वेशीवरचे भूत

गावाबाहेर तमाशा आलाय असे कुणी सांगितले तशी सगळ्यांची लगबग वाढली एक उत्सुकता लागली… कुणी वेळ कधीचा आहे तर कुणी काय तिकीट हाये या विचारात तसे तमाशा म्हटलं कि सर्व लहान मोठ्यांची उत्सुकता वाढणारच त्यात किशोर, जाक्र्या, सुन्या, मन्या, विराट्या, दिप्या सुद्धा उत्सुक झालेत लहान होतो तेव्हा पासून ऐकतोय कि तमाशा असतो लयच भारी असतो आता तर मी मोठा झालो आहे… आणि मित्रांना सांगू लागले कि चला लय दिवसानंतर मनाला गारवा मिळणार हिरवळ बघायला मिळणार आणि नयनसुख प्राप्त होणार तसे सर्व मित्रमंडळींनी तमाशाला जाण्याचे ठरवले. काढला सर्वांनी वेळ बसली पारावर बैठक सगळे एकत्र आले बऱ्याच दिवसांनी. त्यात काही वरिष्ठ महादू बुआ, जनाबुढा, मानकू, सोपान्या सायकलवाला, बबन्या दुकानदार बोलू लागले कि पोरहो असले व्यसन चांगले नाही तुम्ही जावा काम करा… पण हि पोर कसलं ऐकतात कुणाचं… हि तिथून गेली तर खरी पण त्यांच्या मनात तेच सुरु होत कि आपण पण एक दिवस नक्की तमाशाला जाऊ पाहू काय गंमत असते तर. आणि पोर कामाला लागली पण त्यांचे कान या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यातच मग्न होती. तेवढ्यात महादू बुआ बोलले कि राजेहो हा तमाशा आला नेमका कोणाच्या वावरात कि अखिण कुठी त्याची बंदी चौकशी करा पहिले. काऊन कि मागच्या टाइमले वेशीवरच भूत आडवं आलत अन लयच बेकार गोठ झालती बुआ दत्ता आबा एन वक्ता वर नसते आले त आज आपुन जितं नसतो. दत्ता आबा म्हणजे त्या गावातील जेष्ठ आणि समजदार त्यांचा दबदबा होता ते सर्वांना चांगल शिक्षण देत, संस्कार देत, किशोर आणि बाकी मुल त्यांच्या कडे नेहमीच जायचे ते श्रीदत्तात्रयांचे एकनिष्ठ भक्त. ते किशोरला खूप जीव लावत कधी प्रसाद, ताईत तर कधी अंगारा लावण्यासाठी येत. तसेच हि लोक तमाशाची चर्चा करत असताना दत्ता आबा तिथ आले तसे सर्व लोक चिडीचूप पण आबा बोलले की लोकहो जो इचार करताय तो आजच सोडा मागच्या वेळेस मी आलो होतो यावेळी येणार नाही. या बबन्याच्या नादाला लागू नका हा पहिलेच तामसिक आहे. याले चांगली आदत कोणतीच नाही. एखद्या दिवशी हा गड्ड्यात घालीन तुम्हाले. वाईट संगतीतले लोक ना स्वताच कधी भल करत ना दुसऱ्याच. आणि किशोर ला अंगारा व प्रसाद देऊन निघून गेले. लोक बोलू लागले काहो बुआ दत्ता आबा न त आपल्याले आताच सांगितल मंग द्याचा काय इचार सोडून. तितक्यात बबन्या बोलू लागला. फालतू इचार करू नका मस्त लय दिसाबाद तमाशा आला जाऊ पायाले, त्यात घरच्या बायायले अजिबात भनक नाई लागली पाहिजे तमाशाची नाई त आपली काई खैर नाई इतकच ध्यानात ठेवा. सगळे लोक उठले आणि माहिती काढण्यासाठी गावाबाहेर जाण्यासाठी निघाले. किशऱ्या आणि त्याचे मित्र पण निघाले यांच्या मागे कि हे वेशीवरच भूत काय भानगड हाये भो… ते भी पाहू अन बाई भी पाहू कोण हाये त… कशी दिसते त.. आणि सर्व पाठोपाठ निघाले. तेवढ्यात मोठी लोक जाऊन थांबलीत तसे पोर भी थांबलेत पाहू लागले समोरचे दृश्य काय भारी हायेत त्या बाई वा वा …. लयच झक्कास आणि बघितले तंबू भी लयच मोठा बांधेल हाये… अजून तर यायची तयारी भी व्हायची बाकी दिसते आजच आले वाटते हे लोक किशाऱ्या अन बाकी पोर बोलत होते. तेवढ्यात जनाबुढा विचारू लागले कि याचा टाइम काय राहीन…. तशी मावशी बोलू लागली कि टाईमच काय बुआ टाइम त रातच्याच असतो आणि पानाचा ईडा मावशीने तोंडात टाकला. तरी बी मी काय म्हणतो कि जरसाक लोकर नाई काय चालू हू शकत…. सोंगाड्या मधी आला अन बोलू लागला आता मावशीनं ईडा खाल्ला आता मावशी काई बोलणार नाई तुमच्याशी…… बबन्या बोलला तुमीच सांगा मंग… सोंगाड्या बोलू लागला नाई आरामातच होईन, बबन्या बोलू लागला कि बाई लय दिसान आला फड गावात. बाई बोलल्या काय सांगा तुमाले आज काल कोणी भी बलावत नाई अन पहिल्या सारखं नाई रायल आता बुआ… भविष्यात हे कला राईंन कि नाई देव जाणो.
