लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३ संप्टेंबर, २०१७ रोजी औरंगाबाद, नागपूर, पुणे व मुंबई या केंद्रांवर लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७ ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक ०५/२०१७ दिनांक ६ एप्रिल, २०१७ नुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहमुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी), गट – क संवर्गातील पदांवरील भरतीकरीता, आयोजनामार्फत दिनांक ११ जून, २०१७ रोजी घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७ च्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७ रविवार, दिनांक ३ संप्टेंबर, २०१७ रोजी औरंगाबाद, नागपूर, पुणे व मुंबई या केंद्रांवर घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/56-2017.pdf

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

बहुगुणी हळद

हळद म्हटली की पिवळी हळकुंड डोळ्यासमोर दिसतात. पिवळ्या रंगाची हि हळद कुणाला परिचित नसेल असे असणे अश्यक्यच. कारण सर्वांनाच ती परिचित आहे. हळद हि जमिनीत पिकते. ती कंदवर्गीय आहे.हळदीचा वापर हा फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरात होत आहे. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो तसेच जंतुनाशक देखील आहे. आज आपण अशाच या बहुगुणी हळदीचे काही घरगुती औषधी उपयोग जाणून घेणार आहोत.

१) आपणास शरीराला मार लागला असेल वा जखम झाली असेल त्या जागी हळद लावा. हळद लावल्याने रक्तही थांबून जाते.

२) दही व हळद रोज चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच चेहरा उजळ व नितळ होण्यास मदत होते.

३) हळदीचे पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन रोखते.

४) मधुमेहा करता हळद एक उत्तम घरगुती व आयुर्वेदिक उपाय आहे.

५) जखम, मुरगळणे, फोड येणे, विषारी कीटक चावणे इत्यादी वर हळदीचा लेप लावल्याने चांगला फरक पडतो.

६) दुधात अर्धा चमचा हळद चूर्ण टाकून उकळून पिल्याने बऱ्याच रोगांवर हा चांगला उपाय आहे.

७) आपली दाढ द्खत असेल अथवा किडली असेल त्या करता हळद व सरसोचे तेल याचे मिश्रण करून छोटी गोळी दाढी मध्ये ठेवा.

८) आपले हात पाय दुखत असेल अथवा संधिवात असेल तर हळद व अद्रकाचा रस याचा लेप करून त्या जागेवर लावा व गरम शेक द्या.

९) किडनी स्टोन वर हळद एक चांगला उपाय आहे.

१०) हळद हि पोटाच्या विकाराकरता बहुगुणी आहे.

११) गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी पडसे बरे होण्यास मदत मिळते.

१२) सांधेदुखीच्या त्रासांमध्ये सुद्धा हळदीचे दूध घेणे लाभदायक आहे.

१३) हळदीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा चांगले असते.

१४) पोटात जंत झाल्यास हळदीच्या सेवनाने आराम मिळतो.

१५) हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

अशा या हळदीचे विविध औषधी उपयोग आहेत. स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

स्वास्थ्यकारी कढीपत्ता

कढीपत्ता चे फायदे

कढीपत्ता हा आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. अंगणात प्रामुख्याने आढळणारा. हा कढीपत्ता जेवणामध्ये स्वाद वाढवतो, हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे..
कढीपत्ता हा अंदाजे ८-१० फूट सहज वाढणारा थोडीफार सावली देणारा आहे, त्याची हिरव्या रंगाची लांबट गोल पाने, आणि पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले सुगंधित असून याचे सौंदर्य खुलवतात. याची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची गोल व पिकल्यावर लालसर नंतर काळ्या रंगाची असतात.
याला वर्षभर पाने असतात जेवणामध्ये याचा बहुतेक सर्वच ठिकाणी वापर होतो. याला कढीपत्ता, करीपत्ता, गोडनिंब अशी नावे आहेत. आज आपण याची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
जेवण करतांना कढीपत्ता आपण हाताने बाजूला सारतो पण आपल्याला त्याचे गुण व महत्व माहिती झाले कि आपण त्याला जेवणातून काढून टाकणार नाही.

