उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल

buldana lifestyle

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक शहरात उन्हाचा पार खूप चढलेला असतो. अनेक जण दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळतात. परंतु लग्नसराई आणि इतर कामानिमित्त बाहेर जाणे आलेच. मग स्कार्फ, रुमाल, टोप्या यांचा वापर करतांना अनेक जण दिसून येतात. ज्या व्यक्तींची त्वचा तेलकट त्यांना तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते, त्यावर एक सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोनवेळा बर्फ चेहर्‍यावरून फिरवावा, तसेच निदान चार पाच वेळा तरी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.  उन्हामुळे त्वचा काळवंडली(टॅन) असेल तर बटाटय़ाचा रस चेहर्‍यावर लावावा, चेहर्‍याची त्वचा उजळते कारण बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे.

नेहमीसाठी एक घरगुती आणि चांगला फेसपॅक म्हणजे चार चमचे काकडीच्या रसात, चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळावा व बेससाठी आवश्यक एवढी मुलतानी माती ह्या मिश्रणात घालावी. हा पॅक चेहर्‍यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवावा. चेहर्‍याची त्वचा मऊ आणि चमक्दार होते.
तसेच चंदन, बदाम आणि आंबेहळद दुधात उगाळून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा तजेलदार व उजळ होतो. पण आंबेहळदीचे प्रमाण ह्या लेपात बरेच कमी असावे.

१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रंध्रे ( छिद्रे) असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल clean असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रंध्रे ही बंद होत असल्याने त्वचेला एक विचित्र कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रंध्रे बंद राहीली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते, व पोत बिघडायला सुरुवात होते. मेक-अप केल्यानंतर, फंक्शनहुन परतल्यावर आळस टाळुन तो आठवणीने काढायला हवा. क्लिन्झर्स लावुन मेक-अप काढुन त्वचा स्वच्छ धुवुन मग साधे मॉईश्चरायझर लावुन ठेवा
२) दिवसातुन किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते, त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपुन घ्यावी, खसाखसा चोळु नये.
३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतुन एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणुन त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खुपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार ( circular clockwise) करावा
४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टॉमेटोचा गर काढुन त्याने संपुर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवुन टाकला तरी त्वचेचे रापणे ( टॅनिंग) कमी होते
५) उन्हाळ्यात जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खुप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन हितकर असुन. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.
६) शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणेच टाळावे. दुपारचा आहार माफक असावा (सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असु देणे) उन्हाळ्यत नैसर्गिक रित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंगने तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्यात कार्बनडायॉस्काईडचे प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायु कमी होतो व एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचे प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो
७) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा SPF (Sun protection factor) किमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.
८) परमेश्वराने किंवा निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणे. ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच तुम्ही दीर्घकाळपर्यंत तरुण दिसु शकता. उत्तम त्वचेच्या व्याखेत रंग हा मुद्दा सर्वस्वी नसुन त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही आंतर्भुत आहेत, त्यांची जपणुक प्रत्येकाने मनापासुन करावी.

सौंदर्य खुलवण्यासाठी उपयुक्त

आपल्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम व आयरन ची कमतरताही असु शकते.महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्रासलेले आहे. तसेच आपण जर कॉम्पुटर वरच काम करत असाल तर यामुळेही आपल्या डोळ्याखाली काळे डाग पडतात. डोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणांने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत.
१) रोज पुरेशी म्हणजे ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.
३) टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. याने त्वचेला ग्लो प्राप्त होतो. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
४) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
५) पुदिना हे थंड असतो हे आपणा सर्वांना माहिती असेलच तसेच हा पुदिना आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता पुदिन्याची पेस्ट तयार करा त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करून बघा तुम्हाला फरक दिसेल.
६) काकडी हि थंड असते तसेच काकडी हि आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करते. या करता काकडीचा रस त्यात निंबूचा रस टाकून मिश्रण तयार करा व दोन्ही डोळ्या खाली लावा व काही मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करू शकता.
७) कोरे दुध म्हणजे गरम न केलेले दुध एका कापसाच्या साहाय्याने डोळ्यांच्या आजू बाजूला लावा हा प्रयोग काही दिवस करावा.
८) संत्रीची साल बारीक केलेली व थोडे गुलाब जल यांचे मिश्रण करा व तो डोळ्यांच्या आजू बाजूला लावा.
९) टमाटर, काकडी व लिंबु प्रत्येकाच्या घरी असतो तर त्याच्या दोन चकत्या दोन्ही डोळ्यान वर ठेवा.
१०) आलु हे आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता आलुचा रस त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
११) दुधाची साय २ चमचे व पाव चमचा हळद हे मिश्रण एकत्रित करून डोळ्यान जवळील जे काळे डाग आहे त्या वर लावा.