आणि सोंगाड्या सर्वांना घेऊन तंबूत निघून गेला हे लोक निघाले तिथून आणि त्यांचे लक्ष त्या पडक्या स्मशानाकडे गेले ते दचकले कि आता रोज रातच्याला इथून जाण म्हणजे हे भूत काई परेशान न करो. तेवढ्यात सोपान्या बोलला कि हे पहा आपुन रोजच्या रोज त काई येऊ नाई शकत बुआ इतका पैसा नाई आपल्याजोळ उधळायले त्यामुळे आपुन सगळे एकाच टाइमले येऊ अन तमाशा पाहून जाऊ म्हणजे या भुताचा भी घोर होणार नाई आणि कोणाले माहित बी पडणार नाही. त्यात किशऱ्या बोलला कि मले कदी तुमीन संग येऊ देल नाई त मी तुमचं नाव काकुले सांगून दिन… सगळे बोलले कि अबे तुले माईत हाये काय किती परेशान होते माणूस… आमचं आमाले माईत आम्ही कशी करतो हे तारेवरची कसरत त. सगळ्यांनी विचार केला आणि फायनल झालं एकदाच कि सगळे संगच जाऊ पण पहिले त्या वेशीचे काई तरी करावं लागिन.. किशऱ्या बोलला कि मी लहान होतो तहा पासून एकून हावो कि त्या येशिवर भूत रायते पण तहा मले कोणी बी कैच सांगत नव्हतं पण आता तरी सांगा आता मले भेव वाटत नई. तसे सगळे शांत झाले व किशाऱ्याला शांत करून पटापट पाय उचलून चालू लागले तसे ते पारावरच थांबले. किशऱ्या ला काही सुचत नव्हते कि कोणाचं हाये ते भूत अन ते वेशीवर काऊन रायते अन हे लोक इतके काऊन भेतात त्याले.
दिवसा मागून दिवस जात होते आणि किशऱ्या तमाशाला जायची वाट बघत होता आणि त्याच्या आईला आबाला सर्वांना जो भेटेल त्याला वेशीवरच्या भुताची गोष्ट विचारायचा एक दिवस त्याचे आबा त्याला सांगू लागले कि काही वर्षा पूर्वी आपल्या गावात सोम्या नावाचा पोरगा राहत जाय… एक दिस तो रातच्या वावरातून चिंचा घेऊन येत होता त्याच्या सायकलवर हे भूत बसलत… अन त्याची सायकल उलट्या दिशेने चालत होती त्याले काही सुधरत नव्हतं तो घामाघूम झाला अन त्यानं ते सायकल सोडून देली अन कावऱ्या बावऱ्या सारखा पयतच सुटला जसा वेशीच्या आत आला तसा त्याचा त्या भूतान पिच्छा करण सोडून देल तहा पासून सारे लोक वेशीवर भूत हाये ते लोकायले धरते असे म्हणतात. पण काई दिसच तो सोम्या रायला गड्या त्याले रातच्या बेरातच्या सपन दिसे ले बिमार पडला ले औषध गोया खाल्ल्या पण काईच फरक नाई शेवटी गेला तो साऱ्यायले सोडून. त्यानंतर ले किस्से घडले लय लोकायले धरेल हाये त्या भूतान…… आणि गुलाबभाऊ बोलू लागले.