१) कढीपत्त्यामध्ये विविध औषधीय गुण लपलेले आहेत. या मध्ये पोषक तत्व आहेत म्हणून याचे सेवन अकाली केस पांढरे होणे, केस गळने थांबवते. याच्या सेवनाने केस मजबूत होतात. निरोगी केसांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
२) कढीपत्त्यापासून बनवलेले तेल केसांच्या समस्येवर उपयोगी आहे.
३) कढीपत्ता पाने सुकवून त्याची पावडर बनवा हि पावडर तेलात मिक्स करा. आणि या तेलाने केसांची मालिश करा. याच्या वापरमुळे केसांची वाढ होते व केसांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.
४) डोळ्यांसाठी उपयुक्त याच्या सेवनाने दृष्टी चांगली राहते.
५) याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदय विकारांवर उपयोगी आहे.
६) कढीपत्ता रक्तातील साखर कमी करतो म्हणून याचे सेवन मधुमेहावर उपयोगी आहे.
७) कढीपत्ता लठ्ठपणा कमी करण्यासाठी सहाय्यक आहे.
८) या मध्ये एंटीऑक्सीडेंट असते. याची पाने खाल्ल्याने एक विशेष स्फूर्तीचा अनुभव होतो.
९) कफ दूर करण्याचे काम करते. तसेच पित्त नाशक आहे.
१०) विषारी जीव जंतू चावल्यास कढीपत्त्याच्या फळांचा रस व निंबूचा रस मिसळून लावल्यास फायदा होतो.
११) कढीपत्त्याचे नियमित सेवन मासिकपाळीच्या वेळी होण्याऱ्या त्रासाला कमी करते.
१२) याच्या सेवनाने भोजन लवकर पचते. पचनशक्ती वाढवते.
१३) इन्फेक्शन झाल्यास याच्या सेवनाने फायदा मिळतो.
१४) किडनीसाठी लाभकारी आहे.
१५) सुंदर त्वचेसाठी सुद्धा कढीपत्ता चे सेवन लाभदायक आहे.

औषध म्हणून कढीपत्त्याचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

आरोग्यवर्धक अद्रक

चहा प्यायला गेल्यावर साहजिकच प्रत्येकाच्या तोंडून निघते मस्त अद्रक टाकून चहा करा. म्हणजे चहाची चव या अद्रकामुळे वाढते. तसेच हा मसाल्यातील पदार्थ असून हा प्रत्येकाच्या घरात सहजच उपलब्ध असतो. पण हे अद्रक फक्तच चवीसाठी नाही वापरत तर याचा औषधी उपयोग सुद्धा आहे.  अद्रका मध्ये विविध गुण आहे तसेच याचे विविध उपयोग सुद्धा आहेत.अशा या अद्रकाचे दैनंदिन जीवनात फार मोलाचे योगदान आहे. चला तर मग आज आपण बघुयात या जमिनीच्या गाभाऱ्यात जन्मणाऱ्या अद्रकाचे उपयोग.

या अद्र्काला मुखवास म्हणून खाल्ल्या जाते हे पाचक असते.

उल्टी – या स्थिती मध्ये अद्रकाचा रस व कांद्याचा रस सारख्या प्रमाणात सेवन करावे.

घसा – आपला घसा थंडी मुळे अथवा थंड पेय पिल्या मुळे खराब झाला असेल तर अद्रकाचा रस व मध याचे सेवन दिवसातून २ – ३ वेळा करा.

भूख वाढवण्यासाठी – जेवणा पूर्वी मिठा सोबत अद्रक खा, किंवा सुंठ पावडर देखील जेवणा पूर्वी घेऊ शकता.

खोकला – खोकला झाल्यास घश्यात खवखव जाणवत असल्यास अद्रक खावा आराम वाटतो.

जखम – अद्रक पेस्ट करा जेथे जखम झाली आहे त्या भागावर जाडसर लेप लावा व त्यावर पट्टी बांधून ठेवा २ तासाने हा लेप काढून घ्या.
मुक्का मार लागलेला असेल तर या प्रक्रिये नंतर सरसोचे तेल लावा व त्या ठिकाणी सेक द्या आराम पडतो.

अपचन – जेवण झाल्या नंतर अद्रकाचा रस, निबू रस व सेंधेमीठ गरम पाण्यात टाकून प्यावे.

कान दुखी – अद्रकाचा रस थोडा गरम करा व कानात टाका.

नेत्र रोग– अद्रक जाळून त्याचे काजळ बनवा व त्याचा वापर काजळ म्हणून करा.

डोके दुखी – या मध्ये अद्रकाचा रस, सेंधेमीठ व हिंग यांच्या मिश्रणाने मालीश करावी.

औषध म्हणून अद्रकाचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

सौंदर्य खुलवण्यासाठी उपयुक्त

आपल्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम व आयरन ची कमतरताही असु शकते.महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्रासलेले आहे. तसेच आपण जर कॉम्पुटर वरच काम करत असाल तर यामुळेही आपल्या डोळ्याखाली काळे डाग पडतात. डोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणांने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत.
१) रोज पुरेशी म्हणजे ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.
३) टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. याने त्वचेला ग्लो प्राप्त होतो. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
४) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
५) पुदिना हे थंड असतो हे आपणा सर्वांना माहिती असेलच तसेच हा पुदिना आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता पुदिन्याची पेस्ट तयार करा त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करून बघा तुम्हाला फरक दिसेल.
६) काकडी हि थंड असते तसेच काकडी हि आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करते. या करता काकडीचा रस त्यात निंबूचा रस टाकून मिश्रण तयार करा व दोन्ही डोळ्या खाली लावा व काही मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करू शकता.
७) कोरे दुध म्हणजे गरम न केलेले दुध एका कापसाच्या साहाय्याने डोळ्यांच्या आजू बाजूला लावा हा प्रयोग काही दिवस करावा.
८) संत्रीची साल बारीक केलेली व थोडे गुलाब जल यांचे मिश्रण करा व तो डोळ्यांच्या आजू बाजूला लावा.
९) टमाटर, काकडी व लिंबु प्रत्येकाच्या घरी असतो तर त्याच्या दोन चकत्या दोन्ही डोळ्यान वर ठेवा.
१०) आलु हे आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता आलुचा रस त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
११) दुधाची साय २ चमचे व पाव चमचा हळद हे मिश्रण एकत्रित करून डोळ्यान जवळील जे काळे डाग आहे त्या वर लावा.

