महागाई निषेधात काँग्रेसचा भव्य बैलगाडी मोर्चा

Bullock Cart Rally

आज दुपारी बुलडाणा शहरातील स्थानिक तहसील चौकात काँगेसच्यावतीने वाढत्या महागाईच्या निषेधात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई व पेट्रोल, डिझेल, गॅस-सिलेंडर यांच्या दर वाढीचा निषेध करण्यात आला.

काँग्रेसचे आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बुलडाणा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाड्या या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतः आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ हे बैलगाडी मध्ये बसून बुलडाणा शहरात फिरले. या बैलगाड्यावर दोन चाकी वाहने (टू व्हीलर) ठेवण्यात आल्या होत्या. तसेच घरगुती गॅसचे भाव वाढत असल्यामुळे त्याचे फलक देखील बैलगाडीवर लावले होते. रोजच्या रोज पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. बरेच वेळा घरगुती गॅसच्या किमतीत केलेली वाढ त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. शेतकऱ्यावरील वाढत कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यामुळे महागाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मा. तहसीलदार साहेब यांना, मा. आमदार श्री. हर्षवर्धनजी सपकाळ व काँग्रेसकार्यकर्ते यांनी निवेदन सादर केले

गांधी घराणे कायमचे हद्दपार होणार

Buldhana: Stamps-of Gandhi-discontinue

घराणेशाही नुसार चालत आलेले गांधी ‘खानदान’ ने आपल्या कार्यकाळात आपल्या मनानुसार हवे तसे वागले आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांचे नाव दिसून येतेच. मग त्यांनी तसे कार्य केले नसले किंवा त्यांची लायकी नसली तरीही. उदाहरण म्हणजे “पप्पु”. परंतु त्या चुका सुधारण्याचे कार्य मोदी सरकार करीत आहे. आपल्या कार्यकाळात कॉंग्रेसने सुरु केलेल्या पोस्टाच्या तिकीटांवरून गांधी घराणेलवकरच हद्दपार होणार आहेत. काँग्रेस सरकारने सुरू केलेली तिकिटांची मालिका बंद करून केंद्रातील मोदी सरकार आता २४ महान व्यक्तिंचे फोटो असलेली पोस्टाची नवी तिकिटांची मालिका सुरू करणार आहे.

युपीए सरकार ने २००८ मध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो असलेली दोन तिकिटं पोस्टाने सुरू केले होते. पण लवकरच आता ही तिकिटं बंद होतील. जुलै २०१५ पासून इंदिरा आणि राजीव गांधी यांची फोटो असलेली पाच रूपयांची तिकिटं छापण्याचं पोस्टाने बंद केलं आहे. मेकर्स ऑफ इंडिया (भारताचे निर्माते) या शिर्षकाने ही पोस्टाची तिकिट मालिका तयार होणार असून एक तिकीट योग तसेच इतर तिकिटे सरदार वल्लभ भाई पटेल, बाळ गंगाधर टिळक, सुभाष चंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, भगत सिंग, रविंद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, सुब्रमण्यम भारती, पंडित रवी शंकर, भिमसेन जोशी, एम.एस, सुब्बालक्ष्मी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे फोटो असेलेली ही नवी तिकिटं लवकर सरकार छापणार आहे. हे निश्चित चांगले पाऊल आहे. कदाचित लवकर आपल्याला चलनी नोटांवर सुद्धा ‘गांधीगिरी’ संपून महापुरुषांचे फोटो दिसू शकतील

विधानसभा निवडणुक 15 ऑक्टोबर

अखेर ठरल मग, विधानसभेचा बिगुल १५ ऑक्टोबर ला वाजनार. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता प्रतिक्षा संपली असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसुचना जारी होणार असून आचरसंहिता लागू करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीची ही शेवटची तारीख 27 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबर ला अर्ज छाननी होईल. त्या नंतर 15 ऑक्टोबर रोजी मतदान व 19 ऑक्टोबर ला मजमोजणी होणार आहे.