श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सव

दुर्गामाता उत्सव

कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा अंतर्गत श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सवाचे बुलडाण्यात आयोजन करण्यात आलेले आहे. हा उत्सव ३ दिवस म्हमजेच दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समितीने सर्व भाविक-भक्तांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले आहे तरी सर्व बुलडाणा वासियांनी या ३ दिवसीय उत्सवामध्ये सहभागी व्हावे.

दिनांक २९ डिसेंबर २०१८ शनिवार रोजी, मार्गशीष वद्य, सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत.
दशविध स्नान,
पुण्याहवचन,
प्रायश्चितत होम,
मातृकापुजन,
मंडप प्रवेश,
नंदश्रध्दांत कर्म,
गणपती पुजन.

दुपारी २ ते ५ पर्यंत
देवतस जालाधीवास नंतर वास्तू मंडल,
योगीनी मंडल, क्षेत्रपाल मंडल,
मुख्य मंडल स्थापन सप्तशती पाठ.

दिनांक २९ डिसेंबर २०१८ शनिवार रोजी दर्शन सोहळा सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत.

महाआरती दररोज सायंकाळी ७ वाजता.

टिप – दिनांक २९ डिसेंबर शनिवार रोजी पारंपरिक वेषात लाल साडी परिधान करून सहभागी व्हावे.

विनीत तथा आयोजक
कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा
ज्या भक्तांना यज्ञ विधी, महाआरती व महाप्रसादाकरिता दान द्यावयाचे असेल त्यांनी मंदिर समितीशी संपर्क करावा.
मो. नं. ९४२२१८११५९, ९४२१३९३८८७, ९८३२३६४५५०

उद्या बुलडाण्यात मशाल मार्च

बुलडाण्यात बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समिती अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी गांधी जयंती निमित्य दारूमुक्तीसाठी मशाल मार्च चे आयोजन करण्यात आलेले आहे.

महात्मा गांधी पुतळा (जि. प. बुलडाणा) येथून हुतात्मा स्मारक पर्यंत हा दारूमुक्तीसाठी मशाल मार्च निघणार असून संध्याकाळी ६ वाजेला मार्च ला सुरुवात होणार आहे. बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समितीने राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थातून दारूला हद्दपार करण्याच्या निर्धारासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना, युवक-युवती, पुरुष-महिला तसेच संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याच्या जनतेला आवाहन केले आहे की हजारो-लाखोंच्या संख्येत या मध्ये सहभागी व्हा. ज्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थातून दारूला हद्दपार करता येईल.

 

संपर्क : ९८२२८५६१३२, ९६३७२१९१०७, ९०११०४४८५३.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात व्यवस्थापक पदासाठी भरती

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे सध्या बुलडाणा, जालना, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपुर, औरंगाबाद व वाशिम या ठिकाणी व्यवस्थापक (Manager) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. (Contract Basis) कंत्राटी पद्धतीने 05 वर्षे करीता एकूण १६ जागांकरिता भरती करण्यात येणार असून त्यासाठी उमेदवार हा Civil Engineering (BE) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास सम्बंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव असावा. उमेदवारास संगणकाचे ज्ञान (Excel, Powerpoint ) असणॆ आवश्यक आहे.

पद नाम (Post Name) : व्यवस्थापक
जागा तपशील (Post Details) :
खुला (Open) – ०८ जागा
अ.जा. (SC)- ०२ जागा
अ.ज. (ST)- ०१ जागा
वि.जा.(अ) (VJ-A)- ०१ जागा
भ.ज.(ब) (NT-B) – ०१ जागा
इ.मा.व. (OBC)- ०३ जागा

वेतनश्रेणी : ठोक वेतन : दरमहा रु.50,000/- + शासकीयनियमानुसार घरभाडे भत्ता.
वय मर्यादा (Age Limits) : खाजगी क्षेत्रातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 35 वर्षे पर्यंत. शासकीय / निमशासकीय / केंद्र शासनातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 62 वर्षे पर्यंत.

उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पोच देय डाकेने सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital,
Bandra (W), Mumbai – 400 050.