कुठलेही प्रयोग करण्या अगोदर आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

शिवजयंतीनिमित्त बुलडाण्यात भरगच्च कार्यक्रम

shivjayanti in buldana

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८७ वी जयंती. त्या निमित्ताने बुलडाण्यात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवाच्या वतीने गतवर्षीपासून ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने बुलडाणा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, बुलडाणा येथील व्याख्यानाने होणार आहे. शाहीरी पोवाडा हा कार्यक्रम दि. १८ फेब्रुवारी रोजी तर दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जिजामाता प्रेक्षागार, बुलडाणा येथे महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ५१ फुट प्रतिमेला स्वराज्याच्या प्रमुख पाच गडावरील जलाने जलाभिषेक करण्यात येईल व माँ जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून अखंड ज्योतीचे आयोजन करण्यात येईल. शहरात शिवजयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक शिवजन्मोत्सव लोकनृत्य, शाहीरी, पोवाडा, समुहगान इ. कार्यक्रम सादर करण्यात येतील. भव्य शोभा यात्रा हि दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजता संगम चौक, बुलडाणा येथून प्रारंभ होईल. या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त माँसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत ३८७ जिजाऊंच्या लेकी राहतील.

द्रुष्टी आहे तर सृष्टी आहे

कुणाला वाटत नाही सुंदर दिसावं. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी ती असतेच पण वेळ आणि सध्याचे आपले धावपळीचे जीवन यामुळे आपण ज्या शरीरावर प्रेम करतो त्याच शरीराकडे आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि लहान सहान गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो तसेच आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग म्हणजे आपले डोळे काही लहान सहान गोष्टी मुळे डोळे होतात खराब, आणि जास्त मोठा विषय बनल्यावर किंवा त्रास वाढल्यावरच आपले त्याकडे लक्ष जाते. पण अशावेळी त्या डोळ्यांसाठी आपण घरगुती उपाय शोधतो तर आज आपण बघणार आहोत आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग आपले डोळे यांची काळजी कशी घ्यावी तर.

आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अंग व आपले कुठलेही कार्य पूर्ण करण्यास, या सुंदर सृष्टीचे दर्शन घडविण्यात सर्वात जास्त योगदान देतात ते आपले डोळे आहेत. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का?
डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करीतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांची साफ सफाई न करणे – आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि कचरा यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. शहरात वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेमध्ये कार्बनचे कण, शिसाचे प्रमाण व विषारी वायू प्रचंड प्रमाणात वातावरणात पसरलेले आहेत. या हवेतील प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांमध्ये वाहनांचा धूर, धूलिकण, कार्बनचे कण असा अनेक प्रकारचा घातक कचरा सारखा व रोजच्या रोज डोळ्यात जात आहे. त्यामुळे डोळ्याला ऍलर्जीचा विकार उद्‌भवतो. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत जळजळणे, पापण्यांची व डोळ्यांच्या कडांची आग होणे, वारंवार खाज सुटणे अशी आहेत.
चला तर बघूया कशी घ्यावी या डोळ्यांची काळजी.

१) सकाळी उठल्याबरोबर शुद्ध ताज्या पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. डोळे चांगले धुतले गेले पाहिजेत. डोळ्यातील घाण, पापण्यांची चिपडे व्यवस्थित काढली पाहिजेत.
२) दुचाकीवर जाताना संरक्षक हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स वापरावेत. असे गॉगल्स आपल्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
३) डोळे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे. त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी. हा एक अतिशय प्रभावी, सोपा, साधा व संरक्षित उपाय आहे. मात्र पाणी अगदी स्वच्छ असावे. तसेच आपल्या डोळ्यांवर स्वच्छ, थंड पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांमधील धूलिकण बाहेर टाकले जातात व ऍलर्जीचा धोका कमी होतो.
४) कोरफडीचा गर किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यांच्या बंद पापण्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
नेहमी लक्षात ठेवण्यासारखे डोळ्यात कचरा,धूळ, छोटे कीटक काहीही गेल्यास डोळे कधीही चोळू नयेत त्याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

