बीएसएनएलची ‘दिल खोल के बोल’ ऑफर

bsnl launch new plan

रिलायन्स जिओ नंतर आता टेलिकॉम स्पर्धेत बीएसएनएल ने सुद्धा उडी मारली असून कंपनी ने ‘दिल खोल के बोल’ नावाने अनलिमिटेड कॉलिंग प्लान सुरु केला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 6GB इंटरनेट डाटा मिळणार आहे. शिवाय रोमिंग फ्री असणार आहे.

बीएसएनएल ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ५९९ रु. मध्ये हा प्लॅन आणला असून हा प्लॅन रोमिंग मध्ये सुद्धा काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही देशभरात कुठेही असलात तरी तुम्ही ‘दिल खोल के’ बोलू शकता. देशभरात २२ सर्कल मध्ये हा प्लॅन लॉन्च केला आहे. कालच एयरटेल ने आपलं रोमिंग बंद केलं आहे. त्या नंतर बीएसएनएल ने सुद्धा ग्राहकांसाठी ‘दिल खोल के बोल’ प्लॅन आनलेला असून ५९९ रु. च्या यामध्ये 6GB इंटरनेट डाटा पहिल्या ४ महिन्यासाठी मिळणार आहे. त्या नंतर प्रत्येक महिन्याला ३ GB डाटा मिळेल. सुरुवातीला प्रमोशनल ऑफर तऱ्हेने हा प्लॅन काम करणार असून त्या नंतर ग्राहकांना ७९९ रु. मध्ये हा प्लॅन मिळेल.

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 980 जागा भर्ती 2017

upsc recruitment 2017

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 980 जागेसाठी २०१७ वर्षात भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. शेवटच्या वर्षातील परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आहेत ते उमेदवार सुध्दा तात्पुरते या परिक्षेस पात्र असतील.

अर्ज फक्त ऑनलाईन पध्द्तीने करण्यात येतील. अर्ज करण्यासाठी www.upsconline.nic.in किंवा www.upsc.gov.in या वेबसाईट वर करावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2017 रोजी सायं. 06 वा पर्यंत आहे तर 18 जून, 2017 रोजी होणार परीक्षा असणार आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे : उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल. जे उमेदवार शेवटच्या वर्षातील परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आहेत ते उमेदवार सुध्दा तात्पुरते या परिक्षेस पात्र असतील.

ओपन वर्गातील उमेदवार हा 21 ऑगस्ट 2017 रोजी 21 वर्षे ते 32 वर्षे पर्यंतचा असावा.(म्हणजेच उमेदवाराचा जन्म हा 02/08/1985 च्या आधीचा व 01/08/1996 रोजीच्या नंतरचा नसावा.) SC /ST वर्गातील उमेदवारास उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल. OBC प्रवर्गातील उमेदवारास उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहिल. परीक्षा शुल्क 100/- रु.OPEN/OBC साठी असून SC /ST साठी कुठलीही फी नाही. उमेदवार परीक्षेसाठी महाराष्ट्रातील नागपुर, नवी मुंबई, मुंबई, पुणे,. ठाणे या परीक्षा केंद्रापैकी निवडू शकणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात वाचून घ्यावी. जाहिरात वाचूनच अर्ज करावा. जाहिरातीत दिल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक पडताळून बघावी.

पद / परीक्षा नाव :
Indian Administrative Service (IAS).
Indian Foreign Service (IFS).
Indian Police Service (IPS).
Indian P & T Accounts & Finance Service – Group ‘A’.
Indian Audit and Accounts Service – Group ‘A’.
Indian Revenue Service (Customs and Central Excise) – Group ‘A’.
Indian Defence Accounts Service – Group ‘A’.
Indian Ordnance Factories Service – Group ‘A’ (Assistant Works Manager, Administration).
Indian Postal Service – Group ‘A’.
Indian Railway Traffic Service – Group ‘A’.
Indian Railway Accounts Service – Group ‘A’.
Indian Railway Personnel Service – Group ‘A’.
Post of Assistant Security Commissioner in Railway Protection Force – Group ‘A’
Indian Defence Estates Service – Group ‘A’.
Indian Information Service (Junior Grade) – Group ‘A’.
Indian Trade Service – Group ‘A’ (Gr. III).
Indian Corporate Law Service – Group “A”.
Armed Forces Headquarters Civil Service – Group ‘B’ (Section Officer’s Grade).
Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service – Group ‘B’.
Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service – Group ‘B’.
Pondicherry Civil Service – Group ‘B’.
Pondicherry Police Service – Group ‘B’.

अधिक माहिती आणि जॉब व नोकरीविषयक माहितीसाठी एमएच २८.इन व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा.

मोबाईल पाण्यात पडलाय ?

drop mobile in water

मोबाईल म्हणजे सर्वांचा जीव की प्राण. आपल्या जीवापेक्षाही त्याला जपल्या जाते. जर आपल्या चुकीमुळे किंवा अनावधानाने जर आपला महागडा फोन पाण्यात पडला तर ? एकूणच काळजात धस्स होतं ना ! जर असं काही झालं तर काय करायचं हे आज तुम्हाला बघता येईल.

मोबाईल पाण्यात पडला की त्याला काढून पुसून वगैरे पुन्हा सुरु करण्याची आपली तयारी सुरु होते. बहुतांश लोक हेच करतात आणि आपला फोन गमावून बसतात. नशिबात असेल तर मोबाईल सुरु होतो नाही तर संपलंच ! त्यामुळे मोबाईल पाण्यात पडला की, त्याला सुरु करण्याचे टाळावे. मोबाईलच्या आत जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. स्विच ऑफ असेल तर सुरु करण्याचा धोका पत्करू नका.

फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो. त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत. या पद्धतीने मोबाईल मधील पाणी बाहेर काढण्यास मदत होते आणि मोबाईल व्यवस्थित राहतो.
१. एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवस ठेवावा. मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.
२. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
३. सिलिका जेल तुम्हाला माहिती असेलच मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

अजून एक पद्धत म्हणजे मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो. हे लक्षात असू द्या म्हणजे कधी तुमच्या मोबाईल सोबत हा प्रसंग घडलाच तर तुम्ही तुमचा मोबाईल वाचवू शकाल.

मासिकपाळी…स्त्रियांचे ते अवघड दिवस

womens health masikpali

स्त्रियांचे ते अवघड दिवस म्हणजे पाळी.. तीच ती. एमसी.. पीरियड.. प्रॉब्लेम.. अडचण.. विटाळ.. कावळा शिवणे.. बाहेर बसणे.. महिना.. मासिकपाळी.. वयात आल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घडणारी एक सर्वसामान्य घटना.. असंख्य अंधश्रद्धा, भ्रामक कल्पना, भीती, गुप्तता, लाज, शरम यांच्या काटेरी कुंपणात जखडलेली.. स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत खासगी किंवा खरं तर गुप्तच मानला जाणारा हा विषय

मासिकपाळी सामान्यपणे प्रत्येक स्त्रीमध्ये दर २८ दिवसांनी मासिकपाळी येते मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.

मासिक पाळी (MC)म्हणजे काय?
मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला योनीमार्गातून साधारणतः ३ ते ५ दिवस रक्त जाते.या शारीरिक क्रियेला मासिक पाळी असे म्हणतात. या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाते.तसेच स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्रजंतूशी संयोग न झाल्यास ते बीज शरीरातून बाहेर फेकले जाते. मासिक पाळीचे हे चक्र २८ ते ३५ दिवसांचे असते. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारणामुळे काही स्त्रियांना पोटदुखी व कंबरदुखीचा त्रास होतो.

मासिक पाळीत घ्यावयाची काळजी
मासिक पाळी चालू असताना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे अतिशय महत्वाचे ठरते. तसेच फार काळ रक्त साचू देता कामा नये त्यात रोगजंतू वाढून जननइंद्रियांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे होऊ नये यासाठी स्वच्छ ,कोरडे कपडे वापरावेत. तसेच पुरेसा आहार, विश्रांती व मानसिक स्थिती चांगली ठेवावी.

घरातील मोठ्या स्त्रियांचे मार्गदर्शन कसे असावे ?
आयुष्यातील हि सर्वात मोठी घटना त्यामुळे ती घाबरलेली असते. त्यामुळे सर्वप्रथम तिची भीती कमी करायला पाहिजे. तिला उचित मार्गदर्शन करायला पाहिजेत, स्वतःचे अनुभव तिला सांगायला पाहिजेत. हे प्रत्येकीलाच होते यात घाबरण्यासारखे काहीही नाही असे पटवून देणे आवश्यक. स्वच्छ कापड, सॅनेटरी नॅपकिन्स त्यांचा नीट वापर कसा करावा हे सांगायला पाहिजे. हा कुठलाही आजार नसून हा मासिकधर्म आहे. तू आता मोठी झाली आहेस. तू आता चांगलं वागायला पाहिजेत तसेच विशेष काळजी कशी घ्यावी हे समजून सांगायला हवे.

मासिकपाळी येणे शाप की वरदान ?
वंश चालवण्यासाठी महत्वाचे योगदान स्त्रीचेच असते. आणि हे नैसर्गिक आहे. प्रकृतीचाच नियम आहे. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलगी वयात आली असे समजले जाते. मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक अतिमहत्त्वाची घटना असते. आणि याच मासिकपाळी नंतरच मुलीचा विवाह होतो व योग्यवेळी तिला मातृत्व प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच मासिकपाळी हि नैसर्गिक क्रिया आहे. याला शाप म्हणणे योग्य ठरणार नाही.

मासिक पाळी विटाळ नव्हे
योग्य माहिती नसली की त्या मुद्द्याभोवती अनेक गैरसमजुती तयार होतात. स्त्रियांना येणा-या मासिक पाळी बाबतीत ही समाजात अनेक गैरसमजुती आहेत. मासिक पाळीत स्त्रीला विटाळ मानले जाते परंतु मासिकपाळी ही स्त्रीला प्रजननक्षम करणारी शरीरातील केवळ एक क्रिया आहे. मासिकपाळीत पुरुषाच्या शुक्रबिजाशी संयोग न झाल्याने निरुपयोगी ठरलेले स्त्रीबीज व अस्तर शरीराबाहेर टाकून दिले जाते. त्यात अमंगल असे काहीच नसते. या काळात स्त्रीने स्वयंपाकघरात जाऊ नये, पाणी भरू नये, घरात एका बाजूला बसून राहावे नाही तर पाप लागते,असे म्हटले जाते. या सगळ्या प्रथांमागे दोन महत्वाची कारणे दिसून येतात ती म्हणजे, आपली पुरुषप्रधान संस्कृती, पूर्वी लोक फारसे शिकलेले नव्हते त्याना शास्त्र माहित नव्हते, तसेच शास्त्रीय कारणे पटवून देण्यापेक्षा पाप पुण्याची भीती घातली की गोष्टी नक्कीच केल्या जातात. या काळात कामे करू नये म्हटले की आपोआपच बायकांना आराम करता येतो. परंतु सध्याचे धकाधकीचे राहणीमान, छोटी कुटुंबं पाहता स्त्रियांना ना कंपनीतून चार दिवस सुट्टी मिळणार ना घरातून. त्यामुळे काळानुसार या रूढी बदलणे ही काळाची गरज आहे.

व्हाट्सएप्प कडून नविन फिचर

new whatsapp feature status

आपलं व्हाट्सएप्प तुम्ही अपडेट केलं आहे का ? ज्यांनी केलंय त्यांना व्हाट्सएप्प कडून नविन फिचर गिफ्ट मिळालं आहे. हे फिचर काय आहे ? सांगायचं झालं म्हणजे आधी हे फिचर ‘स्नॅपचॅट’ मध्ये होत तसेच व्हाट्सएप्प ने सुद्धा आणले आहे. आपलं स्टेटस अपडेट !!!

आधी फक्त टेक्स्ट स्वरूपात असलेलं स्टेटस अपडेट आता बदललं आहे. एखादी इमेज, विडिओ किंवा GIF आपण आता स्टेटस च्या रूपात ठेवू शकतो. आधी आपलं स्टेटस बघायला संबधित व्यक्तीच्या प्रोफाइल वर जावं लागायचं परंतु नव्या फीचरमुळे आपल्या लिस्ट मध्ये असेल्या प्रत्येकाचं स्टेटस आपल्याला एकाचवेळी बघता येते. शिवाय आपण आपलं स्टेटस किती जणांनी बघितलं हे सुद्धा बघू शकतो. एवढंच नाही तर आपलं स्टेटस इतरांना फॉरवर्ड सुद्धा करता येतं.

व्हाट्सएप्प च्या डॅशबोर्ड वर गेल्यावर मध्ये ‘status’ दिसून येत त्या वर क्लिक केलं की, सर्वात आधी आपण ठेवलेलं स्टेटस आणि त्या नंतर इतरांचे ताजे स्टेटस दिसून येतात. त्या खालीच किती जणांनी आपलं स्टेटस बदललं आहे त्याची लिस्ट दिसून येते. “my status ” ला क्लिक केल्यावर किती जणांनी ते बघितल त्याचा आकडा तर पुढे छोट्या हिरव्या रंगात असलेल्या बाणाने आपण आपलं स्टेटस इतरांना पाठवू शकतो. आहे ना झक्कास फिचर !

तुम्हाला जर हे तुमच्या व्हाट्सएप्प मध्ये दिसत नसेल तर तुमचं व्हाट्सएप्प अपडेट करा मग तुम्ही सुद्धा याचा आनंद घेऊ शकता. व्हाट्सएप्प अपडेट करण्यासाठी गुगल प्ले मध्ये जा आणि वरती दिसत असलेल्या “search bar’ मध्ये ‘whatsapp’ टाईप करा त्या नंतर व्हाट्सएप्प दिसू लागेल तिथे update बटनावर क्लिक केलं म्हणजे आपलं व्हाट्सएप्प अपडेट होईल.

जळगाव पोलीस विभागात शिपाई पदासाठी भरती

जळगाव पोलीस विभागात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई/बैंडस्मन तसेच कारागृह शिपाई इ. पदांसाठी भरती करण्यात येत आहे. जळगाव पोलीस विभागात एकूण ८४ जागेसाठी भरती करण्यात येत असून यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

यासाठी उमेदवाराने 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पोलिस शिपाई पदाकारिता अर्ज करणार्या उमेदवार साठी हलके वाहने चालविण्याचा (LMV) परवाना धारका केला आवश्यक आहे. सदर परवाना नसणाऱ्या उमेदवारास नियुक्तीनंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्ष च्या आत परवाना धारण करण्यात यावा. यासाठी उमेदवाराचे वय 31/03/2017 रोजी चे वय 18 वर्षे ते 28 वर्षे असावे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 वर्षे पर्यंत सूट राहील.

शारीरिक पात्रता :
महिला – 155 सेमी पेक्षा कमी नसावी. पुरुष – 165 सेमी पेक्षा कमी नसावी. पुरुष – न फुगविता 79 सेमी पेक्षा कमी नसावी व फुगवून ही 5 सेमी पेक्षा कमी नसावी.

उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे असून त्यासाठी jalgaonpolice.gov.in, mahapolice.mahaonline.gov.in, www.mahapolice.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग : ३५० रु. , मागास प्रवर्ग :२००रु. आणि माजी सैनिक 50/- रु (दोन्ही प्रवर्ग साठी) असे शुल्क असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

जाहिरात डाउनलोड लिंक :

https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVaTU3ODJENU5GV1U/view?usp=sharing

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक :
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

महाराष्ट्र पोलीस भरती 2017

police recruitment

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज फ़क्त ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी 24 फेब्रुवारी, 2017 ते 17 मार्च, 2017 आहे. अधिक माहितीसाठी www.mahapolice.gov.in यांचे संकेतस्थळ बघावे.

यासंबंधी पात्रता विषयक अधिक संक्षिप्त माहिती लवकरच कळविण्यात येईल. ज्या नागरिकांनी ऑन लाईन पद्धतीने वेबसाईट फॉर्म भरला आहे त्यांनी खालील हेल्पलाईनला कॉल करावा. महाऑनलाईन संदर्भात अडचण असल्यास 9015978978 (IVR Based Support), भारतीय स्टेट बँकसंदर्भात अडचण असल्यास 022-22661765, पोलीस आयुक्त / पोलिस अधीक्षक / समादेशक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक (कार्यालयीन वेळेत ), अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सकाळी १०. ३० ते साय ०५. ०० या वेळेत) 022-22023637.

अर्ज सुरु होण्याची तारीख ही २४ फेब्रुवारी पासून तर 17-03-2017 रोजी 24.00 वा. पर्यंत राहणार आहे. अर्ज करतांना ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 17-03-2017 रोजी 24.00 वा. पर्यंत असणार आहे. तर स्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21-03-2017 रोजी (बँकेच्या वेळेनुसार) असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVYU10b0FGNDRmejA/view?usp=sharing

कथा महाशिवरात्रीची

प्राचीन काळी एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एक दिवस शिकारीसाठी तो जंगलात गेला. जंगलात खुप फिरला पूर्ण दिवस निघून गेला पण एकही शिकार त्याच्या हाती नाही लागली. तो एका नदी काठी पोहचला तेथे तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला व एखादा प्राणी पाणी पिण्यास आल्यास आपण त्याची शिकार करू असा त्याने विचार केला. बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते बेलाच्या पानाने झाकल्या गेलेले होते. याची शिकाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. तो तेथे झाडावर बसला व वाट बघू लागला. पण बराच वेळ झाला तरी तिथे एकही प्राणी फिरकला नाही. तो अस्वस्थ झाला. व अस्वस्थतेत तो बेलाचे पान तोडत असे व फेकत असे ते पान शिवलिंगावर पडत होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

तो सकाळ पासुन उपाशीच होता. त्यामुळे त्याचा उपास घडला. व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित झाले. न कळत पुण्याची प्राप्ती त्याला झाली.  मध्य रात्री एक हरीण पाणी प्यायला आली. शिकाऱ्याने धनुष्यावर तिर लावला नेम धरला आणि तो तिर सोडणार तर ती हरीण बोलली की मी गर्भिणी आहे मी बाळाला जन्म देणार आहे. माझी शिकार करू नको मी माझे बाळ झाल्यावर लगेच परत येईल तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याला तिचे सत्यवाचन वाटले त्याने तिला जाऊ दिले.  काही वेळाने आणखी एक हरीण पाणी पिण्या करता तेथे आली. ती हरीण बोलली माझी शिकार करू नको. मला माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा आहे. मी माझ्या पतीस भेटून येते तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने तिला पण जाऊ दिले. दोन्ही शिकार जाऊ दिल्यामुळे त्याचे डोके आणखी खराब झाले.  काही वेळाने पुन्हा एक हरीण तिच्या पिल्लांना घेऊन पाणी पिण्या करता आली. तेव्हा शिकाऱ्याने लगेच तिच्या वर नेम लावला व तो बाण सोडणार तर ती हरीण बोलली की माझी शिकार करू नको मला माझ्या पिल्लांना माझ्या पती जवळ सोडून परत येते. शिकारी हसला आणि बोलला हातातली शिकार सोडून देऊ एवढा मी मूर्ख नाही. पुन्हा हरीण बोलली की मला माझ्या पिल्लांची चिंता होत आहे मला जाऊ दे. मी माझ्या पिल्लांना घरी सोडून लगेच येते शपथ घेऊन सांगते. त्याला तिच्या पिल्लांना पाहुन दया आली त्याने तिला जाऊ दिले .

शिकारी त्या हरिणीची वाट पाहत होता व बेलाचे पान तोडत शिवलिंगावर फेकत होता. तेवढ्यात एक मोठा हरीण तेथे आला. शिकारी आनंदित झाला व त्याने त्याच्या वर नेम लावला व बाण सोडणारच तर तो हरीण बोलला की माझे जर तू पिल्लं व तीन पत्नी ची शिकार केली असेल तर माझी शिकार कर व मला मारून टाक. जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला पण काही वेळे करता जीवन दान दे. मी त्यांना भेटून लगेच येतो तेव्हा माझी शिकार कर.  तेव्हा शिकाऱ्याच्या समोर संपूर्ण रात्रीचे दृश्य समोर आले. दृष्टी समोर जे घडले ते दृश्य फिरू लागले  त्याने जे झाले त्या हरिणांस सांगितले. हरीण बोलला की जसे माझ्या पत्नीने तुला वचन दिले मी पण तुला वचन देतो की मी त्यांना भेटून त्यांना येथे घेऊन येतो तेव्हा तू आमच्या सर्वांची शिकार कर. तेव्हा शिकाऱ्याने त्याला पण जाऊ दिले.

थोडयाच वेळाने तो हरीण सहकुटूंब त्याच्या समोर आले. उपवास, रात्री जागरण व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित केल्याने त्याचे मन निर्मळ झाले. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडला. त्याला त्याच्या आता पर्यंतच्या कर्माचा पश्चाताप होत होता. भगवान शिव शंकरच्या कृपेने त्याचे मन द्रवित झाले त्याचे हृदय परिवर्तन झाले होते. हिंसक प्रवृतीतून करुणेचा भाव निर्माण झाला होता.  हरिणाच्या कुटुंबीयांची प्रामाणिकता, सत्यता व सामूहिक प्रेम भावना पाहून तो धन्य झाला होता. त्याने हरणाच्या कुटूंबाला जिवंत सोडून दिले. तेव्हा पासून शिकार पण सोडून दिली असा तो बोलला. वरून समस्त देवी देवता हे पाहत होते. समस्त देवी देवतांनी त्याच्या वर व हरीण परिवारावर फुलांचा वर्षाव केला. व भोले बाबांचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. अशाप्रकारे अजाणतेपणाने पण ईश्वर सेवा घडली तरी करुणामयी भोलेबाबा प्रसन्न होतात. आणि आजच्या दिवशी आपण हि महाशिवरात्रीची कथा वाचणार म्हणजे त्यांचे अजाणतेपणे स्मरण होणार त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपणास नक्कीच लाभेल.

महाशिवरात्रीच्या सर्व एमएच २८. इन सदस्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

पापनाशक बारा जोतिर्लिंग

१२ जोतिर्लिंग: महाशिवरात्री

भगवान शंकर त्रिदेवांपैकी एक.आहेत. यांना भोलेबाबा, भोलेनाथ, नीलकंठ, रुद्र, महेश, शिव, शंकर, महादेव अशा विविध नावांनी यांचे स्मरण केले जाते. यांची अर्धांगिनी शक्ती आहे त्यांचे नाव पार्वती आहे. यांचे पुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश आहेत. भगवान शंकराची पूजा शिवलिंग आणि मूर्ती अशा दोन्ही रूपात केली जाते. त्यांच्या गळ्यात नाग देवता विराजमान आहेत. हातात डमरू आणि त्रिशूल धारण केलेले आहे. कैलास त्यांचे निवासस्थान आहे. असे हे देवांचे देव महादेव ज्या ठिकाणी स्वतःहून प्रकट झाले त्या बारा ठिकाणी असलेल्या शिवलिंगला बारा जोतिर्लिंगाच्या रूपात पुजल्या जाते. हिंदू मान्यतेनुसार जो मनुष्य प्रतिदिन नित्य प्रातःकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळी बारा जोतिर्लिंगांचे स्मरण करतो त्याचे साताजन्माचे पाप यांच्या स्मरणाने नष्ट होतात. असे सांगितल्या जाते कि देवाधी देव महादेव यांचे १२ ज्योतिर्लिंग चे दर्शन करणारा व्यक्ती खुप भाग्यशाली असतो. या बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे ज्याच्या नशीब आहे तोच करू शकतो.
तसेच आज २४ फेब्रुवारी २०१७ ला महाशिवरात्री आहे आणि या पावन मुहूर्तावर जर आपण थोडं पुण्य अर्जित करू शकलो तर आपले जीवन सुद्धा धन्य होईल त्यामुळे आज आपण भोलेबाबांच्या १२ जोतिर्लिंगाची माहिती बघणार आहोत. बारा जोतिर्लिंगांची नावे व ते कुठे स्थित आहेत.

१) श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे आहे. काठेवाडच्या दक्षिणेस वेरावल बंदरगाहयेथे स्थित आहे. याचे निर्माण चंद्रदेवाने केले होते. सोम म्हणजे चंद्र आणि त्यांनी हेनिर्माण केले म्हणून याचे नाव सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. हे पृथ्वी वरील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.

२) श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्या मध्ये कृष्णा नदी काठी श्रीशैल नावाच्या पर्वता वर आहे. यास श्री शैल मल्लिकार्जुन नावाने पण ओळखले जाते.

