जळगांव मनपामध्ये विविध पदांसाठी भर्ती

jalgaon municiple recruitment

जळग़ाव शहर मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती जळगांव अंतर्गत कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज श्री. छत्रपति शाहू महाराज, रुग्णालय शाहनगर जळगाव येथे स्वीकारण्यात येतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१७ आहे.

जागांचा तपशील :
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ : 04 जागा
स्टाफ नर्स (Nurse – mid Wifery) : 06 जागा
ANM : 03 जागा
प्रयोगशाला तंत्रज्ञ : 03 जागा
औषध निर्माता (Pharmacist) : 03 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाऊँटंट : 02 जागा

वरील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून. उमेदवार हा M.B.B.S.+MNC झालेला, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ,फिजिशयन, भूलतज्ञ, आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तसेच इतर पदांसाठी 12 वी पास+GNM कोर्स, 10 वी पास +ANM कोर्स,MNC नोंदणी आवश्यक. यासंबंधी इतर माहितीसाठी www.jcmc.gov.in वेबसाईट वर भेट द्यावी.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
http://www.jcmc.gov.in/images/notice/Advertisement%20-%20NUHM%20final%20_%2010-3-2017_.pdf

अर्ज नमुना डाउनलोड करण्याची लिंक:
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVd0V4Q3dFNldHRGc/view?usp=sharing

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल गाव “कनाशि”. तस बघितल तर हे गाव सर्व सामन्याच्या ओळखीतल अजिबात नाही. परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा या गावाला आहे.

महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्याय‌िका आजही सांगितली जाते. तेव्हापासून आतापर्यंत या गावाने महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाच्या घर असलेल्या गढीवर मोठे सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कुणालाही या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. पण त्याहून ही वेगळे असे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीही मांसाहार करीत नाही. या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. गावातील प्रत्येक घरात महानुभाव पंथ जोपासला असून आजची तरुण पिढी सुद्धा हे सर्व काटेकोरपणे पाळताना दिसून येते.

गावामध्ये कोंबडी, शेळी यासारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत. अन् या गावातल्या कोणत्याही दुकानात व‌िक्रीसाठी साधं अंडेही म‌िळत नाही. गावातील संपूर्ण जनसमुदाय गुण्यागोविंदाने नांदत असून गावात वाद तसे क्वच‌ितच होतात. असे म्हणतात की, गावातील या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, अशी भाव‌िकांची धारणा आहे.
या गावास महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि असे सुद्धा म्हटले जाते.