इलेट्रीक व इलेकट्रॉनिक उपकरणा मुळे होणारा त्रास – हे युग आधुनिक युगाच्या नावाने ओळखले जाते. अशा या आधुनिक युगात सर्व कामे हे विदयुत उपकरणांच्या साह्याने केल्या जातात त्यामुळे आपणा सर्वांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या उपकरणांमध्ये मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही, LED लाईट तसेच ईतरही अनेक उपकरणांमुळे आपल्या डोळ्यांला विविध रोग व ऍलर्जीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यावर ताण येणे अशा विविध गोष्टींना सामोरे जावे लागते.
याकरिता उपाय-
१) विदयुत उपकरणांचा कमीत कमी वापर करणे.
२) मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही अशे उपकरण कमी वापरावे व याचा उपयोग करीत असतांना डोळे व या उपकरणा मध्ये अंतर ठेवावे.
३) आपले काम हे जर कॉम्पुटर वरच असेल तर त्या करिता काम करीत असतांना एकेका तासाने आपल्या डोळ्याला ५ मिनिटांची विश्रांती द्यावी. तसेच महत्वाचे म्हणजे कॉम्पुटर काम करणाऱ्यांनी गॉगलचा वापर करावा जो तुमच्या डोळ्यान वरील ताण कमी करण्यास मदत करेल.

अल्प निद्रे मुळे होणारा त्रास – या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ फारच अल्प आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धावपळी मुळे अल्प झोप घेतो त्यामुळे डोळ्यांचे विविध आजार जडतात. त्यामध्ये डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोळ्याची आग होणे असे त्रास उदभवतात. या कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
याकरिता उपाय-
१) कमीत कमी ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) दिवसातून ३ ते ४ वेळा थंड पाण्याने आपले डोळे स्वच्छ करा.
३) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

आहार – आपल्या जीवनात आहाराची फार महत्वाची भूमिका आहे त्यामुळे जेवण हे वेळेवर करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. आहारा मध्ये विविध मोसमी फळे घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर ज्यूस घेत असाल तर यामध्ये मोसंबी ज्यूस, गाजरचा ज्यूस, बीट ज्यूस घेतल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळू शकतो. तसेच हिरव्या पालेभाज्या, सलाद, अंकुरित धान्य यांचा समावेश आपल्या आहारात करावा.

विशिष्ट गुणांनी युक्त – कोरफड (घृतकुमारी)

बहुतेक प्रत्येकाच्या घरी सहजतेने उपलब्ध होणारी वनस्पती, सर्वांच्या परिचयाची कुणी अंगणात,परसबागेत तर कुणी कुंडीमध्ये या कोरफडीला स्थान देतात कुणी या वनस्पतीला सहज म्हणून लावतात तर कुणाला याचे औषधी फायदे सुद्धा माहित असतात. पण साधारणतः प्रत्येकाकडे हि वनस्पती बघायला मिळते.
आज आपण छोटीशी हिरवीगार काटेरी पाने असलेली औषधांचा बहुमूल्य ठेवा स्वतःमध्ये सामावलेली सर्वांना स्वास्थासाठी हितकारक, विशिष्ट गुणांनी युक्त अशा या कोरफडीची माहिती बघणार आहोत.

हिरवी हिरवी पाने, पानांच्या किनाऱ्यावर छोटे काटे पाने हि लांबट असून खोडांभोवती गोलाकार वाढतात,पानांच्या आत पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. या वनस्पतीच्या मध्यातून एक काडी बाहेर येते या काडीला केशरी रंगाची फुले येतात ती दिसायला मनमोहक असतात. याच कोरफडीचा आयुर्वेदामध्ये घृतकुमारी म्हणून संबोधल्या जाते. तसे या वनस्पतीला विविध नावाने सुद्धा ओळखतात. कोरफड, ग्वारपाठा, घृतकुमारी, एलोवेरा इ. या वनस्पतींचा उपयोग विविध औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये केल्या जातो. तसेच घरगुती औषधांमध्ये हि कोरफडीचा उपयोग होतो.
आयुर्वेदामध्ये अगणित वनस्पतींचा आरोग्यवर्धक उपयोग सांगितलेला आहे. त्याप्रकारेच कोरफड सुद्धा आयुर्वेदातीलच एक वनस्पती आहे. या वनस्पतीला जास्त जागा लागत नाही आणि विशेष म्हणजे थोड्याश्या पाण्यावरही या वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. कुंडी मध्ये टांगून सुद्धा ठेवलं तरी हि वनस्पती त्यात पण वाढते.

दैनंदिन जीवनात आपण या अमूल्य संजीवनीचा आपल्या स्वास्थासाठी कसा उपयोग करू शकतो ते आपण आज बघुयात.