३) श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठा वर आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची विशेषतः म्हणजे एकमेव दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग आहे.

४) श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये मान्धाता नागरी मध्ये विराजमान आहे या तीर्थस्थानाजवळच नर्मदा नदी आहे. हा सर्व भाग ओंकार आकाराचा आहे म्हणून याला ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते.

५) श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्या मध्ये हिमालय पर्वत रांगे मध्ये हे तीर्थक्षेत्र आहे. बद्रीनाथ चार धाम पैकी एक आहे. बद्रीनाथचे दर्शन घेण्यास आलेले केदारनाथच्या दर्शन घ्यायला येत असतात. काहीकाळ हे मंदिर बर्फामध्ये बुडालेले असते.

६) श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये पुण्याहून ११० किमी वर स्थित असून. सह्याद्रि पर्वत रांगेत आहे. येथे भीमा नदी वाहते.

७) श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश राज्या मध्ये काशी येथे आहे. काशीलाच वाराणसी, बनारस असे म्हणतात. गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

८) श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये नासिक जिल्हात गोदावरी नदीच्या जवळ आहे.

९) श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग झारखण्ड राज्या मध्ये अतिप्रसिद्ध देवघर येथे स्थित आहे.

१०) श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात दारूका जंगला जवळ आहे. द्वारकापुरी येथून जवळच आहे.

११) श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग तमिलनाडु राज्यात रामनाथपुरं येथे आहे. हे चार धाम पैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगची स्थापना स्वतः भगवान श्री रामचंद्रांनी केली होती त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला रामेश्वरम हे नाव पडले.

१२) श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात दौलताबाद च्या जवळच आहे. येथे जवळच शिवकुंड सरोवर आहे. बारा ज्योतिर्लिंग मध्ये हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.

महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना एमएच २८. इन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 

देवाधी देव महादेवाची आरती

आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त भोलेबाबांची आरती प्रस्तुत करत आहोत.

आरती

ॐ नमः शिवाय

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा। वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें। त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें। नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

महाशिवरात्री निमित्त सर्व एमएच २८. इन परिवारातील सदस्यांना हार्दिक शुभकामना.

लोणार सरोवर पर्यटन महोत्सव ३ ते ५ मार्च रोजी

lonar website

जगप्रसिद्ध लोणार सरोवर पर्यटन महोत्सवाचे आयोजन येत्या ३ ते ५ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. त्यादृष्टीने लोणार सरोवराच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे. लोणार सरोवर जगातील लोकांना बघता यावे.  त्याची माहिती आणि भेट देण्याच्या दृष्टीने http://lonarfestival.in संकेतस्थळाची स्थापना करण्यात आली आहे.

लोणार येथे ३ ते ५ मार्च दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी सकाळी ७.०० ते १०.०० वा. वेळेत सिंदखेड राजा ते लोणार महोत्सव ज्योत आहे.  त्या नंतर सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ होणार असून दुपारी ३.०० ते ५.०० सिंधुताई सपकाळ आणि डॉ. स्मिता देशमुख यांचे व्याखान होणार आहे. सायं. ७ ते १० या वेळेत स्वरानंद (डॉ. विकास आमटे निर्मित) यांचा आनंदवन तुमच्यादारी हा कार्यक्रम असेल.

दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी सकाळी ६.०० ते ७.०० वेळेत ‘मी धावतो लोणारसाठी ‘ ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्या नंतर सकाळी १०.०० ते २.०० वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोणार सरोवर महत्व व संवर्धन यावर दु. ४ ते ५ वेळेत परिसंवाद कार्यक्रम होणार आहे. चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांचा विनोदी कार्यक्रम सायं. ७.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे.

४ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ योगाथोन, ८ ते ९ अजित कडकडे यांचा भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. दु. १२ ते १ वेळेत प्रा. म. के. देशमुख हे संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित नाटिका सादर करतील. त्या नंतर सुरेखा पुणेकर यांचा ‘नटरंगी नार’ हा कार्यक्रम ७ ते १० वेळेत होणार आहे.

दरवर्षी लोणार महोत्सवाचे आयोजन व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत होती. ती प्रशासनाने पूर्ण केली आहे. हा महोत्सव दर्जेदार होण्यासाठी सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न होत आहेत.

विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात ?

why-airplane-windows-are-round/

विमान हा आधीही आणि आतासुद्धा कुतूहलाचा विषय होता आणि आहे.  विमानाचे पंख, इंजिन, ते उडत कसं असेल अनेक प्रश्न आणि त्याच्यात बसण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. अनेक प्रश्नांचं जाळं उभं राहतं. त्यापैकीच एक म्हणजे विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात ?

विमान आलं तेव्हापासून त्यात आमूलाग्र बदल झालेत. अनेक अपघात आणि त्यानंतर करण्यात आलेले बदल यामुळे आताचं विमान सुरक्षित आणि वेगवान सुद्धा झालं आहे. पूर्वी विमानाच्या काचा सुद्धा चौकोनी होत्या. परंतु बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या.
सन १९५० मध्ये हेवीलँड कॉमेट’ नावाच्या विमानाने त्याकाळचे सर्वात सुपर फास्ट विमान म्हणून या नावलौकिक मिळवला होता. प्रवाशी क्षमतेबाबही हे विमान इतर विमानांच्या तुलनेने सरस होते. विमान निर्मात्यांनी सर्व काही योग्य रीतीने केले होते पण त्यांच्याकडून एकच चूक झाली ती म्हणजे त्यांनी विमानाला चौकोनी काचा बसवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की १९५३ मध्ये ‘हेवीलँड कॉमेट’ प्रकारची दोन विमाने आकाशातून थेट खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये जवळपास ५६ प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.

अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासाअंती असा निष्कर्ष निघाला की, विमानच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला. परिणामी हवेच्या अति दाबासमोर काचा तग धरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या व विमान खाली कोसळले. त्या नंतर विमानाच्या काचा बदलण्यात आल्या. अपघात टाळण्यासाठी गोल काचांचा पर्याय पुढे आला. या गोल काचांना कोपरे नसल्याकारणाने काचेवर हवेचा दाब निर्माण होत नाही आणि काचा फुटायची शक्यता नसल्याने चौकोनी काचा जाऊन त्याठिकाणी विमानाला गोलाकार काच लावण्यात आली.

बदकावरील झक्कास निबंध

एका मुलाचा बदकावर झक्कास निबंध

बदक लय चांगला असतो, तो पाण्यात चांगला दिसतो.
बदक मले खुप आवडतो. काऊन कि तो उल्साक असतो.
त्यो पाण्यात पवतो. मी भी पाण्यात पवतो.
मी रोज पाणी पितो, पाण्यानेच आंग धुतो.
बदक तर लय खेप आंग धुतो. त्याले कोणी हटकत नाय.
मीनं ले खेप आंग धुतलं त बोंबलते मायी माय.
आमचे मन्नू काका दारू पितात व गटाऱ्याच्या पाण्यात लोळतात.
पण बदक सफेद असतो म्हणून त्याले पाण्यात सोळतात
बदक सफेद असतो, दूध भी सफेद असते मी रोज दूध पितो.
मी चांगला दिसतो, बदक भी चांगले दिसते, बदक रोज पाणी पितो.
बदक पाण्यात तरंगतो, आबा जवळ काडी हाये,
काडी भी पाण्यात तरंगते. पण मी पाण्यात तरंगत नाई.
काडीने आबा बकऱ्या चारायले नेतात. जंगलातून काड्या घरी आणतात.
कधी मले त्याच आणलेल्या काडीने हाणतात.
हं आणखी कबुतर सफेद असते, ते माया घरावर येऊन बसते.
पण बदक माया घरी येत नाय काऊन कि त्याले पाण्याच्या बाहेर जा वाटत नाय. .
बदक लय दूर उडत नाय म्हणून ते माया घरी येत नाय.
ईमान भी हवेत उडत ते भी सफेद हाय.
बदक काया भी असतो त्यो पाण्याने आंग धूत नाय,
नुस्त पाण्यात पवते म्हणून त्यो काया हाय.
मले दोन पाय आहे बदकाले भी हाय.
मी दोन पायावर चालतो बदक भी दोन पायावर चालतो.
मले बदक लय आवळते काऊन कि तो लय सुंदर दिसतो.
झाला माया निबंध लिहून.

स्वास्थ्यकारी कढीपत्ता

कढीपत्ता चे फायदे

कढीपत्ता हा आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. अंगणात प्रामुख्याने आढळणारा. हा कढीपत्ता जेवणामध्ये स्वाद वाढवतो, हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे..
कढीपत्ता हा अंदाजे ८-१० फूट सहज वाढणारा थोडीफार सावली देणारा आहे, त्याची हिरव्या रंगाची लांबट गोल पाने, आणि पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले सुगंधित असून याचे सौंदर्य खुलवतात. याची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची गोल व पिकल्यावर लालसर नंतर काळ्या रंगाची असतात.
याला वर्षभर पाने असतात जेवणामध्ये याचा बहुतेक सर्वच ठिकाणी वापर होतो. याला कढीपत्ता, करीपत्ता, गोडनिंब अशी नावे आहेत. आज आपण याची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
जेवण करतांना कढीपत्ता आपण हाताने बाजूला सारतो पण आपल्याला त्याचे गुण व महत्व माहिती झाले कि आपण त्याला जेवणातून काढून टाकणार नाही.

१) कढीपत्त्यामध्ये विविध औषधीय गुण लपलेले आहेत. या मध्ये पोषक तत्व आहेत म्हणून याचे सेवन अकाली केस पांढरे होणे, केस गळने थांबवते. याच्या सेवनाने केस मजबूत होतात. निरोगी केसांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
२) कढीपत्त्यापासून बनवलेले तेल केसांच्या समस्येवर उपयोगी आहे.
३) कढीपत्ता पाने सुकवून त्याची पावडर बनवा हि पावडर तेलात मिक्स करा. आणि या तेलाने केसांची मालिश करा. याच्या वापरमुळे केसांची वाढ होते व केसांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.
४) डोळ्यांसाठी उपयुक्त याच्या सेवनाने दृष्टी चांगली राहते.
५) याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदय विकारांवर उपयोगी आहे.
६) कढीपत्ता रक्तातील साखर कमी करतो म्हणून याचे सेवन मधुमेहावर उपयोगी आहे.
७) कढीपत्ता लठ्ठपणा कमी करण्यासाठी सहाय्यक आहे.
८) या मध्ये एंटीऑक्सीडेंट असते. याची पाने खाल्ल्याने एक विशेष स्फूर्तीचा अनुभव होतो.
९) कफ दूर करण्याचे काम करते. तसेच पित्त नाशक आहे.
१०) विषारी जीव जंतू चावल्यास कढीपत्त्याच्या फळांचा रस व निंबूचा रस मिसळून लावल्यास फायदा होतो.
११) कढीपत्त्याचे नियमित सेवन मासिकपाळीच्या वेळी होण्याऱ्या त्रासाला कमी करते.
१२) याच्या सेवनाने भोजन लवकर पचते. पचनशक्ती वाढवते.
१३) इन्फेक्शन झाल्यास याच्या सेवनाने फायदा मिळतो.
१४) किडनीसाठी लाभकारी आहे.
१५) सुंदर त्वचेसाठी सुद्धा कढीपत्ता चे सेवन लाभदायक आहे.

औषध म्हणून कढीपत्त्याचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

विमानाचा रंग पांढराच का असतो ?

why aeroplane in white color

आपण नेहमी आकाशात पाहतो तर आपल्याला पांढऱ्या रंगाचे विमान दिसते. क्वचितच एखादे दुसरे वेगळ्या रंगाचे दिसते. ते सुद्धा पूर्ण रंगीत नसते तर काही ठिकाणी फक्त रंगीत पट्टे अथवा चित्र ई. दिसून येतात. तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का, विमानाचा रंग हा पांढराच का असतो ? तर चला जाणून घेऊया.

पांढरा रंग हा एव्हरग्रीन रंग आहे! म्हणजेच – बाकीचे रंग उन्हाने, पावसापाण्याने खराब होतात, फिके होतात पण पांढरा रंग जसाच्या तसा राहतो. एक तर विमान म्हणजे एखादी बस किंवा कार नाही की लांबी- रुंदी कमी आणि रंग देण्यास सुद्धा कमी पैसे लागतील. एका विमानाला रंगवण्याचा खर्च साधारण ५० हजार ते २ लाख डॉलर्स इतका होतो. चांगलं दिसलं तर ग्राहक वाढतील म्हणून रंग देणं योग्य वाटू शकतं पण त्यासाठी पैसा अधिक लागतो. त्यामुळे दिसायला बरं वाटेल एवढ्या भागात रंग दिल्या जातो आणि इतर पांढऱ्या भागावर फक्त पॉलिश दिलं जातं!

पांढरा रंग हा उष्णतेपासून रक्षण करतो. विज्ञान सांगतं – गडद रंग सूर्यप्रकाश जास्त शोषतात आणि त्यामुळे जास्त गरम होतात. विमान जेवढं तापेल, तेवढा त्या विमानाच्या AC चा खर्च वाढणार. पांढरा रंग बाकीच्या रंगांपेक्षा कमी उष्णता शोषतो आणि तुलनेने कमी गरम होतो.

पांढरा रंग हा लक्ष वेधून घेतो त्यामुळे जसा पांढऱ्या शर्टवर एखादा काळा डाग लगेच दिसून येतो तसेच पांढऱ्या background मुळे विमानावर oil leak, गंज पटकन ओळखता येतो. निळ्याशार आकाशात पांढरं विमान दिसून येतं, तसंच जमिनीवर सुद्धा विमान ओळखता येतं.

विमान घेताना ते फारच महागडं असत लाख दोन लाखात मिळणारी गोष्ट नसल्यामुळे जर तुम्ही विमान दुसऱ्या रंगात रंगवलं तर त्याची resale किंमत कमी होते. कारण विकत घेणाऱ्याला विमानाला परत रंग देत बसावं लागतं. त्यामुळे अशी गोष्ट कुणीच करीत नाही. याबरोबरच अनेक विमानं ही लीजवर घेतलेली असतात. बहुतेक विमान कंपन्या स्वतः विमान खरेदी करीत नाहीत. त्यांनी ते विमान-मालकाकडून लीज वर घेतलेले असते. समजा एखाद्या कंपनीची लीज संपली तर कंपनीचं नाव आणि लोगो काढून दुसऱ्या कंपनीचं लावायचं, बस! हे बदल करण्यासाठी पांढरा रंग वापरण्यात येतो.

तुमच्यासाठी विमानाला रंगरंगोटी करतानाचा एक छोटासा विडिओ आपल्या विडिओ कॅटेगरी मध्ये बघा.

नांदेड आरोग्य विभागात ८३ जागांसाठी भरती

job opening on MH28.in buldana

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड येथे विविध पदाच्या एकूण 83 मुलाखती घेण्यात येणार आहे. नांदेड आरोग्य विभागात ८३ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. थेट मुलाखतीद्वारे सदर जागांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. ३१ मार्च २०१७ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

उमेदवार हा 12 वी पास, BSW किंवा MSW पदवी परीक्षा उत्तीर्ण +MSCIT, 10 वी पास. BSC नर्सिंग, MS, MD, MS(OBGY)/DGO,
MBBS, BDS, B.Sc.(नर्सिंग) असावा. शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा विविध पदानुसार आहे. यासंदर्भात अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

आरोग्य विभागात स्त्रीरोग तज्ञ : 3 जागा, बालरोगतज्ञ : 4 जागा, सर्जन : 3 जागा, फिजिशियन : 6 जागा, एनेस्थेटिस्ट : 2 जागा, Specialist Cardiology/General Medicine: 01 जागा, कंन्सल्टंट मेडिसिन : 01 जागा, डेंटल सर्जन : 01 जागा, स्टाफ नर्स : 24 जागा, कौंसलर (NTCP) : 01 जागा, सोशल वर्कर : 01 जागा, डेंटल हयजीनिस्ट : 01 जागा, कौंसलर (NCD) : 17 जागा, डेंटल असिस्टन्ट : 01 जागा इ. जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी लिंक.

आरोग्यवर्धक अद्रक

चहा प्यायला गेल्यावर साहजिकच प्रत्येकाच्या तोंडून निघते मस्त अद्रक टाकून चहा करा. म्हणजे चहाची चव या अद्रकामुळे वाढते. तसेच हा मसाल्यातील पदार्थ असून हा प्रत्येकाच्या घरात सहजच उपलब्ध असतो. पण हे अद्रक फक्तच चवीसाठी नाही वापरत तर याचा औषधी उपयोग सुद्धा आहे.  अद्रका मध्ये विविध गुण आहे तसेच याचे विविध उपयोग सुद्धा आहेत.अशा या अद्रकाचे दैनंदिन जीवनात फार मोलाचे योगदान आहे. चला तर मग आज आपण बघुयात या जमिनीच्या गाभाऱ्यात जन्मणाऱ्या अद्रकाचे उपयोग.

या अद्र्काला मुखवास म्हणून खाल्ल्या जाते हे पाचक असते.

उल्टी – या स्थिती मध्ये अद्रकाचा रस व कांद्याचा रस सारख्या प्रमाणात सेवन करावे.

घसा – आपला घसा थंडी मुळे अथवा थंड पेय पिल्या मुळे खराब झाला असेल तर अद्रकाचा रस व मध याचे सेवन दिवसातून २ – ३ वेळा करा.

भूख वाढवण्यासाठी – जेवणा पूर्वी मिठा सोबत अद्रक खा, किंवा सुंठ पावडर देखील जेवणा पूर्वी घेऊ शकता.

खोकला – खोकला झाल्यास घश्यात खवखव जाणवत असल्यास अद्रक खावा आराम वाटतो.

जखम – अद्रक पेस्ट करा जेथे जखम झाली आहे त्या भागावर जाडसर लेप लावा व त्यावर पट्टी बांधून ठेवा २ तासाने हा लेप काढून घ्या.
मुक्का मार लागलेला असेल तर या प्रक्रिये नंतर सरसोचे तेल लावा व त्या ठिकाणी सेक द्या आराम पडतो.

अपचन – जेवण झाल्या नंतर अद्रकाचा रस, निबू रस व सेंधेमीठ गरम पाण्यात टाकून प्यावे.

कान दुखी – अद्रकाचा रस थोडा गरम करा व कानात टाका.

नेत्र रोग– अद्रक जाळून त्याचे काजळ बनवा व त्याचा वापर काजळ म्हणून करा.

डोके दुखी – या मध्ये अद्रकाचा रस, सेंधेमीठ व हिंग यांच्या मिश्रणाने मालीश करावी.

औषध म्हणून अद्रकाचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

स्वयंपाकासाठी उपयुक्त अशा टिप्स..

स्वयंपाक करतेवेळी बऱ्याचवेळा मुलींची, नवनवरीची तारांबळ उडत असते.घरातील मोठ्या महिलांना तर दीर्घ अनुभव असतो स्वयंपाकाचा. पण नवं युवतींचे काय ? होतात चुका मग अशावेळी काय करायचं हे एन वेळेवर आठवत नाही. कधी भाजीत मीठ जास्त होते, तर कधी भाजी वेगळी व रसा वेगळा पळतो, तर कधी खूपच पातळ रसा होतो, चांगला तांदूळ वापरला तरी भात काही पांढरा शुभ्र होत नाही, भांड्यांना कांद्याचा लसणाचा वास राहतो, पुऱ्या बनवताना खुसखुशीत होत नाहीत. अशा विविध समस्या स्वयंपाक बनवताना येतात. तर आज आपण याच अडचणी दूर करण्यासाठी यावर काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत.

१) तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो.

२) भाजीचा रसा घट्ट, स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचे किंवा तिळाचे कूट, नारळाचा किस करून भाजीच्या रस्यात टाका.

३) कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.

४) भांडय़ाला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. वास निघून जातो.

५) हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा लिंबू चोळा.

६) पुरीसाठी पीठ भिजवतांना त्यात थोडं दूध व बेसन किंवा गरम तेल. पुर्‍या खुसखुशीत बनतील.

७) मसालेदार पदार्थांची रस्सा घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.

८) डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे मिक्सर मधून बारीक करून टाका.

९) दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी टाका. दूध खाली लागणार नाही.

१०) हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत बनवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.

११) जर भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, हे पाणी भाजीत किंवा कणीक भिजवतांना ही वापरता येते. भाज्या, कडधान्य उकळून न घेता हे वाफेवर ही शिजवू शकता.

१२) आपण भाज्या किंवा फळे ४-५ तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेच अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.

१३) पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सर मधुन बारीक करून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो. स्वादही वाढतो.

१४) आपण ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही. गोल थापली जात नाही. या वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही.

१६) वरणासाठी डाळ शिजवताना त्यात थोडी चिंच टाकावी म्हणजे वरण रुचकर होते आणि चविष्ट बनते.

१७) कोणत्याही गोड पदार्थात चिमुट भर मीठ घातल्यास छान चव लागते.

१८) रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत. छान रस निघतो.

१९) पोहे बनवल्यावर त्यावर खोबरं किस रंगीत करून वापरावा. म्हणजे दिसायला सुंदर दिसते व चवीलाही छान.

२०) काजू बदाम सुकामेवा डब्ब्यात भरणीत भरून ठेवता ? त्याला कीड लागण्याची शक्यता असते म्हणून त्यात २-३ लवंग टाकून ठेवा.

२१) कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या मिठ लावून ठेवा व काहीवेळाने धुवून त्याची भाजी करा.

२२) शिरा बनवताना रवा थोडा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा.जास्त स्वादिष्ट होतो.

२३) ब्रेड उरली असेल तर ब्रेडचे तुकडे तुपात फ्राय करावे नंतर साखरेच्या पाकात विलायची आणि सुकामेवा टाकावा त्यात हे तुकडे टाकावे स्वादिष्ट लागतात.

२४) रात्री पोळ्या उरल्या तर पोळ्यांचा जाडसर भुगा करावा व पोह्याप्रमाणे फोडणी देऊन पोळ्यांचा चिवडा बनवावा हा चिवडा लहान-मोठ्या सर्वांना आवडतो.

२५) धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात.

पुण्यदायी विजया एकादशी

विजया एकादशीची कथा वाचल्याने ऐकल्याने मिळते वाजपेय यज्ञाचे फळ.
हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे विजया एकादशी होय. विजया एकादशी तिच्या नावावरूनच ओळखल्या जाते. हि व्यक्तीला विजय देते. जेव्हा चारही बाजूंनी मनुष्य संकटामध्ये अडकतो त्याला स्वतःचा पराभव दिसू लागतो. अशा परिस्थिती मध्ये विजय मिळवायचा असल्यास विजया एकादशी चे व्रत हे सर्वोत्कृष्ट उपाय मानल्या जातो. हि एकादशी माघ/फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला अकराव्या तिथीला येते.

