तुमचे एटीएम व्यवहार कसे सुरक्षित ठेवाल ?

atm withdral in buldana

पैसे काढण्यासाठी सर्वच जण आता बँकेच्या रांगेत उभे न राहता एटीएम ला प्राधान्य देतात. एटीएम्स खूपच सोयीची आहे आणि एटीएममधून पैसे काढणे, हे तुमचे पैसे मिळवण्याचे सर्वात झटपट मार्ग आहे. अनेक ठिकाणी एटीएम वर सूचना दिलेल्या असतांनाही त्याचे पालन होत नाही. कोणत्याही प्रकारे पैसे काढताना सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता बाळगणे, हे तुमच्या खात्याच्या सुरक्षेबरोबर होणाऱ्या तडजोड टाळण्यासाठी उपयोगी राहील.

तुमचे एटीएम व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया खाली दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचा अवश्य पालन करा:
तुमचा पिन नंबर लक्षात ठेवा आणि तो कुठेही लिहू नका किंवा कुणालाही सांगू नका. २. तुमचा एसएमएस, अकाउंट बॅलन्स आणि बँक स्टेटमेंट्स तपासून पहा आणि त्यात काही चुक आढळल्यास संबंधित बँकेला तात्काळ कळवा. ३. व्यवहार करण्याआधी तुमचे कार्ड कुणीही अनोळखी व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा बँक अधिकाऱ्यांच्या हाती देऊ नका. ४. तुमचे एटीएम वापरताना कुणाही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. ५. व्यवहार करताना रांगेतील (क्यूमधील) अन्य लोकांबरोबर सुरक्षित अंतर ठेवा. ६. नेहेमी एटीएम मशीनच्या जवळ उभे रहा आणि अंतर ठेवा. ७. पैसे काढताना इतर लोकांना एटीएम मशिनभोवती गर्दी करू देऊ नका. ८. पिन एंटर करताना कीपॅड झाकण्यासाठी तुमच्या शरीराचा व हाताचा उपयोग करा. ९. व्यवहार केल्यांनतर तुमची ट्रँजॅक्शन स्लिप एटीएम मध्ये सोडू नका. ती टाकण्यापूर्वी तिचे बारीक तुकडे करा. १०. एटीएम पासून दूर जाताना ‘कॅन्सल’ बटन आठवणीने दाबा.११. तुमचे कार्ड आणि ट्रँजॅक्शन स्लिप न विसरता सोबत घ्या.

आता एटीएम मधून १० हजार रु. काढता येतील

नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून आता २ महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. शहरी भागात काही प्रमाणात वातावरण पूर्ववत होत असले तरी ग्रामीण भागात अजूनही म्हणावा तो फरक पडलेला नाही. आधीच ग्रामीण भागात एटीएम नाहीत. जिथे आहेत तिथे सुद्धा गर्दी दिसूनच येते. त्यातच पैसे काढण्याला मर्यादा होत्या. त्या वाढून आता १० हजार पर्यंत करण्यात आल्या आहेत.

नोटबंदी केल्यानंतर देशभरात पैशाची टंचाई निर्माण झाली होती. सकाळी भरलेली एटीएम २-४ तासांतच खाली होत होती. २ हजार रु. पर्यंतची मर्यादा असल्याने आणि दिवसातून एकदाच पैसे काढता येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्या नंतर ही मर्यादा साडेचार हजार आणि आता १० हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मात्र बँकेतून अजूनही आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम आहे.

चालू खात्यातून आता १ लाख रु.पर्यंत काढू शकतो. ती मर्यादा आधी ५० हजार होती. बँकेनं एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा दिला आहे.