रामायण मधील न ऐकलेल्‍या कथा

कोणत्‍याही धर्माची समिक्षा करण्‍याचा किंवा त्‍या धर्माला कमी लेखनाचा हा प्रयत्‍न नाही. आज आम्‍ही आपल्‍याला धर्मग्रंथामध्‍ये दिलेल्‍या, पण ऐकन्‍यात न आलेल्‍या काही कथा सांगणार आहोत, या कथा समजून घेतल्‍यानंतर आपल्‍या वयक्तिक जीवनात येणारी संकट टाळता येतील.
रामायण- एकदा राजा दशरथ रणांगणावर युद्ध करत असताना त्‍यांच्‍या रथाच्‍या चाकाची कुनी मोडली. रथाचे चाक खाली पडूनये यासाठी राणी कैकयीने आपल्‍या करंगळीचा वापर केला व रथ कोसळ्यापासून रोखला. राज दशरथ युद्धात गुतंलेले होते. जेंव्‍हा त्‍यांनी हा प्रकार पाहिला त्‍यांना कैकयीचा हेवा वाटला. पत्‍नीचा पराक्रम पाहूण त्‍यांनी विचार न करता, भावनेच्‍या भरात कैकयीला दोन वरदान देण्‍याचे वचन दिले. जर राजा दशरथाने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर…
राणी कैकयीची मंथरा नावाची एक दासी होती. ही कुबडत चालणारी दाशी मात्र कैकयीचे कान भरायची.  काल्‍पनीक आणि खोट्या कथा सांगुण मंथराने कैकयीवर आपला प्रभाव पाडला होता. एकदा मंथराने कैकयीला सांगितले जर राम अयोध्‍येचा राजा झाला तर कौशल्‍या तुझ्यापेक्षा श्रेष्‍ठ ठेरल, तुला मान-सन्‍मान मिळणार नाही. मंथराने कान भरल्‍यामुळे कैकयीने भावनीक होऊन राजा दशरथाला दोन वरदान मागीतले. जर कैकयीने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर…
खरे पाहता रामायणातील अनेक पात्रे ( काही आपवाद सोडले तर) स्‍वत: च्‍या निर्णयामुळेच संकटात सापडल्‍याचे लक्षात येते. या रामायणातील कथांमधुन आपण धडा घेतला तर येणारी संकटे टाळता येतील.