इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘फेसबुक’ ची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’

जगाच्या कान्याकोपर्‍यात इंटरनेट पोहोचाविण्यासाठी फेसबुक सज्ज झाले असून जगातील अतिदूर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. या प्रकल्पाला ‘कनेक्टव्हिटी लॅब’ असे नाव देण्यात आले आहे.

सॅटेलाइट तसेच ड्रोन विमानाची मदत घेऊन जगातील अतिदुर्गम भागात इंटरनेट पोहोचण्यासाठी फेसबुक हा प्रयत्न करणार आहे. या साठी ‘फेसबुक’ आणि नेटवर्किंग कंपनी ‘इंटरनेट.ऑर्ग’ यांच्यात करार झाला आहे. अर्थातच याचा फायदा फेसबुक ला होणार असून. या द्वारे फेसबुक चे यूज़र्स वाढणार आहेत. फेसबुकची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ विकसित करण्यासाठी ड्रोन, सॅटेलाइट आणि लेजर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अद्याप हा प्रकल्प पूर्ण कधी होणार या बाबत काही स्पष्ट केले नाही. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन आणि जियोसिंक्रोनस सॅटेलाइट सोडले जाईल. त्यामाध्यमातून जगाच्या प्रत्येक भागात इंटरनेट पोहोचेल, असे झुकेरबर्ग म्हणाले. अवकाशात झेपावणार्‍या एअरक्राफ्ट्सद्वारा अदृश्य लेजर बीमदेखील जमिनीच्या दिशेने सोडले जाणार आहेत. त्यामाध्यमातून इंटरनेटचा स्पीड वाढविण्यास मदत होणार आहे.

भारतीय वायूदलाच्या मालवाहक विमानाला अपघात; 5 ठार

भारतीय वायुदलाच्या ‘सुपर हर्क्युलस सी-१३० जे’ या मालवाहक विमानाचा ग्वाल्हेर येथे अपघात झाला असून, या घटनेत वायूदलाचे पाच जवान शहीद झाले.
वायुदलाच्या प्रवक्त्यांने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चाचणी दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सुपर हर्क्युलस सी-१३० जे’ हे अमेरिकन बनावटीचे विमान असुन मालवाहक विमान खरेदीसाठी भारताने अमेरिकेसोबत २००८ साली तब्बल ६००० कोटींचा करार केला होता. घटनास्थळी वायूदलाचे बचावकार्य सुरू आहे.भारतीय वायुसेनेकड़े अशी 6 विमाने आहेत. या आधी नौसेनेच्या पाणबुडी ला मागे अपघात झाला होता. त्यानंतर आज वायु सेनेच्या विमानाला अपघात झाला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा काल इंटरनेट वरुन वार्‍यासारखी पसरली. आणि असंख्य चाहते दुखी झाले. ही वार्ता खूप जोरात पसरली. परंतु नंतर समजले की ही एक अफवा असून लता दीदी ठणठणीत आहेत. त्यांना काहीही झालेले नाही.

या प्रकारामुळे खुद्द लता दीदीना ट्विट करावे लागले. “नमस्कार, मी ठणठणीत असून मला काहीही झालेले नाही. तुम्हा सर्वांचे प्रेम माझ्यासोबत आहे. ही फक्त एक अफवा होती.” असे त्यानी ट्विट मधे म्हटले आहे.

मुंबई वि. कोलकाता सामन्याद्वारे आइपीएल 2014 ची सुरूवात

अखेर आइपीएल 2014 च्या या वर्षी चे वेळापत्रक आज उशिरा जाहीर करण्यात आले. मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट राइडर या सामन्याद्वारे ही स्पर्धा सुरू होणार आहे. शारजा, अबुधाबी व दुबई या तीन ठिकाणी आधीचे 20 सामने होणार आहेत.

पहिल्या 20 सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून बाकी सामन्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट राइडर या संघामधे अबुधाबी येथे पहिला सामना खेळल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 एप्रिल पर्यंत सामने खेळवले जाणार असून उर्वरित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल अशी माहिती आइपीऐल संकेळस्थळावर देण्यात आलेली आहे.  वेळापत्रक पुढीलप्रमाणे