व्रत कथा
कुंतीनंदन जया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. जया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे व्रत करणारा व्यक्ती नेहमीच विजय प्राप्त करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन आपण माझे परम मित्र आहेत. आणि आपण खूपच चांगला प्रश्न केला आहे. या कथेला ऐकल्यावर आपणास आनंद मिळेल, तसेच हि कथा ऐकणे व वाचल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. आता पर्यंत हि कथा मी कुणालाच सांगितली नाही. यापूर्वी हि कथा नारदजींनी ब्रह्माजी कडून ऐकली होती.
त्रेतायुगात भगवान श्रीहरी नारायणजीचे अवतार म्हणून प्रभू रामचंद्रांनी या सुंदर पृथ्वीवर जन्म घेतला होता. जेव्हा मर्यादा पुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या पत्नीला सीतेला शोधत समुद्रा जवळ पोहचले. तिथेच समुद्र किनारी त्यांचा परम भक्त जटायू नावाचा पक्षी राहायचा. त्या जटायूने सांगितले कि सीता मातेला राक्षसराज लंकेश रावण समुद्राच्या पलीकडे लंकेत घेऊन गेलाय. त्याने मातेला अशोक वाटिकेत ठेवले आहे. जटायू कडून माहिती मिळाल्यावर प्रभू श्रीरामचंद्र वानर सेने सोबत आक्रमणाची तयारी करू लागले. पण एवढ्या मोठ्या समुद्राला कसे पार करावे हा भीषण प्रश्न त्यांच्या समोर होता.
तेव्हा त्यांनी त्यांचे प्रिय बंधू लक्ष्मणजींना प्रश्न केला कि मला सांग तुझ्याकडे काही उपाय आहे का ? लक्ष्मण जी बोलले कि महान ऋषी वकदाल्भ्य मुनि हे इथून काही अंतरावरच राहतात त्यांचा आश्रम आहे त्यांना आपण भेटूया तेच आपणास पुढील मार्गदर्शन करतील. तेव्हा भगवान श्रीराम व लक्ष्मण महान ऋषी वकदाल्भ्य मुनि यांच्या आश्रमात पोहचले. त्यांना प्रणाम केला. व विनम्रतेने त्यांच्या पुढे हा भीषण प्रश्न प्रस्तुत केला.
वकदाल्भ्य मुनि म्हणाले हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मी आपणास विजय प्राप्त करून देणाऱ्या व्रता बद्दल माहिती देतोय. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे व्रत तुम्ही करा हे केल्यास निश्चितच तुम्ही समुद्र पार करून रावणाला पराजित करणार यात संशय नाही.
विजया एकादशी व्रत कसे करावे याबद्दल ऐकून घ्या. या एकादशीला अशी मान्यता आहे कि स्वर्ण दान, भूमि दान, अन्नदान आणि गौदान करून पुण्यफळाची प्राप्ती करू शकता. या दिवशी श्रीहरी नारायणजीची पूजा केल्या जाते. व्रत पूजेत धूप,दीप,नैवेद्य, नारळाचा प्रयोग केल्या जातो. सप्त धान्य घट स्थापना केल्या जाते. सप्त धान्य- गहू, उडीद, मुंग, चना, जौ, तांदूळ, आणि मसूर आहे. यावर श्रीविष्णुजींची मूर्ती ठेवल्या जाते. या व्रताला करणारा व्यक्ती पूर्ण दिवस व्रत करून रात्री विष्णु पाठ करत जागरण करतो. हे व्रत २४ तासांसाठी केल्या जाते. या व्रताची पूर्णता द्वादशीला सकाळी दान धर्म करून, अन्नदान करून केलॆल्या जाते.
प्रभू श्रीरामचंद्र यांनी लक्ष्मण व संपूर्ण वानर सेने सह महर्षीजींनी सांगितलेल्या तिथीनुसार एकादशी व्रत संपन्न केले. प्रभू श्रीरामचंद्र संपूर्ण वानर सेनेसमेत समुद्र पार करून लंकेत पोहचले व रावणाचा अंत केला.
अशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या परम मित्राला सांगितले कि या एकादशीला जो व्रत उपवास करतो त्याचे विघ्न दूर होतात. तसेच त्याचे पाप नष्ट होते. आणि त्यावर कितीही मोठे संकट असो तो त्यावर मात करून विजय प्राप्त करतो. अशाप्रकारे विजया एकादशीचा महिमा सांगितला.

रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट सेवा बंद होणार

jio stop free internet

भारतीय टेलिकॉम विश्वात खळबळ उडवून दिल्यानंतर आता आपल्या ग्राहकांसाठी सुद्धा एका धक्कादायक बातमी ‘रिलायन्स जिओ‘ ने आणली आहे. रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट सेवा ३१ मार्चला बंद होणार आहे. १ एप्रिलपासून जिओ नेटवर्कवरून व्हॉइस कॉल आणि रोमिंग मोफत असेल, पण डेटासाठी नवे टेरिफ प्लॅन सुरू होणार आहेत.

३१ मार्चपूर्वी जिओची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना ९९ रुपयांत जिओ प्राइमचं सदस्यत्व दिलं जाईल आणि या सदस्यांसाठी ३०३ रुपयांचा एक खास प्लॅन असेल, असं रिलायन्स जिओ तर्फे जाहीर करण्यात आलं आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत या सदस्यांना जिओ न्यू इअर ऑफरचा फायदा मिळणार असून ३०३ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये त्यांना अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. My Jio App, jio.com वरून १ ते ३१ मार्चदरम्यान जिओ प्राइमचं सदस्यत्व घेता येईल.

ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग २ सोन्याचा प्रेतलोकातील प्रवास

सदू बुआ सुरश्याला कथा सांगू लागले. काल जसा दगडू पिशाचच्या तावडीतून सुटला होता. तसेच आज सोन्या अदृश्य लोकातून परत येतो. त्याचा प्रेतलोकातील प्रवास खूप काही शिकवतो. हि कथा मला माझ्या आबांनी सांगितलेली आहे असे सदू बुआ सांगू लागले. सोन्या हा एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-वडिलांनी त्याचा एवढा लाड केला की त्याला चांगले संस्कार द्यायचे ते विसरलेत. सोन्या जसा मोठा झाला तसा त्याने सर्व गावात उनाडक्या करून सर्वांना खोडकर वृत्तीने त्रास देणे सुरु केले. त्याच्या आई-वडिलांना कुणी सांगितले की तुम्ही याला एखाद्या आश्रमात नेऊन घाला आजवरच याला शिकायला पाठवलं असत तर हा असा बनला नसता.
त्याच्या घरचे त्याला किसना बुआकडे घेऊन जातात. व नम्र विनंती करतात की तुम्ही याला शिक्षण द्या. किसना बुआ त्याला ठेऊन घेतात. दिवसेंदिवस शांत आश्रमाचे वातावरण सोन्यामुळे बिघडते. गुरुजी त्याला दंडित करतात. हळू हळू त्याला तिथे राहण्याची सवय होते. पण त्याची वृत्ती हि खाण्यामध्ये, उनाडक्या करण्यामध्येच लागून असते. दिसायला धिप्पाड व उन्मत्त सोन्या त्याच्या कक्षात सर्वांपेक्षा मोठा दिसतो त्यामुळे त्याच्या कक्षातील सर्व मुल त्याला भितात. तो सांगेल तसे सर्वांना करणे भाग पडते, असेच एक दिवस उन्मत्त सोन्या सर्व मित्रांना घेऊन एक दिवस कुणालाच न सांगता जंगलात भ्रमण करायला जातो. जंगलात फिरत असताना नाल्या खोऱ्यात अंघोळ करणे, झाडांची फळे खाणे, गुल्लर ने पक्ष्यांना मारणे, झाडावरून पक्ष्यांची घरटी पाडणे, अशाप्रकारची मौज मजा करण्यातच सोन्याचा दिवस निघून जातो. ते सर्व एका टेकडीवर उभे असतात. व अचानक सोन्याच्या पाय सटकतो व सोन्या खाली दरीत कोसळतो सर्व मित्र आरडाओरड करतात तितक्यात सोन्या सर्वांच्या दृष्टीआड जातो. आणि दिसेनासा होतो.
इकडे सर्व मित्र आश्रमात पळत जातात आणि गुरुजींना जे घडले त्याचा सविस्तर वृतांत सांगतात. गुरुजी सर्वांवर रागवतात की कोणी सांगितले होते जंगलात जायला. माझी अनुमती घेतली होती का ? तेव्हा मुले बोलतात गुरुजी सोन्याने भीती दाखवली होती की त्याचे नाही ऐकले तर तो आम्हाला त्रास देईल. गुरुजी काही विशेष शिष्यांसोबत त्या जागेवर जातात आणि तपास करतात. पण सर्व प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही. सर्व आशा सोडून देतात. पण गुरुजी आशा सोडत नाहीत ते म्हणतात की मला काहीतरी वेगळ घडल असा संशय आहे. तो येईल. पण सध्या तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि तिथून निघून जातात. सोन्याच्या आई बाबाला निरोप देऊन सूचित केल्या जाते. ते येऊन आबांना भेटतात आबा त्यांना सांगतात की, सोन्याच्या वर्तणूकी मुळेच सोन्या आज संकटात सापडलाय.
तुम्ही त्याचा एवढा लाड केला की त्याला पुरता बिघडवून ठेवलाय. या आश्रमातील सर्वात खोडकर मुलगा आहे तो. मला नेहमी हीच भीती होती की असे काही विपरीत घडू नये. असो. सध्या तुम्ही ईश्वराचे स्मरण करायला बसा. किसना आबा महादेवाचे एकनिष्ठ भक्त असतात ते सोन्याच्या कुशल मंगलतेसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. तिकडे सोन्या एका सरोवरात पडतो व त्याला डोळ्यासमोर काही वेगळेच दिसायला लागते. तो एका भयानक साम्राज्यात जाऊन पोहचतो तिथे त्याला कुठेच उजेड दिसत नाही त्याला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याला तिथे एक धुरांनी बनलेला वायुक्त राक्षस कवट्याच्या आसनावर बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला एक काळे कुत्रे बांधलेले असते. त्या प्रेतराजच्या चारही बाजूला त्याचे अधीन भूत, प्रेत, आत्मे गोलाकार फिरत असतात. तो त्याच्या सहाय्यक प्रेतांना बोलतो की त्या जीवात्म्याला घेऊन या. सोन्याला प्रेत… प्रेतराज समोर हजर करतात. तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूत, चुडेल, असे अनेक विचित्र दृष्ट आत्मे बघायला मिळतात. सर्व त्याला त्रास देतात. कुणी अपघातात, कुणी इच्छा अपूर्ण असताना मेलेले लोक आणि त्यांचे अतृप्त आत्मे भटकतांना दिसतात. सोन्या बोलतो मी तर टेकडीवर उभा होतो पण माझा पाय सटकला व मी खाली पडलो पण मी इथे कसा आलो. प्रेतराज बोलला तू आला नाहीस तुला आम्ही आणल इथे, तुझ्यावर तर आमची दृष्टी खूप वर्षा आधीच होती. जेव्हा तुला आश्रमात आणले तेव्हा तुझ्या गुरूंनी तुला रुद्राक्ष दिला होता तो तू गळ्यात धारण केला नाहीस. कलावा हातात बांधायला तुला आवडत नाही. तेव्हाच आम्हाला समजल होत की तूच आमच्या इच्छा पूर्ण करू शकतोस. तू ज्या सरोवरात अंघोळ केली ते आमच अदृश्य सरोवर आहे ते जीवात्म्यांना दिसत नाही. तू जे काही फळ तोडून खाल्ली ती सुद्धा आमची आहेत. ती फळे नसून मासाची गोळे होती. तू सर्व नियम भंग करून भूतलावर जीवन व्यतीत करतो म्हणून तू आमच्या तडाख्यात सापडलास तू सध्या प्रेतलोकामध्ये आहेस.
आम्हाला जशी प्रवृत्ती पाहिजेत तू त्या प्रवृत्तीचा आहेस तुझी मानसिकता आमच्या सारखीच आहे. तुला सुद्धा दुसऱ्यांवर हुकुम गाजवायला आवडतो. दुसऱ्यांना विनाकारण त्रास द्यायला आवडतो. तू नित्य कुकर्म करतो. तुझ्या मित्रांना त्रास देतो. गुरूंचे ऐकत नाहीस. नेहमी असत्य बोलतोस. धर्म नियमानुसार तिथी, पवित्रता पाळत नाहीस. उद्धट सारखा बोलतोस. कुणाचाही अपमान करणे म्हणजे तुला विशेष वाटत नाही हि तुझी रुची आहे. नेहमी कामवासनेत तुझे मन अटकलेले असते. तुला मास-मदिरा सेवन करायला आवडते. या सर्व गोष्टी आमच्या सर्व प्रेतलोकांतील आहेत. हीच तर आमची प्रवृत्ती आहे. म्हणून आम्ही तुला आता पकडले आता तुला आम्ही सोडणार नाही. आता आम्ही तुझा आत्मा इकडे बंदिस्त करणार आणि तुझ्या शरीराच्या माध्यमातून आमच्या सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करणार आणि सर्व त्याला पछाडतात. त्याला अतिशय वेदना होतात. त्याला त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन दाखवतात. त्याला उचलून पटकतात, त्यावर काळ्या मांजरी सोडतात, त्याच्यावर वाटवाघुळ हल्ला करतात. त्याला असह्य वेदना होतात. त्याला एका शिळेला बांधून ठेवण्यात येते.
तिथे त्याला एक चांगला प्रेतात्मा भेटतो…. तो बोलतो पोरा इतक्या दिवस आश्रमात राहलास तुला मंत्र येत असतीलच त्यांचा उच्चार कर म्हणजे तू इथून सुटू शकतोस. मी दुसऱ्या लोकातील आहे मरणाच्यावेळी माझ्यात चांगले भाव होते म्हणून मी चांगला भूत बनलो. तू एक काम कर सध्या कृष्णपक्ष सुरु आहे सध्या या प्रेतांची शक्ती वाढलेली असते. अजून काही दिवस यांचा त्रास सहन कर. दोन दिवसांनी अमावस्या आहे त्या दिवशीच हे प्रेत तुझा देह धारण करतील. त्या दिवशी तर यांची शक्ती फारच वाढलेली असते. त्या दिवशी तुला हे जास्त त्रास देतील तुला जर गुरूची शिक्षा लक्षात असेल तर तस कर म्हणजे तुला वेदना कमी होतील. अमावस्ये नंतर शुक्ल पक्ष सुरु होतो त्यादिवशी जर तू इथे मंत्र उच्चारण करत बसला तर तू तुझ्या शरीरात जाऊन तुझ्या आप्तांजवळ जावू शकतोस आणि तो चांगला भूत निघून गेला.
पण सोन्याला काहीच आठवत नाही कारण त्याने कधीच त्यात रस घेतलेला नसतो त्याला फक्त उनाडक्या करणे आवडायचे. तो मनाशीच पुटपुटला मी तर कधीच काही शिकून घेतले नाही गुरुजी सांगायचे तेव्हा मी दुसऱ्यांच्या खोड्या करायचो आता मी कुठून मंत्र उच्चारू ? मला तर एक पण मंत्र येत नाही.  मी कधी कुठल्या देवाची पूजा केली नाही. आणि विचार करू लागला आठवू लागला त्याला गुरुजींनी काय काय शिकवलेलं आहे. आपण जीवनात कधीच गंभीर नव्हतो म्हणून आपल्याला काही येत नाही. आणि सोन्याला त्रास द्यायला प्रेत तिथे आली व त्यांनी सोन्यावर चमकणारी कुत्री छुवाडली…सोन्या कावरा-बावरा होऊन पळू लागला… काळ्या मांजरी त्याच्या गळ्याला चावा घेत होत्या…आणि तीतक्यात सोन्याला समोर एक प्रचंड काळ्या धुरांनी व्यापलेला, धग धगत्या आगीसारखा लालबुंद डोळे असलेला एक पिशाच्च समोरून येतांना दिसला आता तो सोन्यावर तुटून पडणारच तर… मध्ये कुणीतरी आडव आल आणि त्याने सोन्याला बाजूला सारल कोण असावे ते आपल्याला वाचवायला आल असेल असे सोन्या विचार करू लागला. पण सोन्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती कि ते रक्षण करायला आले कि त्याला नष्ट करायला… महाभयंकर दानव सोन्याच्या प्रतीक्षेत होता.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

उपवासासाठी स्पेशल डिश

उद्या विजया एकादशी नंतर महाशिवरात्री म्हणजे उपवास आलाच.. मग उपवास म्हटले कि प्रत्येकाला प्रश्न पडतो कि करावे तरी काय कारण नेहमी नेहमी साबुदाणा उसळ, भगर, नायलॉन साबुदाणा चिवडा, आलू चिप्स, किंवा रताळे उकळून खायचे हे सगळं खाऊन खाऊन कंटाळा येतो ना. मग असे नवीन काय खाऊ शकतो आपण कि जे बनवण्यास पण सोपे असेल व उपवासालाही चालेल तर चला आज जाणून घेऊयात उपवास स्पेशल.

रताळ्यांचा शिरा

साहित्य
१) अर्धा किलो रताळी
२) गूळ एक वाटी
३) ओला नारळ दीड वाटी किसलेला
४) चार/पाच दोंडे वेलची पूड
५) तूप
६) आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता.

कृती
रताळ्याच्या साली काढा.
त्याचे पातळसर गोल चकत्या करा व बाजूला ठेवा.
कमी गॅस करून जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळ्यांच्या चकत्या टाका.
झाकण ठेवून शिजत ठेवा.रताळी मऊसर होऊ द्या.
रताळी शिजली की त्यावर नारळ किस, गूळ आणि वेलची पूड टाका.
थोडा वेळ कमी गॅस वर शिजवा. व मिक्स करून घ्या. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.
झाला तयार रताळ्याचा शिरा सर्वांनाच आवडेल असा. करून बघा.

झटपट लसूण सोलण्याच्या टिप्स

घरात कुणाला लसूण सोलायला दिला कि नाकावर वळ्या पडतात कारण कि तो लवकर सोलल्या जात नाही. ते किचकट काम आहे. मग त्यासाठी विविध प्रकारचे गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स आपल्या कडे असतात किंवा आपण सोलत बसतो.  पण आज आपण बघणार आहोत काही अशा टिप्स कि या टिप्स मुळे  लसूण  तुम्ही झटपट सोलू शकणार.  तुम्हाला गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स वापरण्याचे काम नाही किंवा उगाच वेळ घालवायचा काम नाही.

१) एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका. एका तासानंतर हे पाण्यातुन काढून घ्या. यावर थोडा दाब द्या हाताने अलगद साल काढू शकता.

२) फक्त ३० सेकेंदांसाठी लसणाच्या पाकळ्या मायक्रोवेवमध्ये ठेवा. जेव्हा काढणार तेव्हा लसणाने थोडी साल सोडलेली दिसेल लसूण थंड झाल्यावर सहजच साल काढू शकता.

३) जर तुमच्या जवळ मायक्रोवेव नसेल तर तुम्ही याचे साल काढण्यासाठी कढईचा वापर करु शकता. त्या करता गॅस वर कढई ठेवा व थोडी गरम झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका व परतून घ्या (मात्र लक्षात ठेवा कढईत आपल्याला काहीच टाकायचे नाही आहे. जसे तेल व पाणी देखील नाही.) नंतर ते लसूण साल सोडलेली दिसतील व तेव्हा ते थंड झाल्यावर हाताने अलगद साल काढू शकता.

४) लसणाच्या पाकळ्या जमिनीवर किंवा हातावर रगडा ते साल सोडेल मग आरामात तुम्ही साल काढू शकता. .

५) दुसरी पध्दत म्हणजे, लसुणला चाकु खाली पकडा आणि हाताने दाबा. असे केल्यास लसणाची साल वेगळी होईल व नंतर हाताने ती काढून घ्या.

६) तुम्ही लसुणला बॉटलमध्ये १०-१५ मिनीटे ठेवा. नंतर हे भांडे किंवा डब्बा १० मिनिट हलवा. लसुण आपोआप सोलून निघतो व काही राहिलेली साल हाताने काढून घ्या.

ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग १
पिशाच्च आणि दगडू

आनंदराव अगदी शांत स्वभावाचे आणि धार्मिक वृत्तीचे व नावाप्रमाणे नेहमी आनंदी राहणारे गृहस्थ. त्यांना सर्व आदराने दादा बोलायचे. दादांना सर्व मानायचे. त्यांचा एक वेगळाच दबदबा होता. त्यांचा खूप अभ्यास झालेला. त्यांच्या आधारस्तंभ त्यांच्या पत्नी सुमनबाई, ह्या त्यांचा भरभक्कम आधार.
त्यांना तीन मुले, सुना, दोन मुली सर्वांचे विवाह करून यांनी सर्व कर्तव्य पार पडलेली. तीन नातवंड मुलांची व दोन मुलींची. हे सर्व शेतात गावाबाहेर राहायचे एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरातील संख्या जास्त सर्व मिळून मिसळून राहायचे अगदी सुखी आणि समाधानी कुटुंब. त्याकुटुंबात त्यांचा नातू सुरश्या, गण्या, राजा त्यातील सूरशा हा अगदी लाडाचा, सूरशाच्या जन्मावेळी सांगण्यात आले होते की हा मोठा झाल्यावर मोठ्या संकटात सापडू शकतो याच्याकडे विशेष लक्ष द्या. तसा हा भविष्यात खूप मोठा व्यक्ती बनेल. तेव्हा पासून सूरशा कडे दादांचे जास्तच लक्ष लागलेले होते. दादा घरातील सर्वांना रोज सकाळ संध्याकाळ शेतातील मंदिराच्या मंडपात घेऊन बसायचे त्यांना विविध श्लोक शिकवायचे धार्मिक माहिती द्यायचे. रोज त्यांचे समवयस्क मित्र मंडळीना घेऊन भजन करायचे. सर्व विविध प्रश्न त्यांना विचारायची आणि दादा त्यांच्या प्रश्नाचे समाधान करायचे.
असच रोजच्या दिनचर्येनुसार दादा संध्याकाळी सर्वांना घेऊन बसले होते. तेवढ्यात दादांचे मित्र सदु बुआ बोलले दादा मला एक प्रश्न विचारायचा होता दादा बोलले विचारा.
सदु बुआ बोलू लागलेत की दादा काल रात्री पोरगा रोजच्या पेक्षा जरा उशिराच घरी आला आणि घरी आल्यापासून सारखा – सारखा रडत आहे म्हणे की शेतावरून येत असताना मला चिंचेच्या वनात काही वेगळ दिसलं. आणि मी त्याच्याकडे बघितलं तर ते माझ्या मागे लागल मी कसा बसा जीव मुठीत ठेऊन पळतच घरी आलो. आणि रडायचा, मला नेमक समजल नाही की त्याला तिथ काय दिसलं असाव ?
दादा बोलू लागले.. सदु बुआ वेळ काळ काही बघायचा असतो की नाही की फकत कामाचच बघता तुम्ही. कालचा दिवस पण चांगला नव्हता काल अमावस्या होती आणि त्याला तिथे चींचीच्या वनात काहीतरी दिसन हे साहजिक आहे. उपरी हवा तर वाहतच असते. ती जागा तशी आवेशीत आहे. तसे सर्व विचारु लागले की दादा हे काहीतरी म्हणजे काय ? तुम्ही आता काय बोलले ते समजल नाही. दादा बोलले की आता तुम्हाला माहिती देणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्ही कोणी अशी चूक करणार नाही व काळाचा ग्रास बनणार नाही. तसे दादा बोलले की मी तुम्हाला काही अनुभव सांगतो जे काही माझ्या आयुष्यात आलेत, काही मित्रांकडून ऐकले. काही इकडून तिकडून ऐकलेत.
दादा बोलू लागले की सदू बुआ तुम्हाला तर आठवायलाच हवे की आपण सुद्धा असा प्रसंग अनुभवलेला आहे. सदू बुआ बोलले नाही. दादा थोडी स्पष्ट आठवण करून द्या. आशीच्या उपचारासाठी दत्तू बुआ ने आपल्याला जंगलात पाठवलं होत…. सदू बुआ बोलले आठवल दादा लय भयंकर प्रसंग होता तो… आजही रडायला येते. दादा बोलले की तसाच प्रसंग तुमच्या मुलाने अनुभवला असावा काल… दादा बोलले आमच्या जीवनातला हा किस्सा आहे मी साधारण १८-१९ चा असेल व सदू बुआ १६-१७ चे आणि दगडू भाऊ ३५ वर्षाचे असतील. आम्ही जंगलातून काही औषधी घेऊन येत होतो. वेळ हि रात्री अकरा ची असेल. दत्तू बुआ ने आम्हाला आधीच सांगितल होत की काहीही होवो पण एकदा तो झाड पाला घेतला की घरी ये पर्यंत मागे वळून पहायचं नाही आणि त्या चींचीच्या वनात एक तळं आहे त्या तळ्याजवळ अजिबात जायचे नाही. पण आम्ही येत असतांना आम्हाला तहान लागली व आम्ही त्या तळ्यावर गेलो तिथे आम्हाला एक माणूस भेटला. पूर्ण काळे कपडे दाढी वाढलेली त्याचे तोंड दात आज हि आठवले तरी जीवाचा थरकाप उडतो. त्या माणसाने आम्हाला हटकले तसे आम्ही पळतच सुटलो. आम्ही जेवढ पळायचो पुन्हा त्या तळ्यापाशीच यायचो. आम्ही पूर्ण घाबरलो होतो. तसा तो माणूस बोलू लागला हे तळं आवेशीत हाये…. मी बलवान आत्मा हाये… मी प्रेतयोनी मधला हाये अन तुम्ही मनुष्य योनीतले…मी बलवान आहे आणि तुम्ही बलहीन आणि हसायला लागला. तुम्ही या ठिकाणी येऊन मोठी चूक केली आता तुम्हाले माया पासून कोणीच नाही वाचवू शकत आणि हसायला लागला. मी आणि सदू बुआ दत्तू बुआ चे शिष्य होतो. दत्तू बुआ म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील. आम्ही लहानपणापासून त्यांनाच गुरु मानलेल. आम्ही रोज त्यांच्याकडून शिक्षण घ्यायचो. पण दगडू भाऊ हे सर्वत्र श्रद्धा ठेवणारे… त्यांचे मन कधी एकाजागी लागलंच नाही. तो माणूस बोलू लागला कृष्णपक्ष सुरु हाये. आता तुमच वाचनं कठीण हाये. आणि अचानक तिथून गायब झाला. आम्हाला वाटल भास झाला असावा आम्ही तिथेच थोडं उभ होतो पण तो माणूस परत समोर आलाच नाही आम्ही तिघं तिथून सरळ शेताकडे निघालो आणि शेतात पोहचलो. दत्तू बुआ ला सर्व वृतांत सांगितला आणि ती औषधी त्यांना दिली. दत्तू बुआ बोलले पोर हो नशीब चांगल तुमच म्हणून तुम्ही घरी पोहचलात जा जेवण करा व झोप तुम्ही. आणि दत्तू बुआ माझ्या वडिलांशी बोलू लागले की पावणेबुआ तुम्हाला वाटत नाही का की हे पोर जे सांगतात त्यानुसार काही भलतच घडून राहाल म्हणून, एक प्रेतयोनीतला भूत इतक्या सहजा सहजी हार मानून गायब होऊन जाईल आणि या पोरांना मार्ग मोकळा करून देईल घरी जायचा. वडील बोलले मामा मला तर यात काही वेगळाच संशय येतोय. पण हे दोघे तर ठीक दिसून राह्लेत. दत्तू बुआ बोलले की हेच तर पहेली आहे की अस का घडल असाव ?
आणि सर्व रात्री झोपले…सकाळ झाली तसे दगडू चे बाबा आमच्या घरी ओरडतच आले… दत्तू बुआ हे पोर काल जंगलातून घरी आले पण दगड्या काही अलगच करून राहला… बुआ बोलले मला वाटलच होत की इतक्या सहजा सहजी हे पोर त्या प्रसंगातून बाहेर पडलेच कसे.. ?
दगड्याचे बाबा बोलू लागले की मामा आता तुम्हीच पहा काय करता येईल तर आणि दत्तू बुआ, माझे वडील, सदू आणि मी व इतर सर्व दगडू भाऊच्या भेटीला गेलो. दगडू भाऊला बघून सर्वांचे होश उडाले. दगडू भाऊने अंगावरचे सर्व कपडे काढून फेकलेले. एका अंधाऱ्या खोलीत भिंतीच्या आडोशाला ते बसून होते आणि फारच कटू शब्दात काहीतरी पुटपुटत होते. जसे दत्तू आबा त्यांच्या जवळ गेले तसे ते आक्रमक झाले त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्या अंगाचा दुर्गंध येत होता. ते सारखे सारखे मांस खायला मागत होते. आणि एकाएकी रडायला लागायचे तसे आजोबांनी हे सर्व बघितले आणि बोलले की बुआ तुम्ही सर्वात प्रथम घरातील तामसिक वातावरण बंद करा. तुम्ही मांस, मदिरा यांना दिलेले घरातील स्थान आज तुम्हाला हे दिवस दाखवत आहे. हा दगडू घरून काय करून गेला होता ते जाणून घेणे आधी महत्वाचे. दगडू च्या बाबाने दगडू च्या आईला इशारा केला तश्या त्या घरात गेल्या व त्यांनी सुनेला विचारले व बाहेर येऊन होकारार्थी मान हलवली तसे माझे आजोबा बोलले बुआ संस्कार महत्वाचे असतात, तेच तुम्ही देऊ नाही शकलात. कधी पण काहीही करायचं दिवस असो की रात्र काहीच पाहन नाही. दिवस-वार, वेळ याचं काहीच महत्व नसल की असे काहीना काही घडतेच. याने संग केला आणि आंघोळ न करताच जंगलात गेला त्यात मदिरा आणि मांस भक्षण हे तर आदतच झालेली आहे. मग अस भूत मानगुटीवर नाही बसणार तर काय ? बुआ याला पिशाच्च बाधा झाली आहे. ती दूर करणे महत्वाचे. आणि आजोबांनी सर्वांना सांगितले की घरी चाला. आणि लहान मुलांना याच्यापासून दूरच ठेवा.
आजोबा व आम्ही सर्व घरी आलो तसे आजोबा सांगू लागलेत की मनुष्य मेल्यानंतर हे जग संपत नाही किंवा तो कुठल्याही बंधनातून मुक्त होत नसतो. मरणाच्या वेळेला त्या मनुष्याची जी इच्छा, कामना, त्याचे कर्म, दिवस-वार, यावर त्यांची मेल्यानंतर उत्पत्ती होत असते. जे या सृष्टीत उत्पन्न झालेले आहे ते नष्ट सुद्धा होणारच. उत्पत्ती आणि नाश हे तर संसार चक्रच आहे. या चक्राचे बंधन प्रत्येकालाच आहे. आणि प्रकृतीचे नियम आहेत. काही मर्यादा आहेत, ते सर्वांनाच लागू होतात. पण त्या नियमांचे त्या मर्यादेचे उल्लंघन झाले की अशी समस्या उद्भवते. अतिरिक्त अहंकार हा नेहमी पतनाचाच मार्ग प्रस्तापित करत असतो. स्वताच्या मनाला वाटेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकणे नाही. अशे जे भिन्न प्रवृत्तीचे असतात त्यांसोबतच असे घडते. तसाच हा पिशाच्च सुद्धा उत्पन्न झालेला आहे. व त्याने सुद्धा त्याला पसंद पडेल. त्याच्या अतृप्त इच्छा पूर्ण करून देणारा देह निवडला. आणि आजोबांनी दगडू ची कुंडली मागवली व पाहू लागले व त्यात सुद्धा ते बोलले की हि पिशाच्च बाधाच आहे. आणि दगडू च्या बाबांना सांगू लागलेत की बुआ आता बस्स झाल. आता सुधारायची वेळ आली आहे. बंद करा आता जे तुम्ही वर्षानुवर्ष चालवले. तेवढ्यात दगडू ची आई धावत आली व बोलली की बुआ तो दगड्या कसा कसा करतोय त्याने दोन बकऱ्या खाल्ल्या…. तसे आजोबांनी सांगितले की त्याला साखळ दंडाने बांधून ठेवा. आणि त्यावर त्वरित उपाय करा, अन्यथा समस्या हाताबाहेर जायची. आणि सर्वांना जवळ बोलवून आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितले की दगड्याचे बाबा कोणी दुसरे नाहीत आणि तुमचच घरातल घर त्यामुळे त्याला तुमच्या घरात या पवित्र स्थानी जागा द्या त्या सर्वांना या पवित्रतेत राहू द्या. दगडू चे बाबा व त्यांचा सर्व परिवार राहत घर सोडून आमच्याकडे राहायला आलेत. मग त्या सर्वांना सांगितले की तुम्ही श्रीदत्तात्रय स्वामींच्या दर्शनाला याला घेऊन जा व तिथे प्रण घ्या की आजनंतर कधीच मासाहार, मदिरापान, व तामसिक वृत्तीने वागणार नाही म्हणून आणि पवित्रते कडे पहिले पाऊल उचला. त्यांची महिमा अगाध आहे. ते पवित्र मनाने केलेल्या भक्तांच्या आवाजाला नक्कीच धावून येतात. तीच शक्ती तुम्हाला या दुखःतून सावरू शकते. आबा व आम्ही सर्व श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाला गेलो तिथे दगडूला सोडून देण्यात आले. त्याच्या आईने २१ दिवसांचा उपवास व सतत स्मरण करण्याचा निर्णय घेतला. दगडूची पत्नी सुद्धा त्याच्या मंगलस्वास्थासाठी प्रार्थना करू लागली. आजोबांनी श्रीदत्तात्रेयांचे स्मरण केले व ध्यानाला बसले. त्यांनी दगडूचे डोके जसे श्रीचरणावर नेवू केले तसे दगडू किंचाळायला लागला. जोर-जोरात ओरडू लागला, झाडांवर सरसर चढू लागला. आणि अचानक एका कुंडात उडी मारून तळाशी गेला. इकडे आजोबा देह रक्षा मंत्राचा जप करू लागलेत. आणि त्यांनी एका घुबडाला बोलावले तसे एक घुबड उडत तिथे आले व ते विनम्रतेने तिथे बसले आजोबा काहीतरी बोलले तसे त्याने त्याचे एक पंख दिले व ते उडून गेले. आजोबांनी ते पंख घेतले विविध मंत्र म्हणून त्याला अभिमंत्रित केले, नंतर थोडा अंगारा घेतला एका कापडात हे सर्व बांधले व त्याचा ताईत बनवून दगडूच्या गळ्यात घालणार तसा दगडू किंचाळायचा, उड्या मारायचा, गर गर गोल गोल फिरायचा, आजोबांवर चालून जायचा, त्याने दोन वेळा आजोबाना ढकलून दिले, तसे आजोबांनी व सर्वांनी मिळून त्याच्या गळ्यात ताईत घातला तसा दगडू ओरडला व खाली कोसळला. तसा पिशाच्च बाहेर आला व आजोबांशी बोलू लागला माया इच्छा जद्लोक पुऱ्या होत नाहीत मी शांत बसणार नाही मी याले परत धरीन. आजोबांनी त्याला भस्म फेकून मारले तसा पिशाच्च दूर जाऊन पडला. आजोबांनी दगडूला उठवले देवाच्या चरणात घातले आणि दगडूला बोलू लागले की पोरा बघ याच शक्तीने तुझे
प्राण वाचवले आज यांच्यासमोर तुला काहीतरी चांगला प्रण घ्यायलाच पाहिजेत. तसे दगडू बोलला आबा मी चुकलो मला क्षमा करा. खरच मी मनुष्य असून पशु प्रमाणे वागलो मी सर्व प्रकृतीचे नियम सोडून स्वताच्या मनाप्रमाणे वागलो. मला ईश्वराचा विसर पडला होता. देवासमोर हात जोडले की झाल. वर्षातून एक दोन वेळा उपवास व्रत केले की झाल असे मला वाटायचे, किंवा म्हातारपणी काय काम राहते म्हातारे झालो की करूया देव-देव असे म्हणून मी जगायचो पण आज मी दोन प्रकारची दुनिया बघितली जी सर्वांना दिसते ती मनुष्यांची आपली दृश्य व जी कुणालाच दिसत नाही ती अदृश्यांची अतृप्त आत्म्यांची दुनिया. त्यात खूप मोठ्या प्रजाती होत्या खूप मोठे वेगवेगळे भूत होते. ते लोकांना का पछाडतात ? त्यांच्या इच्छा काय असतात ते सर्व मी बघितले. मी आज पासून फकत याच शक्तीला शरण जाणार. व सात्विकतेच्या मार्गावर जीवन व्यतीत करणार. असे दगडू चे जीवन सावरले व दगडू ईश्वर शक्ती पुढे विनम्रतेने झुकला आणि त्याचे सर्व दुखः सर्व त्रास दूर झाला. तसे मी व सदू ने आजोबांकडून खूप काही शिकून घेतले व त्यांनाच गुरु मानून त्यांनाच सर्वस्व अर्पण केले. आणि आज त्यांच्याच कृपेमुळे मी तुमचे मार्गदर्शन करतोय. तेवढ्यात सुरश्या बोलला दादा बस… झाली पण का कथा ? दादा अजून सांगा न. सदू बुआ बोलले पोरा उद्या आणखी नवीन कथा सांगेन मी तुझ्या दादांनी व मी खूप मोठ्या कथा अनुभावल्या आणि आमचे गुरुजी आम्हाला खूप काही शिकवून गेलेत. सदू बुआ बोलले पूर्ण समजल दादा मला की माझ्या मुलाला काय झाल असेल तर. मी त्याला सुद्धा चांगल्या सत्मार्गाने चालायची प्रेरणा देईल. व दादा बोलू लागले की अशा प्रकारे ईश्वरीय शक्ती मुळे दगडू वाचला होता. त्यामुळे सर्वांनी प्रकृतीचे नियम व मनुष्य जन्माच्या मर्यादा पाळायला पाहिजेत. थोरा-मोठ्यांचे ऐकले पाहिजेत. देव-धर्म करायला, पौराणिक कथा वाचायला आणि तीर्थयात्रा करायला म्हातारच व्हायला पाहिजेत असे काही नाही. मनुष्य जन्म असो की कोणाचाही जन्म हा पाण्याचा बुडबुडा आहे. जीवनाचा अंत केव्हाही होऊ शकतो म्हणून वर्तमानात जगा. आजचा विचार करा व आजच कर्म करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. अशाप्रकारे एका पिशाच्च्याने ईश्वर शक्ती समोर हार मानली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

दानवीय असुरी शक्ती झाली नतमस्तक

वेशीवरच भूत अंतिम भाग
गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. तरी तिथे दानवीय शक्ती वावरत होती आणि सर्व लोक त्या अमानवीय शक्ती चा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे.

तसे विराट बोलला कोण हाये बे तो धिप्पाड पोऱ्या अन तुले कसा काय वयखते ? किशोर म्हणे अबे मले काय माहित कोण हाये तर मले त आज या भूतायन मांगचा जनम भी सांगितला की मले दोन भाऊ होते अन मोठा भाऊ राज्या होता अन लहाना भाऊ बिघडेल होता पण मले थोडी आठवते मांगचा जनम अशीन भी.. नशीन भी. नाहीतन हे भूत खोट बोलत असतीन आपल्याले फिरवत असतीन यायची प्रवृत्तीच आहे ती. तिकडे भूत आणि त्यांचे राक्षस कोणी आकाशी पाळण्यात तर कोणी कुठ जाऊन बसले. आणि युद्धाची तयरी करू लागले. महादू बुआ बोलले काय होवून रायले हे सायाचे काहीच समजून नाई रायल मले…. माय त डोक्स बंद बधीर झाल लेक हो. मांगच्या जन्मी काय पाप केलत की हा दिवस पाह्याले भेटला…!!
सुन्या बोलला आपल्या सगळ्यांची पळता भुई थोडी झालेली आहे……टांगा पलटी अन घोडे फरार अशी अवस्था त्यात आपुन सगळ्यांन जगण्याची आशा सोडलेली. सर्वांना कळून चुकले आज की आज आपली विकेट पडणार कुणाची आधी त कुणाची नंतर… पण नक्कीच पडणार रे भो.. जीव जाते आज आपला.
जाक्र्या म्हणे मले फकत अठीसाक तो पोऱ्या लय पटला…. वीराट्या बोलला कोनसा बे तोच धिप्पाड पोऱ्या…..किशऱ्याले कसा म्हणे मेरे यार….. मेरे भाई…. मेरे दोस्त अन गपागप बाटलीत भूत कोंबे.
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली. तसे सर्व ओरडायला लागले. बुडा रगत ओकू लागला. त्याले वाचवणार तितक्यात जाक्र्याच्या कानाखाली कोणी मारली अन जाक्र्या बेशुद्ध पडला. सगळे सैरा वैरा पळू लागले. आणि महादू बुआ पळत असताना एका भुताने बुआ चा पाय पकडला अन फेकल बुआले बुआ पडला कुपात जाऊन. साऱ्या अंगात काटे घुसले. सोपान्याच्या पायाचे लचके कोल्हे तोडत होती… महाभयंकर तो आवाज आणि सगळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. रात्रीचे अडीच वाजले असावेत असे मन्या बोलला. आज आपण वाचणार की नाही हे तर माहित नाही पण इकडे तिकडे पळाल्या पेक्षा यांच्याशी दोन-दोन हात करूनच मरू. किशऱ्या म्हणे बरोबर आहे मन्याचे हि वेळ इकडे तिकडे पळायची नाही हि वेळ आहे एकत्र येण्याची आणि गुरुमंत्राचा जप करण्याची किशऱ्याने सर्वांना एकत्रित केले आणि सर्व एकाजागी बसून नामजप करत होते तेव्हा त्यांना कळल की असे केले की आपल्याला कुणी मारत नाही. आणि ते तेच करू लागले. आणि होत असलेल्या वेदना सहन करू लागले.
आणि त्यांची प्रतीक्षा संपली तिथे दत्ताआबा पोहचले.
त्यांनी सर्वात आधी गावकऱ्याना सांगितले की मी जसे सांगतो तसे करा. इथे मोठमोठी राक्षस, असुर, दैत्य, दानव उपस्थित आहेत. त्यामुळे थोडीशी चूक सर्वांचा अंत करु शकते. आबांनी सर्वांच्या बाजूला एक रिंगण आखले व सर्वांना सांगितले की या रिंगणाच्या बाहेर कोणी निघणार नाही. आणि सर्व लोक त्यात बसलीत आणि दत्ताआबा रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्या धिप्पाड पोराला व दाढी वाल्या बुआ ला काहीतरी सांगत होते हे तीघ तिथे उभे राहून यांनी त्या राक्षसराजला चुनोती दिली आणि आबा ने शंख वाजवला तसे राक्षसांनी सुद्धा किंचाळायला सुरुवात केली आणि यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले ते एकमेकांवर वार करू लागलेत राक्षस चमकणारे गोळे फेकत होता तसे आबा त्यावर भस्म फेकत होते. असे हे खूप वेळ चालले… तिकडे धिप्पाड पोरगा भूत बाटलीत कोंबे…दाढी वाला बुआ त्या चूडेल, डाकिन. आग्या, वेताळ यांच्यावर धावून जाये. किशऱ्याला व बाकी रिंगणात बसलेल्याना काम दिल होत की गोवऱ्या जाळायच्या व सर्वत्र धूर करायचा. त्यात थोडे जडीबुटीची पावडर टाकायची. सर्व धूर करण्यात व बघण्यात मग्न होते सर्वांना छोटे छोटे कापडांचे तुकडे दिले होते ते सर्वांनी मनगटावर बांधले व सर्वांनी जोरजोरात ईश्वराचा नामघोष सुरु केला सर्व भूत प्रजाती हतबल झाल्या…. सर्व दत्ताआबाला विनवणी करू लागल्या की आम्ही परत अशे शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. खोट-नाट बोलून लोकांना फसवणार नाही आणि आजच्या सारखे कुणाला कधीच त्रास देणार नाही. आम्ही शरण येतो आम्हाला क्षमा करा. तुमची शक्ती आमच्या पेक्षा महान आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही परत गावावर आमची छाया पडू देणार नाही. आम्ही जंगलातच भटकत जाऊ. आम्ही जेवढ्या लोकांना त्रास दिला पछाडल त्यांना सोडून देतो. पण आम्हाला आमची हि सजा पूर्ण करू द्या. नाहीतर विधाता रागवेल. शेवटी आबा बोलले की या वेशीवरच्या भूतामुळे आमचा सर्वांचा लाडका दिप्या गेला त्यामुळे मी या भुताला क्षमा नाही करू शकत आणि आबाने वेशीवरच्या भुताला नष्ट केल. किशाऱ्या व सर्व दिप्या गेल्यामुळे शोक करू लागलीत व सर्व स्वताला दोष देऊ लागली…आबा बोलले पोर हो तुमच्या क्षणिक सुखाच्या नादात तुमच्या व्यसना पाईच आज दिप्या गेला. पण दिप्या काही काळानंतर परत येईल जनम घेऊन. राक्षसराज ला सुद्धा पश्चाताप होत होता. आबा बोलले की राक्षसराज तुम्हाला खरोखर तुमची चूक मान्य झालेली दिसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा अधर्माने कितीही पायमूळ पसरली तरी धर्माला ती परास्त करू शकत नाही. असत्य कितीही हुशारीने बोला ते सत्य लपवू शकत नाही. आबा लोकांना उद्देशून बोलले की लोकहो क्षणिक सुख शेवटी क्षणिकच असते. ते परम शांती कधीच देऊ शकत नाही.
किशोर बोलू लागला त्याने आबाचे पाय पकडले व क्षमा मागू लागला आणि बोलला मी आज तुम्हाला व सर्वांना साक्षी मानून शपथ घेतो की आजच्या नंतर कोणत्याच गलत गोष्टीत मन ठेवणार नाई. अन आबा जे सांगतात तेच करत जाईन. व किशोर ने शपथ घेतली. आबाला त्यांची नम्रता पाहून चांगले वाटले व आबाने किशोरला सांगितले की बाळ किशोर रडू नकोस शोक आवर स्वताचा एक दिवस हा दिप्या परत येईल दुसऱ्या कुठे तरी जनम घेऊन…आणि तुला तो परत मिळेल. तेव्हा त्याचा खूप लाड कर…आणि आज जे घडले असे कधी कुणासोबत घडणार नाही यावर कार्य कर…यालाच ध्येय समज आणि रक्षणकर्ता हो..! परत एकच सांगू इच्छितो हा तमाशा एक क्षणिक सुख आहे… आणि तुम्ही शहाणे असते तर तुम्ही त्याची पायरी चढले नसते. व्यसन हे कोणतेही असो ते शेवटी घातच करते म्हणून आजच याच ठिकाणी किशोर ने घेतली तशी शपथ घ्या की कुठल्याही क्षणिक सुखाच्या नादाला लागणार नाही आणि कुणाच्याही सांगण्यावरून कोणतच व्यसन करणार नाही. एवढी मोठी राक्षसांची, भूतांची प्रजाती त्यांच्या फालतूच्या अहंकारा पायी नष्ट होणार होती. ईश्वराला शरण जा….त्याची महिमा खूप मोठी आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच मी आज तुम्हा सर्वांचा जीव वाचवू शकलो आणि शेवटी अमानवीय शक्ती दैवी शक्तीच्या पुढे हरली आणि नतमस्तक झाली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

गुरुभक्तीचा महिमा.. अमानवीय शक्ती हारली.

वेशीवरच भूत पाचवा भाग
शैतान मारल्या गेला आणि धिप्पाड पोरगा व दाढी वाला बुआ घायाळ झाले. तरी किशऱ्या आणि इतर लोक जीव मुठीत घेऊनच होते. आता पुढे.

