कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

Official website of Buldhana

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना मालठाना येथे घडली आहे. ४ पैकी ३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एक अत्यवस्थ आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या ग्राम मालठाना येथील मसाने ह्या आदिवासी शेतकरी कुटुंबीयाने आज कर्जाच्या ओझ्यापायी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत. मसाने कुटुंबाकडे कडे एक एकर ,शेती आहे. त्यांवर हे लोक गुजराण करायचे परंतु त्यांच्यावर एक लाखाचं कर्ज होत. हे फेडता येण शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या कुटुंबातील दिनेश मसाने, ३५, लक्ष्मीबाई मसाने ४०, जितेंद्र मसाने १७ यांची प्राणज्योत मालवली आहे तर न्यानसिंग मसाने ७०, यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

बुलढाणा गौरव – नरेंद्र लांजेवार

Buldhana District

आपल्या लेखणीतून सतत काहीना काही लिहिणारे आपले लेखक, मार्गदर्शक आणि बुलडाणा जिल्ह्याचे गौरव ‘नरेंद्र लांजेवार’ जी यांचा आज वाढदिवस आहे त्याचे औचित्य साधून आपण आज त्यांच्या बाबतीत आपण आज जाणून घेणार आहोत.

नरेंद्र लांजेवार यांचा जन्म ११ मे १९६८ ला झाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली. व्यवसायाने बुलडाणा येथील भारत विद्यालयात ग्रंथपाल असेलेल नरेंद्र लांजेवार यांनी अनेक ग्रंथलेखन केले आहेत. त्यामध्ये अभिव्यक्तीचे क्षितिजे, वाचू आनंदे मिळवू पपरमानंदे, बुलडाणा जिल्हा साहित्य दर्शन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या: चिंता आणि चिंतन,, कथांकुर अशी अनेक पुस्तके लेखन केली आहेत. याशिवाय २०० प्रासंगिक तथा वाङ्मयीन लेख लिहिले आहेत. दै.देशोन्नती., दै. लोकमत, दै. मराठवाडा, दै. तरुण भारत, दै. नवराष्ट्र, दै. सकाळ यासंह आत्मभान, महाराष्ट्र यांसारख्या साप्ताहिक मध्ये तसेच दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. नरेंद्र लांजेवार यांनी आकाशवाणी च्या जळगाव केंद्रावरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण तथा ‘उगवतीचे रंग’, ‘बालवाडी’, ‘पुस्तक परिचय’, ‘पालक-बालक’, ‘साल आणि उकल’, ‘पाऊलखुणा’ इ,सदरांचे लेखन केले आहे.

नरेंद्र लांजेवार यांनी फक्त लेखनच नाही तर सर्वाना वाचनाची आवड लागावी. लहान मुलांना या डिजिटल युगात पुस्तक वाचण्यासाठी आणि आवड निर्माण होण्यासाठी बुलडाणा शहरात ५० पुस्तक्मैत्री बाल वाचनालयांची उभारण्याचे कार्य केले आहे. शिवाय नरेंद्र लांजेवार हे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे मुख्य संयोजक आहेत. आपल्या लेखणीने जिल्हावासियांवर ठसा उमटवणारे नरेंद्र लांजेवार यांना पत्रकारितेच्या तथा वाचन-लिखाणाच्या क्षेत्रातील विभागीय तथा राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना एम एच २८. इन तर्फे भरभरून शुभेच्छा. ते असेच आपल्या लेखणीतून आपणा सर्वाना ज्ञानरूपी अमृत पाजत राहो हीच सदिच्छा.

हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार

Buldhana

आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटस गाव म्हणजे भेंडवळ. एकण्यात आहे की येथील घट मांडणी ही प्राचीन परंपरा सुमारे ३००-४०० वर्षा पासून चालत आलेली आहे. या परंपरेची सुरुवात केली होती चंद्रभान महाराज यांनी आणि ही परंपरा पूर्ण विश्वासाने आजही जोपासली जाते. जी अक्षय तृतीयाच्या महापर्वावर वाघ परिवाराच्या वतीने साजरी केली जाते.