यासंबंधी अधिक माहितीसाठी www.msrdc.org ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट दयावी.  जाहिरातीसाठी दिलेली लिंकवर क्लिक करा अथवा आपल्या ब्राऊजर मध्ये ओपन करा.
http://www.msrdc.org/Site/Upload/Images/ManagerforNMSCEW.pdf

संकल्प निरोगी जीवनाचा

आजचे आपले दैनंदिन जीवन हे धावपळीचे आहे त्यात दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. दिनचर्या पळताना वेळेचे योग्य नियोजन होत नाही व दिनचर्या कोलमडते. त्यात विविध आजारांची भर पडते. अनेक वेळा आपण निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम, योग-प्राणायाम, स्वास्थवर्धक आहार यांचा संकल्प करतो पण कालांतराने तो ही कोलमडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे, सुपाच्य आहार घ्यायला पाहिजे हे सर्वांना पटते. अशात प्रत्येकाला असे वाटते की आपण निरोगी राहायला पाहिजे आपल्याला कुठलेच आजार होऊ नये. आपण स्वस्थ असावं. पण आपण स्वस्थ राहण्यासाठी खरोखर प्रयत्नरत आहोत का ? निरोगी जीवन जगण्यासाठी काय करायला पाहिजेत याबाबत आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

रोज सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा. “लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धन संपत्ती मिळे” असे आपण ऐकूनच आहोत. सकाळचे वातावरण सात्विक आणि शुद्ध असते पवित्र वायू सर्वत्र व्याप्त असतो. वातावरण शांत आणि थंड असते.

रोज सकाळी अनशापोटी पाणी पिण्याची सवय लावावी. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी पाणी पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते व निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे.

पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचे संबंधी समस्या दूर होतात, भूक वाढते, पोटाच्या समस्या दूर होतात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

नित्य सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावा. सकाळची हवा शुद्ध असते आणि अशा शुद्ध हवेत फिरायला जाणे स्वास्थासाठी हितकारक असते.

किमान अर्धा तास तरी चालावे, चालताना ताठ चालावे, श्वास नाकानेच घ्यावा. तोंड बंद ठेवावे. सकाळची शुद्ध हवा आरोग्यासाठी हितकारक असते. त्याचा स्वास्थावर चांगला परिणाम होतो.

रोज स्वच्छ व सुती कपडे परिधान करावे. व योगासन प्राणायाम करावे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त असा व्यायाम आहे.

थंड पाण्याने अंघोळ करावी. यामुळे वजन नियंत्रित राहते, रक्तभिसरण क्रियेत वाढ होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आपल्या श्रद्धेनुसार रोज सकाळी देवाचे स्मरण करावे प्रार्थना करावी. थोडेसे ध्यान करावे मान एकाग्र करावे. थोड मौन राहावे.

रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय लावावी त्यामध्ये अंकुरित धान्य, हिरव्या पालेभाज्या सलाद, मोसमी फळे यांचा समावेश असावा. अति थंड पदार्थ खाणे टाळावे.

रोजच्या जेवणानंतर शतपावली करावी. जेवणानंतर सावकाश चालल्याने पचन शक्ती सुधारते. खाल्लेले पचायला मदत होते. अपचन सारख्या समस्या होत नाहीत. वजन कमी करण्यास उपयुक्त.

रोज सायकल चालवावी यामुळे पायांचा शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होईल.

पोहणे ही एक चांगली सवय आहे पोह्ल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. मैदानी खेळ खेळवीत यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

जेवणा नंतर दुपारी झोपू नये. दुपारी झोपल्याने रात्री झोपेत अडथळा येतो रात्री लवकर झोप लागत नाही. व दिनचर्या बिघडते.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्याचा आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

बदकावरील झक्कास निबंध

एका मुलाचा बदकावर झक्कास निबंध

बदक लय चांगला असतो, तो पाण्यात चांगला दिसतो.
बदक मले खुप आवडतो. काऊन कि तो उल्साक असतो.
त्यो पाण्यात पवतो. मी भी पाण्यात पवतो.
मी रोज पाणी पितो, पाण्यानेच आंग धुतो.
बदक तर लय खेप आंग धुतो. त्याले कोणी हटकत नाय.
मीनं ले खेप आंग धुतलं त बोंबलते मायी माय.
आमचे मन्नू काका दारू पितात व गटाऱ्याच्या पाण्यात लोळतात.
पण बदक सफेद असतो म्हणून त्याले पाण्यात सोळतात
बदक सफेद असतो, दूध भी सफेद असते मी रोज दूध पितो.
मी चांगला दिसतो, बदक भी चांगले दिसते, बदक रोज पाणी पितो.
बदक पाण्यात तरंगतो, आबा जवळ काडी हाये,
काडी भी पाण्यात तरंगते. पण मी पाण्यात तरंगत नाई.
काडीने आबा बकऱ्या चारायले नेतात. जंगलातून काड्या घरी आणतात.
कधी मले त्याच आणलेल्या काडीने हाणतात.
हं आणखी कबुतर सफेद असते, ते माया घरावर येऊन बसते.
पण बदक माया घरी येत नाय काऊन कि त्याले पाण्याच्या बाहेर जा वाटत नाय. .
बदक लय दूर उडत नाय म्हणून ते माया घरी येत नाय.
ईमान भी हवेत उडत ते भी सफेद हाय.
बदक काया भी असतो त्यो पाण्याने आंग धूत नाय,
नुस्त पाण्यात पवते म्हणून त्यो काया हाय.
मले दोन पाय आहे बदकाले भी हाय.
मी दोन पायावर चालतो बदक भी दोन पायावर चालतो.
मले बदक लय आवळते काऊन कि तो लय सुंदर दिसतो.
झाला माया निबंध लिहून.

