संग्रामपूर येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

आरक्षण आणि कोपर्डी येथील घटनेतील आरोपीना लवकरात लवकर शिक्षा होणे यासारख्या मागण्यासाठी काल संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल आणि कारामोडा फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सादर रस्ता रोको करण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे जमलेले कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने जळगाव जामोद, तेल्हारा आणि शेगाव कडे जाणारी वाहतूक बंद होती. सोबतच करमोडा फाट्यावर सुद्धा मराठा समाजाच्या युवकांनी रास्ता रोको केला होता. यावेळी तांमगाव पो. स्टे . चे बी. आर. गीते यांनी परिस्थतीत नियंत्रणात ठेवली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घेतला नाही .

वरवंट बकाल येथे आज 'बेटी बचाव' आणि 'व्यसनमुक्ती' अभियान

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि. १३ रोजी मंडळातर्फे ‘बेटी बचाव अभियान’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यावर आधारित गीतगायन आणि नाटिकेचे आयोजन केले आहे.

आज रात्री ८:३० वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन नवयुवक गणेश मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नवयुवक गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

buldana news

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, प्रश्नमंजुषा, व्यसनमुक्ती, सर्पमित्रांचे व्याख्यान, बेटी बचाव , आंबा बरवा येथील पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच भजन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

५ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता १५ सप्टेंबर ला बक्षीस वितरण कार्यक्रमाने होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे रविवार ११ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मंडळाकडून ६०-६५ युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटक संतोष टाकळकर, कृऊबासचे उपसभापती संजय राठोड यांच्या उपस्थितीत गणेश टापरे, प्रतीक राठी, राजू कुयटे, विनोद टाकळकर, गणेश अस्वार, सागर शेगोकार, नंदकिशोर राठी, चेतन बकाल, नितीन टाकळकर, जयेश दातार, वैभव डाबरे, निलेश भोपळे, सागर रौदळे इ. युवकांनी रक्तदान केले.