ब्लॅक बॉक्स चे गुपित

Buldhana News

जग अधिक आधुनिक होत आहे आणि प्रवास अधिकच सुखकर होत आहे. त्यांत विमानप्रवास सुद्धा सामन्याच्या आवाक्यात आल्याने रोज कित्येक प्रवाशी विमानाने ये जा करतात. अर्थात प्रवाशी असो वा लष्करी विमाने आता महत्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर समजून येईल की विमानांच्या अपघातात सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. त्यातसुद्धा लष्कराच्या विमानांची अपघाताची संख्या जास्त आहे. अनेकदा अपघात का होतो हे सुद्धा कळून येत नाही कारण विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ सापडत नाही. आज आपण जाणून घेवू ह्या ‘ब्लॅक बॉक्स’ बद्दल.

विमानात नारंगी रंगाचे एक इलेक्ट्रोनिक रेकोर्डिंग यंत्र असते त्यालाच आपण ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणून ओळखतो. दुर्घटना झाल्यानंतर ह्या ‘ब्लॅक बॉक्स’चा उपयोग अपघाताचे कारण शोधण्यासाठी होतो. फ्लाईट डाटा रेकोर्डर (FDR) म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’ विमानातील प्रत्येक हालचालींचे रेकोर्डिंग करून एका पैरामीटर वर जतन करून ठेवतो. तसेच द कॉकपिट व्होईस रेकोर्डर (CVR) हे यंत्र कॉकपिट मधील हालचाली तसेच वैमानिकांचे संभाषण सुद्धा रेकॉर्ड करत असते. अश्या प्रकारे विमानात होत असलेल्या सर्व घटनांचे जतन या दोन्ही ‘ब्लॅक बॉक्स’ द्वारे केल्या जाते. त्यामुळे नंतर अपघाताचे मुळ कारण शोधण्यास मदत होते.

‘ब्लॅक बॉक्स’ चा शोध

‘ब्लॅक बॉक्स’ चा शोध ऑस्ट्रेलिया च्या डॉ. डेविड वारेन यांनी लावला. सन १९५० ला डॉ. वारेन यांना मेलबोर्न येथे एरोनोटिकल रिसर्च लेबोरेटरी येथे कार्यरत असताना ‘द कॉमेट’ या विमानाच्या रहस्यमयी अपघाताचा शोध घेणाऱ्या टीम चा सदस्य होण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांना समजले की, जर अपघातापूर्वी विमानातील परिस्थिती काय होती हे जर समजले असते किंवा ते रेकॉर्ड झालेले असते तर अपघाताचे निश्चित कारण कळले असते. त्या नंतर त्यांनी यावर कार्य करण्यास सुरुवात केली आणि त्याचा पहिला डेमो १९५७ ला दिला. ह्या डेमोच्या यशस्वीतेनंतर १९६० नंतर ऑस्ट्रेलिया ने प्रत्येक विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ अनिवार्य केले. ह्या यंत्रामुळे आज जगातील प्रत्येक विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ हे यंत्र दिसून येते आणि ते आपले कार्य चोखरित्या बजावत सुद्धा आहे. अपवाद ‘मलेशिया एयरलाईन्स; सारख्या घटनांचा आहे. ज्यामध्ये विमान हे समुद्रात कोसळते आणि त्यामुळे ‘ब्लॅक बॉक्स’ मिळवणे असंभव होते. त्यामुळे विमानात नेमका काय बिघाड झाला हे कळू शकत नाही. त्यामुळे ह्यावर सुद्धा तोडगा काढण्यासाठी इलेक्ट्रोनिक आणि रेडीओ चे प्रोफेसर ‘डेविड स्टेपल्स’ यांनी हा सर्व डाटा ‘क्लाउड ‘ वर संग्रहीत करण्याचा विचार मांडला आहे. ह्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होवून लवकरात लवकर रहस्यमयी अपघातांचे कारण कळू शकेल. सध्या तरी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. डेविड स्टेपल्स’ यांचा प्रस्ताव ‘ब्लॅक बॉक्स’ च्या भूमिकेत मोलाचे सहकार्य करू शकतो हे मात्र खरे.

Buldhana News,Black Box,Buldhana district website

रेल्वे च्या शेवटच्या डब्यावर 'एक्स' अक्षर का असतं ?