दि. 16 एप्रिल  – मुंबई वि. कोलकाता
दि. 17 एप्रिल – दिल्ली वि. बंगलोर
दि. 18 एप्रिल – चेन्नई वि. पंजाब
दि. 18 एप्रिल – हैदराबाद वि. राजस्थान
दि. 19 एप्रिल – बंगलोर वि. मुंबई
दि. 19 एप्रिल – कोलकाता वि. दिल्ली
दि. 20 एप्रिल – राजस्थान वि. पंजाब
दि. 21 एप्रिल – चेन्नई वि. दिल्ली
दि. 22 एप्रिल – पंजाब वि. हैदराबाद
दि. 23 एप्रिल – राजस्थान वि. चेन्नई
दि. 24 एप्रिल – बंगलोर वि. कोलकाता
दि. 25 एप्रिल – हैदराबाद वि. दिल्ली
दि. 25 एप्रिल – चेन्नई वि. मुंबई
दि. 26 एप्रिल – राजस्थान वि. बंगलोर
दि. 26 एप्रिल – पंजाब वि. कोलकाता
दि. 27 एप्रिल – दिल्ली वि. मुंबई
दि. 27 एप्रिल – हैदराबाद वि. चेन्नई
दि. 28 एप्रिल – बंगलोर वि. पंजाब
दि. 29 एप्रिल – कोलकाता वि. राजस्थान
दि. 30 एप्रिल – मुंबई वि. हैदराबाद

टी 20 वर्ल्डकप चा फीवर आजपासून

पाचव्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्यास आजपासून बांग्लादेश मधे सुरूवात होत आहे. आजपासून विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होत असून सलामीची लढत यजमान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबर होणार आहे. खऱ्या अर्थाने विश्वचषकाचा स्पर्धेला मुख्य फेरीच्या पहिली लढत भारत आणि पाकिस्तान या लढतीने सुरुवात होईल.

भारत या स्पर्धेत 21 मार्च ला पाकिस्तान, 23 मार्च ला वेस्ट इंडीज तर 28 मार्च ला साखळी फेरीत प्रवेश करणार्‍या संघासोबत खेळेल. उद्या दि. 17 मार्च भारत आपला सराव सामना श्रीलंकेसोबत खेळणार असून दरम्यान फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ फतुल्ला येथे आज सराव करणार आहे.

प्रख्यात गीतकार सुधीर मोघे काळाच्या पडद्याआड

प्रख्यात कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली..  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्यांचा… फिटे अंधाराचे जाळे… सांज ये गोकुळी… एकाच या जन्मी जणू… अशी एकापेक्षा एक अजरामर गीते त्यांनी लिहिली.

गीत लेखनसोबतच  सुधीर मोघे यांनी संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन अशा अनेक प्रांतात यशस्वी कामगिरी केली. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय अशा ५०हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं.

शांता शेळके, सुधीर फडके, श्रीधर फडके यांच्या सोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. कविता-गीतलेखनाचं काम करत असतानाचा त्यांनी काही मालिका, सिनेमांनाही संगीत साज चढवला. झी मराठीवर गाजलेला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाचं यशस्वी सादरीकरणही केलं होतं.  साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चारवेळा पटकावला होता

पहिली चुक

झंम्प्या : साहेब
ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत

साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते..

झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच
चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो….

सुधीर सुर्वे यांना बुलडाण्यातून आपची उमेदवारी

सुधीर सुर्वे  यांना आज आप अर्थात आम आदमी पार्टी ने बुलडाण्यातून उमेदवारी जाहिर केली आहे. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सतरा उमदेवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बारामतीतून माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंना तिकीट देण्यात आलं आहे. तर हातकणंगलेमधून राजू शेट्टींना रघुनाथदादा पाटलांचं आव्हान असणार आहे. उत्तर मुंबईतून सतीश जैन यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर धुळे लोकसभा मतदार संघातून निहाल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसंच नंदुरबार माजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.संजय अपरांती यांनाही आपनं रायगडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अपरांतींनी तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. त्यांनाही आम आदमी पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. शिरुरमधून न्यायाधिश निकम आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून कर्नल गडकरी अशा उच्च शिक्षितांना आम आदमीनं आपल्या तिसऱ्या यादीत स्थान दिलं आहे.

आपचे उमेदवार आणि मतदार संघ :

1) बारामती – सुरेश खोपडे
2) भिवंडी – जलालुद्दीन अन्सारी
3) बुलडाणा – सुधीर सुर्वे
4) धुळे – निहाल अहमद
5) हातकणंगले – रघुनाथदादा पाटील
6) माढा – सविता शिंदे
7) उत्तर मुंबई – सतीष जैन
8) नांदेड – नरेंद्र सिंह ग्रांथी
9) उस्मानाबाद – विक्रम साळवे
10) परभणी -सलमा कुलकर्णी
11) रायगड- डॉ.संजय अपरांती
12) रामटेक – प्रताप गोस्वामी
13) रत्नागिरी – सिंधुदुर्ग – कर्नल गडकरी
14) सातारा – राजेंद्र चोरगे
15) शिर्डी – नितीन उदमले
16) शिरुर – निकम
17) कल्याण – नरेश ठाकुर

आयपीएल 7 संयुक्त अरब अमिरात आणि भारतात

आयपीएलच्या 7 पर्वामधील सुरुवातीचे काही सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या सत्रातील सामने भारतातच होणार आहेत. बीसीसीआइने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. 13 मे नंतरचे सामने भारतातच होणार आहेत, असेही या पत्रकात लिहिण्यात आले आहे.