दानवीय असुरी शक्ती झाली नतमस्तक

वेशीवरच भूत अंतिम भाग
गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. तरी तिथे दानवीय शक्ती वावरत होती आणि सर्व लोक त्या अमानवीय शक्ती चा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे.

तसे विराट बोलला कोण हाये बे तो धिप्पाड पोऱ्या अन तुले कसा काय वयखते ? किशोर म्हणे अबे मले काय माहित कोण हाये तर मले त आज या भूतायन मांगचा जनम भी सांगितला की मले दोन भाऊ होते अन मोठा भाऊ राज्या होता अन लहाना भाऊ बिघडेल होता पण मले थोडी आठवते मांगचा जनम अशीन भी.. नशीन भी. नाहीतन हे भूत खोट बोलत असतीन आपल्याले फिरवत असतीन यायची प्रवृत्तीच आहे ती. तिकडे भूत आणि त्यांचे राक्षस कोणी आकाशी पाळण्यात तर कोणी कुठ जाऊन बसले. आणि युद्धाची तयरी करू लागले. महादू बुआ बोलले काय होवून रायले हे सायाचे काहीच समजून नाई रायल मले…. माय त डोक्स बंद बधीर झाल लेक हो. मांगच्या जन्मी काय पाप केलत की हा दिवस पाह्याले भेटला…!!
सुन्या बोलला आपल्या सगळ्यांची पळता भुई थोडी झालेली आहे……टांगा पलटी अन घोडे फरार अशी अवस्था त्यात आपुन सगळ्यांन जगण्याची आशा सोडलेली. सर्वांना कळून चुकले आज की आज आपली विकेट पडणार कुणाची आधी त कुणाची नंतर… पण नक्कीच पडणार रे भो.. जीव जाते आज आपला.
जाक्र्या म्हणे मले फकत अठीसाक तो पोऱ्या लय पटला…. वीराट्या बोलला कोनसा बे तोच धिप्पाड पोऱ्या…..किशऱ्याले कसा म्हणे मेरे यार….. मेरे भाई…. मेरे दोस्त अन गपागप बाटलीत भूत कोंबे.
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली. तसे सर्व ओरडायला लागले. बुडा रगत ओकू लागला. त्याले वाचवणार तितक्यात जाक्र्याच्या कानाखाली कोणी मारली अन जाक्र्या बेशुद्ध पडला. सगळे सैरा वैरा पळू लागले. आणि महादू बुआ पळत असताना एका भुताने बुआ चा पाय पकडला अन फेकल बुआले बुआ पडला कुपात जाऊन. साऱ्या अंगात काटे घुसले. सोपान्याच्या पायाचे लचके कोल्हे तोडत होती… महाभयंकर तो आवाज आणि सगळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. रात्रीचे अडीच वाजले असावेत असे मन्या बोलला. आज आपण वाचणार की नाही हे तर माहित नाही पण इकडे तिकडे पळाल्या पेक्षा यांच्याशी दोन-दोन हात करूनच मरू. किशऱ्या म्हणे बरोबर आहे मन्याचे हि वेळ इकडे तिकडे पळायची नाही हि वेळ आहे एकत्र येण्याची आणि गुरुमंत्राचा जप करण्याची किशऱ्याने सर्वांना एकत्रित केले आणि सर्व एकाजागी बसून नामजप करत होते तेव्हा त्यांना कळल की असे केले की आपल्याला कुणी मारत नाही. आणि ते तेच करू लागले. आणि होत असलेल्या वेदना सहन करू लागले.
आणि त्यांची प्रतीक्षा संपली तिथे दत्ताआबा पोहचले.
त्यांनी सर्वात आधी गावकऱ्याना सांगितले की मी जसे सांगतो तसे करा. इथे मोठमोठी राक्षस, असुर, दैत्य, दानव उपस्थित आहेत. त्यामुळे थोडीशी चूक सर्वांचा अंत करु शकते. आबांनी सर्वांच्या बाजूला एक रिंगण आखले व सर्वांना सांगितले की या रिंगणाच्या बाहेर कोणी निघणार नाही. आणि सर्व लोक त्यात बसलीत आणि दत्ताआबा रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्या धिप्पाड पोराला व दाढी वाल्या बुआ ला काहीतरी सांगत होते हे तीघ तिथे उभे राहून यांनी त्या राक्षसराजला चुनोती दिली आणि आबा ने शंख वाजवला तसे राक्षसांनी सुद्धा किंचाळायला सुरुवात केली आणि यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले ते एकमेकांवर वार करू लागलेत राक्षस चमकणारे गोळे