किशोर आणि बाकी सर्वांवर चाबकाचे फटाके पडत होते सगळ्यांना असह्य वेदना होत होत्या…. सगळे आक्रोश करून रडत होते….. राक्षस देत असलेला त्रास त्यांना अजिबात सहन होत नव्हता. तेवढ्यात किशोर ला जाक्र्याने सांगितले की तुले आठवते काय आपले गुरुजी बोलले होते की गुरुमंत्र अशी शक्ती हाये की ते कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते तसे किशऱ्या, जाक्र्या आणि विराट्या हे गुरूंची आठवण काढू लागले गुरुमंत्राचा जपच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकतो हे किशोर ने ओळखले व ते त्याच ठिकाणी वेगवेगळे योग करून ध्यान करू लागले जसे त्यांच्या गुरूने शिकवलेले होते. व थोड्याच वेळात या तिघांवर करण्यात येणारे चाबकाचे वार व्यर्थ जाऊ लागलेत. फकत जनाबुढा व महादू बुआ व इतर लोक हेच मार खात होते. महादू बुआ ने पण किशोर सारखेच केले व ते सुद्धा नामजप करू लागलेत. किशोर पूर्णतया ध्यानस्थ झाला होता त्याला शांतता जाणवत होती तो गुरूंचे स्मरण करण्यात मग्न होता. राक्षसराज बोलला हे लोक इथे सात्विकतेने परिपूर्ण होण्या अगोदर, यांची योगशक्ती जागृत होण्या आधीच यांना आपल्या दुनियेत न्याव लागेल यांचे प्रयत्न विफल करा. तसे यांच्यावर गोळे बरसू लागलेत यांचे ध्यान सुटले व यांच्यावर परत चाबकांचा वार सुरु झाला. तिकडे मानकू व दिप्या घोड्यावर जात असताना घोड्याला भुतांनी पाडले व दिप्या आणि मानकू फेकल्या गेले. ते तसेच पळत सुटले गावाकडे.
गावात दत्ताआबा व संपूर्ण गाव एकाच ठिकाणी वाट बघत होते की हे लोक घरातून न सांगता कुठे गेली असावी ? तमाशाला गेले असते तर आता पर्यंत आले असते रात्रीचा १ वाजत आला. अजून कसे आले नाहीत तितक्यात बबन्या येतो तमाशा बघून आबा त्याला थांबवतात आणि विचारतात बबन्या गावातील पोर आणि लोक कुठाय ? बबन्या बोलतो की आबा म्या भी त्यायची लय वाट बघितली तमाशाच्या बाहीर पण ती आली नाही. शेवटी म्या एकट्यानेच तमाशा पायला अन आलो आता घरी. आबा बोलले तुझ्या सारख्या नालायक माणसामुळे आज संपूर्ण गावाला त्रास सहन करावा लागतोय. तुला एक सुद्धा चांगली सवय नाही… सर्वच्या सर्व वाईट सवयी घेऊन फिरतो तू….. त्यात इतरांना सुद्धा स्वतासारखच बनवण्याची इच्छा तुझी. तरी मी त्यादिवशी सर्वांना सांगितले होते की या बबन्या च्या नादाला लागू नका हा एक दिवशी तुम्हाला संकटात आणेल. पण लोक सुद्धा क्षणिक सुखाच्या नादात संकटात अडकले असतील. तेवढ्यात गावाच्या वेशीवरच दिप्या पडला तो कायमचाच व मानकु घामाघूम होवून पळतच गावात पोहचला. आबा बोलले काय रे मानकु काय झाल की पळतोय असा ? कोणी जंगली जनावर मागे लागल काय ? कुठून येतोय एवढ्या रात्रीचा ? बस शांत हो….पाणी पी. मानकू शांत झाला व रडत रडतच बोलू लागला आबा अनर्थ झाला आपला दिप्या कायमचा सोडून गेला आपल्याला. आबा बोलले काय बोलतोय मूर्ख सारखा असे कसे झाले. गावातील लोक बबन्याच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत तमाशा पाहण्यासाठी गेली होती पण तो वेशीवरच भूत बबन्याच्या रुपात होता आता हे सर्व टेकडीच्या खाली आहेत तिकडे.ते राक्षस त्या सगळ्यांना त्रास देत आहेत. तिथे कुणी तरी राक्षसांचा म्होरक्या आहे सर्व राक्षस त्याच्या अधीन आहेत तो किशोर ला त्याचं मागच्या जन्मावरून त्रास देत आहे. महादू बुआ व जनाबुढा यांना खूप फटके देत आहे. फकत आम्ही दोघच असे होतो तिथे की आम्हाला काहीच दिसत नव्हत आम्ही तिथून इथे येण्यात यशस्वी झालो पण दिप्याला त्या वेशीवरच्या भूताने खंजर फेकून मारला व दिप्या गेला. आबांनी काही गावकऱ्यांना सांगितले कि दिप्याला घेऊन या व त्याच्या अंताची तयारी करा. आबा बोलले चिंता करू नका आज या राक्षसांचा कायमचा सोक्ष-मोक्ष लावून टाकू आपण. मला अगोदर सांगा किशोर कसा आहे. आबा किशोर ला तो भूत जास्त त्रास देत आहे. आबा बोलले ठीक आहे या बबन्यामुळे सर्व गाव संकटात आल. आबांनी सर्व तरुण मुले व माणसांना सांगितले की मशाली, कंदील घ्या हातात. काठ्या घ्या. गोवऱ्या घ्या. कडूनिंबाचा पाला घ्या. आणि आबा त्यांच्या घरात गेले व झोळी घेतली व काही सामान घेतले. व सर्व मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन निघालेत. आबा बोलले की किशोर ला वेळेवर सद्बुद्धी प्राप्त होवो आणि त्याने गुरुमंत्राचा जप करावा म्हणजे अनर्थ टाळायला त्याना मदत होईल आणि सर्व लोक ताटल्या वाजवत होते जेणे करून जंगली हिंस्र श्वापद अंगावर येऊ नये. आणि ईश्वराचा नामघोष करत होते…
तिकडे राक्षसराज ला चाहूल लागली यांच्या येण्याची तसा तो बोलला आज काहीही होवो पण तो सत्विक्तेची खाण दत्ता आबा ला आपल्याला नस्तनाबूत करायचच आहे. लय दिवसान आज भारी मोठ युद्ध होईल जस पाहिलेच्या काळात देव आणि दैत्याच होत होत. आज पवित्रतेवर अपवित्रता हावी होईल आणि हसायला लागला…… त्याच्या राक्षसी पद्धतीने. किशोर त्याला बोलला ज्यावेळी अंत जवळ येतो तेव्हा विवेक नष्ट होत असतो तसा तुझा विवेक नष्ट झालाय म्हणून तू अस अभद्र बोलतोय. आज तुमच्या सर्वांचा अंत होणार. तेवढ्यात जाक्र्या ला दिसले जाक्र्या बोलला की आलेत दत्ताआबा आता सर्व भूतांची काही खैर नाई आणि तिथे तो धिप्पाड पोरगा येऊन उभा राहला… आणि सर्व गुरुमंत्राचा नामघोष करीत होते आज गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. व अमानवीय दानवीय शक्ती त्या गुरुमहिमा पुढे तग धरू शकली नाही व कायमची तिथून नष्ट झाली. तरी राक्षसी व असुरी शक्ती तिथे वावरत होती. ती सुद्धा नतमस्तक होणार अशी सर्वांना आशा लागून होती. आणि सर्व लोक त्या राक्षसी व असुरी शक्तीचा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे राक्षसांचा अंत कसा होणार व दानवीय शक्ती चा पराभव कसा होणार याच विचारात सर्व होते.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदांसाठी भरती

rojgar sandhi

बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदाच्या १२१ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवाराचे वय १५ डिसेंबर २०१६ रोजी १८ पूर्ण असावे. परंतु २६ पेक्षा जास्त नसावे. . SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक यांना शासकीय मार्गदर्शक तत्वानुसार वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. उमेदवार किमान दहावी पास असावा तसेच त्यास प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी असल्यास अतिरिक्त वजन दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी बँकेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील. यासाठी SC/ST/PWD/EXSM उमेदवारांसाठी १०० तर इतरांसाठी ४०० रु. फी आहे. निवड काटेकोरपणे गुणवत्तेनुसार परीक्षा पध्दतीने (ऑनलाईन) केली जाईल. ऑनलाईन संयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची रचना पुढीलप्रमाणेअसेल.

संपूर्ण परीक्षा ही १०० गुणांची असून २ तासाच्या कालावधीत उमेदवारास स्थानिक भाषेबाबत ज्ञान ३० गुण, इंग्रजी भार्षेबाबत ज्ञान १० गुण, बँकिंगसह सर्वसाधारण जागरूकता २० गुण , प्राथमिक अंकगणित / सांख्यिकीय योग्यता २० गुण, सायकोमेट्रिक चाचणी २० गुण असा १०० गुणांचा पेपर असणार आहे. उत्तीर्ण होण्यास किमान ४० गुण असणे आवश्यक आहे.

या बाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pune.bobcareers.in/

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://pune.bobcareers.in/document/notification-maharashtra-mar.pdf

शैतान आणि धिप्पाड पोरगा

bhutachya goshti

वेशीवरच भूत चौथा भाग
महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती. आता पुढे..

सोपान सायकलवाला असह्य वेदना सहन करत बोलू लागला आपुन एक काम करायले पाहिजेत येळ न लावता मानकू अन दिप्या या दोघायले पहिलेच त काई दिसून नाई रायल. मले वाटते त्यायच्या नावराशी नसाव आपण त्यांना पाठवून देऊ गावाकडे, म्हणजे कस भी दत्ताआबा पर्यंत गोष्ट पोहचली तरी आपला जीव वाचू शकतो… महादू बा बोलले पण या राकेसायन त्या दोघायले काई केल नाही पाहिजेत की झाल. आम्ही जातो गावाकडे अन येतो घेऊन आबाले. ते दोघ निघाले तसे त्यांना अडवण्याचा प्रयत्न भूत करु लागलेत. पण ते अयशस्वी झाले. तसे ते राक्षसराज जवळ जाऊन बोलले की एवढ्या सर्व लोकांमध्ये फकत ते दोघ… एक तो माणूस अन एक तो पोरगा इथून पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांना आपली शक्ती का नाही थांबवू शकली ? त्यावर राकेसराज बोलला ते दोघ त्या आबाचे सेवक हायेत. ते दोघ मानकू म्हणजे माणिकबुढा हाये तो…. ज्याने मांगच्या येळी या वेसिवरच्या भूताले सडो की पडो करून सोडलत, त्यान लय भूतायले तकलीफ देल हाये. त्याच्या नावान बंद्या चुडेला घाबरतात. अन तो पोऱ्या म्हणजे त्या आबाचा सगळ्यात लाडाचा शिष्य हाये तो पुढे भविष्यात अलग नावान येईन दुनियात आता मीन त्याले जादुई खंजर फेकून मारले हाये आता त्याच वाचन कठीण हाये. तो चुकून आलता आज या लोकांमधी यायन त्या पोराले आणून मोठीच चूक केली… हा हा हा हा…. हो हो हो.. तो पोरगा येत जात राहते. हे बंदी चूक तू केलीस वेशीवरच्या भूता तुला एवढ पण समजल नाही की तुया सोबत ते दोघ आहेत म्हणून. आणि सर्व भूतांना युद्धाचा हुकुम सोडला सर्व भूत आणि त्यांचे विविध प्रकार वेगवेगळे चमकणारे गोळे बनवू लागलेत. किशऱ्या, जाक्र्या, वीराट्या यांच्यावर भूत चामड्याच्या चाबकाने वार करत होते तसे हे तिघे आक्रोश करून रडत होते.
तेवढ्यात महादू बुआ ओरडले आली दैवी शक्ती आली आपल्याले वाचवायले आणि तिथे एक उंच पोरगा धिप्पाड आणि त्याचे मोठे केस मोकळे सोडलेले पाठीवरती लोंबकळत होते, आणि त्याच्या हातात काचेच्या मोठ्या मोठ्या बाटल्या होत्या. आणि तो तीव्र वेगाने लाल घोड्यावर बसून आकाश मार्गाने येताना दिसला. आणि जाक्र्या ने जोरात चित्कारला आणि स्तब्ध झाला त्याला तो घोड्यावरील धिप्पाड पोरगा काही वेगळाच आणि तीव्र घोड्यावरून येताना दिसला आणि तो हवेतूनच सर्वांवर तुटून पडत होता… अन जाक्र्या बोलला हा एवढा मोठा धीप्पाड पोऱ्या कोण हाये ? हा काचेच्या बाटल्या मंधी भूत कोंबत हाये. अन हा दाढी वाला माणूस एका हातात माळ घेऊन एका हातान काई तरी फेकून मारत हाये. तेवढ्यात तो धीप्पाड पोऱ्या किशोर सोबत बोलला किशोर आप हो ? किशोर म्हणे हावो मीच हाये किशोर. आपको मिलना हि था एक दिन चलो आज मिलना हुआ….बहोत ख़ुशी प्राप्त हुई…. चिंता मत करो मेरे भाई….मेरे दोस्त…..मेरे यार अब मै आ गया हूँ अब मै इन्ह भूतों को इस बाटली में कैद करके ले जाऊंगा. मिलना हुआ तो जरुर मिलेंगे. नहीं तो मुझे याद रखना. किशोर काही बोलणार इतक्यात तो मुलगा पुढे निघून गेला. आणि मानकू आणि दिप्याचा पाठलाग करणाऱ्या त्या वेशीवरच्या भूतावर तुटून पडला…. वेशीवरचे भूत आणि धिप्पाड पोऱ्या यांच्यात अटीतटीच युद्ध जुंपल….. तो महाधिप्पाड पोऱ्या त्या भूतायले उचलू उचलू पटके….. धरला भूत की घाल बाटलीत…. धरला भूत की घाल बाटलीत…. त्याच्या त्या आक्रोशान ती पूर्ण जागा हलली सर्व राक्षस आणि भूत घाबरली की कोण आहे हा आणि काय भयानक तुटून पडतोय आपल्यावर. संपणार आपली प्रजाती याच्यामुळे आणि राक्षसराज चालून आला तो त्या पोरावर विविध वार करत होता तो पोरगा वार चुकवत होता तर कधी त्याचाच वार त्याच्यावर करत होता. महाभयंकर युद्ध जुंपल. तो पोरगा दिप्या पर्यंत पोहचला आणि बोलला की दिपू जी डरो मत आप. मेरे पास यह तीव्र घोडा है | आप दोनो इसपर बैठकर गाव जल्दी पोहोच सकते हो | आणि पोरगा तिथून निघून गेला व मानकू व दिप्या घोड्यावर बसून गावाकडे निघाले आणि इकडे हा पोरगा भूतांसोबत युद्ध करत होता याने किती तरी भूतांचा नायनाट केला. तसा राक्षसराज ने एक शैतान आणला व शैताना सोबत तो धिप्पाड पोरगा युद्ध करू लागला त्यात शेवटी दोघ हि कोसळले आणि शैतान मारल्या गेला आणि धिप्पाड पोरगा व दाढी वाला बुआ घायाळ झाले. तरी किशऱ्या आणि इतर लोक जीव मुठीत घेऊनच होते. हि लोक वाचतील की नाही, काय होईल यांचे हि एक पहेलीच होती.
क्रमश:
ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

खडूस डिग्याची फजिती

खडुस डिग्या नेहमी मुलांवर ओरडत असायचा. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.
एके दिवशी डिग्या डब्बूच्या घरी गेला.

खडुस डिग्या – डब्या पोरा मले लय जोराची तहान लागली आहे, जरा मले पाणी पाजत काय ??

डब्बू – पाणी तर नाही आहे माया घरी, नळ नाही आले. पण लस्सी आहे. चालेल काय …??

खडुस डिग्या (खुश होऊन) : वा वा चालेल की… हे त लयच मस्त जमलं !

डब्बू – लस्सी घेऊन येतो आणि डिग्या हावरटासारखा पाच लोटे लस्सी पितो.

खडुस डिग्या – डब्ब्या, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही काय रे…??

डब्बू – पितात तर, सर्वच जण पितात. पण आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.

खडुस डिग्या – संतापून…. हाता मधला लोटा जोरात जमीनीवर फेकून देतो.

डब्बू (रडत रडत) – मम्मी ह्या डिग्यानं आपला लोटा फोडला, आता आपुन Toilet ले काय घेऊन जायचं….??

खडुस डिग्या वर्षभरा पासून उलट्याच करत आहे. हा हा हा….

सौंदर्य खुलवण्यासाठी उपयुक्त

आपल्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम व आयरन ची कमतरताही असु शकते.महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्रासलेले आहे. तसेच आपण जर कॉम्पुटर वरच काम करत असाल तर यामुळेही आपल्या डोळ्याखाली काळे डाग पडतात. डोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणांने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत.
१) रोज पुरेशी म्हणजे ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.
३) टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. याने त्वचेला ग्लो प्राप्त होतो. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
४) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
५) पुदिना हे थंड असतो हे आपणा सर्वांना माहिती असेलच तसेच हा पुदिना आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता पुदिन्याची पेस्ट तयार करा त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करून बघा तुम्हाला फरक दिसेल.
६) काकडी हि थंड असते तसेच काकडी हि आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करते. या करता काकडीचा रस त्यात निंबूचा रस टाकून मिश्रण तयार करा व दोन्ही डोळ्या खाली लावा व काही मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करू शकता.
७) कोरे दुध म्हणजे गरम न केलेले दुध एका कापसाच्या साहाय्याने डोळ्यांच्या आजू बाजूला लावा हा प्रयोग काही दिवस करावा.
८) संत्रीची साल बारीक केलेली व थोडे गुलाब जल यांचे मिश्रण करा व तो डोळ्यांच्या आजू बाजूला लावा.
९) टमाटर, काकडी व लिंबु प्रत्येकाच्या घरी असतो तर त्याच्या दोन चकत्या दोन्ही डोळ्यान वर ठेवा.
१०) आलु हे आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता आलुचा रस त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
११) दुधाची साय २ चमचे व पाव चमचा हळद हे मिश्रण एकत्रित करून डोळ्यान जवळील जे काळे डाग आहे त्या वर लावा.

कुठलेही प्रयोग करण्या अगोदर आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

शिवजयंतीनिमित्त बुलडाण्यात भरगच्च कार्यक्रम

shivjayanti in buldana

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८७ वी जयंती. त्या निमित्ताने बुलडाण्यात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवाच्या वतीने गतवर्षीपासून ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने बुलडाणा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, बुलडाणा येथील व्याख्यानाने होणार आहे. शाहीरी पोवाडा हा कार्यक्रम दि. १८ फेब्रुवारी रोजी तर दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जिजामाता प्रेक्षागार, बुलडाणा येथे महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ५१ फुट प्रतिमेला स्वराज्याच्या प्रमुख पाच गडावरील जलाने जलाभिषेक करण्यात येईल व माँ जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून अखंड ज्योतीचे आयोजन करण्यात येईल. शहरात शिवजयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक शिवजन्मोत्सव लोकनृत्य, शाहीरी, पोवाडा, समुहगान इ. कार्यक्रम सादर करण्यात येतील. भव्य शोभा यात्रा हि दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजता संगम चौक, बुलडाणा येथून प्रारंभ होईल. या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त माँसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत ३८७ जिजाऊंच्या लेकी राहतील.

वेशीवरच्या भूतांची जत्रा

वेशीवरच भूत तिसरा भाग
आज अमावस्या हाये अन बबन्या वेशीवरच भूत हाये हा तमाशा नाई हे तर या भूतांची जत्रा आहे. सगळे विचार करू लागले की इथून निघायचं कस ? त्यातील कुणालाच माहिती नव्हत की त्या जत्रेतून ते घरी जातील की नाही तर…. आता पुढे
महादू बुआ बोलले पोरहो आपुन चांगलच गोत्यात आलो आपलाच नाद आपल्याला भवला मले पहिले सांगा तुमाले अठीसाक काय काय दिसून रायल. त्यावरच पुढचं ठरवता येईल.
किशऱ्या बोलला मले अठी तंबू नाई दिसत हे स्मशान आहे. अन अठी सर्व दूर मांस, रक्त, हाड, कवट्या पडून आहेत. जे फुल हातात बांधली ते हाडा-मासाचे कुजलेले तुकडे हायेत. त्या घुबळा बबन्याच्या अंगावर बसून हायेत. बबन्या रक्त पीत आहे.
जाक्र्या बोलू लागला मी तर पहिलेच सांगितलं की मले अठी स्मशान दिसते, हा तमाशा एखांद्या स्मशानात हाये म्हणून.
वीराट्या बोलू लागला की मले अठी दूर दूर लोक भूत रगत-मास विकताना दिसत हायेत अन बाकीचे भूत ते इकत घेऊन रायले.
सुन्या बोलला अबे मले त लयच भीती वाटून रायली अठी… मी तमाशात आल्तो तहाच बोललो होतो की मले अठी घुबळा दिसून रायल्या म्हणून. आता त आकाशी पायना बी दिसून रायला भूतायची पोर त्यात बसून मजा घेऊन राय्लेत. किशाऱ्या बोलला काई भी म्हणत काबे भूत कुठून आन्तीन आकाशी पाळणा ? अन मले कावून दिसत नाई मंग अस काई ?
मन्या बोलला अबे मले त अठी हाटेली दिसून रायल्या बॉ…त्यात ले मोठे पदार्थ बनवेल हायेत काई लोक जेलेबी तउन रायलेत. त काई इकत घेऊन खाऊ लागलेत.
दिप्या बोलला अबे मले अठीसाक अस काहीच दिसून नाई रायल फकत अंधार हाये अन त्यात रोजच्या सारखे कुत्तळे भूकून रायले अन काई माजरी, रानकुत्रे, हिंडून रायले अन आपुन सध्या गावाच्या लयच दूर आहोत जंगलात आहोत आपुन. अठीसाक स्मशान नाई हाये. स्मशान त गावाच्या बाहेर हाये. हे जंगल हाये जंगल. गावाच्या बाहेर सुन्याच्या वावरात उभ रायल की जे टेकडी दिसते त्या टेकडीच्या खाली दरीत उभ असू आपुन.
मानकू बोलला हा दिप्या बरोबर बोलते मले भी तुम्ही लोक सांगता तस काई दिसत नाई हा दिप्या म्हणते तसच वाटते मले भी.
महादू बुआ बोलू लागले कशी गोठ करता तुम्ही दोघ भी तुम्ही दोघ त दत्ता आबाचे पेठ आहात मंग तुम्हाले त सगळ दिसाय्ले पाहिजेत. असो बॉ तुम्ही भारी माणस तुम्ही म्हणता तर दिसत भी नशीन. पण मले किशऱ्या म्हणते तसच दिसते अन लयच घाण कुजेल वास येऊन रायला अठीसाक, त्यात आपल्याले अठी उभ भी राहू देत नाई कोणी. किती लोक धक्के-बुक्के देऊन जात हायेत, पाय ठेव्याले भी जागा नाई अठीसाक… अन त्यात मले दिसून रायल की आपल्याले चारही बाजून भूत, चुडेल, आग्या, वेताळ अशा सैन्याचा वेढा हाये हे आत्मे हातात अलग अलग चमकणारे गोळे घेऊन उभे हायेत. त्यात ते चमकणारा चाबूक फेकून हाणतात, काळ्या माजरीच्या गयात चामड्याचा दोर बांधून हे आत्मे त्यायले नियंत्रित करत हायेत. कोणी तरी मोठा राक्षस त्या दक्षिणे कडून एका काया घोड्यावर बसून येऊन रायला असे दिसते. त्याच्या अंगात भारी लोखंडाचे व काया रंगाचे कपडे हायेत, त्याच्याजोळ अलग अलग हत्यार हायेत. त्यान एक अलगच कवट्याचा मुकुट डोक्यात घालेल हाये. तो राक्षस आता घोड्याहून खाले उतरला. त्याच्या समोर सर्व भूत वाकून हायेत. तो सर्वांच्या अंगावर पाय देऊन पुढे जात हाये सगळे भूत त्याच्या समोर झुकू रायलेत. तो यायचा राजा अशीन वाटते. हा बबन्या भी गेला आता त्याच्या जोळ तो राक्षसराजा बबन्या ले इचारून रायला की कशी हाये तुई वेस बबन्या म्हणते की त्या वेशीवरच राज्य करण चालू हाये अजून तर, असे बाकी सगळे पिशाच्च, भूत, आग्या, वेताळ, ब्रह्मराकेस, चुडेल, हाकीन, डाकिन, चकवा, मुंज्या, असे सगळे अलग अलग अतृप्त आत्मे हजेरी लावून रायलेत त्याच्याजोळ. सोम्या अन रेखीच्या घरचा बॉ भी तठी दिसून रायले त्या दोघायले अन ले मोठ्या लोकायले तकलीफ देन सुरु हाये. अन घुबळ, वटवाघूळ, कावळे, अलगच प्रकारचे मिठ्ठू, कधी न पायलेले प्राणी अठीसाक दिसून रायलेत. त्यान सर्व भूतायले एक एक टीप भरून काई तरी देल. सर्व ते आता पीत हायेत मले वाटते ते पिऊन त्यायच्या अंगात आल म्हणजे ते दारू असावी. सर्व आता कुजेल मास खात हायेत.
अन जोर जोरात बोंबलत हायेत अशुद्ध अन घाण तेच आमची जान ….. तेवढ्यात एक त्यायच्यातलाच भूत उभा रायला तो जरा राज्याच्या खालोखाल दिसून रायला मले त्यान भी तसेच काये कपडे अन लोखंडाचा डरेस घालेल हाये. तो म्हणते की राकेसराज आजकाल आपल्याला पछाडता येईल असे लोक भेटत नाईत काय उपाय करता येईन त सांगा ? तो राकेसराजा कडाडला त्या भूतावर अरे आता नाई भेटत म्हणता त मंग काय सतयुगात भेटतीन अरे हे युग सध्या बयकेल हाये अठीसाक आता कोणी एवढ धर्माच-शास्त्राच पालन करत नाई. जागोजागी त अशुद्ध, अपवित्र लोक हायेत. आज या लोकांसाठी त सन्मानाचा विषय हाये मदिरा पिणे, व्यसन करणे, आपल अनुकरणच तर करत हायेत हे लोक…आता तेच पाय तिकडे उभे हवस, कामाग्नीने प्रदीप्त झालेले लोक तमाशा पहायच्या नादात आपल्या जवळ स्वताच येऊन पोहचलेत. त्यांच्यात काहींच्या नावराशी होत म्हणून काही आपल्या तडाख्यात सापडले तर काही स्वताहून आपल्या जवळ आलेत. काही लोभ, मोहाने ग्रासलेले आहेत तर काही काम, क्रोधाने ग्रासलेले तर काहींना अतिरिक्त अहंकार आहे की मी धार्मिक आहे मंग मले काहीच होऊ शकत नाही. पण त्यांना हे माहित नाही की सात्विकता महत्वाची असते आणि आज या तमाशाला आलेल्या लोकांजवळ एकाकडेही सात्विकता नाही. असे महादू बुआ सर्वांना सांगू लागले तेवढ्यात सोपान्या सायकलवाला बोलला बरोबर हाये महादू बुआ आपल्यात जास्त अनुभवी हायेत ते जे सांगतात ते सर्व त्यांना दिसत असेल. महादू बुआ बोलले सोपान्या आपल्या सारखेच या तमाशाले लय लोक येल हायेत गड्या अन सगळे या राक्षसांच्या तडाख्यात आलेत. तसा जनाबुढा बोलू लागला महाद्या मले वाटते गड्या आता आपुन काई आठून जितं जाऊ शकत नाई मले भी तू जे सांगत ते थोड अस्पष्ट दिसून रायल पण नेमक काय दिसते हे तून सांग्ल्या वर समजल. आता अपुन काय कराव. महादू बुआ बोलले की अठून कस निघता येईल ते पहा आता. तेवढ्यात महादू बुआ बोलले किशऱ्या पय बाबू त्या राकेसान आताच तुव नाव घेतलं किशऱ्या म्हणे हाव हो काका मीनं भी आयकल पण या भूतायचा अन माया काय संबंध ? हे माय नाव काहून घेऊ लागलेत ? तेवढ्यात एका भुताने किशऱ्याला पकडले आणि किशऱ्या ला ओढत नेऊ लागला आणि किशऱ्या राक्षसराज समोर उभा होता. राक्षस बोलू लागला याला आपल्या दुनियेतील सुखद आनंद द्या याची चांगली खातिरदारी करा.
मग किशोर ला आकाशी पाळण्यात बसवले त्याला गर गर फिरवले….नंतर घोड्यावर बसवले अतितीव्र गतीने फिरवले किशऱ्या उलट्या करत होता….त्याचं पोटातल सर्व तोंडात येत होते…. त्याला विस्तवावर चालवले….. आता त्याला सडलेल कुजलेल खायला दिल किशऱ्या ते खायला तयार होईना…..तेवढ्यात राक्षसराज बोलला तुला आठवत नसेल मागचा जन्म पण मी आठवण करून देतो. मागच्या जन्मात लय माजला होतास तू ? तुवा भाऊ एक राज्या होता तहा तून आम्हा सर्व भूत प्रजातीले खाऊ की ठू करून सोडलत पण आता पाय या जन्मात न तुवा भाऊ संग हाये न तुले कोणी वाचवणार.. अन तो तुवा दुसरा लहान बिघडलेला भाऊ भी दुसऱ्याच कोण्या ठिकाणी जन्माले येल हाये. त्याचा लय लाड करायचे न तुम्ही आता परत पोरीचाच नाद करीन तो……अन स्वताहून येईन आमच्या तडाख्यात…. अन हासायले लागला हा हा हा हा हा……हुन्ह्छछ्छ्ह्ह…..व्हान्न्न्नन्न्न्नन्न…….हे हे हे हे …… तुवा हिशोब करून झाला की आम्ही त्या तुया भावले भी समजावू त्यान मागच्या जन्मात अतिरिक्त अशुद्ध अपवित्र आचरण ठेवलंत बायायचा नाद केलता, अनाचार, व्यभिचार केलते पण तुम्हीन त्याले आमच्या दुनियेत घेऊन जाण्या पासून वाचवल होत आता तो अन तुम्ही सगळे आपापल्या कर्मान जनम घेऊन अलग अलग ठिकाणी आलेत. तुम्हाले समझीन की केलेल्या चुकांचे फळ हे जन्म संपला की संपल सगळ असे कधीच होत नसते. ते भोगावेच लागते तुम्ही सुटले असान वरच्याच्या हातून पण मी सोडणार नाई. तुम्ही मेले की दुनिया विसरत असते तुमच्या केलेल्या कार्माले. पण आमच्या सारखे अतृप्त आत्मे कधीच विसरत नाहीत. अन बदला घेणे हि तर आमची मुख्य प्रवृत्ती आहे.
या महाद्याले भी माहित नाई की हा पहिले कोण होता तर हा भी लय खेटेल हाये माया संग मी आता याले भी नाई सोडणार. अन परत हसायला लागला हा हा हा हा…. ते दानवीय….राक्षसी…..असुरी हास्य बघून सोपान सायकलवाला बोलला महादू बुआ हे काय ऐकू येत हाये. हे भूतांची जत्रा तर लयच बेकार हाये आणि तेवढ्यात सोपान्याच्या छातीवर भर भक्कम आघात झाला व सोपान्या कोसळला……तसा महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती सर्वांचे नेत्र त्या शक्ती कडे लागून होते. काय होईल पुढे हे कुणालाच माहित नव्हत.. एक महाभयंकर रात्र त्यांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