घट मांडणी दोन वेळा केली जाते :
ही घट मांडणी वर्षातून दोन वेळा केली जाते पहिली गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गावातील पारावर तर दुसरी अक्षय तृतीया या महा पर्वावर गावाजवळच्या पूर्वेकडील शेतात ही घट मांडणी केली जाते. असे असले तरी या दोन्ही मांडणी यामध्ये महत्वाच्या आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मांडणीतून मिळालेले संकेत आणि अक्षय तृतीया या महापार्वावर केलेल्या घट मांडणीतून मिळालेले संकेत या दोन्ही मांडणीतील संकेत जुळवून निष्कर्ष काढल्या जातो व भविष्य वर्तवले जाते.
ही मांडणी त्याकाळा पासून सुरु आहे जेव्हा हवामान खाते,पाऊस पाण्याची माहिती देणारे कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा पण जन सामान्यांपर्यंत ही माहिती पोहचवण्याचे कार्य केले आहे या भेंडवळ च्या मांडणीने. ही भेंडवळ ची घट मांडणी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे या घट मांडणी कडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार या मांडणीवर विश्वास ठेवतो. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा,विश्वासाचा भाग आहे.

अशा प्रकारे केली जाते घट मांडणी :
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी गावाजवळच्या पूर्वे कडील शेतात जे घट मांडणीसाठी निवडून ठेवलेले असते तिथे जातात. तिथे चंद्रभान महाराजांचा जयजयकार करतात. तिथे मोठे रिंगण आखतात त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार करतात त्या खड्ड्यात घट मांडणी करतात. वर्षा ऋतूतील चार महिन्यांची प्रतीके म्हणून चार मातीची ढेकळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेली छोटी घागर ठेवतात. घागर ही समुद्राचे प्रतिक मानल्या जाते. या घागरीवर पुरी पृथ्वीचे प्रतिक. पापड,सांडोयी-कुरडई चाऱ्याचे प्रतिक. वडा-भजा चवीचे प्रतिक. करंजी आर्थिक संपन्नतेचे प्रतिक. असे पदार्थ ठेवण्यात येतात. तसेच विड्याचे पान व सुपारी सुद्धा ठेवण्यात येते हे राजा व त्याच्या गादीचे प्रतिक आहे.
खड्ड्याच्या भोवती गोलाकार १८ धान्यांची रास मांडण्यात येते त्यात अंबाडी,सरकी,ज्वारी,तूर,मुग,उडीद,तीळ,भादली,बाजरी,हिवाळी मुग, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा,करडी,मसूर. संध्याकाळी ही सर्व पूजाअर्चा विधिवत केली जाते. त्यानंतर सर्व घरी येतात रात्रभर याकडे कुणीही येत-जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी घट मांडणी ची बारकाईने पाहणी केली जाते रात्रभरात मांडणी मध्ये जो काही बदल घडून आला असेल त्यानुसार पिक पाणी, पर्जन्य, याविषयावर अंदाज व्यक्त करण्यात येतो.
चंद्रभान महाराजांचा जयजयकार करण्यात येतो. त्यांचे वंशज एक एक करीत सर्वच अंदाज व्यक्त करतात आणि शेतकरी बांधव ते लिहून घेतात व त्या प्रमाणे पिक पाण्याचे नियोजन केले जाते.

भेंडवळ च्या घट मांडणीतील यावर्षी २०१६ चे अंदाज : हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार असल्याचे भेंडवळ घट मांडणीतून दिसून येते. यंदाचा पाऊस साधारण स्वरूपाचा राहील तसेच पहिल्या महिन्यात साधारण पण अधून मधून पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगल्या पावसा सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तिसरा महिना उत्तम पावसा सह अतिवृष्टी चा इशारा. अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आलेत. संपूर्ण देशात गुरांसाठी चारा-पाणी टंचाई राहील,तीळ हे पिक साधारण असून मुग,उडीद या पिकांची काही भागात नासाडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. जवस तांदूळ या पिकांची सुद्धा नासाडी संभवते,गहू,हरभरा या पिकांना बाजारपेठेत तेजी मंदी असू शकते.
तसेच परकीय शत्रूंमुळे देशावर संकट येऊ शकते त्यामुळे संरक्षण विभागावर ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशावर आर्थिक स्थितीचे सावट येऊ शकते. राज्याला हे वर्ष ठीक नसून त्याच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकट येऊ शकतात. असेही अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. हे कितपत तंतोतंत खरे होऊ शकते हे ईश्वराला माहित. कारण आपण ईश्वर नसून आपण सामान्य माणूस आहोत त्यामुळे आपण विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर फक्त तर्क वितर्क लावू शकतो. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा श्रद्धेचा विषय आहे.