मूळव्याध अति भयंकर त्रास या त्रासांमध्ये कोरफडचा ताजा गर नुसता ठेवला तरी दाह कमी होण्यास मदत होते व आराम मिळतो.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.
डोळ्यांची आग उन्हाळ्यात जास्त जाणवते किंवा वेल्डिंग सारख्या प्रखर प्रकाशाकडे बघितल्यास डोळ्यांमध्ये आग होते अशावेळी कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यात होणारी आग कमी होण्यास मदत होते.
शरीरावर कुठे चटका लागला, करपल तर यावर त्वरित उपाय म्हणून कोरफड लावावे आग कमी होण्यास मदत होते.
काही दिवस कोरफड सेवन केल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होते.
रोज कोरफडीचा चमचाभर गर घेतल्यास पाळी नियमित येण्यास मदत होते.
कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.
अंघोळीच्या अगोदर कोरफडीचा गर काढून त्याचा रस केसांना लावल्यास केस निरोगी होण्यास मदत मिळते.
त्वचेवर रोज कोरफडीचा गर लावल्यास त्वचा सतेज राहण्यास मदत मिळते. कोरफडीमध्ये एंटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या यामुळे कमी होण्यास मदत होते. तसेच कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.
ताज्या कोरफडीचा रस नियमित पिल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.
सर्दी-खोकला झाल्यास त्यावर घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा रस हा उत्तम पर्याय आहे.
तसा हा कोरफडीचा रस खूप कडू चवीचा असतो लवकर पिल्या जात नाही पण रोजच्या सवयीमुळे ते शक्य होऊ शकते.
सांधेवात हि वृद्धावस्थेत जाणवणारी समस्या या समस्येवरही कोरफड फायदेशीर ठरते.
हिरड्यांना आलेली सूज, दात निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा कोरफडीचे सेवन करणे हितावह आहे.
तोंड आलेले असल्यास सुद्धा कोरफडीचा वापर आरामदायक असतो.
कोरफडीचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे.
कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
उटण्यामध्ये या कोरफडीचा वापर होतो. त्वचेसाठी जणू वरदानच आहे कोरफड.
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.

अशाप्रकारे भरपूर उपयोग आहेत या अमूल्य कोरफडीचे हि विशेष गुणधर्माची आहे.या वनस्पती पासून विविध औषधे बनतात शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. केसांच्या समस्यांसाठी कोरफडीचे तेल केसांना निरोगी ठेवते केसांना चकाकी आणते. त्वचेला दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात.
चला तर मग आजपासून आपण सुद्धा एक तरी कोरफड आपल्या परसबागेत लावूयात व या निसर्गाच्या अमूल्य औषधींचा आपल्या स्वास्थाकरिता उपयोग करूयात.

औषध म्हणून कोरफडीचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

आकाराने लहान पण गुणांनी महान… काळे मिरे

हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणारा. रोज त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतच असतो. आपल्याला काळे मिरे म्हटले कि मसाला आठवतो आणि याचा उपयोग फक्त मसाल्यातच होत असावा असा फारसा समज आहे. बहुतेक ठिकाणी तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिर्‍याची पूड वापरतात. काळे मिरे- सॅलड, सूप, चायनीज पदार्थ, सांबार, मसालेभात अशा अनेक पदार्थामध्ये काळ्या मिऱ्याचा वापर होतो. मिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. मिरे हे पपईच्या वाळलेल्या बियांसारखेच दिसतात. पण हे काळे मिरे फक्त मसाल्यापुरते मर्यादित नसून आयुर्वेदात यांचा औषधी उपयोग सुद्धा आहे. चला तर मग या महान गुणांच्या छोट्याशा काळ्या मिऱ्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत यांचे औषधी उपयोग.

नाक बंद झाल्यास सुती कपड्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जिरे सम प्रमाणात घेऊन त्याची पोटली बांधावी आणि ती नाकाने हुंगावी यामुळे नाक मोकळे होते.
चहामध्ये काळे मिरे, सुंठ, गवतीचहा टाकून बनवलेला चहा सर्दी-खोकल्यावर उत्तम आहे.
खोकल्यामध्ये काळी मिरी गरम दुधात मिसळून ते दूध घेतल्यास फायदा होतो.
मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूक वाढते.
२ चमचे दही, १ चमचा साखर आणि ६ ग्रॅम काळे मिरे बारिक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला आणि डांग्या खोकला दूर होतो.
पित्तामुळे पोटात गुडगुड होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.
वजन कमी करण्यासाठीही काळी मिरे हे उपयोगाची आहे. यामुळे शरीरातील फॅटही कमी होतो. तसेच कॅलरीज जाळण्यासाठी उपयुक्त आहे.
डोळ्यांसाठी उपयुक्त आहे काळे मिरे. रोजच्या आहारात याचा वापर करावा.
काळे मिरे टाकून चहा पिल्यास चेहऱ्यावरील दाग-धब्बे दूर होतात चेहरा चांगला होतो.
दात दुखत असल्यास काळे मिरे दाताखाली चावून दाबून ठेवावे यामुळे दात दुखीवर आराम मिळतो.
पायरिया,दातांच्या समस्या, हिरड्या, यामध्ये मिरे पूड मीठ एकत्र करून दातावर लावावे आराम मिळेल.
एक ग्लास ताकामध्ये थोडी मिरे पूड मिसळून पिल्यास पोटातील जंतांचा त्रास कमी होतो.
श्वासासंबंधी काही त्रास असेल तर पुदिना व मिरे यांचा चहा मध्ये समावेश करावा.
स्मरणशक्ती साठी सुद्धा काळे मिरे उपयुक्त आहेत.
पोटातील गॅस, ऍसिडिटी सुद्धा यामुळे कमी होते आराम मिळतो.
अशाप्रकारे विविध औषधी उपयोग आहेत काळ्या मिऱ्याचे.

औषध म्हणून काळी मिरीचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

पातुर्डा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पातुर्डा चे ग्रामदैवत महासिद्ध महाराज यांची यात्रा येत्या १० फेब्रुवारी येत आहे. त्या निमित्ताने गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हभप रवींद्र महाराज सोयगाव, लक्ष्मण महाराज कोकाटे सावरपाटी, गजानन महाराज मलकापूर, लक्ष्मी नारायण दायमा महाराज पारस, मधुकर महाराज जोगंदल अकोला, संजय पाटील महाराज बामदा, गणेशनंद महाराज कागन्ये आळंदी देवाची, विनायक महाराज भोपळे निमगाव यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी अभिनेते अमोल जुमळे आणि साथीदारांचा ‘शिवनागर’ कार्यक्रम होणार आहे. ‘गाथा पारायण’ व्यासपीठाचे नेतृत्व निमगाव येथील विनायक भोपळे हे करणार आहेत. गावकऱ्यांच्या वतीने ११ फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वाना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंग- उत्तम आरोग्यासाठी लाभदायक

आपल्या रोजच्या जेवणात हिंग वापरण्यात येतो. स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. हिंगाचे अनेक फायदे आहेत. उत्तम आरोग्याच्या दृष्टीने ते कुठले ते आपण बघूया.

वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो. उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल. छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल. टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे. डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे. भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.
कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून, त्या तेलाचं एक-एक थेंब कानात टाकल्याने वेदना दूर होतील. दातांमध्ये कॅविटी झाल्यास हिंग फायद्याचे ठरेल. दाता किड लागली असल्या रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपावे. कीड आपोआप दूर होईल.

आपल्या किचन मध्ये असलेली इवलीशी हिंगाची डबी काय करते ते आपण बघितले. पुढील वेळी नक्की त्याचा प्रयोग करून बघा.

गंगीचा उपचार

ghost story

झपाटलेली गंगीचा पुढील भाग

आणि आजोबा सुद्धा तिथे आले व त्यांनी सांगितले की बाळ्या…. ए … पोरा. हे अमानवीय दिसतया गड्या हा सगळा खेळ त्योच आहे… आणि ते घरात निघून गेले. मामा उठले आणि एवढ्या रात्रीच निघाले मामीने विचारले अव कुठी चालले इतक्या राती ? तर मामा काई बोलले नाई. आज्जी बोलली की जा बाळ्या यळ झाली आता त्या माय ले बोलवायची तेच लावीन आता एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष. मी तस आईला वीचारलं की आज्जी कुठल्या माय बद्दल बोलतेय. आईचा सुद्धा स्वर मंद झाला आई सुद्धा बोलली सोनू बाळा तू खरच यात पडू नकोस ती माय महाकालीची एकनिष्ठ भक्त आहे. तीला खूप काही समजते. मी लहान होती तेव्हा पासून तिला बघते एकदा आजोबांना भूत दिसलं होत तेव्हा घर गावात होत आणि आजोबा रात्री शेताहून पाणी देवून येत होते तेव्हा त्यांना नाल्यातून येताना एक माणूस भेटला होता आणि त्याने चक्क आजोबांना तंबाखू मागीतली होती आजोबांनी तंबाखू दिली तर त्याने ती घेतली आणि खाल्ली आणि आजोबांसोबत गप्पा करू लागला जेव्हा वेस जवळ आली तेव्हा तो बोलला की थांबा थोड मी पाणी पेतो मले तहान लागली आजोबांनी त्याला सांगीतले की एवढ्या रात्री कुठे दोर-बकेट शोधणार आणि पाणी काढणार…. घर जवळच आहे घरी चला चहा प्या, तसाच तो खीदी-खीदी हसायला लागला आणि त्याने आजोबांना वेसीजवळच्या वीहरीत ढकलले आणि झाडावर जाऊन बसला असे काहीतरी घडले होते तेव्हा आजोबा खूपच आजारी पडले होते काहीही केले तरी त्यांची तब्येत सुधारत नव्हती तेव्हा याच मायने त्यांचा उपचार केला होता.
ठीक आहे सोनु बाळा तू झोप आता रात्र फार झाली आहे. व आई झोपली पण मला कशाची झोप येते माझी उत्सुकता आणखी वाढली.आणि रात्र कल्पना करण्यातच गेली.
सकाळ झाली थोडा काळोखच होता मामा एका काळ्या कपड्यावाल्या बाईला घेऊन आले त्यांच्या गळ्यात काही वेगवेगळ्या मण्यांच्या माळा होत्या त्या काळोखात सुद्धा चमकत होत्या. हातात भारी वजनाची वाकडी तिकडी काडी होती. त्यांच्या खांद्यावर झोळी होती. मी दुरूनच हे सर्व पाहत होतो. मामा आले तसे घरातील सर्व तसे रात्रभर जागीच होते ते सर्व ओसरी मध्ये जमा झाले त्या मायने आजी-आजोबांना जय मा काली म्हटलं आणि ओसरीच्या बाहेरच उभी राहली आणि बोलू लागली हे जागा आवेशीत होयेल हाये….. आठीसाक काई असल्याचा मले भास हुन रायला…. . बाहीरच हाये बंद…. उपरी हवा वायते आठीसाक…. डाक… डाक…. डाक… डाकीण शाकिन काई बी असू शकते. लय बेक्कार हालत होयेल हाये ढोरायची. हूंम…. हुं…. नाय नाय अशी काही विचित्रच ती माय बोलत होती…. म्या काई वस्तू सांगते त्या आताच्या आता मायाजोळ आणून द्या अन आज्जी-आजोबा मामा सोडून बाकीचे बंदे घरात निगुन जा… आम्ही सर्व तीथून घरात गेलो मी खीडकीतून सर्व बघत होतो त्या माय ने एक ठिकाणी चार लिंबू ठेवले त्यावर काही तरी उच्चार करत ते घराच्या चारही कोपऱ्यात जमिनीत दाबायचे सांगीतले. मामाने तसे केले. मग त्यांनी काही लाकडे पेटवली व तिथे बसल्या आणि विस्तव तयार केला आणि तो विस्तवावर राय टाकली आणि धूप घेऊन फिरत असतानाच त्यांना चिंचेच्या झाडाखाली काहीतरी दिसलं आणि अचानक त्या झाडाखाली थांबल्या आणि मोठं-मोठ्याने ओरडू लागल्या बाळ्या….ओ….बाळ्या…. पोरा हे पाय रे…. तसे मामा तिकडे धावत गेले.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