फिर वही मोबाईल लाया हू

nokia 3310 news mh28.in

काही वर्षाआधीच काळ आठवतो का? मोबाईल म्हणजे काय आणि कसा असतो याची ओळख आज मोबाईल वापरणाऱ्या सर्व भारतीयांना करून देणाऱ्या नोकिया 3310 ने पुन्हा जुने दिवस आठवून दिले आहेत. २००० साली नोकिया 3310 हा बाजारपेठेत अवतरला होता. त्यानंतर बाजारपेठेत नोकिया 3310 ने धूम केली होती. सर्वात जास्त विकल्या गेलेला, मोबाईल क्रांती घडवून आणलेल्या नोकिया 3310 ने पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दमदार बॅटरी, स्नेक गेमी साठी नोकिया 3310 ओळखल्या जायचा. फोन कॉल्स, गेम खेळून सुद्धा दोन दोन दिवस बॅटरी कमी व्हायची नाही ही या फोनची वैशिष्ट. तसेच उंचावरून पडला तरी स्क्रीन किंवा काहीही तुटफूट होत नसल्याने लोकांनी नोकिया 3310 ला पसंती दिली होती. परंतु काळाच्या ओघात स्मार्टफोन आलेत आणि नोकिया 3310 मागे पडला आणि संपुष्ठात आला. अजूनही काही विक्रेत्यांकडे हा फोन विक्रीस दिसून येतो. भारतीय बाजारपेठेत नोकियाचे नाव मोठे होते.

नोकिया ३३१० हा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरणार आहे.  त्यावेळी २ हजारात मिळणार हा फोन यावेळी मात्र ४ हजार रुपयात मिळणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार नोकिया आपला ३३१० हा हँडसेट रिलाँच करणार आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया स्मार्टफोन लाँच करणार आहे.  या आधी कंपनीने चीनमध्ये नोकिया ६ लाँच केला होता. बाजारात उपलब्ध झाल्यापासून या फोनची तुफान विक्री झाली. विक्री सुरू होण्याच्या आधीच दहा लाख लोकांनी या फोनची नोंदणी केली होती. एचएमडी ग्लोबल ही फिनलँडची कंपनी हा फोन लाँच करणार असून नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे.

तुमचे एटीएम व्यवहार कसे सुरक्षित ठेवाल ?

atm withdral in buldana

पैसे काढण्यासाठी सर्वच जण आता बँकेच्या रांगेत उभे न राहता एटीएम ला प्राधान्य देतात. एटीएम्स खूपच सोयीची आहे आणि एटीएममधून पैसे काढणे, हे तुमचे पैसे मिळवण्याचे सर्वात झटपट मार्ग आहे. अनेक ठिकाणी एटीएम वर सूचना दिलेल्या असतांनाही त्याचे पालन होत नाही. कोणत्याही प्रकारे पैसे काढताना सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता बाळगणे, हे तुमच्या खात्याच्या सुरक्षेबरोबर होणाऱ्या तडजोड टाळण्यासाठी उपयोगी राहील.

तुमचे एटीएम व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया खाली दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचा अवश्य पालन करा:
तुमचा पिन नंबर लक्षात ठेवा आणि तो कुठेही लिहू नका किंवा कुणालाही सांगू नका. २. तुमचा एसएमएस, अकाउंट बॅलन्स आणि बँक स्टेटमेंट्स तपासून पहा आणि त्यात काही चुक आढळल्यास संबंधित बँकेला तात्काळ कळवा. ३. व्यवहार करण्याआधी तुमचे कार्ड कुणीही अनोळखी व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा बँक अधिकाऱ्यांच्या हाती देऊ नका. ४. तुमचे एटीएम वापरताना कुणाही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. ५. व्यवहार करताना रांगेतील (क्यूमधील) अन्य लोकांबरोबर सुरक्षित अंतर ठेवा. ६. नेहेमी एटीएम मशीनच्या जवळ उभे रहा आणि अंतर ठेवा. ७. पैसे काढताना इतर लोकांना एटीएम मशिनभोवती गर्दी करू देऊ नका. ८. पिन एंटर करताना कीपॅड झाकण्यासाठी तुमच्या शरीराचा व हाताचा उपयोग करा. ९. व्यवहार केल्यांनतर तुमची ट्रँजॅक्शन स्लिप एटीएम मध्ये सोडू नका. ती टाकण्यापूर्वी तिचे बारीक तुकडे करा. १०. एटीएम पासून दूर जाताना ‘कॅन्सल’ बटन आठवणीने दाबा.११. तुमचे कार्ड आणि ट्रँजॅक्शन स्लिप न विसरता सोबत घ्या.

वाशीम जि.प. मध्ये विविध पदांसाठी भरती

job in zilla parishad washim

वाशीम जि.प. मध्ये विविध पदांसाठी कंत्राटी पध्द्तीने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी आहे. वाशीम जि.प मध्ये अधिपरिचारिका (स्टाफ नर्स), औषध निर्माता, सांख्यिकी अन्वेषक, सिस्टर इंचार्ज, सिकलसेल समन्वय व आर. के. एस समन्वयक, सिकलसेल समुपदेशक (डे.केअर), लेखापाल, वैद्यकीय अधिकारी पुरुष, वैद्यकीय अधिकारी महिला, सांख्यिकी अन्वेषक, आरोग्य सेविका इ. पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अधिपरिचारिका (स्टाफ नर्स)- GNM कोर्स व MNC नोंदणी केलेली आवश्यक आहे. औषध निर्माता – D Pharm/B Pharm, सांख्यिकी अन्वेषक – BSC (संख्याशास्त्र), सिस्टर इंचार्ज – GNM कोर्स व MNC नोंदणी केलेली आवश्यक आहे, सिकलसेल समन्वय व आर. के. एस समन्वयक – MSW, MSCIT, लेखापाल – B Com, MSCIT, Tally ERP 9.0, Typing -Eng.40, Mar.30, वैद्यकीय अधिकारी पुरुष/महिला : – MBBS/ BAMS, सांख्यिकी अन्वेषक – BSc (संख्याशास्त्र), आरोग्य सेविका –परिचारिका या पदाचा 18 महिन्याचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण असावा. तसेच नोंदणी (MNC) आवश्यक.

यासाठी वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे पर्यंत तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे पर्यंत आहे. उमेदवारास 02 वर्षे अनुभव आवश्यक असून अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक स्वतः भरून पोस्टाने पाठवावा. अर्ज राष्ट्रिय आरोग्य अभियान जुनी जिल्हा परिषद, वाशिम येथे पाठवावा. अधिक माहितीसाठी www.washim.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी, 2017 रोजी पर्यंत (कार्यालयीन वेळेत) राहील. अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.

जाहिरातीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करा.

https://drive.google.com/uc?export=download&id=0B_nz2wUctSAXLVFrbExlZmxEb1U

वेशीवरचे भूत

गावाबाहेर तमाशा आलाय असे कुणी सांगितले तशी सगळ्यांची लगबग वाढली एक उत्सुकता लागली… कुणी वेळ कधीचा आहे तर कुणी काय तिकीट हाये या विचारात तसे तमाशा म्हटलं कि सर्व लहान मोठ्यांची उत्सुकता वाढणारच त्यात किशोर, जाक्र्या, सुन्या, मन्या, विराट्या, दिप्या सुद्धा उत्सुक झालेत लहान होतो तेव्हा पासून ऐकतोय कि तमाशा असतो लयच भारी असतो आता तर मी मोठा झालो आहे… आणि मित्रांना सांगू लागले कि चला लय दिवसानंतर मनाला गारवा मिळणार हिरवळ बघायला मिळणार आणि नयनसुख प्राप्त होणार तसे सर्व मित्रमंडळींनी तमाशाला जाण्याचे ठरवले. काढला सर्वांनी वेळ बसली पारावर बैठक सगळे एकत्र आले बऱ्याच दिवसांनी. त्यात काही वरिष्ठ महादू बुआ, जनाबुढा, मानकू, सोपान्या सायकलवाला, बबन्या दुकानदार बोलू लागले कि पोरहो असले व्यसन चांगले नाही तुम्ही जावा काम करा… पण हि पोर कसलं ऐकतात कुणाचं… हि तिथून गेली तर खरी पण त्यांच्या मनात तेच सुरु होत कि आपण पण एक दिवस नक्की तमाशाला जाऊ पाहू काय गंमत असते तर. आणि पोर कामाला लागली पण त्यांचे कान या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यातच मग्न होती. तेवढ्यात महादू बुआ बोलले कि राजेहो हा तमाशा आला नेमका कोणाच्या वावरात कि अखिण कुठी त्याची बंदी चौकशी करा पहिले. काऊन कि मागच्या टाइमले वेशीवरच भूत आडवं आलत अन लयच बेकार गोठ झालती बुआ दत्ता आबा एन वक्ता वर नसते आले त आज आपुन जितं नसतो. दत्ता आबा म्हणजे त्या गावातील जेष्ठ आणि समजदार त्यांचा दबदबा होता ते सर्वांना चांगल शिक्षण देत, संस्कार देत, किशोर आणि बाकी मुल त्यांच्या कडे नेहमीच जायचे ते श्रीदत्तात्रयांचे एकनिष्ठ भक्त. ते किशोरला खूप जीव लावत कधी प्रसाद, ताईत तर कधी अंगारा लावण्यासाठी येत. तसेच हि लोक तमाशाची चर्चा करत असताना दत्ता आबा तिथ आले तसे सर्व लोक चिडीचूप पण आबा बोलले की लोकहो जो इचार करताय तो आजच सोडा मागच्या वेळेस मी आलो होतो यावेळी येणार नाही. या बबन्याच्या नादाला लागू नका हा पहिलेच तामसिक आहे. याले चांगली आदत कोणतीच नाही. एखद्या दिवशी हा गड्ड्यात घालीन तुम्हाले. वाईट संगतीतले लोक ना स्वताच कधी भल करत ना दुसऱ्याच. आणि किशोर ला अंगारा व प्रसाद देऊन निघून गेले. लोक बोलू लागले काहो बुआ दत्ता आबा न त आपल्याले आताच सांगितल मंग द्याचा काय इचार सोडून. तितक्यात बबन्या बोलू लागला. फालतू इचार करू नका मस्त लय दिसाबाद तमाशा आला जाऊ पायाले, त्यात घरच्या बायायले अजिबात भनक नाई लागली पाहिजे तमाशाची नाई त आपली काई खैर नाई इतकच ध्यानात ठेवा. सगळे लोक उठले आणि माहिती काढण्यासाठी गावाबाहेर जाण्यासाठी निघाले. किशऱ्या आणि त्याचे मित्र पण निघाले यांच्या मागे कि हे वेशीवरच भूत काय भानगड हाये भो… ते भी पाहू अन बाई भी पाहू कोण हाये त… कशी दिसते त.. आणि सर्व पाठोपाठ निघाले. तेवढ्यात मोठी लोक जाऊन थांबलीत तसे पोर भी थांबलेत पाहू लागले समोरचे दृश्य काय भारी हायेत त्या बाई वा वा …. लयच झक्कास आणि बघितले तंबू भी लयच मोठा बांधेल हाये… अजून तर यायची तयारी भी व्हायची बाकी दिसते आजच आले वाटते हे लोक किशाऱ्या अन बाकी पोर बोलत होते. तेवढ्यात जनाबुढा विचारू लागले कि याचा टाइम काय राहीन…. तशी मावशी बोलू लागली कि टाईमच काय बुआ टाइम त रातच्याच असतो आणि पानाचा ईडा मावशीने तोंडात टाकला. तरी बी मी काय म्हणतो कि जरसाक लोकर नाई काय चालू हू शकत…. सोंगाड्या मधी आला अन बोलू लागला आता मावशीनं ईडा खाल्ला आता मावशी काई बोलणार नाई तुमच्याशी…… बबन्या बोलला तुमीच सांगा मंग… सोंगाड्या बोलू लागला नाई आरामातच होईन, बबन्या बोलू लागला कि बाई लय दिसान आला फड गावात. बाई बोलल्या काय सांगा तुमाले आज काल कोणी भी बलावत नाई अन पहिल्या सारखं नाई रायल आता बुआ… भविष्यात हे कला राईंन कि नाई देव जाणो.
आणि सोंगाड्या सर्वांना घेऊन तंबूत निघून गेला हे लोक निघाले तिथून आणि त्यांचे लक्ष त्या पडक्या स्मशानाकडे गेले ते दचकले कि आता रोज रातच्याला इथून जाण म्हणजे हे भूत काई परेशान न करो. तेवढ्यात सोपान्या बोलला कि हे पहा आपुन रोजच्या रोज त काई येऊ नाई शकत बुआ इतका पैसा नाई आपल्याजोळ उधळायले त्यामुळे आपुन सगळे एकाच टाइमले येऊ अन तमाशा पाहून जाऊ म्हणजे या भुताचा भी घोर होणार नाई आणि कोणाले माहित बी पडणार नाही. त्यात किशऱ्या बोलला कि मले कदी तुमीन संग येऊ देल नाई त मी तुमचं नाव काकुले सांगून दिन… सगळे बोलले कि अबे तुले माईत हाये काय किती परेशान होते माणूस… आमचं आमाले माईत आम्ही कशी करतो हे तारेवरची कसरत त. सगळ्यांनी विचार केला आणि फायनल झालं एकदाच कि सगळे संगच जाऊ पण पहिले त्या वेशीचे काई तरी करावं लागिन.. किशऱ्या बोलला कि मी लहान होतो तहा पासून एकून हावो कि त्या येशिवर भूत रायते पण तहा मले कोणी बी कैच सांगत नव्हतं पण आता तरी सांगा आता मले भेव वाटत नई. तसे सगळे शांत झाले व किशाऱ्याला शांत करून पटापट पाय उचलून चालू लागले तसे ते पारावरच थांबले. किशऱ्या ला काही सुचत नव्हते कि कोणाचं हाये ते भूत अन ते वेशीवर काऊन रायते अन हे लोक इतके काऊन भेतात त्याले.
दिवसा मागून दिवस जात होते आणि किशऱ्या तमाशाला जायची वाट बघत होता आणि त्याच्या आईला आबाला सर्वांना जो भेटेल त्याला वेशीवरच्या भुताची गोष्ट विचारायचा एक दिवस त्याचे आबा त्याला सांगू लागले कि काही वर्षा पूर्वी आपल्या गावात सोम्या नावाचा पोरगा राहत जाय… एक दिस तो रातच्या वावरातून चिंचा घेऊन येत होता त्याच्या सायकलवर हे भूत बसलत… अन त्याची सायकल उलट्या दिशेने चालत होती त्याले काही सुधरत नव्हतं तो घामाघूम झाला अन त्यानं ते सायकल सोडून देली अन कावऱ्या बावऱ्या सारखा पयतच सुटला जसा वेशीच्या आत आला तसा त्याचा त्या भूतान पिच्छा करण सोडून देल तहा पासून सारे लोक वेशीवर भूत हाये ते लोकायले धरते असे म्हणतात. पण काई दिसच तो सोम्या रायला गड्या त्याले रातच्या बेरातच्या सपन दिसे ले बिमार पडला ले औषध गोया खाल्ल्या पण काईच फरक नाई शेवटी गेला तो साऱ्यायले सोडून. त्यानंतर ले किस्से घडले लय लोकायले धरेल हाये त्या भूतान…… आणि गुलाबभाऊ बोलू लागले.
असाच एक किस्सा झाला होता गावात रेखीच्या लग्नाच्या वेळेस. रेखीच लगन लागल अन दोन दिसात तिच्या घरच्या बुआ ले या वेशीवरच्या भूतान धरलत. तो बुआ तिले घ्याले घरी आलता अन रातभर रायला आमच्या सोबत गप्पा केल्या अन पायटे निघीन त त्याच्या काय मनात आल काय माहित म्हणे मी तुमच गाव पाहू इच्छितो मंग दिसभर गावात हिंडला गाव पायल रात झाली म्हणे निघतो बुआ आमी आता आणि निघाला रात्री जसा वेशीच्या बाहीर गेला तसा वेशीवरच्या भूतान त्याला घोयसल.. रेखी उतरली बैल गाड्यातून अन चिंग पयत सुटली तशी गावात युनच थांबली भला मोठा आक्रोश कारे तिचा बुआ गावाबाहीर कुत्तळ्या सारखे आवाज करे भुके जोर जोरानं भूऊऊऊऊ…… भूऊऊऊऊ……. भूऊऊऊऊ असे त कदी मांजरी सारखे आवाज करे…. कोणी म्हणे पावन्याले पिशाच्च झोंबल…त कोणी म्हणे की हे वेशीवरच भूत हाये… बंद गाव ताटल्या वाजवत निघाल गावाबाहेर. तेव्हा बी त्या दत्ताआबा न केलत बुआ सार तो आबा ले अनुभवी माणूस हाये. त्यायन गावा बाहीर जाऊन धरल त्या पावन्याले अन दोन-चार लोकायन उचलल अन आणल न भो वेशीच्या आत अन इतक्या जोरयान बोंबलला तो पावना की चितच झाला. त्याले जडीबुटी चा काढा देला प्याले अन पावना काईच काईच करे… लय दिस त बिमारच होता अन एक दिस गेला बॉ सोडून बंद्यायले….आबा म्हणे की त्याच्या अंगाले लग्नाची हयद होती हयदीच अंग असताना त्यान गावाबाहीर हिंद्याले नव्हत पाहिजेत.
असे किती लोकायले धरल त्या भूतान अन कितीक बिमार पडले अन कितीक सोडून गेले. आज बी कोणी माणूस हिंमत करत नाई रातच्या वेशीबाहेर जाण्याची. किशऱ्या बोलू लागला आबा वेशीच्या बाहेरच काऊन धरते ते भूत वेशीच्या अंदर काऊन नाई येत. आबा बोलू लागले पोरा वेशीले लय महत्व हाये वेस आपली सीमा हाये जठलोक वेस हाये तठलोक देवाची कृपा रायते वेशीच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर गाव संपलं असा समज. गावाच्या बाहेर त्यायचच राज्य जंगल, जंगली जनावर, हे अतृप्त आत्मे हे बंदे गावाच्या बाहेरच रायतात म्हणून स्मशान भूमी गावाच्या भाईरच असते. म्हणून तुले सांगत असतो कि बाबू गावाच्या बाहीर जात नको जाऊ… दिवस पायन नाई…. टाइम पायन नाई…. बस चालले आपले पोराय संग कुठी बी. किशऱ्या थोडा भांबावला होता हे सगळं ऐकून… पण आबा मले भेव वाटत नाई… आबा बोलले पोरा संकट काय सांगून येत असते व्हय. संकट येते तहा समजते कितीही मोठा माणूस असो त्याची टरकतेच. ते सोड मले सांग तु आज येणार नाई काय तुई आई अन मी तर चाललो दत्ता आबाकडे भजनाले…किशऱ्या चाला आबा मी, सुन्या, जाक्र्या, मन्या, वीराट्या बंदे तयार हावोत आमी बी येतो तुमच्या संग…सगळे पोहचले दत्ता आबाच्या घरी अन बसले. सगळ्यांनी आबाला प्रणाम केला आणि अंगारा डोळ्याला,कपाळाला लावला. आणि एकू लागले. दत्ता आबा सद्गुण आणि अवगुण यांच्यातील भेद समजावून सांगत होते. अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह माया, आणि अहंकार हे ज्याच्याजोळ असतात तो माणूस न कधी स्वताची प्रगती करत न दुसऱ्याची. माणसान मर्यादेत रायल पाहिजेत. कधी अधर्माची पायरी चढू नये, देव-पूजा करत रहाव. ज्याच्या मुखी देवाचे नाम…तोच सुखी हाये. तेवढ्यात दत्ताआबा बोलले लोकहो आपल्या गावाच्या बाहेर तमाशा आलेला आहे त्याचा नाद करन वाईट गोष्ट आहे. चांगल्या माणसान त्याची पायरी चढू नये अशे उपदेश लोक ग्रहण करत होते. आणि रात्र झाली सर्व आबाला प्रणाम करून घराकडे निघाले. रात्र झाली होती किशऱ्या झोपी गेला. सकाळ झाली तसा बबन्या गोठ्यात किशऱ्या जोळ आला व सांगू लागला आज संध्याकाई जायचं हाये तयार रायजो. किशऱ्या आज थोडा लवकरच उठला तयार झाला आणि घरची नित्याची कामे करू लागला. आणि तो क्षण आला झाली संध्याकाळ भेटले सगळे पारावर. आणि वाट पाहू लागले बबन्याची. महादू बुआ बोलले की एन वक्तावर हा बबन्या कुठी गेला ?
वाट पाहून थकले तेवढ्यात सोपान्या आला अन बोलला की बबन्या वावरात जायेल हाये तो आपल्याले गावाच्या बाहेरच भेटीन… अठी टाइम लाऊ नका चाला आता. निघाले सगळे तेवढ्यात महादू बुआ बोलले कि चाला गडे हो भूक नसो पण शिदोरी असो आणि सर्वांना घेऊन मंदिरात गेले आणि पुजारी बुआ ला सांगितले कि बुआ आमच्या हातात गंडा बांधून द्या आम्हाला गावाबाहेर वावरात जायचं आहे. आणि तेवढ्यात तिथे काकू आल्या आणि त्या बघतील म्हणून सगळ्यांनी तो गंडा लपवला सर्व तिथून निघाले आणि चालू लागले तेवढ्यात वेस आली तसे महादू बुआ बोलले गडेहो मायी काई इच्छा होत नाई गावाबाहेर येण्याची मी चाललो घरी तुमाले यायचं असलं तर सांगा….हे कुत्रे पहा कशे बोंबलुन रायले….महाभयाण स्मशान शांतता हाये आज त…त्यात कोणी तरी म्हणे आज वावरत की आजची अमावस्या आहे. खरच आजचा दिस कोणता हाये लेकाचा रोजच्या पेक्षा जास्तच अंधार जाणवते.. अन साऱ्यात जास्त ज्याले घाई झालती तो बबन्या बी नाई आला आपल्या संग… जनाबुढा म्हणे काय भेत बे लहान हाये का तू आता चाल न मस्त मजा घेऊ. तस बी किती वर्ष झाले काई मनोरंजन झाल नाई…. महादू बुआ म्हणे नाई बुआ तुमी काय बी म्हणा माय मन म्हणते कि घरी गेलेलं बर राहीन…. मानकू तेवढ्यात बोलला बरबर हाये त्यायचं मी घरून निगतानाच बोललो होतो कि आजचा दिस भी काय सुदा नाई आपुन दुसऱ्या कोण्या दिशी जाऊ पण हा सोपान्या आयकत नव्हता. अन बबन्यान मले पायटीचं सांगून ठेवलंत कि मी वावरात जातो तुम्ही वेस वलांडली कि मले भेटा… आपुन त वेशीच्या बाहेर आलो पण हा बबन्या काई अजून आला नाई. तेवढ्यात १०-१२ काळ्या मंजरींनी त्यांच्यावर उद्या मारल्या सगळे घाबरले…. शेवटी किशऱ्या बोलला या बबन्यानच सांगितलं होत कि गावात तमाशा येल हाये म्हणून… आन हाच इतकी घाई करून रायला होता अन ऐन वक्तावर हाच गायब हाये मले काई अलगच वाटते यात… अन अश्या माजरीच आपल्यावर झेप घेण मले त काई भलताच संशय येऊन रायला. तेवढ्यात बबन्या आला…सारे लोक बोलले त्याले की हा टाइम हाये काय ? तुले टाइमाच काईच महत्व नाई. बबन्या म्हणे किती वाळखोचा वाट पाहून रायलो मी…आता जाऊद्या… टाइम लाऊ नका … चाला….. चाला हो …… टाइम लावू नका… बबन्याने सर्वांना पटवलं आणि चालू लागला. कुणालाच माहित नव्हते कि तो बबन्या हाये की वेशीवरच भूत. येणाऱ्या संकटाची कुणालाच चाहूल नव्हती….आणि एक भयंकर रात्र त्या सर्वांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