16 एप्रिल ते 1 जून या काळात ही स्पर्धा होणार आहे. एक मेपासून भारतात सामने खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बीसीसीआयने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. त्याला मंजुरी दिली, तर 30 एप्रिलनंतरचे सामने भारतात खेळवण्यात येतील. अन्यथा 13 मेपर्यंतचे सामने संयुक्त अरब अमिरात किंवा बांगलादेशमध्ये खेळवले जातील, असे या पत्रकात नमूद केले आहे.  लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 16 ते 30 एप्रिलदरम्यान होणारे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये हे सामने खेळवले जातील. या काळात तिथे एकूण 16 सामने होतील. एमिरट्स क्रिकेट मंडळाने सामन्यांना परवानगी दिल्यामुळे बीसीसीआयने त्यांचे आणि संयुक्त अरब अमिरात सरकारचे आभार मानले आहेत.

तरुण पिढीचा आयडल मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. मार्ककडे कोणत्याही बिझनेस स्कूल ची पदवी नाही तरीही त्याने फेसबुकसारख्या साईटची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. फेसबुकच्या ऑफिस मधलं वातावरण अतिशय मोकळं आहे. तिथे कोणीही बॉस नाही. आपल्या सगळ्यांना फेसबुकवर जसं स्वातंत्र मिळतं तसच ते फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्येही मिळतं. सुरवातीच्या काळातील फेसबुकची ऑफिसेस तर आपल्याकडे महानगरपालिकेची असतात तशी होती. झुकरबर्गसारखीच त्याची ऑफिसेस साधी होती.

झुकरबर्गचं व्यक्तीमत्व आणि जीवनशैली अत्यंत साधी आहे. झुकरबर्ग कधीच कॉरपरेट कपडयांमध्ये नसतो. अमिरेकेतील सेलिब्रेटिजचा पाठलाग करणारे पापाराजी तर झुकरबर्गची साधी जीवनशैली पाहुन चकितच झाले. रविवारच्या दिवशी सामान्य माणसासारखा बाजारात जाणारा आणि जमिनीवर बसुन मेक्सिकन सॅण्डविच चा आंनद लुटणारा अब्जाधिश पाहुन वर्तमानपत्रांचे फोटोग्राफ्रर अचंबित तर झालेच पण त्याचबरोबर हाती काहीच न लागल्याने नाराजही झाले. जगातल्या सर्वात कमी वयाच्या या अब्जाधिशावर अमिरेकेत २०१० मध्ये ‘द सोशल नेटवर्क’ हा सिनेमाही निघाला. या सिनेमाला ३ ऑस्कर मिळाले आहेत. त्याच्या फेसबुकवरच्या स्व:ताच्या पेजवर त्याने रेव्हलुश्न, ओपननेस, कनेक्टीव्हीटी, शेअरिंग, या गोष्टी पर्सनल इंटरेस्ट मध्ये नमुद केल्या आहेत. वयाच्या २८व्या वर्षी अमिरेकेतल्या श्रीमंताच्या यादीत १४ व्या स्थानावर असणारा झुकरबर ‘कलर ब्लाइन्ड’ आहे. म्हणुनच फेसबुकचा रंग निळा आहे कारण झुकराबर्ग ला त्या रंगाचे ज्ञान आहे.

१८ मे ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ७०० इतकी असुन कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्याने लग्न केलं तेही साधेपणाने. आठ वर्ष जुनी मैत्री असलेल्या प्रिसाला चान बरोबर तो १८ मे ला लग्नाच्या बंधनात अडकला. यात ही त्याची कमिटमेन्ट दिसुन येते. या लग्नाला मोजके १०० निमत्रिंत होते आणि त्यानां आपल्याला कशासाठी बोलवले आहे याची कल्पनाही नव्हती. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे

मलेशिया एअरलाइन्सच्या त्या विमानाचा शोध लागला ?

एमएच 370

मलक्काच्या खाडीत मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे अवशेष सापडले आहेत, असे मलेशियाच्या लष्कराने सांगितले आहे.  यापूर्वी ज्या ठिकाणी विमान कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापासून बऱ्याच दूर अंतरावर अवशेष सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोटा भारू येथून विमानाने आपला मार्ग बदलला होता. त्यानंतर विमान बऱ्याच कमी उंचीवरून उड्डाण करीत होते. त्यानंतर विमान मलक्काच्या खाडीत कोसळले असावे,   असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे कोणतेही अवशेष गेल्या काही दिवसांमध्ये न सापडल्याने मोठी शोध मोहिम उघडण्यात आली होती. दहा देशांच्या विमानवाहू नौका, लढाऊ विमाने, अत्याधुनिक शोध सुविधा असलेली जहाजे गेल्या अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर आहेत. गेल्या शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बिजिंगला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केले होते.

