हते. त्या संकटांचा बंदोबस्त करून टाकायचा हे आता त्यांनी मनात ठाम केले होते.

आजोबांच्या घराच्या अगदी बाजूला एक घर होतं. जेत्याला आज सारे भूत बंगला असे म्हणतात. एका महामारी झालेल्या माय लेकरानं स्वतःला जाळून घेतलं होतं. पण कालांतराने त्या घरात काही सुशिक्षित लोकं राहायला आली होती. सुरुवातीला त्यांना भुताखेताची मुळीच जाणीव झाली नाही. पण काही महिन्यांनी त्यांना रात्री मध्यरात्री विचित्र आवाज येऊ लागले, कधी कधी लाईटची बटणे आपोआप चालू बंद होऊ लागायची तर कधी लाईट नसेल तर रॉकेलची लावलेली चिमणी आडवी पडली तरी भडका न उडता साधेपणाने जळत राहायची. दारं खिडक्या आपोआप बंद व्हायच्या,मग त्यातच त्या माणसांनी जोराने जरी मदतीसाठी लोकांना हाका मारल्या किंवा किंकाळ्या ठोकल्या तरी आवाज बाहेर जायचा नाही. त्या सुशिक्षित माणसांना सुरुवातीला हे सारे अजिब प्रकार वाटले. आपल्या मनाचे भ्रम असतील असे वाटले. पण काही दिवसांनी हे प्रकार रोज घडू लागल्याने त्यांनी आमच्या गणप्या आजोबांना याची माहिती दिली होती. ती भली माणसं कुठल्या भयंकर संकटात सापडू नये म्हणून आजोबांनी त्या घरात घडलेल्या खऱ्या घटनेची माहिती सांगून टाकली. महामारीने कंटाळून स्वतःला जाळून घेतलेल्या त्या माय लेकराची होरळपणारी भयानक कथा ऐकून ते सुशिक्षित कुटुंब त्याच दिवशी ते घर व गाव सोडून निघून गेलं. आजोबांना मात्र आपल्या गावाची आणि गाववाल्यांनी काळजी होती. तडफडत मेलेली माणसं भूत झाली की लय जालीम असतात हे आजोबांना माहित होतं. उद्या त्यांनी गावातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तर प्रकरण खूप वाढेल, म्हणून आजोबांनी त्या दोघांचा बंदोबस्त करायचा ठरवला. परंतु गावाच्या भल्यासाठी एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल तर काही कुबुद्धीत माणसांना ते पटत नाही आणि ते आडकाठी घालतात तसेच झालं. आजोबांनी त्यावेळी काही लोकांचा विरोध असूनही त्या भुतांचा चांगलाच बंदोबस्त करून त्यांना त्याच घरात कैद करून ठेवले होते. मंत्राच्या पवित्र शब्दांनी व अनेक ठिकाणावरच्या पवित्र दगडांनी बांधलेल्या समाधीत त्या दोघांचे आत्मे कैद करून ठेवले होते आणि गावाला बजावले होते की उद्या काहीही होतो पण या समाधीचा एकही दगड हलता काम नये. ज्या दिवशी या समाधीचा दगड हलेल किंवा समाधीपासून वेगळा होईल त्या दिवशी या दोन आत्म्यांचा तांडव सुरु होईल. मग मीच काय महादेवही काही करू शकणार नाहीत. कारण तेव्हा हे आत्मे अधिक क्रोधाने प्रबळ आक्रमक झालेले असतील. त्यानंतर जवळ जवळ दहा वर्षाने त्या समाधी वरच्या घुमटाचे सर्वच दगड कुणीतरी काढून टाकले होते. जे काल रात्री झालेल्या प्रकार नंतर आजोबांनी भूत बंगल्यात जाऊन बघितले होते.

पुर्वीचे आत्मे पुन्हा मुक्त झालेत हे कळल्यावर सारे पिंपळवाडीतील लोक दहशतीनं हादरून गेले. दाटीवाटीनं ते गणप्या आजोबांना येऊन भेटू लागले. पण नक्की हे केले कुणी याचा मात्र थांग लागत नव्हता. आजोबांनाही काय करावे हे सुचत नव्हते. त्या दोघांनाही पकडण्याची ताकद आता आजोबांकडे राहिली नव्हती. पण बंदोबस्त करावाच लागेल आणि करणारच हि जिद्द मात्र आजोबांनी सोडली नव्हती. रोज दिवसरात्र ते त्याच विचारात असायचे. त्यांनी अनेक जाचक मंत्रांनी आपले घर आणि गावातील सारी घरं भारवून ठेवली होती. प्रत्येक गावकऱ्याला महादेवाची विभूती असलेली पवित्र पुडी दिली होती जी त्यांनी सतत आपल्यासोबत ठेवायला सांगितली होती.