बछडे खाणारे रक्तपिपासू पिशाच्च

आजकाल जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किंवा आपण ही कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टींमध्येच उरले आहेत . असो, आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडला आहे. तेव्हा मी ८ वीला शिकत होतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो. मामा , मामी , आजी असे सर्व जण तिथे असायचे सोबत मामाची मुले त्यामुळे मज्जाच मज्जा असायची. मामीचे घर जुने होते परंतु खूप मोठे , समोर छोटीशी बाग, आणि बाजूला गुरांचा वाडा. तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले की गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो २ दिवसात मरतो. आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंग मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं की हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतरी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात. मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला. तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येतो आणि काय करायचं ते बघतो . दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी जागीच होतो कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहिरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहिरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत. बछडे मरत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्यावर तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्याचेच तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली की सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं की पूजा आता चालू करू. पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची यादी मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो जोरजोरात कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . त्यावेळी ज्या घटना झाल्या त्याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुद्धा! आम्हाला वाटल की कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच, लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला. मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरी सुद्धा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रि
काने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले की यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . पूजा करताना अनेक विघ्न पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय. ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला. उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला आणि अचानक चक्कर येऊन तिथेच पडला. लोकांनी त्याला उचलले आणि तोंडावर पाणी मारले. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यावर तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा. त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या. त्या नंतर पुन्हा कधीच गायीच्या बछड्याचा मृत्यू झाला नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

उद्या बुलडाण्यात संविधान जागर यात्रा

Buldana News

उद्या दि.२ डिसेंबर रोजी संध्या. ६. ३० वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत ‘संविधान जागर यात्रा’ येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिस, बुलडाणा आणि बुलडाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

चिखली रोड बुलडाणा येथील सामाजिक न्यायभावनाच्या सभागृहात उद्या ही यात्रा येणार आहे. तरी संध्या. ६. ३० वाजता आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साद माणुसकीची मित्र परिवाराची 'माणुसकीची भिंत '

buldana news

बुलडाणा शहरात अनेक गोरगरीब भटकतांना दिसून येतात ज्यांना घालायला कपडे नाहीत. थंडी, ऊन वारा पाऊस सर्व अंगावर झेलत ही लोक आपला बचाव करताना दिसून येतात. त्यांची गरज जाणून त्यांना मदत व्हावी या हेतूने साद माणुसकीची मित्र परिवार बुलडाणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना क्षणभर थांबायला लावणारी भिंत सध्या चर्चेत आहे. ज्याला लोकांनी पागल म्हणून हिनवले होते त्याला त्याच माणसानंमध्ये वावरण्या योग्य बनविले याचे समाधान साद माणुसकीची परिवाराच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