द्रुष्टी आहे तर सृष्टी आहे

कुणाला वाटत नाही सुंदर दिसावं. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी ती असतेच पण वेळ आणि सध्याचे आपले धावपळीचे जीवन यामुळे आपण ज्या शरीरावर प्रेम करतो त्याच शरीराकडे आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि लहान सहान गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो तसेच आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग म्हणजे आपले डोळे काही लहान सहान गोष्टी मुळे डोळे होतात खराब, आणि जास्त मोठा विषय बनल्यावर किंवा त्रास वाढल्यावरच आपले त्याकडे लक्ष जाते. पण अशावेळी त्या डोळ्यांसाठी आपण घरगुती उपाय शोधतो तर आज आपण बघणार आहोत आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग आपले डोळे यांची काळजी कशी घ्यावी तर.

आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अंग व आपले कुठलेही कार्य पूर्ण करण्यास, या सुंदर सृष्टीचे दर्शन घडविण्यात सर्वात जास्त योगदान देतात ते आपले डोळे आहेत. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का?
डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करीतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांची साफ सफाई न करणे – आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि कचरा यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. शहरात वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेमध्ये कार्बनचे कण, शिसाचे प्रमाण व विषारी वायू प्रचंड प्रमाणात वातावरणात पसरलेले आहेत. या हवेतील प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांमध्ये वाहनांचा धूर, धूलिकण, कार्बनचे कण असा अनेक प्रकारचा घातक कचरा सारखा व रोजच्या रोज डोळ्यात जात आहे. त्यामुळे डोळ्याला ऍलर्जीचा विकार उद्‌भवतो. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत जळजळणे, पापण्यांची व डोळ्यांच्या कडांची आग होणे, वारंवार खाज सुटणे अशी आहेत.
चला तर बघूया कशी घ्यावी या डोळ्यांची काळजी.

१) सकाळी उठल्याबरोबर शुद्ध ताज्या पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. डोळे चांगले धुतले गेले पाहिजेत. डोळ्यातील घाण, पापण्यांची चिपडे व्यवस्थित काढली पाहिजेत.
२) दुचाकीवर जाताना संरक्षक हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स वापरावेत. असे गॉगल्स आपल्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
३) डोळे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे. त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी. हा एक अतिशय प्रभावी, सोपा, साधा व संरक्षित उपाय आहे. मात्र पाणी अगदी स्वच्छ असावे. तसेच आपल्या डोळ्यांवर स्वच्छ, थंड पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांमधील धूलिकण बाहेर टाकले जातात व ऍलर्जीचा धोका कमी होतो.
४) कोरफडीचा गर किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यांच्या बंद पापण्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
नेहमी लक्षात ठेवण्यासारखे डोळ्यात कचरा,धूळ, छोटे कीटक काहीही गेल्यास डोळे कधीही चोळू नयेत त्याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

इलेट्रीक व इलेकट्रॉनिक उपकरणा मुळे होणारा त्रास – हे युग आधुनिक युगाच्या नावाने ओळखले जाते. अशा या आधुनिक युगात सर्व कामे हे विदयुत उपकरणांच्या साह्याने केल्या जातात त्यामुळे आपणा सर्वांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या उपकरणांमध्ये मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही, LED लाईट तसेच ईतरही अनेक उपकरणांमुळे आपल्या डोळ्यांला विविध रोग व ऍलर्जीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यावर ताण येणे अशा विविध गोष्टींना सामोरे जावे लागते.
याकरिता उपाय-
१) विदयुत उपकरणांचा कमीत कमी वापर करणे.
२) मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही अशे उपकरण कमी वापरावे व याचा उपयोग करीत असतांना डोळे व या उपकरणा मध्ये अंतर ठेवावे.
३) आपले काम हे जर कॉम्पुटर वरच असेल तर त्या करिता काम करीत असतांना एकेका तासाने आपल्या डोळ्याला ५ मिनिटांची विश्रांती द्यावी. तसेच महत्वाचे म्हणजे कॉम्पुटर काम करणाऱ्यांनी गॉगलचा वापर करावा जो तुमच्या डोळ्यान वरील ताण कमी करण्यास मदत करेल.

अल्प निद्रे मुळे होणारा त्रास – या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ फारच अल्प आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धावपळी मुळे अल्प झोप घेतो त्यामुळे डोळ्यांचे विविध आजार जडतात. त्यामध्ये डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोळ्याची आग होणे असे त्रास उदभवतात. या कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
याकरिता उपाय-
१) कमीत कमी ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) दिवसातून ३ ते ४ वेळा थंड पाण्याने आपले डोळे स्वच्छ करा.
३) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

आहार – आपल्या जीवनात आहाराची फार महत्वाची भूमिका आहे त्यामुळे जेवण हे वेळेवर करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. आहारा मध्ये विविध मोसमी फळे घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर ज्यूस घेत असाल तर यामध्ये मोसंबी ज्यूस, गाजरचा ज्यूस, बीट ज्यूस घेतल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळू शकतो. तसेच हिरव्या पालेभाज्या, सलाद, अंकुरित धान्य यांचा समावेश आपल्या आहारात करावा.

शेराले सव्वाशेर

आबा – अम्या, पिंट्या, रज्या मी जे इचारतो ते लक्ष देऊन ऐका .

पोर – लक्ष देऊनच ऐकत असतो आम्ही बोला तुम्ही.

आबा – पोर हो मले सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?

पोर (एका स्वरात) – लोखंड

आबा – दोघांचही वजन एक किलोच हाये त मंग लोखंड कसं जड होईन ?

अम्या – नाही आबा लोखंडंच जड हाये.

आबा (गोंधळलेल्या स्वरात) – अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहीन न.

पिंट्या – नाही आबा लोखंडंच जड राहीन

आबा (रागवून) – अरे लेकहो दोघायचही वजन सारखंच आहे.

रज्या (हसत हसत ) – तुम्ही मले एक किलो कापूस फेकून हाणा, मी तुमाले एक किलो लोखंड फेकून हाणतो.
मंग समझीन तुमाले काय जड हाये त.

आबा मंदातूनच उठले अन झाले बातच फरार….

अम्या, पिंट्या आणि रज्या हसुन हसुन बेजार… हा हा हा

 

विशिष्ट गुणांनी युक्त – कोरफड (घृतकुमारी)

बहुतेक प्रत्येकाच्या घरी सहजतेने उपलब्ध होणारी वनस्पती, सर्वांच्या परिचयाची कुणी अंगणात,परसबागेत तर कुणी कुंडीमध्ये या कोरफडीला स्थान देतात कुणी या वनस्पतीला सहज म्हणून लावतात तर कुणाला याचे औषधी फायदे सुद्धा माहित असतात. पण साधारणतः प्रत्येकाकडे हि वनस्पती बघायला मिळते.
आज आपण छोटीशी हिरवीगार काटेरी पाने असलेली औषधांचा बहुमूल्य ठेवा स्वतःमध्ये सामावलेली सर्वांना स्वास्थासाठी हितकारक, विशिष्ट गुणांनी युक्त अशा या कोरफडीची माहिती बघणार आहोत.

हिरवी हिरवी पाने, पानांच्या किनाऱ्यावर छोटे काटे पाने हि लांबट असून खोडांभोवती गोलाकार वाढतात,पानांच्या आत पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. या वनस्पतीच्या मध्यातून एक काडी बाहेर येते या काडीला केशरी रंगाची फुले येतात ती दिसायला मनमोहक असतात. याच कोरफडीचा आयुर्वेदामध्ये घृतकुमारी म्हणून संबोधल्या जाते. तसे या वनस्पतीला विविध नावाने सुद्धा ओळखतात. कोरफड, ग्वारपाठा, घृतकुमारी, एलोवेरा इ. या वनस्पतींचा उपयोग विविध औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये केल्या जातो. तसेच घरगुती औषधांमध्ये हि कोरफडीचा उपयोग होतो.
आयुर्वेदामध्ये अगणित वनस्पतींचा आरोग्यवर्धक उपयोग सांगितलेला आहे. त्याप्रकारेच कोरफड सुद्धा आयुर्वेदातीलच एक वनस्पती आहे. या वनस्पतीला जास्त जागा लागत नाही आणि विशेष म्हणजे थोड्याश्या पाण्यावरही या वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. कुंडी मध्ये टांगून सुद्धा ठेवलं तरी हि वनस्पती त्यात पण वाढते.

दैनंदिन जीवनात आपण या अमूल्य संजीवनीचा आपल्या स्वास्थासाठी कसा उपयोग करू शकतो ते आपण आज बघुयात.

मूळव्याध अति भयंकर त्रास या त्रासांमध्ये कोरफडचा ताजा गर नुसता ठेवला तरी दाह कमी होण्यास मदत होते व आराम मिळतो.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.
डोळ्यांची आग उन्हाळ्यात जास्त जाणवते किंवा वेल्डिंग सारख्या प्रखर प्रकाशाकडे बघितल्यास डोळ्यांमध्ये आग होते अशावेळी कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यात होणारी आग कमी होण्यास मदत होते.
शरीरावर कुठे चटका लागला, करपल तर यावर त्वरित उपाय म्हणून कोरफड लावावे आग कमी होण्यास मदत होते.
काही दिवस कोरफड सेवन केल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होते.
रोज कोरफडीचा चमचाभर गर घेतल्यास पाळी नियमित येण्यास मदत होते.
कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.
अंघोळीच्या अगोदर कोरफडीचा गर काढून त्याचा रस केसांना लावल्यास केस निरोगी होण्यास मदत मिळते.
त्वचेवर रोज कोरफडीचा गर लावल्यास त्वचा सतेज राहण्यास मदत मिळते. कोरफडीमध्ये एंटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या यामुळे कमी होण्यास मदत होते. तसेच कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.
ताज्या कोरफडीचा रस नियमित पिल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.
सर्दी-खोकला झाल्यास त्यावर घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा रस हा उत्तम पर्याय आहे.
तसा हा कोरफडीचा रस खूप कडू चवीचा असतो लवकर पिल्या जात नाही पण रोजच्या सवयीमुळे ते शक्य होऊ शकते.
सांधेवात हि वृद्धावस्थेत जाणवणारी समस्या या समस्येवरही कोरफड फायदेशीर ठरते.
हिरड्यांना आलेली सूज, दात निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा कोरफडीचे सेवन करणे हितावह आहे.
तोंड आलेले असल्यास सुद्धा कोरफडीचा वापर आरामदायक असतो.
कोरफडीचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे.
कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
उटण्यामध्ये या कोरफडीचा वापर होतो. त्वचेसाठी जणू वरदानच आहे कोरफड.
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.

अशाप्रकारे भरपूर उपयोग आहेत या अमूल्य कोरफडीचे हि विशेष गुणधर्माची आहे.या वनस्पती पासून विविध औषधे बनतात शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. केसांच्या समस्यांसाठी कोरफडीचे तेल केसांना निरोगी ठेवते केसांना चकाकी आणते. त्वचेला दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात.
चला तर मग आजपासून आपण सुद्धा एक तरी कोरफड आपल्या परसबागेत लावूयात व या निसर्गाच्या अमूल्य औषधींचा आपल्या स्वास्थाकरिता उपयोग करूयात.

औषध म्हणून कोरफडीचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

महानिर्मिती मध्ये २८० विविध पदांसाठी भरती

jobs at Mh28.in buldhana

महाजेनको (महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी लिमिटेड) मध्ये २८० विविध जागांसाठी भरती करण्यात येत आहे. महानिर्मिती जाहिरात क्र.० १(Jan)/२०१७ अन्वये विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिता देण्यात आलेल्या सरळसेवा जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

महानिर्मिती मध्ये विविध संवर्गातील रिक्त पदांकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी २०१७ अशी होती. परंतु उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण येत असल्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार येत असल्याने सदर बाब विचारात घेऊन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून दिली आहे. आता उमेदवार १३/०२/२०१७ पर्यंत अर्ज भरू शकतील.

उमेदवारांनी महानिर्मितीच्या www.mahagenco.in संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा विविध पद नुसार आहे. महानिर्मिती मध्ये खालील २८० पदांकरिता भरती करण्यात येत आहे.
सीनिअर केमिस्ट : 19 जागा,
लॅब केमिस्ट:13 जागा,
ज्यु. लॅब केमिस्ट:38 जागा,
वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर):03 जागा,
उप व्यवस्थापक (एचआर):8 जागा,
व्यवस्थापक (एफ अँड ए):5 जागा,
उप व्यवस्थापक (एफ अँड ए) :17 जागा,
सिस्टम ॲनेलिस्ट:1 जागा, प्रोग्रामर:4 जागा,
सहाय्यक प्रोग्रामर:13 जागा,
सहायक कल्याण अधिकारी:5 जागा,
वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा):2 जागा,
उप वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा):5 जागा,
उप व्यवस्थापक (सुरक्षा):9 जागा,
कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) : 31 जागा,
अग्निशमन अधिकारी : 2 जागा,
सहायक अग्निशमन अधिकारी:10 जागा,
कनिष्ठ अग्निशमन अधिकारी:7 जागा,
फायरमन:58 जागा,

आधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जाहिरात वाचावी. जाहिरात download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :
http://recruitment.mahagenco.in/2017_AD01/home/ListsofExam.aspx

जाहिरात download लिंक :
https://drive.google.com/uc?export=download&id=0B_nz2wUctSAXWUtJZWFXME5aY1k

जिजा आणि साली बायको मध्ये आली

buldana jokes

बायको: काय हो मगापासनं बघतेय काय प्रेम उतू येऊन राहाल तुमचं तर. इतक्या प्रेमाने कुणाशी बोलताय ?

नवरा: अगं काही नाही बहिणीशी बोलतोय.

बायको: बहिणीशीच बोलताय तर एवढा हळू आवाज कशाला प्रेम व्यक्त करायला ?

नवरा: अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय.

आकाराने लहान पण गुणांनी महान… काळे मिरे

हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणारा. रोज त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतच असतो. आपल्याला काळे मिरे म्हटले कि मसाला आठवतो आणि याचा उपयोग फक्त मसाल्यातच होत असावा असा फारसा समज आहे. बहुतेक ठिकाणी तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिर्‍याची पूड वापरतात. काळे मिरे- सॅलड, सूप, चायनीज पदार्थ, सांबार, मसालेभात अशा अनेक पदार्थामध्ये काळ्या मिऱ्याचा वापर होतो. मिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. मिरे हे पपईच्या वाळलेल्या बियांसारखेच दिसतात. पण हे काळे मिरे फक्त मसाल्यापुरते मर्यादित नसून आयुर्वेदात यांचा औषधी उपयोग सुद्धा आहे. चला तर मग या महान गुणांच्या छोट्याशा काळ्या मिऱ्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत यांचे औषधी उपयोग.

नाक बंद झाल्यास सुती कपड्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जिरे सम प्रमाणात घेऊन त्याची पोटली बांधावी आणि ती नाकाने हुंगावी यामुळे नाक मोकळे होते.
चहामध्ये काळे मिरे, सुंठ, गवतीचहा टाकून बनवलेला चहा सर्दी-खोकल्यावर उत्तम आहे.
खोकल्यामध्ये काळी मिरी गरम दुधात मिसळून ते दूध घेतल्यास फायदा होतो.
मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूक वाढते.
२ चमचे दही, १ चमचा साखर आणि ६ ग्रॅम काळे मिरे बारिक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला आणि डांग्या खोकला दूर होतो.
पित्तामुळे पोटात गुडगुड होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.
वजन कमी करण्यासाठीही काळी मिरे हे उपयोगाची आहे. यामुळे शरीरातील फॅटही कमी होतो. तसेच कॅलरीज जाळण्यासाठी उपयुक्त आहे.
डोळ्यांसाठी उपयुक्त आहे काळे मिरे. रोजच्या आहारात याचा वापर करावा.
काळे मिरे टाकून चहा पिल्यास चेहऱ्यावरील दाग-धब्बे दूर होतात चेहरा चांगला होतो.
दात दुखत असल्यास काळे मिरे दाताखाली चावून दाबून ठेवावे यामुळे दात दुखीवर आराम मिळतो.
पायरिया,दातांच्या समस्या, हिरड्या, यामध्ये मिरे पूड मीठ एकत्र करून दातावर लावावे आराम मिळेल.
एक ग्लास ताकामध्ये थोडी मिरे पूड मिसळून पिल्यास पोटातील जंतांचा त्रास कमी होतो.
श्वासासंबंधी काही त्रास असेल तर पुदिना व मिरे यांचा चहा मध्ये समावेश करावा.
स्मरणशक्ती साठी सुद्धा काळे मिरे उपयुक्त आहेत.
पोटातील गॅस, ऍसिडिटी सुद्धा यामुळे कमी होते आराम मिळतो.
अशाप्रकारे विविध औषधी उपयोग आहेत काळ्या मिऱ्याचे.

औषध म्हणून काळी मिरीचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

काका आणि लाकूड तोडणारे भूत

लोडशेडिंग असल्याने आधी सर्वच त्रस्त होते. पण सर्वात जास्त त्रास शेतकरी लोकांना व्हायचा आणि अजूनही काही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. दिवसातून १२ तास लोडशेडिंग असल्याने लाईट येईल तेव्हा शेतात जाऊन पिकास पाणी द्यावे लागायचे. मग त्यासाठी कुठला वार अन कुठलं काय ? कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री शेतात जाऊन हे काम करावे लागते.. अख्खी रात्र जागून काढावी लागते. अशाच एका अमावस्येच्या रात्री पिंपळगाव येथील हरिभाऊ (काका) आपल्या शेतात पिकास पाणी पाजण्यास गेले.

काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. शेत गावाबाहेर आणि जंगली भाग असल्याने फक्त अंधार आणि रातकिड्यांची साथ ती काय होती बाकी कुणी नाही. आपल्या खिशातून बिडी काढली आणि हरिभाऊने शिलगावली आणि ओढत बसले. ती ओढून झाल्यावर थोडं आंग टाकू म्हणून ते मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते झोपले. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो सदाशिव! काकांना आवाज देऊन तो उठवीत होता.

काका उठल्यावर तो म्हणाला, ‘हऱ्या, झोपलायस काही काम नाही का?’ काका म्हणाले, ‘अरे सर्व सरींना पाणी सोडलेय. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तु इथे काय करतोयस?’ अरे तुझ्याकडेच आलोय, सदा बोलला. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते. दिवसा डोँगरात फॉरेस्टवाला (वनरक्षक) असतो. म्हणून म्हटलं रातच्याला जाऊ. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, ‘चल ठीक आहे, जाऊया’.

काकांनी जवळची बॅटरी घेतली आणि दोघेही गप्पा करीत डोंगराकडे निघाले. ते कधी डोंगरात पोहोचले. काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, ‘बरं चल तोड आता तुला हवे ते लाकुड’. तो म्हणाला, ‘जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत’. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला.

काका दत्तमार्गी होते. नेहमी देवपूजा, नामस्मरण करायचे. आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्याला म्हणाले, ‘कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?’. आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या हद्दीत न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, ‘वाचलास तू’! आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन थेट शेतात पोहोचले. मूर्च्छा येऊन हरिभाऊ तिथेच पडले ते थेट सकाळी हॉस्पिटलमध्ये भानावर आले.

सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मात्र हरिभाऊ कधीच रात्री शेतात गेले नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

जळगाव वर नजर ‘तिसऱ्या डोळ्याची’

jalgon jamod cctv

आता जळगाव जा. शहरावर नजर असणार आहे ‘तिसऱ्या डोळ्याची’. दिवस असो वा रात्र संपूर्ण शहर नजरेखाली असणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. आ. संजय कुटे यांनी केलेल्या संकल्पनेनुसार जळगाव जा. ची स्मार्टसिटी कडे वाटचाल सुरु झाली आहे. आज जळगाव जामोद येथे सर्वत्र नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे आता शहरात होणाऱ्या अनेक अवैध धंद्यास, चोरी, छेडखानी यासारख्या प्रकारास आळा बसणार आहे.

येथील बस स्थानक चौक, न्यूईरा हायस्कुल, दुर्गा चौक, के के कॉलेज, मानाजी चौक, डॉ. दलाल हॉस्पिटल परिसर, सुनगाव वेस, जगदंबा मंदिर, सुलतानपूरा, खेर्डा वेस, भाजी बाजार, आंबेडकर पुतळा, चावडी इ. ठिकाणी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारास वचक बसणार आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना सहाय्य्य होणार असून शहरात वाढत असलेल्या चोरी, चिडीमारी, गुंडागर्दी सारख्या घटना कॅमेऱ्यात कैद होणार आहे. हे कॅमेरे थेट पोलीस स्टेशन ला जोडले असल्याने सर्व हालचाली स्टेशनातून टिपल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम जळगाव जा. ला हा दर्जा मिळणार आहे. शहरवासी या कामाने आनंदित झाले असून नगर परिषदेचे कौतुक होताना दिसून येत आहे.