अनेक दिवस विचार केल्यावर आजोबांना त्यांच्या वडिलांनी दीक्षा देताना सांगितलेला कानमंत्र आठवला. अतृप्त जुनाट आत्मा जेव्हा देवाच्या मंत्रांहुन अधिक प्रबळ होतो आणि कशालाही जुमानत नाही त्यावेळी त्याचा शेवट एक पवित्र आत्माच करू शकतो व त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. पण गावात तसा पवित्र आत्मा निदान त्यावेळी तरी शोधून सापडण्यासाखे नव्हते. दिवसेंदिवस आजोबांच्या मनाची बेचैनता वाढत होती आणि गावाच्या व गावातील लोकांच्या काळजीने ते स्वस्थ बसू शकत नव्हते. दोन दिवसांवर अमावस्या आली होती आणि अमावास्येच्या शेवटच्या प्रहरा नंतर एका शुभघडीच्या आरंभिला त्या दोन दृष्टआत्म्यांना मारण्याची संधी आजोबांकडे होती. पण त्यासाठी एक पवित्र आत्म्याची साथ असणे गरजेचे होते. कारण सामान्य माणूस त्या दुष्ट आत्म्यांवर विजय मिळवणे शक्य नव्हते.

अमावास्येच्या आदल्या दिवशी पिंपळवाडीतील प्रतिष्ठीत व्यक्तींना बोलावून आजोबांनी महायज्ञ करण्याची परवानगी घेतली आणि गावकऱ्यांचे सहकार्य मिळावे अशी विनंतीही केली. त्यानंतर आजोबांच्या जवळच्या सहकाऱ्यांना व पांडू आजोबांना सर्व कामे वाटून दिली.आजोबांनी अमावास्येच्या दिवशी पांडू आजोबांना महायज्ञ कसा करायचा आणि महादेवाला प्रसन्न केल्यावर त्या भुतांचा नायनाट कसा करायचा हे सर्व आधीच सांगून ठेवले. पण पांडू आजोबांना हे कळले नव्हते. महायज्ञ मी करणार मग गणप्या काय करणार हाच प्रश्न सारखा त्यांना सतावत होता. शेवटी ती वेळ जवळ आली महायज्ञ सुरु होणार यावेळी गावातील काही मोजकीच माणसं यज्ञाजवळ थांबवली होती आजोबांनी आणि बाकीच्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. आजोबांनी मंत्रोच्चार सुरु केले आणि महादेवाला प्रसन्न करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या चेटूक आणि चेटकिणीलाही बोलावण्याचे मंत्र सुरु केले. भर आमावस्येला हे महायज्ञ चालू होते. सोसाट्याचा वारा सुरु झाला होता. काळ्या भयाण अंधारात झाडे जाणू तांडव करीत असल्याचा भास होत होता. अधून मधून दूर जंगलातून जनावरे रडल्याचे आवाज येत होते. अचानक सर्वत्र सोसाट्याचा वारा, झाडांचे तांडव , जनावरांचे आवाज आणि निरनिराळ्या मंत्रोच्चारांनी भोवताली मोठा गदारोळ झाला होता. आणि तेवढ्यातच ते दोन आत्मेही त्या ठिकाणी प्रकट झाले होते. आजोबांनी मंत्र वाचायला सुरुवात केली. आता फक्त समोर चेटूक आणि चेटकीण उरली होती. ते दोघे अनेक प्रयत्न करत होते पणआजोबांच्या मंत्रांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते. खूप वेळ झाल्यावर कसेबसे आजोबांनी त्या दोघांनाही बाटलीमध्ये बंद करून टाकले. आजोबांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्ठ युद्ध आणि महायज्ञ त्या दिवशी घडलं.

औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, औरंगाबाद मध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, औरंगाबाद मध्ये विविध पदांच्या एकूण ३९ जागा कंत्राटी पद्धतीने भरायच्या आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://aurangabadzp.gov.in/UploadedFiles/NHM/NHM-91373-91374.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx