ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती

job upated on buldana app

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे. त्या अभियानांतर्गत पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थांपन कक्षात खालील पदे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्याचा करार तत्वावर इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एकुण पदसंख्या : १६१
जिल्हा अभियान व्यवस्थापक : 08 जागा
जिल्हा व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 07 जागा
जिल्हा व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 04 जागा
जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (कृषी): 09 जागा
जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (बिगर कृषी) : 03 जागा
जिल्हा व्यवस्थापक – M.I.S. : 04 जागा
जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन :05 जागा
जिल्हा व्यवस्थापक – विपणन :05 जागा
कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक : 09 जागा
तालुका अभियान व्यवस्थापक : 32 जागा
तालुका व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 19 जागा
तालुका व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी :05 जागा
तालुका व्यवस्थापक – उपजीविका : 18 जागा
तालुका व्यवस्थापक – आर्थिक समावेशन : 05 जागा
तालुका व्यवस्थापक – M.I.S. and M&E : 28 जागा

शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे. अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी www.jobs.msrlm.org किंवा www.umed.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2017 रोजी रात्री 11:59 वा पर्यंत आहे.

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक:
http://www.umed.in/DocumentFiles/Advt%20for%20Website.pdf