प्रत्येकाकडे जुने कपडे असतात जे आपण टाकून देतो अथवा दाराशी आलेल्याना देऊन त्या बदल्यात काही तरी वस्तू घेतो. हेच कपडे जर ह्या गरजुंना दिले तर त्यांची गरज पण भागेल आणि काही केल्याचं समाधान पण मिळेल. या विचारातून बुलडाणा येथील साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने शहरातील,आसपाच्या खेड्यातील वंचितांना गरजेच्या वस्तू, कपडे,स्वेटर, भांडी, लहान मुलांचे,पुरुषांचे,स्त्रियांचे कपडे व इतर साहित्य दान करण्याचा उपक्रम राबविला आहे. इथे उभारलेल्या ‘माणुसकीच्या भिंतीवर’ आपल्याला नको असेलेले ती वस्तू देतात तर गरजवंत ‘घेऊन जातात’. प्रशंसनीय असलेल्या उपक्रमात रितेश खडके, सुरेश कावळे, महेंद्र सौभागे, अजय दराखे, योगेश सुरडकर, राहुल दराखे,न रेंद्र लांजेवार यांचा समावेश आहे.

ज्यांच्या जवळ जे जास्त असेल त्यांनी ते द्यावं,आणि ज्यांना नसेल त्यांनी घेऊन जावं. बस्स येव्हड साधं सोप्प गणित आहे ! आपण दान करू शकतो ते सर्व आपल्याला इथे देता येतील!! मोठ्या मनाने दान करा! दिल्याने कधी कमी होत नाही!! तरी आम्हाला हात द्या,वंचितांना साथ द्या आणि माणुसकी जपण्यास मदत करा असे आवाहन साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

वरवंट बकाल येथे आज 'बेटी बचाव' आणि 'व्यसनमुक्ती' अभियान

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि. १३ रोजी मंडळातर्फे ‘बेटी बचाव अभियान’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यावर आधारित गीतगायन आणि नाटिकेचे आयोजन केले आहे.

आज रात्री ८:३० वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन नवयुवक गणेश मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नवयुवक गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

buldana news

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, प्रश्नमंजुषा, व्यसनमुक्ती, सर्पमित्रांचे व्याख्यान, बेटी बचाव , आंबा बरवा येथील पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच भजन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

५ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता १५ सप्टेंबर ला बक्षीस वितरण कार्यक्रमाने होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे रविवार ११ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मंडळाकडून ६०-६५ युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटक संतोष टाकळकर, कृऊबासचे उपसभापती संजय राठोड यांच्या उपस्थितीत गणेश टापरे, प्रतीक राठी, राजू कुयटे, विनोद टाकळकर, गणेश अस्वार, सागर शेगोकार, नंदकिशोर राठी, चेतन बकाल, नितीन टाकळकर, जयेश दातार, वैभव डाबरे, निलेश भोपळे, सागर रौदळे इ. युवकांनी रक्तदान केले.

Official website of Buldhana district

आपल बुलडाणा, आपली साइट

विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या व मां जिजाऊच्या माहेर असणार्‍या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आम्ही ही साईट तमाम बुलडाणेकारांसाठी व वैदर्भिय जनतेसाठी तयार केली आहे. ही वेबसाइट म्हणजे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. तुमच्या प्रश्नासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी तसेच इतर घडामोडी, नोकरी, आरोग्य, शिक्षण ई. माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा थोडा प्रयत्न करतोय.

एम एच २८. इन च्या नावाखाली तुम्हाला चांगली व तडक सेवा देण्याचा आमचा मानस असून आम्ही इंटरनेट, प्रिंटिंग, मोबाइल या क्षेत्रात काम करतोय. जिल्ह्याच्या व आसपासच्या सर्व क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, नोकरदार वर्ग, गृहिणी ई. ना दोन पाउल पुढे नेण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतोय. उद्या आपण सर्व हक्काने सांगू शकाल की, माझ बुलडाणा, माझी वेबसाइट असा आमचा प्रयत्न आहे.

आपल बुलडाणा, आपली साइट

बुलडाना शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे अपघाती निधन

buldana news

बुलडाना शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे औरंगाबाद जवळ नांदगाव-शिऊर बंगला मार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. मुंबई येथील शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रमास बुलडाणा येथून शांताराम जगताप, पत्रकार राजेश देशमाने, बुलडाणा तालुकाप्रमुख अर्जुन दांडगे, ओमसिंह राजपूत हे एम.एच. २८ व्ही. ४४५३ गाडीने गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून बुलडाणा येथे परतत असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील नांदगाव-शिऊर बंगला जवळ सकाळी साडेचारच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची भरधाव कार रस्त्यावरील पुलावरून खाली कोसळली. यामध्ये शांताराम जगताप यांचे जागीच निधन झाले तर इतर चार जण जखमी झाले. सादर अपघाताची बातमी कळताच परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना कारच्या बाहेर काढले आणि औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले.

शांताराम जगताप यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या गावी ‘अजिसपूर’ येथे स्मशान शांतता पसरली होती. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी लागलीच औरंगाबाद कडे धाव घेतली. गेली ३० वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आणि माजी आ. शिंदे यांचे खास माणूस असलेले शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांच्या जाण्याने सेनेला मोठा आघात झाला आहे.