असाच एक किस्सा झाला होता गावात रेखीच्या लग्नाच्या वेळेस. रेखीच लगन लागल अन दोन दिसात तिच्या घरच्या बुआ ले या वेशीवरच्या भूतान धरलत. तो बुआ तिले घ्याले घरी आलता अन रातभर रायला आमच्या सोबत गप्पा केल्या अन पायटे निघीन त त्याच्या काय मनात आल काय माहित म्हणे मी तुमच गाव पाहू इच्छितो मंग दिसभर गावात हिंडला गाव पायल रात झाली म्हणे निघतो बुआ आमी आता आणि निघाला रात्री जसा वेशीच्या बाहीर गेला तसा वेशीवरच्या भूतान त्याला घोयसल.. रेखी उतरली बैल गाड्यातून अन चिंग पयत सुटली तशी गावात युनच थांबली भला मोठा आक्रोश कारे तिचा बुआ गावाबाहीर कुत्तळ्या सारखे आवाज करे भुके जोर जोरानं भूऊऊऊऊ…… भूऊऊऊऊ……. भूऊऊऊऊ असे त कदी मांजरी सारखे आवाज करे…. कोणी म्हणे पावन्याले पिशाच्च झोंबल…त कोणी म्हणे की हे वेशीवरच भूत हाये… बंद गाव ताटल्या वाजवत निघाल गावाबाहेर. तेव्हा बी त्या दत्ताआबा न केलत बुआ सार तो आबा ले अनुभवी माणूस हाये. त्यायन गावा बाहीर जाऊन धरल त्या पावन्याले अन दोन-चार लोकायन उचलल अन आणल न भो वेशीच्या आत अन इतक्या जोरयान बोंबलला तो पावना की चितच झाला. त्याले जडीबुटी चा काढा देला प्याले अन पावना काईच काईच करे… लय दिस त बिमारच होता अन एक दिस गेला बॉ सोडून बंद्यायले….आबा म्हणे की त्याच्या अंगाले लग्नाची हयद होती हयदीच अंग असताना त्यान गावाबाहीर हिंद्याले नव्हत पाहिजेत.
असे किती लोकायले धरल त्या भूतान अन कितीक बिमार पडले अन कितीक सोडून गेले. आज बी कोणी माणूस हिंमत करत नाई रातच्या वेशीबाहेर जाण्याची. किशऱ्या बोलू लागला आबा वेशीच्या बाहेरच काऊन धरते ते भूत वेशीच्या अंदर काऊन नाई येत. आबा बोलू लागले पोरा वेशीले लय महत्व हाये वेस आपली सीमा हाये जठलोक वेस हाये तठलोक देवाची कृपा रायते वेशीच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर गाव संपलं असा समज. गावाच्या बाहेर त्यायचच राज्य जंगल, जंगली जनावर, हे अतृप्त आत्मे हे बंदे गावाच्या बाहेरच रायतात म्हणून स्मशान भूमी गावाच्या भाईरच असते. म्हणून तुले सांगत असतो कि बाबू गावाच्या बाहीर जात नको जाऊ… दिवस पायन नाई…. टाइम पायन नाई…. बस चालले आपले पोराय संग कुठी बी. किशऱ्या थोडा भांबावला होता हे सगळं ऐकून… पण आबा मले भेव वाटत नाई… आबा बोलले पोरा संकट काय सांगून येत असते व्हय. संकट येते तहा समजते कितीही मोठा माणूस असो त्याची टरकतेच. ते सोड मले सांग तु आज येणार नाई काय तुई आई अन मी तर चाललो दत्ता आबाकडे भजनाले…किशऱ्या चाला आबा मी, सुन्या, जाक्र्या, मन्या, वीराट्या बंदे तयार हावोत आमी बी येतो तुमच्या संग…सगळे पोहचले दत्ता आबाच्या घरी अन बसले. सगळ्यांनी आबाला प्रणाम केला आणि अंगारा डोळ्याला,कपाळाला लावला. आणि एकू लागले. दत्ता आबा सद्गुण आणि अवगुण यांच्यातील भेद समजावून सांगत होते. अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह माया, आणि अहंकार हे ज्याच्याजोळ असतात तो माणूस न कधी स्वताची प्रगती करत न दुसऱ्याची. माणसान मर्यादेत रायल पाहिजेत. कधी अधर्माची पायरी चढू नये, देव-पूजा करत रहाव. ज्याच्या मुखी देवाचे नाम…तोच सुखी हाये. तेवढ्यात दत्ताआबा बोलले लोकहो आपल्या गावाच्या बाहेर तमाशा आलेला आहे त्याचा नाद करन वाईट गोष्ट आहे. चांगल्या माणसान त्याची पायरी चढू नये अशे उपदेश लोक ग्रहण करत होते. आणि रात्र झाली सर्व आबाला प्रणाम करून घराकडे निघाले. रात्र झाली होती किशऱ्या झोपी गेला. सकाळ झाली तसा बबन्या गोठ्यात किशऱ्या जोळ आला व सांगू लागला आज संध्याकाई जायचं हाये तयार रायजो. किशऱ्या आज थोडा लवकरच उठला तयार झाला आणि घरची नित्याची कामे करू लागला. आणि तो क्षण आला झाली संध्याकाळ भेटले सगळे पारावर. आणि वाट पाहू लागले बबन्याची. महादू बुआ बोलले की एन वक्तावर हा बबन्या कुठी गेला ?