शब्दवीरांच्या जगात…

जगातल्या कुठल्या कोपऱ्यात आणि कुठल्या क्षेत्रात भारतवंशीय नागरिकांची घोडदौड नाही, हे सांगणे सध्या कठीण बनले आहे. अमेरिकेच्या शेती, संशोधन व्यासपीठांपासून ते राजकारण आखाडय़ापर्यंत, युरोप खंडात करी, चिकन टिक्का सादर करण्याऱ्या रेस्टॉरण्ट साखळी मालकांपर्यंत, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड क्षेत्रांतील उच्चशिक्षित व्यावसायिकांपर्यंत, आफ्रिका खंडात मोठय़ा गुंतवणुकीसह प्रभाव पाडणाऱ्या श्रीमंतांपर्यंत आणि आखाती राष्ट्रांत मरमर राबणाऱ्या गरिबांच्या जथ्थ्यांमध्ये भारतीय वंश हा लक्षवेधी घटक ठरला आहे.

भारतीयांची ही सर्वव्यापी उपस्थिती नेहमीच क्षणिक अभिमानाचे सुख देणारी असते. बुद्धीला चालना देणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘स्पेलिंग बी’सारख्या शब्दस्पर्धामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय वंशाचे विद्यार्थी विस्तारत असलेले यशोशिखर मात्र भारतीयांच्या बुद्धिसामर्थ्यांचे वैशिष्टय़ ठरत आहे. याच आठवडय़ात अमेरिकेतील कठीणोत्तम स्पेलिंग बीमध्ये परीक्षकांकडे शब्दच शिल्लक न ठेवणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे वृत्त बौद्धिक जगताच्या कौतुकाचा विषय बनले आहे.

जातवैधता प्रमाणपत्र अटीला आव्हान

बुलडाणा : येत्या एप्रिल ते जून या कालावधीत कार्यकाळ पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राखीव जागांवर मानांकन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. मंगेश कांबळे यांनी यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १0 (१)(क) अनुसार राखीव जागेसाठी नामांकन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला गारांचा तडाखा

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरूच आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ांतील काही भागांना शनिवारी सलग सहाव्या दिवशी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्य़ाला, तर मराठवाडय़ातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागला.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्याला, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगावलाही शनिवारी गारपिटीने तडाखा दिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ठिकठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारांमुळे किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा चिखल झाला. मराठवाडय़ातील परळीमध्ये अवकाळी पावसाने शनिवारी दोघांचा बळी घेतला, तर तालुक्यात २२ जण जखमी झाले.

निशा आणि दृष्ट आत्मा

निशा माझी जुनिअर केजी पासूनची मैत्रीण आहे. आमची बिल्डींग टॉवरच्या प्रोजेक्टसाठी गेली. त्यामुळे आम्हाला भाड्याच्या रुममध्ये राहावे लागणार होते. निशाचे कुटुंब गोदरेज कंपनीच्या क्वार्टर्सच्या रूममध्ये राहायला गेले. त्या क्वार्टर्सच्या बाजूला खाडी असल्याने , रात्रीच्यावेळी तेथील वातावरण अतिशय भयानक दिसत असे. त्यामुळे तेथील रहिवासी रात्री ८च्या नंतर बाहेर फिरकत नसत. या क्वार्टर्स फक्त या कंपनीतल्या कामगारांनाच मिळत असल्याने , निशाच्या बाबांना ती रूम मिळाली होती.