भारतमातेचा शूरवीर योद्धा महाराणा प्रताप

Maharana Pratap

भारतमातेचा शूर, पराक्रमी योद्धा ज्याच्या पराक्रमाचे पोवाडे आजही गायल्या जातात त्या महापराक्रमी महाराणा प्रताप यांची आज जयंती. महाराणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते. शुक्ल तृतीया रविवार विक्रम संवत १५९७ तदानुसार ९ मे १५४० ला कुम्भलगढ़, राजस्थान येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव उदयसिंग तर आईचे नाव जयवंताबाई होते. लहानपणी ‘किका’ नावाने सुद्धा त्यांना ओळखले जायचे. उदयपुर, मेवाड़ च्या सिसोदिया राजवंशाचे थे राजा होते. त्यांच्या काळात मुघल सम्राट ‘अकबर’ याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि अनेक राजपूत राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते. परंतु ‘महाराणा प्रताप’ एकमेव असे राजा होते की त्यांनी आपल्या जीवनात कधीही ‘अकबर’ चे मांडलिकत्व स्वीकार केले नाही.

महाराणा प्रताप हे स्वाभिमान तथा धार्मिक आचरण यांसाठी ओळखल्या जायचे. त्यांनी सदैव मर्यादेचे पालन केले. लहानपणापासून सर्वसाधारण शिक्षा घेतल्या पेक्षा तलवारबाजी, भालाफेक याशिवाय शस्त्र बनवण्याची कला शिकण्यास त्यांचा कल होता. एकदा जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, “स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे राजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य राजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.” याद्वारे आपल्याला समजू शकते की महाराणा प्रताप हे स्वतः च्या मातृभूमीसाठी किती तत्पर होते आणि त्यांचा स्वाभिमान आपल्याला यातून दिसून येतो. महाराणा प्रताप ज्या वंशात जन्मले होते त्या सिसोदिया वंशातील एकही शासकाने आपली कन्या मुघलास अथवा त्याचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या राजास दिली नाही. अशा प्रकारच्या वैवाहिक संबंधास महाराणा प्रताप यांनी लगाम लावला होता अर्थात ते याच्या विरोधात होते.

महाराणा प्रताप हे राजा उदयसिंग यांचे थोरले पुत्र असतानाही मरते वेळी राजा उदयसिंग यांनी आपल्या छोट्या पुत्रास जग्माल यांस उत्तराधिकारी घोषित केले. परंतु तरीही आपल्या छोट्या भावासाठी त्यांनी आपल्या अधिकारास बगल दिली यावरून त्यांची त्यागवृत्ती दिसून येते. परंतु इतर लोक राजा उदयसिंग यांच्या या निर्णयाने खुश नव्हते. त्यामुळे सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाने व खुद्द प्रजेलाच त्या जागेवर महाराणा प्रताप यांना बसवायचे होते त्यामुळे जग्माल यांस ते सोडावे लागले. यांचा राग मानून जग्माल अकबरास जावून मिळाला आणि स्वत:च्या भावाविरोधात षड्यंत्र करू लागला होता.

