मोठ्या बगीच्यातील मुंजा

Ghost In A Garden

एका शहरातील गोष्ट आहे. त्या शहरामध्ये एक मोठा बगीचा होता तो फार पुरातन इंग्रजांच्या काळात बनवलेला होता. बगीचा फार सुंदर, भव्य, विविध जंगली प्राणी, एक तलाव, एक विहीर, मोठाले वट वृक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी तेथे होत्या. अशा या बगीच्यात एक मोठी विहीर आहे त्याच्याच जवळ एक खूप मोठे पिंपळाचे झाड होते. तेथील लोक सांगतात की त्या झाडावर मुंजा राहतो. तो तेथे येणाऱ्या लोकांना त्रास देतो, खोड्या करतो तर कधी लहान मुलांचा जीव देखील घेतो.

एके दिवशी त्या शहरातील त्या बगिच्या पासुन दूर एका नगरातील तिन कुटुंब आपल्या मुलांनसह तेथे सुट्टी घालविण्यास आले. तो दिवस होता रविवार व विशेष म्हणजे अमावस्या ची पहिली रात्र व वेळ हा संध्याकाळचा होता. तिनी कुटुंब एकाच ठिकाणी बसलेले होते व त्यांची मुले तेथे आजू बाजूला खेळत होती. काही मुले व मुली झोक्या वर झुलत होती तर काही इतर खेळ खेळीत होती पण त्यांच्यातील एक लहान मुलगा घसरगुंडी खेळत होता. तो खेळत असताना वर गेला व खाली आला. त्या मुलाने रडत रडत येऊन आपल्या बाबाला सांगितले की बाबा बाबा कोण तरी मला खेळत असतांना लोटले. बाबाने विचारले तुझ्या मागे कोण होते ? मुलगा म्हणाला बाबा कोणीच नव्हते पण मला कोणीतरी खरच लोटले होते. बाबा म्हणाले बाळा असे कसे शक्य आहे तुझा पाय सटकला असेल व तु पडला असेल. मुलगा नाही ना बाबा मी खर खर बोलतो. त्या मुलाच्या वडलांनी त्याच्या मुलाच्या बोलण्या कडे नंतर लक्ष दिले नाही. दोघे मुल पकडा पकडी खेळत होती त्यातील एक मुलगा पडला व तो म्हणाला तूच मला लाथ मारून पाडले त्यांचे भांडण झाले दुसरा मुलगा म्हणाला मी नाही लाथ मारली. तेथे त्यांचे आई वडील आले व दोघांना घेऊन गेले. एका ठिकाणी हे तिन्ही कुटुंब बसलेले होते तेथे लहान मुलीला घेऊन येत होती ती जवळ आली व ती पडली. तिचा पती धावत आला व म्हणाला पाहून चालत जा. तेव्हा ती म्हणाली मला कोणीतरी लाथ मारून पाडले. तिचा पती म्हणाला मुर्खा सारखे काही पण बडबडू नको तू व सोनू शिवाय आणखी कोणीच नाही आजू बाजूला. त्या नंतर तिन्ही कुटुंब गप्पा मारत तेथेच बसले. तेथील सगळ्यांना असे काय होत आहे हे कळतच नव्हते.

काही वेळा नंतर एक मुलगी त्या पिंपळाच्या झाडा जवळील विहिरी जवळ गेली हे पाहून तिथे तिचे वडील देखील गेले. ते त्याच्या मुलीला म्हणाले बाळा काय विहीर पाहते. हो बाबा लगेच तिचे बाबा पाण्यात पडले ति मुलगी ओरडली व लगेच ती मुलगी देखील त्या विहिरीत पडली. इतर लोक धावत आले व त्यांना बाहेर काढले. त्या काकांना पोहता येत होते त्या मुळे त्यांना काहीच झाले नाही व मुलीला पडतांना पाहून त्यांनी तिला खाली झेलून घेतले. तेथील लोकांनी विचारले की कसे काय पडलात तुम्ही तेव्हा ते म्हणाले कोणी तरी माझा एक पाय उचलून मला विहिरीत पाडले. ती लहान मुलगी म्हणाली बाबा मला तर कोणी तरी उचलून फेकले. त्या मुलीची आई म्हणाली इथे तर तुमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. तेव्हा त्याच वेळी एक आजी तेथे आली तिने हे बोलले वाक्य ऐकले व ती म्हणाली, एक मुलगा होता. नंतर ती आजी काही मंत्र म्हणत होती. त्या आजीने तेथील सगळ्यांना दूर एका ठिकाणी घेऊन गेली, तेथे सगळ्यांना बसायला सागितले. त्या आजी खूप वयस्कर होत्या.

आजी म्हणाली मी एक गोट सांगते पण तुम्ही घाबरू नका म्या आहे तुमच्या संग. आजीला सगळे म्हणाले सांगा आजी आम्ही नाही घाबरत. आजी म्हणाली मी तेव्हा बोलली होती की एक मुलगा होता म्हणून. सगळे म्हणाले हो आजी. आजी म्हणाली तो मुलगा म्हणजे मुंजा भूत व्हय. तेव्हा सगळे घाबरले व बाया ओरडल्या. आजी म्हणाली ओरडू नको व बाये म्या हाये अठी तो इकडे आता येणार नाही. त्यातील एक मुलगा म्हणाला आजी मुंजा भूत काय असते. आजी म्हणाली जेव्हा एखांदा पोर लहान पणि मरते तो मुंजा बनते व पिंपळाच्या झाडावर जाऊन बसते. आजी पूढे बोलली लय जुनी गोट हाय इकदा तिन पोर अठी खेळायले आलते. तव्हा या विहिरीत तो पोऱ्या पडला त्याच्या सोबतचे जे पोर होती त्यांणले पोहता येत नव्हते. त्यामुळे ते त्याले वाचू शकले नाही व ते पोर मेल. तेव्हा पासनं ते पोर मुंजा बनून इथच भटकते व पिंपळाच्या झाडावर रायते. तुम्ही ज्या विहिरीत पडलते त्याच विहिरीत तो मेलता. तुम्ही या गावात नवीन दिसता. सगळे म्हणाले हो आजी. आजी म्हणाली इथ अमावस्येला आदल्या दिवशी व नंतरच्या दिवशी कुणी भी येत नाही. तुम्ही आले म्हणून तुम्हाले त्रास झाला. म्या अठी असती तर तुम्हाले अठी येऊ दिल नसत. आता रात्र होत हाय चला म्या तुम्हाले सोडून देते. या नंतर अठी हे तिन दिवस चुकून बी यायचं नाय लक्षात ठेवा पोरहो.