गांधी घराणे कायमचे हद्दपार होणार

Buldhana: Stamps-of Gandhi-discontinue

घराणेशाही नुसार चालत आलेले गांधी ‘खानदान’ ने आपल्या कार्यकाळात आपल्या मनानुसार हवे तसे वागले आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांचे नाव दिसून येतेच. मग त्यांनी तसे कार्य केले नसले किंवा त्यांची लायकी नसली तरीही. उदाहरण म्हणजे “पप्पु”. परंतु त्या चुका सुधारण्याचे कार्य मोदी सरकार करीत आहे. आपल्या कार्यकाळात कॉंग्रेसने सुरु केलेल्या पोस्टाच्या तिकीटांवरून गांधी घराणेलवकरच हद्दपार होणार आहेत. काँग्रेस सरकारने सुरू केलेली तिकिटांची मालिका बंद करून केंद्रातील मोदी सरकार आता २४ महान व्यक्तिंचे फोटो असलेली पोस्टाची नवी तिकिटांची मालिका सुरू करणार आहे.

युपीए सरकार ने २००८ मध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो असलेली दोन तिकिटं पोस्टाने सुरू केले होते. पण लवकरच आता ही तिकिटं बंद होतील. जुलै २०१५ पासून इंदिरा आणि राजीव गांधी यांची फोटो असलेली पाच रूपयांची तिकिटं छापण्याचं पोस्टाने बंद केलं आहे. मेकर्स ऑफ इंडिया (भारताचे निर्माते) या शिर्षकाने ही पोस्टाची तिकिट मालिका तयार होणार असून एक तिकीट योग तसेच इतर तिकिटे सरदार वल्लभ भाई पटेल, बाळ गंगाधर टिळक, सुभाष चंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, भगत सिंग, रविंद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, सुब्रमण्यम भारती, पंडित रवी शंकर, भिमसेन जोशी, एम.एस, सुब्बालक्ष्मी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे फोटो असेलेली ही नवी तिकिटं लवकर सरकार छापणार आहे. हे निश्चित चांगले पाऊल आहे. कदाचित लवकर आपल्याला चलनी नोटांवर सुद्धा ‘गांधीगिरी’ संपून महापुरुषांचे फोटो दिसू शकतील