आमलकी एकादशी

या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे.

हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय. आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवांमध्ये श्रीहरी नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे. तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली. तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला. आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे.

व्रत कथा
कुंतीनंदन विजया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. विजया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे.या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास सांगतो. ती शांत पूर्वक ऐका

प्राचीन काळी महान राजा मान्धाताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की, महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल.

महर्षी वशिष्ठजी बोलले – हे राजा सर्व व्रतांमध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशी चे व्रत होय.
राजा मान्धाता बोलले – महर्षीजी मला सांगा या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली? हे व्रत कसे करतात.
महर्षी वशिष्ठजी बोलले – हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो. हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते. या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे. आमलकी म्हणजे आवळा यांची उत्पत्ती हि भगवान विष्णूच्या मुखातून झाली. मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो ती एका.
प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते. त्यानगरात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चारी वर्णातील लोक फार प्रसन्न पूर्वक राहत होते. या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे. त्या नगरात कोणीच पापी, दुराचारी, नास्तिक असे कोणीच नव्हते. नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते. ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती. तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते.
एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली. त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंद पूर्वक एकादशीचा उपवास केला. राजाने आपल्या प्रजे बरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप, दीप व नैवेद्य यांनी पूजा करीत होते. त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले. त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की, माझ्या सर्व पापाचा सर्वनाश करा. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता. आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करून करत असे. त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता. त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रत कथा व महात्म ऐकत होता. या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली. सकाळी सगळे आपआपल्या घरी निघून गेले. शिकारी पण घरी गेला व जेवण केले. काही दिवसाने त्या शिकाऱ्याचा मृत्य झाला. तो फार पापी होता त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत त्याच्या कडून एकादशीचे व्रत, उपवास व जागरण झाले होते. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते व त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती.
त्याला पुढील जन्म देण्यात आला. त्याचा राजा विदुरथच्या घरी जन्म झाला. त्यांचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. वसुरथ पुढे तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले. त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्या प्रमाणे होते, त्याची कांती चंद्रा प्रमाणे, क्षमेची प्रवृत्ती पृथ्वी प्रमाणे होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णु-भक्त होता. तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे रोज दान धर्म करत असे.
एकदा राजा वसुरथ शिकार करण्या करता गेला. त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रास्ता भटकला. तेथेच एका झाडाखाली तो झोपला. काही वेळाने तेथे डाकू आले राजाला एकटे पाहून ते ओरडत होते मारा याला मारा. या राजाने आपल्या वडील, आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले. आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे. एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले. डाकू अस्त्र -शस्त्राने राजा वर वार करीत होते. परंतु ते अस्त्र-शस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते. देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्र-शस्त्र हे त्यांचेच त्याच्या वर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते. त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू पाहत आहे असे. तेव्हा त्या मृत्यूच्या देवी प्रमाणे दिसत होत्या. त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पहिले की त्यांच्या आजू बाजूला कित्येक डाकू मरून पडले आहे. ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले? कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे? हे विचार करीत असतांना आकाश वाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. हि आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले.
वशिष्ठ ऋषी बोलले –  राजा हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमलकी एकादशी चे व्रत करतो, तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो.

पुण्यदायी विजया एकादशी

विजया एकादशीची कथा वाचल्याने ऐकल्याने मिळते वाजपेय यज्ञाचे फळ.
हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे विजया एकादशी होय. विजया एकादशी तिच्या नावावरूनच ओळखल्या जाते. हि व्यक्तीला विजय देते. जेव्हा चारही बाजूंनी मनुष्य संकटामध्ये अडकतो त्याला स्वतःचा पराभव दिसू लागतो. अशा परिस्थिती मध्ये विजय मिळवायचा असल्यास विजया एकादशी चे व्रत हे सर्वोत्कृष्ट उपाय मानल्या जातो. हि एकादशी माघ/फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला अकराव्या तिथीला येते.