सर्वकाही सुरळीत चालले होते , पण निशाला मात्र तिथे खूप विचित्र वाटत होतं , तसं तिने आपल्या घरच्यानाही बोलून दाखवलं. पण घरच्यांनी मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. जसजसे दिवस उलटू लागले तसतसा निशाला त्रास होऊ लागला. त्रास म्हणजे रात्रीच्यावेळी मधेच ती खाडकन उठून बसायची आणि झोपेतच मोठमोठ्याने ओरडायची की, “मला नाही यायचे आहे तुझ्यासोबत , मला त्रास नको देउस “, पण तरीही तिच्या घरच्यांना वाटले की ,कदाचित तिला एखादं वाईट स्वप्न पडल्यामुळे ती अशी वागत असावी, म्हणून त्यांनीही याकडे जास्त लक्ष दिले नाही . पण हे प्रकार काही थांबले नाहीत. एक दिवस निशाच्या स्वप्नात एक तरुण मुलगा आला . तो तिला वारंवार सांगत होता, की “तू माझी होणारी बायको आहेस . तू माझ्याशी लग्न कर , मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईन ” अशाप्रकारे तो रोजच निशाच्या स्वप्नात येउन तिला सतावू लागला होता. आणि निशाचा हा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. निशाचे घर मोठे असल्याने, निशा रात्री २ वाजता उठून अख्या घरभर फिरायची. आणि त्यांच्या बाल्कनीत जाऊन एकटीच बडबडत बसायची. असे प्रकार आता रोजच होऊ लागले आणि सकाळी मात्र तिची तब्येत आणखीनच खराब होत असे. आता मात्र तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटू लागली होती. पण त्यांना भुताटकीच्या प्रकारावर मात्र तिळमात्र विश्वास न्हवता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना बोलावून निशावर उपचार सुरु केले , पण या उपचारांचाही तिच्यावर काहीच प्रभाव होत न्हवता.
एके दिवशी अशीच निशा रात्री उठून सार्या घरभर फिरू लागली आणि नंतर बाल्कनीत जाऊन बसली होती , तेव्हा अचानक तिच्या आईला जाग आली . निशा संध्याकाळच्या वेळी कधी बाल्कनीत उभी राहत नसे, त्यामुळे तिला बाल्कनीत उभी राहून त्या खाडीकडे बघताना पाहूनसुद्धा खूप भीतीदायक वाटत होते, त्यामुळे इतक्या रात्री निशा एकटीच बाल्कनीत काय करतेय , कुणाशी बोलतेय हे पाहून तिच्या आईला फार आश्चर्य आणि भीतीही वाटली.आणि इतक्या रात्री तिला बाल्कनीत उभी राहिलेली पाहून , भीतीनेच का होईना तिच्या आईने तिला जोरात हाक मारली, “निशा , तिथे काय करतेयस तू!!” आईचा आवाज ऐकताच निशा एकाएकी गप्प झाली. तिच्या आईने पुन:पुन्हा हाक मारूनही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून तिची आई उठली आणि निशाजवळ गेली आणि तिला पुन्हा आवाज दिला असता निशाने आपल्या आईकडे पहिले, तेव्हा तिच्या आईने समोर जे काही पाहिले त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. निशाचे ते विचित्र रूप पाहून ती पूर्ण हादरली होती. तिचे विस्कटलेले लांबसडक केस . डोळ्यात एक प्रकारचा आगसदृश्य राग ,तिचे ते रागाने थरथरणारे होठ त्यातून तिचे विचित्र हसणे , आणि रात्रीची वेळ त्यामुळे एकंदरीत सर्वच वातावरण खूपच विचित्र आणि भयाण भासत होतं , तेवढ्यातूनही तिच्या आईने तिला विचारले, “काय झालं ग बाळा ?…इतक्या रात्री बाल्कनीत काय करतेयस तू ?” इतक्यात अचानक निशा हसता हसता मधेच रडू लागली अन् अचानक मुलाच्या आवाजात रागाने बोलू लागली, निशाची आई तिचे हे रूप पाहून खूपच घाबरली होती, त्यात तिच्या तोंडून असा मुलाचा भयानक आवाज ऐकून तर त्यांना आता चक्करच यायची बाकी राहिली होती . भीतीने त्यांच्या तोंडून साधा शब्दही फुटत न्हवता. त्यावेळी काय करावे, काय बोलावे हेच त्यांना सुचेनासे झाले होते. इतक्यात निशाच्या शरीरातील त्या मुलाचा आत्मा म्हणाला, की ” निशा माझी होणारी बायको आहे , आणि मी तिला घेऊनच जाणार आहे . कारण एकदा मी तिला गमावलं आहे, पण आता नाही गमावणार. आणि जर कुणी मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला जिवंत नाही सोडणार” इतकं बोलून निशा आणखीनच भयानक घोगऱ्या आवाजात जोरजोरात किंचाळू लागली. ती रात्र इतकी भयानक असेल याची कल्पनाच कारण शक्य न्हवतं . नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली अन् निशा धडकन जमिनीवर बेशुध्द होऊन कोसळली. आणि लागलीच तिच्या आईने घरातील सर्वाना हक मारून बोलावले आणि निशाला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आज पहिल्यांदा निशाच्या बोलण्यातील भयाणता त्यांना जाणवत होती. मग सर्वांनी हळूच निशाला उचलले आणि बेडवर नेवून ठेवले.
मग निशाच्या आईने घडलेला सर प्रकार तिच्या बाबांच्या कानावर घातला आणि तिच्या बाबांच्या गुरुंना घरी बोलावून घेण्यास सांगितले. दुसर्या दिवशी लगेच निशाच्या बाबांनी त्यांच्या परम पूज्य गुरुजींची भेट घेतली आणि सारा प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. आणि मग ते गुरुजीही सर्व हकीगत ऐकून त्यांच्या घरी येण्यास तयार झाले. जेंव्हा त्या गुरुजींनी निशाच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा सर्रकन एक वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून निघून गेली आणि तेव्हाच या घरात नक्कीच कुठलीतरी अमानवी शक्ती वास करत आहे, हे गुरुजींच्या लक्षात आले .