वाट पाहून थकले तेवढ्यात सोपान्या आला अन बोलला की बबन्या वावरात जायेल हाये तो आपल्याले गावाच्या बाहेरच भेटीन… अठी टाइम लाऊ नका चाला आता. निघाले सगळे तेवढ्यात महादू बुआ बोलले कि चाला गडे हो भूक नसो पण शिदोरी असो आणि सर्वांना घेऊन मंदिरात गेले आणि पुजारी बुआ ला सांगितले कि बुआ आमच्या हातात गंडा बांधून द्या आम्हाला गावाबाहेर वावरात जायचं आहे. आणि तेवढ्यात तिथे काकू आल्या आणि त्या बघतील म्हणून सगळ्यांनी तो गंडा लपवला सर्व तिथून निघाले आणि चालू लागले तेवढ्यात वेस आली तसे महादू बुआ बोलले गडेहो मायी काई इच्छा होत नाई गावाबाहेर येण्याची मी चाललो घरी तुमाले यायचं असलं तर सांगा….हे कुत्रे पहा कशे बोंबलुन रायले….महाभयाण स्मशान शांतता हाये आज त…त्यात कोणी तरी म्हणे आज वावरत की आजची अमावस्या आहे. खरच आजचा दिस कोणता हाये लेकाचा रोजच्या पेक्षा जास्तच अंधार जाणवते.. अन साऱ्यात जास्त ज्याले घाई झालती तो बबन्या बी नाई आला आपल्या संग… जनाबुढा म्हणे काय भेत बे लहान हाये का तू आता चाल न मस्त मजा घेऊ. तस बी किती वर्ष झाले काई मनोरंजन झाल नाई…. महादू बुआ म्हणे नाई बुआ तुमी काय बी म्हणा माय मन म्हणते कि घरी गेलेलं बर राहीन…. मानकू तेवढ्यात बोलला बरबर हाये त्यायचं मी घरून निगतानाच बोललो होतो कि आजचा दिस भी काय सुदा नाई आपुन दुसऱ्या कोण्या दिशी जाऊ पण हा सोपान्या आयकत नव्हता. अन बबन्यान मले पायटीचं सांगून ठेवलंत कि मी वावरात जातो तुम्ही वेस वलांडली कि मले भेटा… आपुन त वेशीच्या बाहेर आलो पण हा बबन्या काई अजून आला नाई. तेवढ्यात १०-१२ काळ्या मंजरींनी त्यांच्यावर उद्या मारल्या सगळे घाबरले…. शेवटी किशऱ्या बोलला या बबन्यानच सांगितलं होत कि गावात तमाशा येल हाये म्हणून… आन हाच इतकी घाई करून रायला होता अन ऐन वक्तावर हाच गायब हाये मले काई अलगच वाटते यात… अन अश्या माजरीच आपल्यावर झेप घेण मले त काई भलताच संशय येऊन रायला. तेवढ्यात बबन्या आला…सारे लोक बोलले त्याले की हा टाइम हाये काय ? तुले टाइमाच काईच महत्व नाई. बबन्या म्हणे किती वाळखोचा वाट पाहून रायलो मी…आता जाऊद्या… टाइम लाऊ नका … चाला….. चाला हो …… टाइम लावू नका… बबन्याने सर्वांना पटवलं आणि चालू लागला. कुणालाच माहित नव्हते कि तो बबन्या हाये की वेशीवरच भूत. येणाऱ्या संकटाची कुणालाच चाहूल नव्हती….आणि एक भयंकर रात्र त्या सर्वांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

लय भारी च्या प्रमोशन दरम्यान १५ जखमी

अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी “लय भारी” चित्रपटाच्या प्रमोशन्स साठी औरंगाबाद मध्ये आला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जखमी झाले. औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्ये रितेश येणार अशी खबर मिळाल्याने अनेक तरुण-तरुणी मॉल मध्ये जमलेले होते. प्रोझोनचे तिन्ही जिने आणि फुटकोर्ट गर्दीने फुलून गेले होते. मात्र, रितेश आल्यानतंर त्याला एक नजर डोळा भरून पाहाण्यासीठी चाहत्यांनी रेटारेटी सुरु केली आणि गोंधळ उडाला. अनेकांचे कपडे फाटले तर, काहींचे महागडे मोबाईल आणि इतर वस्तू हरवल्या. मॉलमधील मुख्य स्क्रीनसमोर रितेश येऊन उभा राहिल्यानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. त्यातच हा प्रकार घडला. चाहत्यांची गर्दी एवढी होती की, उपस्थित असलेली पोलिस सुरक्षा व बाउन्सर कमी पडलेत त्याना गर्दी आवरने मुश्कील झाले होते.