महाराणा प्रताप यांच्या कारकिर्दीत महत्वाचे ठरलेले युद्ध म्हणजे ‘हल्दी घाटी’ चे युद्ध. 18 जून, 1576 साली अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या मध्ये हे युद्ध झाले होते . उदयपुर ते नाथद्वारा दरम्यान असेल्या डोंगराळ प्रदेशात हे युद्ध झाले. या युद्धात महाराणा प्रताप यांनी पराक्रम गाजवला. या युद्धात महाराणा प्रताप यांच्या कडून लढणारे एकमेव योद्ध होते हकीम खान सूर. महाराणा प्रताप यांनी स्वतः या युद्धाचे नेतृत्व केले होते. तर मुघलांकडून मानसिंह तथा आसफ खाँ यांनी मोर्चा सांभाळला होता. या युद्धात महाराणा प्रताप यांच्या तलवारी व भाल्याने अनेक मुघलांचे प्राण घेतले त्वेषेने लढत महाराणा प्रताप मुघलांच्या सैन्यामध्ये घुसले होते आणि मानसिंह यांस शोधत होते परंतु तो नाही मिळाला पण अकबराचा पुत्र ‘सलीम’ मात्र महाराणा प्रताप यांच्या पुढ्यात आला. हत्तीवर बसलेला सलीम थोडक्यात महाराणा प्रताप यांची शिकार झाला नाही; नाही तर अकबरास आपला उत्तराधिकारी गमवावा लागला होता. महाराणा प्रताप चहुबाजूने मुघलांच्या वेढ्यात अडकले होते या वेळी झालासिंग यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले होते. महाराणा प्रताप आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रूसैनिकाने त्यांचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला. चेतक च्या जाण्याने त्यांना अपार दुख झाले होते.

महाराणा प्रताप यांनी आपल्या जीवनात असे कार्य केले होते की लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होते. त्यांच्या घोड्याने सुद्धा तेवढाच आपल्या मालकास जीव लावला होता. अशा या पराक्रमी वीरपुत्राचे 29 जनवरी 1957 ला राजधानी चावंड येथे आजारपणाने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्यांचा कट्टर दुश्मन व क्रूर सम्राट अकबर सुद्धा हळहळला त्याच्या पण डोळ्यातून अश्रू आले. अश्या या भारतमातेच्या वीरपुत्रास एम एच २८ तर्फे त्रिवार अभिवादन.

भगवान परशुराम जयंती

Parashuram Jayanti in Buldhana

ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्।। भगवान परशुराम श्रीहरी विष्णू चे अवतार आहेत. त्यांचा हा अवतार त्रेता युगातील रामायण काळातील आहे. तसेच त्यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी माता रेणुका यांच्या उदरी झाला त्यांचे पिता महर्षि जमदग्नि आहेत. एका कथेनुसार ऐकण्यात आहे कि जेव्हा राजांचा अत्याचार वाढला होता तेव्हा पृथ्वी माता गाय रूप घेऊन भगवान विष्णू कडे जाऊन प्रार्थना केली आणि अत्याचारी राजांचा नाश करावा अशी विनंती करू लागली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी पृथ्वी मातेला वचन दिले कि दृष्टांच्या नाशासाठी व धर्म स्थापणे करीता भार्गव कुळात महर्षि जमदग्नि चे पुत्र म्हणून जन्म घेईल व सर्व अत्याचारी राजांचा नाश करेल. आपल्या दिलेल्या वचना नुसार श्रीहरी विष्णूंनी अवतार घेतला. भगवान परशुराम शिवशंकराचे भक्त होते शंकराच्या कृपा प्रसादाने त्यांना परशु प्राप्त झाले व त्यांनी ते परशु धारण केले तेव्हा पासून ते परशुराम या नावाने प्रसिद्धीस आले.

तसेच त्यांचे आरंभिक शिक्षण महर्षी विश्वामित्र व ऋचीक ऋषी यांच्या आश्रमात झाले तेथे त्यांना महर्षी ऋचीक यांच्या कडून सारंग नावाचा दिव्य धनुष्य व ब्रह्मर्षी कश्यप यांच्या कडून विधिवत अविनाशी वैष्णव मंत्र प्राप्त झाला. त्यानंतर चे शिक्षण कैलास येथील गीरीश्रुंग येथे भगवान शंकराच्या आश्रमात विद्या प्राप्त केली त्यात त्यांनी विविध दिव्यास्त्र,विद्युदभि नावाचा परशु प्राप्त केला. तसेच त्यांना विविध वरदान प्राप्त होते.

भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी क्षत्रीयविहीन केली होती हे प्रसिध्द आहेच.तसेच ते माता पिता यांचे भक्त आणि अज्ञाकारी होते. भगवान परशुराम शस्त्र विद्येचे महान गुरु होते, तसेच महाभारतामध्ये आचार्य द्रोणाचार्य,पितामह भीष्म व दानवीर कर्ण हे त्यांचे शिष्य होते. अजर, अमर, अविनाशी आहेत भगवान परशुराम. आज पण महेंद्र पर्वतावर निवास करतात भगवान परशुराम.

बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

विहिरी जवळची ती बाई

Buldhana District official website

आम्ही लोणंदला राहायला आलो तेव्हा लोणंद एक सर्वसाधारण गाव होते. शाळा, दवाखाने, रेल्वे वगैरेसुविधा होत्या पण ज्या पाण्यावर फारसे तरंग उमटत नाहीत असे संथ नि शांत जीवन होते तिथले. आता गावात एक थिएटर आहे पण तेव्हा दोन तंबू टॅाकीज होते. जयश्री आणि अशोक. गावापासून लांब मोकळ्या रानात! रात्री नऊ हे सिनेमा सुरु होण्याचे घोषित वेळापत्रक असले तरी प्रेक्षक गोळा होईपर्यंत तो सुरु होत नसे. तंबू उभारायलाच नऊ वाजायचे. मग शहनाई. वाऱ्यावर लहरत ते सूर घराघरात पोचायचे. मग सिनेमा बघायला जाणारांची गडबड उडे. एकमेकांना हाका मारत एकमेकांच्या सोबतीने सर्व निघत. पण प्रत्येक वेळेस सोबत मिळेच असे नाही. आम्हांला सिनेमा बघायची फार हौस होती. घरांत टी. व्ही. रेडीओ नव्हता. पपा. मुंबईला. मोठी बहिण मामाकडे. मग मी, आई, मोठी बहिण आणि मोठा भाऊ असे सिनेमाला जात असू. सिनेमा बदलला की आम्ही निघालोच.
असाच एकदा ‘ जयश्री’ ला ‘ घुंघट’ नावाचा सिनेमा लागला. शेजाऱ्यांना बच्चन , धर्मेंद्र यांचे मारधाडीचे चित्रपट आवडत. त्यामुळे कोणीच सोबत आले नाही. आम्हीच निघालो. काही अंतर चालले की पानपट्टीसारखी अरुंद टपरी दिसायची. जकात नाका होता तो . कंदिलाच्या पिवळट उजेडात तिथे बसलेल्या बुटकेल्या, जाडगेल्या माणसाची सोबत वाटायची. अजून काही अंतर चालले की रॉकेलचे एक जुनाट दुकान. आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक विहीर. आम्ही चाळीतली मुले हमखास शाळेत जाताना त्या विहिरीपाशी जायचो. तीत एक कासव होते. सकाळच्या वेळी ते हळूच बाहेर येई व ऊन खात कपारीत बसे. आम्हा मुलांसाठी ते प्रचंड कुतूहलाचा विषय होते.
त्या रात्री पौर्णिमा होती. आम्ही निघालो तेव्हा का कोणास ठाऊक आमची मांजर पुन्हापुन्हा मागे येत आम्हाला अडवत होती. तिला हाकलून दिले तरी ती धावत येऊन पायांत घोटाळे. अखेर तिला लांब पिटाळून लावून आम्ही निघालो. सिनेमा उशिरा सुरु झाला नि उशिरा संपला. आम्ही निघालो. जुना सिनेमा असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे परतताना तुरळक माणसांची सोबत होती. वाटेत त्यांची घरे लागल्यावर तीही सोबत संपली. आता शांत झोपलेले गाव…ग्रामपंचायतच्या ट्यूबलाईट्सनी उजळलेला निर्मनुष्य रस्ता, आणित्यारस्त्यावरआम्ही चौघे. आम्ही भावंडे सिनेमा वर चर्चा करत होतो. आता तो सिनेमा थोडाही आठवत नाही. आणि आम्ही काय बोलत होतो तेही नाही. आई माणसांची सोबत संपल्याने आम्हाला पावलेउचलायला सांगत होती एवढे ठळक आठवते. आम्ही आमच्याच नादात.
