वरवंड येथे सर्जिकल स्ट्राईक

बुलडाणा जिल्ह्यात अशी बरीच गावे आहेत ज्यांना आदर्श गाव तसेच “हागणदारी मुक्त गाव” असे पारितोषिक मिळालेले आहेत. तर काही गावांची परिस्थिती अजून हि तशीच आहे. याकरीता सरकारने अनेक योजना देखील राबविल्यात त्यात घरकुल योजना, सार्वजनिक स्वच्छतागृह व कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम. इ. सरकार कडून याकरीता अनुदानही मिळते. एवढ्या सुविधा असुन देखील गावात स्वच्छता राखल्या जात नाही. काहींनी कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामाकरीता सरकार कडून अनुदानही घेतले. काहींनी शौचालय बांधले पण त्या शौचालयांचा वापर होताना काही दिसत नाही. ज्यांच्या कडे शौचालय नाहीत ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत नाहीत व उघड्यावर शौचाकरीता बसतात.
असे उघड्यावर शौचा करीता बसून रोगराईचे साम्राज्य पसरू नये व सर्वांचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी आज काही व्यक्तींना पकडण्यात आले.

आज दि. ११ जुलै २०१७ रोजी सकाळी ५:०० वाजता बुलडाणा पं.स.चे ग.वि.अ.श्री.वाघ साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदरीत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली व ग्रा.पं.भादोला व वरवंड येथे २१ व्यक्तींना उघड्यावर शौचास जाताना पकडण्यात आले. व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये बुलडाणा पं.स.चे ग.वि.अ.श्री.वाघ साहेब, ता.स.श्री.मानवतकर, Brc योगेश सुरडकर, पो.कॉ.श्री.आघाव, पो.कॉ.श्री.डोळे, ग्रा.पं.सचिव श्री.मानकर, श्री.शिंदे उपस्थित होते.