व्रत कथा
कुंतीनंदन जया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. जया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे व्रत करणारा व्यक्ती नेहमीच विजय प्राप्त करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन आपण माझे परम मित्र आहेत. आणि आपण खूपच चांगला प्रश्न केला आहे. या कथेला ऐकल्यावर आपणास आनंद मिळेल, तसेच हि कथा ऐकणे व वाचल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. आता पर्यंत हि कथा मी कुणालाच सांगितली नाही. यापूर्वी हि कथा नारदजींनी ब्रह्माजी कडून ऐकली होती.
त्रेतायुगात भगवान श्रीहरी नारायणजीचे अवतार म्हणून प्रभू रामचंद्रांनी या सुंदर पृथ्वीवर जन्म घेतला होता. जेव्हा मर्यादा पुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या पत्नीला सीतेला शोधत समुद्रा जवळ पोहचले. तिथेच समुद्र किनारी त्यांचा परम भक्त जटायू नावाचा पक्षी राहायचा. त्या जटायूने सांगितले कि सीता मातेला राक्षसराज लंकेश रावण समुद्राच्या पलीकडे लंकेत घेऊन गेलाय. त्याने मातेला अशोक वाटिकेत ठेवले आहे. जटायू कडून माहिती मिळाल्यावर प्रभू श्रीरामचंद्र वानर सेने सोबत आक्रमणाची तयारी करू लागले. पण एवढ्या मोठ्या समुद्राला कसे पार करावे हा भीषण प्रश्न त्यांच्या समोर होता.
तेव्हा त्यांनी त्यांचे प्रिय बंधू लक्ष्मणजींना प्रश्न केला कि मला सांग तुझ्याकडे काही उपाय आहे का ? लक्ष्मण जी बोलले कि महान ऋषी वकदाल्भ्य मुनि हे इथून काही अंतरावरच राहतात त्यांचा आश्रम आहे त्यांना आपण भेटूया तेच आपणास पुढील मार्गदर्शन करतील. तेव्हा भगवान श्रीराम व लक्ष्मण महान ऋषी वकदाल्भ्य मुनि यांच्या आश्रमात पोहचले. त्यांना प्रणाम केला. व विनम्रतेने त्यांच्या पुढे हा भीषण प्रश्न प्रस्तुत केला.
वकदाल्भ्य मुनि म्हणाले हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मी आपणास विजय प्राप्त करून देणाऱ्या व्रता बद्दल माहिती देतोय. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे व्रत तुम्ही करा हे केल्यास निश्चितच तुम्ही समुद्र पार करून रावणाला पराजित करणार यात संशय नाही.
विजया एकादशी व्रत कसे करावे याबद्दल ऐकून घ्या. या एकादशीला अशी मान्यता आहे कि स्वर्ण दान, भूमि दान, अन्नदान आणि गौदान करून पुण्यफळाची प्राप्ती करू शकता. या दिवशी श्रीहरी नारायणजीची पूजा केल्या जाते. व्रत पूजेत धूप,दीप,नैवेद्य, नारळाचा प्रयोग केल्या जातो. सप्त धान्य घट स्थापना केल्या जाते. सप्त धान्य- गहू, उडीद, मुंग, चना, जौ, तांदूळ, आणि मसूर आहे. यावर श्रीविष्णुजींची मूर्ती ठेवल्या जाते. या व्रताला करणारा व्यक्ती पूर्ण दिवस व्रत करून रात्री विष्णु पाठ करत जागरण करतो. हे व्रत २४ तासांसाठी केल्या जाते. या व्रताची पूर्णता द्वादशीला सकाळी दान धर्म करून, अन्नदान करून केलॆल्या जाते.
प्रभू श्रीरामचंद्र यांनी लक्ष्मण व संपूर्ण वानर सेने सह महर्षीजींनी सांगितलेल्या तिथीनुसार एकादशी व्रत संपन्न केले. प्रभू श्रीरामचंद्र संपूर्ण वानर सेनेसमेत समुद्र पार करून लंकेत पोहचले व रावणाचा अंत केला.
अशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या परम मित्राला सांगितले कि या एकादशीला जो व्रत उपवास करतो त्याचे विघ्न दूर होतात. तसेच त्याचे पाप नष्ट होते. आणि त्यावर कितीही मोठे संकट असो तो त्यावर मात करून विजय प्राप्त करतो. अशाप्रकारे विजया एकादशीचा महिमा सांगितला.

भगवान परशुराम जयंती

Parashuram Jayanti in Buldhana

ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्।। भगवान परशुराम श्रीहरी विष्णू चे अवतार आहेत. त्यांचा हा अवतार त्रेता युगातील रामायण काळातील आहे. तसेच त्यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी माता रेणुका यांच्या उदरी झाला त्यांचे पिता महर्षि जमदग्नि आहेत. एका कथेनुसार ऐकण्यात आहे कि जेव्हा राजांचा अत्याचार वाढला होता तेव्हा पृथ्वी माता गाय रूप घेऊन भगवान विष्णू कडे जाऊन प्रार्थना केली आणि अत्याचारी राजांचा नाश करावा अशी विनंती करू लागली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी पृथ्वी मातेला वचन दिले कि दृष्टांच्या नाशासाठी व धर्म स्थापणे करीता भार्गव कुळात महर्षि जमदग्नि चे पुत्र म्हणून जन्म घेईल व सर्व अत्याचारी राजांचा नाश करेल. आपल्या दिलेल्या वचना नुसार श्रीहरी विष्णूंनी अवतार घेतला. भगवान परशुराम शिवशंकराचे भक्त होते शंकराच्या कृपा प्रसादाने त्यांना परशु प्राप्त झाले व त्यांनी ते परशु धारण केले तेव्हा पासून ते परशुराम या नावाने प्रसिद्धीस आले.

तसेच त्यांचे आरंभिक शिक्षण महर्षी विश्वामित्र व ऋचीक ऋषी यांच्या आश्रमात झाले तेथे त्यांना महर्षी ऋचीक यांच्या कडून सारंग नावाचा दिव्य धनुष्य व ब्रह्मर्षी कश्यप यांच्या कडून विधिवत अविनाशी वैष्णव मंत्र प्राप्त झाला. त्यानंतर चे शिक्षण कैलास येथील गीरीश्रुंग येथे भगवान शंकराच्या आश्रमात विद्या प्राप्त केली त्यात त्यांनी विविध दिव्यास्त्र,विद्युदभि नावाचा परशु प्राप्त केला. तसेच त्यांना विविध वरदान प्राप्त होते.

भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी क्षत्रीयविहीन केली होती हे प्रसिध्द आहेच.तसेच ते माता पिता यांचे भक्त आणि अज्ञाकारी होते. भगवान परशुराम शस्त्र विद्येचे महान गुरु होते, तसेच महाभारतामध्ये आचार्य द्रोणाचार्य,पितामह भीष्म व दानवीर कर्ण हे त्यांचे शिष्य होते. अजर, अमर, अविनाशी आहेत भगवान परशुराम. आज पण महेंद्र पर्वतावर निवास करतात भगवान परशुराम.