बोलताबोलता त्या विहिरीपाशी आलो. काही हातांवर ती विहीर. आम्ही बोलत होतो नि आईला त्या विहिरीच्या बाजूने कोणीतरी लक्ष वेधून घेण्यासाठी खाकरते तसा आवाज आला. तिने चमकून पाहिले. ट्यूबलाईट्सचा उजेड होताच…शिवाय टिपूर चांदणे. आईला त्या उजेडात विहिरीच्या मधोमध एक बाई उभी दिसली. तिचे केस मोकळे होते. अंगावर गुलाबी पातळ होते. अंगात चोळी नव्हती. ती एकटक आईकडे पाहत होती. आईला प्रश्न पडला. एवढ्या रात्री ही येथे काय करतेय? आणि विहिरीच्या मध्ये काय करतेय ? तिच्या लवकर लक्षात आले नाही. तिला वाटले दगड, माती, कचरा साठून विहीर बुजत आलीये म्हणून ती मध्ये उभी राहू शकली असेल. तरीही एवढ्या रात्री काय करतेय हा प्रश्न होताच. काही क्षणातच आईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिला आठवले याच विहिरीतल्या कासवाची गम्मत आम्ही तिला सांगत असू. म्हणजे विहिरीत पाणी होते. आणि ती बाई मधोमध तरंगत होती. आई शहारली. तिने आम्हाला जवळ जवळ ढकलतच पुढे आणले. ‘ लवकर लवकर चला’. एवढेच पुटपुटली. आमच्या लक्षात नाही आले. बंद दुकाने, झोपलेली घरे आणि विरक्त सन्याशासारखी उभी असलेली निमूट झाडे यातून वाट काढत आम्ही निघालो. तो छोटेखानी जकातनाका लागला आणि तिथला माणूस जागा असल्याचे पाहून आईच्या जीवात जीव आला. सकाळी आईने शेजारच्या बाईला विचारले, ‘ त्या विहिरीत काही आहे का हो?’
ती म्हणाली, ‘ हो. एका वडारी समाजाच्या बाईने जीव दिलाय तिथे. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून. पण ती बायकांना काही करत नाही. पुरुषांना त्रास देते. अमावास्या पौर्णिमेला पुरुषांना तेथे हमखास अपघात होतो.’
काल रात्री हाताच्या अंतरावर एक अमानवी अस्तित्व होते..या जाणीवेने आई शहारली. तिने आम्हाला सर्व सांगितले. मांजरीकडे बघून म्हणाली,’तरीच ही बया अडवत होती’. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही कासव बघायला गेलो. सोबतच्या पोरांना आम्ही रात्रीचा किस्सा सांगितला. दिवसाच्या लख्ख उजेडात विहीर निरुपद्रवी वाटत होती. नव्या कुतूहलाने आम्ही ते गूढ काळपट पाणी न्याहाळले. कोणीतरी शोध लावला. ते कासवच भूत असेल. दिवसा कासव आणि रात्री बाई. आम्ही हसलो. पुढे कोणाची सोबत नसताना कित्येकदा मी विहिरीपाशी गेले. पाण्याखाली ती बाई राहत असेल का याचा विचार करत मी पाण्याकडे पाही. भीती नाही वाटली, आणि थोडे कळायला लागल्यावर दया वाटू लागली. आयुष्य संपवावे वाटण्याइतका तिचा छळ झाला होता. आज ती विहीर पूर्णपणे बुजवून तीवर ऑफिस थाटण्यात आलेय. एक घरही बांधले गेलेय. त्यांना भुताने छळल्याच्या हकीकती ऐकल्या नाही. ती बाई आणि ते कासव यांचे काय झाले असेल हा प्रश्न मला आजही पडतो.

राजेश्वरी कांबळे.