पातुर्डा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पातुर्डा चे ग्रामदैवत महासिद्ध महाराज यांची यात्रा येत्या १० फेब्रुवारी येत आहे. त्या निमित्ताने गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हभप रवींद्र महाराज सोयगाव, लक्ष्मण महाराज कोकाटे सावरपाटी, गजानन महाराज मलकापूर, लक्ष्मी नारायण दायमा महाराज पारस, मधुकर महाराज जोगंदल अकोला, संजय पाटील महाराज बामदा, गणेशनंद महाराज कागन्ये आळंदी देवाची, विनायक महाराज भोपळे निमगाव यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी अभिनेते अमोल जुमळे आणि साथीदारांचा ‘शिवनागर’ कार्यक्रम होणार आहे. ‘गाथा पारायण’ व्यासपीठाचे नेतृत्व निमगाव येथील विनायक भोपळे हे करणार आहेत. गावकऱ्यांच्या वतीने ११ फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वाना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विना ग्रुप बनवता अनेकांना मेसेज कसा पाठवाल ?

whatsapp message

खिशात फोन आणि त्यात ‘व्हाट्सऍप ‘ नाही असं शक्य आहे का ? स्मार्टफोनच्या दुनियेत व्हाट्सऍप ने अद्भुत क्रांती घडवून आणली आहे. काही वर्षाआधी मेसेज ची देवाण घेवाण SMS च्या माध्यमातून होत होती. त्याला बदलून अगणित मेसेज आणि एकाच वेळी कित्येक मित्र-मैत्रिणी सोबत बोलण्याची सोय आणि ते सुद्धा फक्त टेक्स्ट नव्हे तर छान ग्रीटिंगद्वारे फक्त ‘व्हाट्सऍप’ ने आणली.

आपण रोज व्हाट्सऍप वापरतो. ग्रुपमध्ये एकाचवेळी अनेक लोकांशी संभाषण करतो. रोज कित्येक मेसेजची देवाणघेवाण होत असते. कित्येकांना ओळखतो तर कित्येकांना ओळखत सुद्धा नाही. ग्रुप मध्ये अनेक लोकांसोबत संभाषण करताना प्रत्येकाला आलेला मेसेज दिसत असतो. पण तुम्ही अनेकांना मेसेज केला आहे परंतु त्यांच्याकडून आलेला मेसेज फक्त तुम्हीच बघू शकता इतर नाही असं काही केलेलं आहे का ? अगदी ग्रुपप्रमाणे तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांशी बोलू शकता पण त्यांचा आलेला मेसेज फक्त तुम्हालाच दिसू शकतो असं फिचर व्हाट्सऍप मध्ये आहे, अगदी पूर्वीपासून ! काहींना ते माहिती असेल तर कित्येकजण अजूनही त्यापासून अनभिज्ञ असतील.

आपल्या व्हाट्सऍप मध्ये गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या मेनू आयकॉन वर क्लिक करा तिथे ‘new brodcast message’ दिसेल त्याला क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर आपली कॉन्टॅक्ट लिस्ट दिसू लागेल त्यामधून ज्यांना मेसेज पाठवायचा त्यांना क्लिक करा म्हणजे ते सिलेक्ट होतील. असे आपल्याला हवे तेवढे मित्र आपण ऍड करू शकतो. त्या नंतर मोबाईल च्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. त्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ‘मेसेज विंडो’ दिसू लागेल त्यावर वरती किती “receipant” आपण ऍड केले ते दिसेल आणि खाली ‘मेसेज’ टाईप करण्यासाठी बॉक्स दिसेल. अशा प्रकारे आपण सर्वाना एकच वेळी मेसेज पाठवू शकतो. जरी ते एकाच ग्रुप मध्ये नसतील तरीही.  आपल्याला प्रत्येकाला काही संदेश द्यायचा असेल अथवा काही सांगायचे असेल.  परंतु त्यांचा रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसायला हवा तर हे फिचर त्यासाठीच आहे. त्यांनी दिलेला रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसेल इतरांना नाही. तुम्ही जर हे फिचर वापरले नसेल तर एकवेळ नक्कीच वापरून बघा.

तरुणींनी इंटरनेट वापरतांना काय काळजी घ्यावी

इंटरनेट, मोबाइलचा वापर अधिक वाढला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट आहे. मुलांसोबत मुलीही इंटरनेट व संगणकाच्या वापरात कुठेच मागे नाहीत. पण त्या सायबर गुन्ह्यांना बळी पडून शकतात. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यांना महिलाच अधिक बळी पडतात. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सुशिक्षित समजले जाणारे व्यक्ती जेव्हा अशा घटनेस बळी पडतात त्यावेळी मात्र संशय निर्माण होतो. त्या व्यक्तीवर आणि इंटरनेट जगतावर.

सोशल मीडिया, व्हाटसअँप यांच्या माध्यमातून कुणीही कुणाला मित्र बनवू शकतो. अनेक वेळा काही फेक अकाउंट बनवून सुद्धा गंडविण्याचे प्रकार होताना दिसून येतात. प्रेमप्रकरण मग बदनामी इ. प्रकार कित्येक महिलांसोबत घडलेले आहेत. संपूर्णतः हे थांबवणे शक्य नसले तरी महिलांनी जागरूक असले तर असे प्रकार नक्कीच बंद होऊ शकतात.
महिलांना फसविण्याचा प्रकार प्रामुख्याने ज्या माध्यमातून घडते ते म्हणजे बनावट ई-मेल : एकतर्फी प्रेम, राग, व्यावसायिक मतभेद, जळवणूक यातून महिलेचे नाव बदनाम करण्यासाठी तिच्या नावे बोगस ई-मेल आयडी तयार करून तिच्या ओळखीच्या अथवा कुटुंबीयांना बदनामीकारक ई-मेल पाठवला जातो.
हॅरॅसमेट व्हाया ई-मेल : सारखे सारखे ई-मेल पाठवून ई-मेल क्रश करायचा. ई-मेल पाठवून महिलेला भेटायला बोलवायचे. ई-मेल पाठवणे, हे या प्रकारात मोडते. सायबर स्टॉकिंग : फेसबुक सारख्या सोशल नेटवìकग साइट्सवर महिलेचा माग काढणे, तिच्या प्रोफाइलवर ईल कमेंट करून त्रास दिला जातो. पोर्नोग्राफी : ईल चित्र, व्हीडिओ एमएमएस पाठवून त्रास देणे, अल्पवयीन मुलींना व्हीडिओ दाखवणे. मॉर्फिंग : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नग्न छायाचित्रावर महिलेचा चेहरा लावला जातो. त्यानंतर हे छायाचित्र मोबाईल फोन, सोशल नेटवìकग साईट, पोर्नसाईट्सवर अपलोड केली जातात. डिफमेशन : मॉíफग, स्पुिफगच्या साहाय्याने महिलेची बदनामी केली जाते. एकतर्फी प्रेम, रागातून अशी कृत्य केली जातात. असे अनेक प्रकार दिसून येतात. यासाठी प्रतिबंध म्हणून घरचा पत्ता, खासगी मोबाईल, बँक खाते क्रमांक इतर माहिती कोणाला सांगू नका. अथवा ते कोणाच्या हाती लागतील अशा ठिकाणी ठेऊ नका. येणारे ई-मेल, फोन, एसएमएस यांची उत्तरे देताना सावधानता बाळगा. त्याद्वारे खासगी माहिती व इतर माहितीची विचारपूर्वक उत्तरे द्या. तुमचा सोशल सिक्युरिटी क्रमांक देऊन नका. ब्लॉग किंवा वेबसाईटवर स्टॅट्स काऊंटर ठेवा. बँक खाते नियमित तपासून पाहा. एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन तुटल्यानंतर त्याला सांगितलेला पासवर्ड व इतर खासगी माहिती त्वरित बदला. तुमच्या ई-मेल अथवा सोशन नेटवìकग साइट हॅक झाल्याचे संशय येत असल्यास तुमचा संगणक अनुभवी माणसाकडून तपासून घ्या. ई-मेल आयडी निर्माण करतानाचा प्रश्न व त्याचे उत्तर कोणाला सांगू नका. ईवडील अथवा विश्वासू माणसाकडून इमोशनल सपोर्ट मिळवा.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांत पोलिसांचे सायबर सेल स्थापन करण्यात आले आहेत. तेथे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी घेतल्या जातात. तसेच जवळपासच्या पोलिस ठाण्यांतही सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारी दाखल करता येतात. आता पोलीस ठाणे सुद्धा हायटेक होत असल्याने जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते.

लग्नाआधी वधू ने करावयाची पूर्वतयारी

लग्नसोहळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि आता लगबग चालू होईल. या काळात सर्वात जास्त लक्ष वधू वर असते. सर्व मुलगी कशी आहे याकडे लक्ष देत असतात तर ज्या मुलीचे लग्न आहे ती सुद्धा जास्तीत जास्त मेहनत घेऊन सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असते. लग्नाच्या एक महिनाआधी मुलीने काय तयारी केली पाहिजेत त्या बघू.

जसं जसं लग्न जवळ येत असत तशी लगबग आणि धाकधूक वाढते. अनेक मुली चिंता आणि तणावात दिसून येतात. परंतु काही गोष्टी जर लग्नाच्या एका महिनाआधी पासून सुरु केल्या तर हा तणाव टाळता येऊन सुंदर दिसण्यास मदत होवू शकते. ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी तुम्ही छान मेकअप केला असला तरी जर तुम्ही तणावात असाल तर तुमची सुंदरता नष्ट झालीच म्हणून समजा. म्हणून शक्यतो त्या दिवशी तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हसत खेळत आणि मोकळं राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अनकंफर्टेबल वाटणार नाही.

लग्नाच्या एक महिना आधीपासून जर तुम्ही काही प्रयोग केलेत तर तुम्ही सुंदर दिसलाच आणि ऐनवेळी होणारी धावपळ आणि तणाव दूर होण्यास मदत होईल.
१. बॉडी वॉश : बाजारात अनेक बॉडी वॉश मिळतात ज्यामध्ये साबण नसतो. अशा बॉडी वॉश चा उपयोग केल्यास त्वचा कोरडी होत नाही . मुलायम राहते.
२. स्क्रब : चेहरा आणि इतर नाजूक भागात स्क्रब चा वापर केल्यास त्वचा मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होते. यासाठी ‘ऑलिव्ह ऑइल’ चा उपयोग केल्यास त्वचा कोरडी राहत नाही .
३. शॉवर बॉडी ऑइल : ‘शॉवर बॉडी ऑईल्स ‘ वापरल्यास त्वचा मुलायम राहते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि कडक होत नाही.
४. लिपबाम : नरम आणि कोमल ओठ करायचे असतील तर रोज रात्री झोपण्याआधी आपल्या ओठांना लिपबाम लावावे म्हणजे ते सुंदर आणि कोमल होण्यास मदत होईल. बाजारात अनेक कंपन्यांचे लिपबाम लगेच उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार हवा तो फ्लेवर तुम्ही निवडू शकता.
५. पुरेशी झोप : स्वस्थ आणि सुंदर चेहरा कुणाला नको. त्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे. लग्न कार्य आहे आणि कामे पडलीत म्हणून अनेक घरी या काळात जागरण होत असतात. परंतु जर जागरण नेहमी होत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ आणि शरीरावर पडतो. चेहरा टवटवीत न दिसत थकलेला आणि निरुत्साही दिसतो. म्हणून पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
६. पाणी: दिवसभर कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दिवसभरात ८ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा कोरडी आणि अनाकर्षक होणार नाही.
७. ब्लिच आणि इतर : लग्न काळात शॉपिंग, खरेदी इ. कारणामुळे बाहेर फिरावे लागते त्यामुळे त्वचा काळवंडते आणि कोरडी पडते. धूळ-प्रदूषण यामुळे त्वचेस होणारे नुकसान दूर करण्यासाठी ब्लिच, वॅक्सिंग इ. करून घ्यावे.

चम्प्याची बायको

चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
“चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..”
चम्प्या मनातल्या मनात”किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस

धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस”
पुढे लिहिलं असतं..
“आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये..”

वक्तृत्व स्पर्धेत नेहा सांगळे प्रथम

संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला, वाणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाची बीएससी भाग १ ची विद्यार्थिनी कु नेहा सांगळे ही वतृकत्व स्पर्धेत प्रथम आली आहे. सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कृष्णराव इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 21- 22 जानेवारी दरम्यान कला अणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये मधे वक्तृत्व आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेत अधुनिकतेच्या नावाखाली नीतिमत्तेचा ह्रास या विषयावर वतृकत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे अणि कार्यक्रमाचे परीक्षक प्रा गुर्जर सर अणि प्रा सातव सर यानी कु नेहा हीचा वतृकत्व स्पर्धा मधे प्रथम क्रमांक घोषित केला. यासाठी तिला प्रा कालपांडे सर, प्रा वानखडे सर, प्रा शिवकुमार गिरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

ऑनलाईन पैसा मिळवा फोटोग्राफीमधून

jobs in buldana

आजच्या युगात नोकरी, रोजगारासाठी अनेक जण धडपडत असतात. आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जण छोटे मोठे उद्योग करीत असतात तर काही नोकरी करतात. ज्यांना स्वतः चा व्यवसाय करायचा आहे अशांसाठी सरकार सुद्धा काही योजना राबवित असते. प्रत्येक वेळेस व्यवसायासाठी जागा आणि भांडवल असलंच पाहिजेत असं नाही. आज तुम्हाला याबद्दल काही सांगणार आहोत.

सध्या लग्नकार्याचे दिवस सुरु झालेत. सर्वत्र धामधुम दिसून येत आहे. ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सेवा पुरविणाऱ्यांना सुद्धा सवड मिळत नाही. या लग्नकार्यात सर्वांचा आवडता विषय आणि माणूस म्हणजे- फोटोग्राफर! तसे आपण नेहमीच फोटो काढत असतो परंतु आयुष्यातील ह्या मौल्यवान क्षणाला बंदिस्त करण्यासाठी आपण कुठलीही कसर सोडत नाही. आपल्यापैकी अनेक जण फोटोग्राफर असतील. शहरातील व खेड्यातील. आपल्या व्यवसायाला सांभाळून किंवा जे छंद म्हणून फोटोग्राफी करतात असे लोक घरबसल्या पैसे कमवू शकतात. ते कसे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच !

तुम्ही उत्तम फोटोग्राफर असाल, कॅमेरा अँगल, लाईट इ. चे ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचा ‘पोर्टफोलिओ’ बनवू शकता आणि त्याचे प्रमोशन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे “प्रिवेड फोटोशूट’ ला मागणी आहे. यामध्ये तुम्ही तुमचं कसब पणाला लावून आपलं नाव करून घेऊ शकता. याशिवाय तुमच्या कडे कम्प्युटर, इंटरनेट असेल आणि ‘फोटोशॉप’ च चांगलं ज्ञान असेल तर फोटो एडिटिंग करून ऑनलाईन काम घेऊ शकता अथवा तुम्ही काढलेले उत्तम फोटो इंटरनेट वर असलेल्या अनेक वेबसाईट वर विकू शकता. अनेक वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन फोटो सेल करतात.

जाहिरातीसाठी, प्रेझेन्टेशन, वेबसाईट, ब्रॅण्डिंग इ. ठिकाणी फोटो ची मागणी असते. त्यानुसार तुम्ही काढलेले फोटो सेल करू शकता. ‘इमेजबझार’ नावाची भारतीय वेबसाईट आहे जी भारतातील अनेक कंपन्याला फोटो पुरवीत असते. यासारख्या इतर वेबसाईट आहेत जिथे तुम्ही आपलं अकाउंट ओपन करून ऑनलाईन फोटोविक्री चालू करू शकता. जर तुम्हाला स्वतः ची वेबसाईट बनवून हा व्यवसाय चालू करायचा असेल तर वेबसाईट बनवून सुद्धा फोटो सेल करू शकता.

काही जणांना आऊटडुअर फोटोग्राफीचा छंद असतो. त्यांच्यासाठी सुद्धा आपला छंद जोपासत आपलं नाव आणि पैसे कमावण्याची अनेक दार इंटरनेट द्वारे उघडी आहेत. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचं ज्ञान मात्र आवश्यक आहे. चला मग विचार कसला करतांय उचला कॅमेरा आणि करा ‘क्लिक.. क्लिक..क्लिक’

हिंग- उत्तम आरोग्यासाठी लाभदायक

आपल्या रोजच्या जेवणात हिंग वापरण्यात येतो. स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. हिंगाचे अनेक फायदे आहेत. उत्तम आरोग्याच्या दृष्टीने ते कुठले ते आपण बघूया.

वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो. उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल. छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल. टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे. डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे. भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.
कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून, त्या तेलाचं एक-एक थेंब कानात टाकल्याने वेदना दूर होतील. दातांमध्ये कॅविटी झाल्यास हिंग फायद्याचे ठरेल. दाता किड लागली असल्या रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपावे. कीड आपोआप दूर होईल.

आपल्या किचन मध्ये असलेली इवलीशी हिंगाची डबी काय करते ते आपण बघितले. पुढील वेळी नक्की त्याचा प्रयोग करून बघा.

आपल्या मुलीस एका बापाचे सुंदर उत्तर

एका मुलीला तिच्या वडीलांनी ३५,००० चा Mobile भेट दिला.
दुसर्‍या दिवशी तिला विचारले. Mobile मिळाल्यावर तु सर्व प्रथम काय केले?

मुलगी – मी Scratch Guard लावला आणि Cover बसवले.
बाप- तुला अस करण्यास कोणी Force केला का?
मुलगी – नाही.
बाप – तुला अस वाटत नाही का की तु Manufacturer चा Insult केलाय?
मुलगी – नाही. उलट Manufacturer ने Cover आणि scratch guard लावणे Recommend केलय.
बाप – Mobile स्वस्त आणि दिसायला खराब आहे म्हणून तु Cover बसवले आहे?
मुलगी – नाही…उलट त्याला Damage व्हायला नको म्हणून मी Cover बसवले.
बाप – Cover लावल्यावर त्याची Beauty कमी झाली का?
मुलगी – नाही बाबा. उलट तो जास्त Beautiful दिसतोय.

बापाने प्रेमाने मुलीकडे पाहिले आणि म्हणाला…”मुली Mobile पेक्षा किंमती आणि सुंदर तुझ शरीर आहे. त्याला अंगभर कपडे घालून Cover केल तर त्याचे सौंदर्य अजून वाढेल… ?
मुलगी निरुत्तर झाली.

एक्स्चेंज ऑफर

marathi jokes

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेंज ऑफर …
गजाभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला…
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..

संग्रामपूर येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

आरक्षण आणि कोपर्डी येथील घटनेतील आरोपीना लवकरात लवकर शिक्षा होणे यासारख्या मागण्यासाठी काल संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल आणि कारामोडा फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सादर रस्ता रोको करण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे जमलेले कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने जळगाव जामोद, तेल्हारा आणि शेगाव कडे जाणारी वाहतूक बंद होती. सोबतच करमोडा फाट्यावर सुद्धा मराठा समाजाच्या युवकांनी रास्ता रोको केला होता. यावेळी तांमगाव पो. स्टे . चे बी. आर. गीते यांनी परिस्थतीत नियंत्रणात ठेवली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घेतला नाही .

पदवीधर मतदारांना नावे शोधण्यासाठी वेबसाईट विकसीत

buldana website for padaveedhar

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांची नावे कोणत्या मतदान केंद्रावर संलग्न आहेत, हे शोधण्यासाठी आज्ञावली विकसित केलेली आहे. ही आज्ञावली www.buldhana.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छूक मतदारांनी या आज्ञावलीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी बुलडाणा तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्हा बुलडाणा यांनी कळविले आहे.

source : ‘महान्यूज’

काका, अमानवीय शक्ती आणि बैल

buldana online stories

गजूकाकांचे गाव जळगाव. ते काका सुट्टीत गावाला आले होते .काकाचं निसर्ग, ग्रामीण जीवन यांवर खूप प्रेम .त्यांची शरीरयष्टी उत्तम. त्यामुळे ते जास्त कोणाला घाबरत नसत . गावी त्यांची शेती होती . शेतीचं काम त्यांचे बाबा आणि त्यांचे काका बघत . एके रात्री शेतीला पाणी देण्यासाठी घरातून कोणाला तरी जाव लागणार होत , पण त्या रात्री अमावस्या होती. आणि अमावस्या असल्यामुळे कोणी जायला तयार नव्हत .

कोणीच शेतावर जायला तयार होईना म्हणून अखेर काकांनी स्वतः शेतात जायचा निर्णय घेतला. पण घरचे म्हणाले “आज जाऊ नका ! आज अमावस्या आहे . एक रात्र नाही पाणी दिल तरी चालेल . काही बिघडत नाही त्याने . पण काका काय ऐकायला तयार होईना. शहरात राहत असल्यामुळे त्यांना या सगळ्या भाकड कथा वाटत होत्या .त्यांनी आज रात्री पाणी देऊन यायचं पक्कच केल होत. ते एकटेच चालत निघाले. त्यांच्या काकांनी त्यांना थांबवल आणि म्हणाले ” चालत नको जाऊ. बैलगाडी घेऊन जा !” काका बैलगाडी घेऊन जायला तयार झाले. त्यांनी बैलगाडी घेतली आणि शेताकडे निघाले. त्यांना रस्ता ठाऊक होता की स्मशान आल्यावर विरुद्ध बाजूला वळायचे . अर्ध्याच्या वर रस्ता संपत आला होता. आता स्मशान लागल होत . त्यांनी विरुध्द बाजूला जायला बैलगाडी वळवली . पण बैल मात्र पुढे जायला तयार होत नव्हते . ते जागच्या जागीच थांबले. यांनी त्यांना खूप हाकले पण बैल काही जागचे हालेना . त्यांनी चाबकाने बैलांना मारून मारून त्यांच्या पाठीवर चे रक्त काढले . तरीही बैल पुढे जायला तयार होत नव्हते. काका विचारात पडले की बैल असे अचानक का थांबले असतील ? आणि एवढं मारून , रक्त निघायला लागल तरी पुढे जायला का तयार होत नाही . जोडी तर जुनी आहे मग पुढे का जात नाही? असा विचार करतच होते तेवढ्यात अचानक बैल उधळले . बैल उधळले म्हणून काकांनी त्यांना मारायचं थांबवल . मग बैल ही उधळायचे बंद झाले, पण त्या वाटेने बैल पुढे जाताच नव्हते, शेवटी वैतागून काकांनी घरी यायचा निर्णय घेतला . बैलांनी त्यांना आता मात्र बरोबर घरी आणल .घरी आले तर त्यांचे वडील आणि काका जागेच होते. त्या काकांनी हा प्रकार त्या दोघांना सांगितला . त्यावर त्यांचे काका त्यांना म्हणाले,  उद्या सांगतो . काका आधीच खूप दमले होते. म्हणून अजून जास्त विचार न करता ते ही झोपून गेले . सकाळी काकांनी रात्रीचा प्रकार परत सांगितला . तेव्हा त्यांचे काका म्हणाले, “ही जोडी जुनी आहे . त्यांना रस्ता माहित आहे. तू जिथे चालला होता. तो रस्ता स्मशानाच्या विरुध्द दिशेचा नसून, स्मशानाचा होता.

तुझ्या सोबत काल चकवा घडला होता . म्हणून मी रात्री तुला नाही सांगितल”. त्या स्मशानाच्या ठिकाणी असेच भास अनेक लोकांना झाले आहेत . अनेक लोक आता पर्यंत मेले आहेत. जनावरे अशा गोष्टीपासून अत्यंत जागृत असतात . त्यांनी तुझा जीवच वाचवला काल रात्री . हे ऐकल्यावर मात्र काकांना आपल्या चुकीची जाणीव झाली . त्या पाळीव मुक्या जनावरांना रक्त काढेपर्यंत मारल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला होता. मनातूनच ते एखाद्या गुन्हेगारासारखे वाटू लागले, मनातूनच त्यांनी त्या मुक्या बैलांची आणि देवाची माफी मागितली, आणि आभारही मानलेत.