फेकत होता तसे आबा त्यावर भस्म फेकत होते. असे हे खूप वेळ चालले… तिकडे धिप्पाड पोरगा भूत बाटलीत कोंबे…दाढी वाला बुआ त्या चूडेल, डाकिन. आग्या, वेताळ यांच्यावर धावून जाये. किशऱ्याला व बाकी रिंगणात बसलेल्याना काम दिल होत की गोवऱ्या जाळायच्या व सर्वत्र धूर करायचा. त्यात थोडे जडीबुटीची पावडर टाकायची. सर्व धूर करण्यात व बघण्यात मग्न होते सर्वांना छोटे छोटे कापडांचे तुकडे दिले होते ते सर्वांनी मनगटावर बांधले व सर्वांनी जोरजोरात ईश्वराचा नामघोष सुरु केला सर्व भूत प्रजाती हतबल झाल्या…. सर्व दत्ताआबाला विनवणी करू लागल्या की आम्ही परत अशे शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. खोट-नाट बोलून लोकांना फसवणार नाही आणि आजच्या सारखे कुणाला कधीच त्रास देणार नाही. आम्ही शरण येतो आम्हाला क्षमा करा. तुमची शक्ती आमच्या पेक्षा महान आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही परत गावावर आमची छाया पडू देणार नाही. आम्ही जंगलातच भटकत जाऊ. आम्ही जेवढ्या लोकांना त्रास दिला पछाडल त्यांना सोडून देतो. पण आम्हाला आमची हि सजा पूर्ण करू द्या. नाहीतर विधाता रागवेल. शेवटी आबा बोलले की या वेशीवरच्या भूतामुळे आमचा सर्वांचा लाडका दिप्या गेला त्यामुळे मी या भुताला क्षमा नाही करू शकत आणि आबाने वेशीवरच्या भुताला नष्ट केल. किशाऱ्या व सर्व दिप्या गेल्यामुळे शोक करू लागलीत व सर्व स्वताला दोष देऊ लागली…आबा बोलले पोर हो तुमच्या क्षणिक सुखाच्या नादात तुमच्या व्यसना पाईच आज दिप्या गेला. पण दिप्या काही काळानंतर परत येईल जनम घेऊन. राक्षसराज ला सुद्धा पश्चाताप होत होता. आबा बोलले की राक्षसराज तुम्हाला खरोखर तुमची चूक मान्य झालेली दिसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा अधर्माने कितीही पायमूळ पसरली तरी धर्माला ती परास्त करू शकत नाही. असत्य कितीही हुशारीने बोला ते सत्य लपवू शकत नाही. आबा लोकांना उद्देशून बोलले की लोकहो क्षणिक सुख शेवटी क्षणिकच असते. ते परम शांती कधीच देऊ शकत नाही.
किशोर बोलू लागला त्याने आबाचे पाय पकडले व क्षमा मागू लागला आणि बोलला मी आज तुम्हाला व सर्वांना साक्षी मानून शपथ घेतो की आजच्या नंतर कोणत्याच गलत गोष्टीत मन ठेवणार नाई. अन आबा जे सांगतात तेच करत जाईन. व किशोर ने शपथ घेतली. आबाला त्यांची नम्रता पाहून चांगले वाटले व आबाने किशोरला सांगितले की बाळ किशोर रडू नकोस शोक आवर स्वताचा एक दिवस हा दिप्या परत येईल दुसऱ्या कुठे तरी जनम घेऊन…आणि तुला तो परत मिळेल. तेव्हा त्याचा खूप लाड कर…आणि आज जे घडले असे कधी कुणासोबत घडणार नाही यावर कार्य कर…यालाच ध्येय समज आणि रक्षणकर्ता हो..! परत एकच सांगू इच्छितो हा तमाशा एक क्षणिक सुख आहे… आणि तुम्ही शहाणे असते तर तुम्ही त्याची पायरी चढले नसते. व्यसन हे कोणतेही असो ते शेवटी घातच करते म्हणून आजच याच ठिकाणी किशोर ने घेतली तशी शपथ घ्या की कुठल्याही क्षणिक सुखाच्या नादाला लागणार नाही आणि कुणाच्याही सांगण्यावरून कोणतच व्यसन करणार नाही. एवढी मोठी राक्षसांची, भूतांची प्रजाती त्यांच्या फालतूच्या अहंकारा पायी नष्ट होणार होती. ईश्वराला शरण जा….त्याची महिमा खूप मोठी आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच मी आज तुम्हा सर्वांचा जीव वाचवू शकलो आणि शेवटी अमानवीय शक्ती दैवी शक्तीच्या पुढे हरली आणि नतमस्तक झाली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