Train in Buldhana

रेल्वेचा शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ अक्षर का असतं?

आपण रेल्वे ननेहमी बघतो. अनेकांना रेल्वेचा प्रवास खूप आवडतो. एकाला एक जोडलेले डबे, इंजिनच्या शिटीचा आवाज,गार्ड च्या हातातील कंदील अश्या अनेक गोष्टी आपल्याला कुतुहलाच्या होत्या आणि आहेत. तशीच एक गोष्ट म्हणजे रेल्वे ला असलेल्या शेवटच्या डब्यावर असलेल्या ‘एक्स’ अक्षराची. आपणास माहिती आहे का रेल्वेचा शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ अक्षर का असतं? तर चल जाणून घेवूया.

रेल्वे ला अनेक डबे जोडलेले असतात परंतु शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ हे अक्षर असत. इतर डब्यावर असे कुठलेही सांकेतिक चिन्ह नसते. शिवाय या अक्षराच्या खाली उजव्या बाजूला ‘LV’ हे अक्षर असतात आणि मधोमध एक लाल लाईट चमकत असलेला आपण बघितलेला असेलच. याच काय महत्व आहे, आणि
का असतात हे चिन्ह याची आपण माहिती मिळवली नसेल तर ती जाणून घेवू.

‘एक्स’ या शब्दाचा अर्थ म्हणजे हा संकेत असतो की, हा रेल्वे चा शेवटचा डबा आहे. या ‘एक्स’ शब्दाचा उपयोग सकाळच्या वेळेस तर त्या खालील ‘लाल दिव्या’ चा उपयोग रात्री होतो. एखाद्या संकटकाळात अथवा अपघात किंवा इतर वेळेस डब्याच्या शेवटी हा ‘एक्स’ मार्क दिसून येत नाही अथवा शेवटचा डबा जोडलेला नसतो. असे असल्यास ताबडतोड रेल्वे विभागास याची माहिती दिली जाते आणि अपघात टाळण्यास मदत होते. या शिवाय डब्यावर आणखी अक्षरे असतात ती म्हणजे ‘LV’ चा अर्थ होतो ‘लास्ट व्हिकल’.

या नंतर जेव्हा पण
तुम्ही रेल्वे ने प्रवास कराल तेव्हा याकडे लक्ष असू द्या आणि अखेरचा डबा निश्चित बघा. ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचावा जेणे करून त्यांना सुद्धा हे गुपित कळेल

हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला

khamgaon jalna railway route sanctioned in Buldhana

अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य स्थितीत असेलेल्या रेल्वे च्या प्रश्नास सोडवण्यास त्यांचा अधिक कल होता.

खामगाव – जालना रेल्वे झाल्याने विदर्भ आणि मराठवाडा यांस जोडणारा हा एकमेव मार्ग होणार असून जिल्ह्यास विकास कामास मदत होणार आहे. अनेक प्रवाशांनी लावून धरलेली खामगाव – जालना रेल्वे मार्गाची मागणी अखेर पूर्ण झाली असून आनंद व्यक्त होत आहे. अखेर बीजेपीच्या काळात हा प्रश्न मार्गी निघाल्याने खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांना ही अनोखी भेट दिली आहे. खामगाव – जालना रेल्वे मार्गास साधारण ३००० कोटी खर्च अपेक्षित आहे

महाराष्ट्राच्या वाटेस या वेळी खामगाव – जालना रेल्वे मार्गासह पुणे-नाशिक 265 किमी प्रकल्पाला मान्यता, वैभववाडी-कोल्हापूर 107 किमी, जळगाव-भुसावळ चौपदरीकरण 24 किमी, दौंड-मनमाड दुपदरीकरण, मनमाड-जळगाव तिसरी लाईन 160 किमी, वर्धा-नागपूर चौपदरीकरण 76 किमी इंदौर-मनमाड व्हाया मालेगाव 368 किमी, लातुर-नांदेड व्हाया लोहा, गडचिंदुर-आदिलाबाद 70 किमी आदि मार्गांवर रेल्वे चालू करण्यात आली आहे. मागच्या बजेट प्रमाणेच यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. मागील बजेट मधील १३९ योजनांना सुरुवात झालेली आहे.