संग्रामपूर येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

आरक्षण आणि कोपर्डी येथील घटनेतील आरोपीना लवकरात लवकर शिक्षा होणे यासारख्या मागण्यासाठी काल संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल आणि कारामोडा फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सादर रस्ता रोको करण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे जमलेले कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने जळगाव जामोद, तेल्हारा आणि शेगाव कडे जाणारी वाहतूक बंद होती. सोबतच करमोडा फाट्यावर सुद्धा मराठा समाजाच्या युवकांनी रास्ता रोको केला होता. यावेळी तांमगाव पो. स्टे . चे बी. आर. गीते यांनी परिस्थतीत नियंत्रणात ठेवली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घेतला नाही .