गुरुजी घरात आल्यापासून सतत कान टवकारून काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. मग ते जिथे निशाला झोपवले होते तिथे गेले. तिथे बेडवर निशा निपचित पडली होती. तिच्या चेहऱ्यावरचे सारे तेज नाहीसे झाले होते. मग त्यांनी हळूच मायेने निशाच्या डोक्यावरून हाथ फिरवला, इतक्यात फट्कन निशाने डोळे उघडले आणि ती रागाने गुरुजींकडे पाहू लागली . आता मात्र निशा आणखीनच चिडली होती. एखाद्या जंगली श्वापदाने शिकार पाहिल्यावर गुरगुरावे तशी निशा त्यांच्याकडे पाहून गुरगुर करू लागली. आता ती त्यांच्याकडे झेप घेणार इतक्यात निशाच्या भावाने व बाबांनी तिला घट्ट पकडून ठेवले. मग गुरुजींनी काही वेळ विचार करून निशाच्या बाबांना सांगितले, की निशाची अवस्था फारच बिकट झालीय आणि त्यासाठी लवकरात लवकर आता काहीतरी उपाय करावा लागेल अन्यथा ती दृष्ट आत्मा आपल्या दृष्ट उद्देशात सफल होईल. मग लगेच त्यांनी निशाच्या बाबांना एका लहान हवनाची तयारी करण्यास सांगितले.
सगळी तयारी झाल्यानंतर निशाला गुरुजींच्या समोर बसवण्यात आले पण निशा काही त्या हवनाच्या जवळ जाण्यास तयार न्हवती . ती जोरजोरात मोठ्याने किंचाळत होती अन् हाथ पाय आपटत होती तरीही कसेबसे तिला गुरुजींसमोर बसविण्यात आले आणि मग हळू हळू गुरुजींचे मंत्र उच्चारण सुरु झाले तसा अचानक घरातील संपूर्ण वातावरणात बदल जाणवू लागला. घरातील हवा गायब होऊन वातावरण कोंदट होऊ लागले आणि आता तर निशाच्याही हालचाली सुरु होऊ लागल्या होत्या . इतक्यात गुरुजींनी डोळ्यानीच निशाच्या बाबांना व भावाला इशारा केला व तिला घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. निशाच्या आईला मात्र तिची हि अवस्था बघवेनाशी झाली होती. त्या तोंडाला पदर लावून एका कोपऱ्यात उभ्या राहून रडू लागल्या.
आता मात्र निशाचा आवाज बदलून एका मुलाचा भयानक आवाजात ती बोलू लागली , तो म्हणाला ,” तुम्हाला सांगितलं होतं न कि माझ्या वाट्याला जायचं नाही म्हणून, निशा माझी आहे आणि मी तिला घेऊनच जाणार आहे , आणि जो कुणी मला अडवा येयील त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही” आणि पाहता पाहता निशाचे रूपाच बदलू लागले , तिचे डोळे रक्तासारखे खूपच लाल झाले होते, तिचे बांधलेले केसही सुटले होते. आणि ती जोरजोरात ओरडत होती . तिचे हे रूप पाहून आता गुरुजी सोडले तर सर्वचजण खूप घाबरले होते. ओरडता ओरडता निशा मधेच आपले डोळे गरगर फिरवत होती आणि काहीतरी सांगत होती. मग गुरुजींनी आणखीनच मोठ्याने मंत्र उच्चारण्यास सुरवात केली आणि मंत्र उच्चारता उच्चारता गुरुजी स्वतःकडील गंगाजल निशाच्या अंगावर शिंपडू लागले . तशी निशाच्या शरीरातील त्या अतृप्त आत्म्याला आणखीनच त्रास होऊ लागला व तो तडफडू लागला. पण त्याचबरोबर बिचाऱ्या निशाचीही फरपट होत होती. तिच्या आई-बाबांना आपल्या मुलीची हि अवस्था तर बघवतच न्हवती. मग गुरुजी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी कसलासा अंगारा आपल्या हातात घेतला आणि निशाच्या कपाळावर लावला. तो अंगारा लावल्याबरोबर निशाच्या शरीरातील त्या मुलाच्या आत्म्याला आता तो त्रास असह्य झाला आणि मग निशाकर्वी तो गुरुजींसमोर हाथ जोडून माफी मागू लागला. मग गुरुजींनी त्याला दटावले व निशाचे शरीर सोडून जाण्यास सांगितले. नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली आणि एकाएकी निशा पुन्हा बेशुध्द होऊन जमिनीवर कोसळली. मग गुरुजींनी मोठ्या मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला आणि मग त्यांनी निशाचे संरक्षण व्हावे यासाठी एक तावीज काही मंत्र उच्चारून निशाच्या गळ्यात बांधले व निशाच्या घरच्यांना तिला घेऊन त्यांच्या कुळदैवतेला जाऊन येण्यास सांगितले. व लवकरात लवकर ते घरही सोडून जाण्यास सांगितले कारण या घरात निशासोबत पुन्हा असे काही होण्याचा धोका नाकारता येत न्हवता. मग त्याप्रमाणे काही दिवसांतच त्या लोकांनी ते घर सोडले व दुसर्या नवीन घरात राहण्यासाठी निघून गेले. मात्र आपल्या मुलीबाबत असे का झाले हा विचार निशाच्या बाबांना स्वस्थ बसू देत न्हवता , त्यामुळे त्यांनी त्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्या घराविषयी चौकशी केली असता त्यांना असे कळले, कि काही वर्षापूर्वी याच घरात मुकेश नावाच्या एका तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती . कारण त्याचे स्नेहा नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते , पण स्नेहाने मात्र त्याला साफ नकार दिला व चारचौघात त्याचा पान उताराही केला होता त्यामुळे मुकेश खूपच दुखावला गेला होता. इतका कि त्याने जगण्यापेक्षा मरणाचा मार्गाच योग्य समजला. त्या दिवसापासून मुकेशशची आत्मा त्या घरात वास करत होती, अनेकवेळा त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून ओरडण्याचा आवाजही येत असे या घरात अनेकांना अनेकांना वाईट अनुभव आल्यामुळे त्या घरात कुणी राहण्यास, व कुणीच काही बोलण्यास धजावत न्हवते. त्यामुळे त्यांची निशाच्या कुटुंबीयांनाही सावध करण्याची हिम्मत झाली न्हवती आणि म्हणूनच निशाच्या घरच्यांना या घटनेबाबतीत काहीच माहित नसल्यामुळे त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला होता.
निशाच्या बाबांनी या मोठ्या संकटातून त्यांच्या कुटुंबाला वाचवल्याबद्दल देवाचे व त्यांच्या गुरुजींचे खूप मनापासून आभार मानले. एके दिवशी तिच्या आईनेच आम्हाला भेटायला आल्यानंतर हि सगळा किस्सा माझ्या आईला सांगितला होता , त्या घटनेनंतर काही दिवसांनी मला निशा भेटलीही होती , तिला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तिच्यासोबत घडलेली हि भयानक घटना झरझर डोळ्यासमोरून गेली. एकदा असेही वाटून गेले की निशाला याबाबत काही विचारणा करावी कि नक्की त्यावेळी काय घडले होते , त्यानंतर तिला याबाबतीत काय वाटतंय, पण माझी काही हिम्मतच झाली नाही आणि मला तिला पुन्हा दुखावयाचेही न्हवते. तरी या सर्व भयंकर प्रकारातून माझी जिवलग मैत्रीण मात्र सुखरूप बाहेर पडली हेच माझ्यासाठी खूप आनंददायी होतं

