कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

Official website of Buldhana

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना मालठाना येथे घडली आहे. ४ पैकी ३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एक अत्यवस्थ आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या ग्राम मालठाना येथील मसाने ह्या आदिवासी शेतकरी कुटुंबीयाने आज कर्जाच्या ओझ्यापायी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत. मसाने कुटुंबाकडे कडे एक एकर ,शेती आहे. त्यांवर हे लोक गुजराण करायचे परंतु त्यांच्यावर एक लाखाचं कर्ज होत. हे फेडता येण शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या कुटुंबातील दिनेश मसाने, ३५, लक्ष्मीबाई मसाने ४०, जितेंद्र मसाने १७ यांची प्राणज्योत मालवली आहे तर न्यानसिंग मसाने ७०, यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.