टी 20 वर्ल्डकप चा फीवर आजपासून

पाचव्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्यास आजपासून बांग्लादेश मधे सुरूवात होत आहे. आजपासून विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होत असून सलामीची लढत यजमान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबर होणार आहे. खऱ्या अर्थाने विश्वचषकाचा स्पर्धेला मुख्य फेरीच्या पहिली लढत भारत आणि पाकिस्तान या लढतीने सुरुवात होईल.

भारत या स्पर्धेत 21 मार्च ला पाकिस्तान, 23 मार्च ला वेस्ट इंडीज तर 28 मार्च ला साखळी फेरीत प्रवेश करणार्‍या संघासोबत खेळेल. उद्या दि. 17 मार्च भारत आपला सराव सामना श्रीलंकेसोबत खेळणार असून दरम्यान फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ फतुल्ला येथे आज सराव करणार आहे.