पप्पा ची पॅंट

jokes on app mh28.in

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,  सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
बंडू रडत रडत,
पप्पा हि पॅंट माझी नाही तुमची आहे

उच्च शिक्षणात ऑनलाईन क्रांती

ऑनलाइन कोर्सेस हा प्रकार तसा फारचा नवीन नाही. पूर्वी इंटरनेट नव्हतं तेव्हाही ‘करस्पॉन्डन्स कोर्सेस’ असत. पत्रव्यवहार करुन दूरुन शिकता येई. परंतु इंटरनेट आलं आणि पोस्टाची गरज उरली नाही. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन कोर्सेसचा उदय झाला. परंतु ऑनलाइन कोर्सेसना तितका मान नव्हता किंवा आजही नाही. ज्यांना मुख्य मार्गानी शिकता येत नाही, असे लोक ऑनलाइन कोर्सेस करताना दिसतात. परंतु अमेरिकेत एका कंपनीने हे समीकरण बदलायचा विडा उचलला आहे.
फेब्रुवारी 2013 मध्ये अमेरिकन काऊन्सिल फॉर एज्युकेशन या संस्थेने आपल्या सदस्य विद्यापीठांना ‘कोर्सेरा’ कंपनीच्या पाच कोर्सेसना (विषयांना) जमेस धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच अर्थ, काही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी हे ऑनलाइन कोर्सेस केले असतील तर ते जमेस धरुन त्या विषयाची परीक्षा त्यांना त्या विद्यापीठात द्यावी लागणार नाही! ऑनलाइन कोर्सेसना मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला विएतनाम च्या समुद्रात अपघात

संपर्क तुटलेलं मलेशियन एअरलाईन्सचं प्रवासी विमान, व्हीएतनामच्या समुद्रात कोसळलं आहे. व्हीएतनाम माध्यामांनी याबाबतची माहिती दिली आहे. या विमानात 12 कर्मचारी आणि 227 प्रवाशांसह 239 जण होते.