कुठलेही प्रयोग करण्या अगोदर आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

द्रुष्टी आहे तर सृष्टी आहे

कुणाला वाटत नाही सुंदर दिसावं. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी ती असतेच पण वेळ आणि सध्याचे आपले धावपळीचे जीवन यामुळे आपण ज्या शरीरावर प्रेम करतो त्याच शरीराकडे आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि लहान सहान गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो तसेच आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग म्हणजे आपले डोळे काही लहान सहान गोष्टी मुळे डोळे होतात खराब, आणि जास्त मोठा विषय बनल्यावर किंवा त्रास वाढल्यावरच आपले त्याकडे लक्ष जाते. पण अशावेळी त्या डोळ्यांसाठी आपण घरगुती उपाय शोधतो तर आज आपण बघणार आहोत आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग आपले डोळे यांची काळजी कशी घ्यावी तर.

आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अंग व आपले कुठलेही कार्य पूर्ण करण्यास, या सुंदर सृष्टीचे दर्शन घडविण्यात सर्वात जास्त योगदान देतात ते आपले डोळे आहेत. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का?
डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करीतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांची साफ सफाई न करणे – आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि कचरा यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. शहरात वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेमध्ये कार्बनचे कण, शिसाचे प्रमाण व विषारी वायू प्रचंड प्रमाणात वातावरणात पसरलेले आहेत. या हवेतील प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांमध्ये वाहनांचा धूर, धूलिकण, कार्बनचे कण असा अनेक प्रकारचा घातक कचरा सारखा व रोजच्या रोज डोळ्यात जात आहे. त्यामुळे डोळ्याला ऍलर्जीचा विकार उद्‌भवतो. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत जळजळणे, पापण्यांची व डोळ्यांच्या कडांची आग होणे, वारंवार खाज सुटणे अशी आहेत.
चला तर बघूया कशी घ्यावी या डोळ्यांची काळजी.

१) सकाळी उठल्याबरोबर शुद्ध ताज्या पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. डोळे चांगले धुतले गेले पाहिजेत. डोळ्यातील घाण, पापण्यांची चिपडे व्यवस्थित काढली पाहिजेत.
२) दुचाकीवर जाताना संरक्षक हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स वापरावेत. असे गॉगल्स आपल्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
३) डोळे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे. त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी. हा एक अतिशय प्रभावी, सोपा, साधा व संरक्षित उपाय आहे. मात्र पाणी अगदी स्वच्छ असावे. तसेच आपल्या डोळ्यांवर स्वच्छ, थंड पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांमधील धूलिकण बाहेर टाकले जातात व ऍलर्जीचा धोका कमी होतो.
४) कोरफडीचा गर किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यांच्या बंद पापण्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
नेहमी लक्षात ठेवण्यासारखे डोळ्यात कचरा,धूळ, छोटे कीटक काहीही गेल्यास डोळे कधीही चोळू नयेत त्याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

इलेट्रीक व इलेकट्रॉनिक उपकरणा मुळे होणारा त्रास – हे युग आधुनिक युगाच्या नावाने ओळखले जाते. अशा या आधुनिक युगात सर्व कामे हे विदयुत उपकरणांच्या साह्याने केल्या जातात त्यामुळे आपणा सर्वांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या उपकरणांमध्ये मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही, LED लाईट तसेच ईतरही अनेक उपकरणांमुळे आपल्या डोळ्यांला विविध रोग व ऍलर्जीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यावर ताण येणे अशा विविध गोष्टींना सामोरे जावे लागते.
याकरिता उपाय-
१) विदयुत उपकरणांचा कमीत कमी वापर करणे.
२) मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही अशे उपकरण कमी वापरावे व याचा उपयोग करीत असतांना डोळे व या उपकरणा मध्ये अंतर ठेवावे.
३) आपले काम हे जर कॉम्पुटर वरच असेल तर त्या करिता काम करीत असतांना एकेका तासाने आपल्या डोळ्याला ५ मिनिटांची विश्रांती द्यावी. तसेच महत्वाचे म्हणजे कॉम्पुटर काम करणाऱ्यांनी गॉगलचा वापर करावा जो तुमच्या डोळ्यान वरील ताण कमी करण्यास मदत करेल.

अल्प निद्रे मुळे होणारा त्रास – या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ फारच अल्प आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धावपळी मुळे अल्प झोप घेतो त्यामुळे डोळ्यांचे विविध आजार जडतात. त्यामध्ये डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोळ्याची आग होणे असे त्रास उदभवतात. या कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
याकरिता उपाय-
१) कमीत कमी ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) दिवसातून ३ ते ४ वेळा थंड पाण्याने आपले डोळे स्वच्छ करा.
३) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

आहार – आपल्या जीवनात आहाराची फार महत्वाची भूमिका आहे त्यामुळे जेवण हे वेळेवर करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. आहारा मध्ये विविध मोसमी फळे घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर ज्यूस घेत असाल तर यामध्ये मोसंबी ज्यूस, गाजरचा ज्यूस, बीट ज्यूस घेतल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळू शकतो. तसेच हिरव्या पालेभाज्या, सलाद, अंकुरित धान्य यांचा समावेश आपल्या आहारात करावा.