हे विमान क्वालालंपूरहून चीनची राजधानी बिजींगकडे जातं होतं..शुक्रवारी साडेचारला निघालेलं हे विमान रात्री साडेदहापर्यंत चीनमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु विमानाचं उड्डाण झाल्यानंतर दोन तासांनी विमानाचा संपर्क तुटला.

सुरुवातीला विमान व्हीएतनामच्या हवाई हद्दीत असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला.मात्र आता  हे विमान व्हीएतनामच्या समुद्रात कोसळल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

 

रामायण मधील न ऐकलेल्‍या कथा

कोणत्‍याही धर्माची समिक्षा करण्‍याचा किंवा त्‍या धर्माला कमी लेखनाचा हा प्रयत्‍न नाही. आज आम्‍ही आपल्‍याला धर्मग्रंथामध्‍ये दिलेल्‍या, पण ऐकन्‍यात न आलेल्‍या काही कथा सांगणार आहोत, या कथा समजून घेतल्‍यानंतर आपल्‍या वयक्तिक जीवनात येणारी संकट टाळता येतील.
रामायण- एकदा राजा दशरथ रणांगणावर युद्ध करत असताना त्‍यांच्‍या रथाच्‍या चाकाची कुनी मोडली. रथाचे चाक खाली पडूनये यासाठी राणी कैकयीने आपल्‍या करंगळीचा वापर केला व रथ कोसळ्यापासून रोखला. राज दशरथ युद्धात गुतंलेले होते. जेंव्‍हा त्‍यांनी हा प्रकार पाहिला त्‍यांना कैकयीचा हेवा वाटला. पत्‍नीचा पराक्रम पाहूण त्‍यांनी विचार न करता, भावनेच्‍या भरात कैकयीला दोन वरदान देण्‍याचे वचन दिले. जर राजा दशरथाने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर…
राणी कैकयीची मंथरा नावाची एक दासी होती. ही कुबडत चालणारी दाशी मात्र कैकयीचे कान भरायची.  काल्‍पनीक आणि खोट्या कथा सांगुण मंथराने कैकयीवर आपला प्रभाव पाडला होता. एकदा मंथराने कैकयीला सांगितले जर राम अयोध्‍येचा राजा झाला तर कौशल्‍या तुझ्यापेक्षा श्रेष्‍ठ ठेरल, तुला मान-सन्‍मान मिळणार नाही. मंथराने कान भरल्‍यामुळे कैकयीने भावनीक होऊन राजा दशरथाला दोन वरदान मागीतले. जर कैकयीने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर…
खरे पाहता रामायणातील अनेक पात्रे ( काही आपवाद सोडले तर) स्‍वत: च्‍या निर्णयामुळेच संकटात सापडल्‍याचे लक्षात येते. या रामायणातील कथांमधुन आपण धडा घेतला तर येणारी संकटे टाळता येतील.

लोणार सरोवर

लोणार सरोवर

लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक सरोवर आहे.लोणार सरोवर याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर लोणार सरोवर असून औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे.

सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या लोणार सरोवर मध्ये मंगळावरील विषाणू सापडला असून ‘बेसिलस ओडीसी’ असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार सरोवर परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार सरोवर हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.

राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान – सिंदखेडराजा

Proin tristique justo ut massa aliquet et feugiat massa pulvinar. In eleifend pretium rhoncus. Sed magna erat, fringilla pulvinar tincidunt id, scelerisque in nunc. Nunc venenatis varius ipsum egestas malesuada. Quisque fringilla consequat pulvinar. Duis semper tincidunt erat id ultricies. Pellentesque sem metus, auctor vel vulputate non, dictum id justo. Continue reading “राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान – सिंदखेडराजा”

खा. गजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्‍ट्र

मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.  कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या २२ मार्चपर्यंत पुढील निर्णय घेणार असल्याचेही बाबर यांनी स्पष्ट केले आहे. मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी खासदार गजानन बाबर आणि सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज (मंगळवार) श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली. यावर नाराज होऊन गजानन बाबर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
आकुर्डीमधील शिवसेना भवनात खासदार बाबर यांनी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच गेली चार दशके शिवसेनेचे निष्ठेने काम करत आलो आहे. कोणताही भ्रष्टाचार आजपर्यंत केलेला नाही. जनतेची कामे करत आलो म्हणून मला प्रत्येकवेळी जनतेने विजयी केले. परंतु, शिवसेनेत निष्ठेपेक्षा पैशाला महत्व प्राप्त झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचे गजानन बाबर यांनी उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्यमंत्र

भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत बसणाऱ्या पर्यायी उपचारांचे श्रेय अनेक प्रकारे भारतीय ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते.  आयुर्वेद आणि होमिओपथीची माहिती आपल्यापर्यन्त पोहोचवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
Continue reading “आरोग्यमंत्र”