खडूस डिग्याची फजिती

खडुस डिग्या नेहमी मुलांवर ओरडत असायचा. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.
एके दिवशी डिग्या डब्बूच्या घरी गेला.

खडुस डिग्या – डब्या पोरा मले लय जोराची तहान लागली आहे, जरा मले पाणी पाजत काय ??

डब्बू – पाणी तर नाही आहे माया घरी, नळ नाही आले. पण लस्सी आहे. चालेल काय …??

खडुस डिग्या (खुश होऊन) : वा वा चालेल की… हे त लयच मस्त जमलं !

डब्बू – लस्सी घेऊन येतो आणि डिग्या हावरटासारखा पाच लोटे लस्सी पितो.

खडुस डिग्या – डब्ब्या, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही काय रे…??

डब्बू – पितात तर, सर्वच जण पितात. पण आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.

खडुस डिग्या – संतापून…. हाता मधला लोटा जोरात जमीनीवर फेकून देतो.

डब्बू (रडत रडत) – मम्मी ह्या डिग्यानं आपला लोटा फोडला, आता आपुन Toilet ले काय घेऊन जायचं….??

खडुस डिग्या वर्षभरा पासून उलट्याच करत आहे. हा हा हा….

शेराले सव्वाशेर

आबा – अम्या, पिंट्या, रज्या मी जे इचारतो ते लक्ष देऊन ऐका .

पोर – लक्ष देऊनच ऐकत असतो आम्ही बोला तुम्ही.

आबा – पोर हो मले सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?

पोर (एका स्वरात) – लोखंड

आबा – दोघांचही वजन एक किलोच हाये त मंग लोखंड कसं जड होईन ?

अम्या – नाही आबा लोखंडंच जड हाये.

आबा (गोंधळलेल्या स्वरात) – अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहीन न.

पिंट्या – नाही आबा लोखंडंच जड राहीन

आबा (रागवून) – अरे लेकहो दोघायचही वजन सारखंच आहे.

रज्या (हसत हसत ) – तुम्ही मले एक किलो कापूस फेकून हाणा, मी तुमाले एक किलो लोखंड फेकून हाणतो.
मंग समझीन तुमाले काय जड हाये त.

आबा मंदातूनच उठले अन झाले बातच फरार….

अम्या, पिंट्या आणि रज्या हसुन हसुन बेजार… हा हा हा

 

आपल्या मुलीस एका बापाचे सुंदर उत्तर

एका मुलीला तिच्या वडीलांनी ३५,००० चा Mobile भेट दिला.
दुसर्‍या दिवशी तिला विचारले. Mobile मिळाल्यावर तु सर्व प्रथम काय केले?

मुलगी – मी Scratch Guard लावला आणि Cover बसवले.
बाप- तुला अस करण्यास कोणी Force केला का?
मुलगी – नाही.
बाप – तुला अस वाटत नाही का की तु Manufacturer चा Insult केलाय?
मुलगी – नाही. उलट Manufacturer ने Cover आणि scratch guard लावणे Recommend केलय.
बाप – Mobile स्वस्त आणि दिसायला खराब आहे म्हणून तु Cover बसवले आहे?
मुलगी – नाही…उलट त्याला Damage व्हायला नको म्हणून मी Cover बसवले.
बाप – Cover लावल्यावर त्याची Beauty कमी झाली का?
मुलगी – नाही बाबा. उलट तो जास्त Beautiful दिसतोय.

बापाने प्रेमाने मुलीकडे पाहिले आणि म्हणाला…”मुली Mobile पेक्षा किंमती आणि सुंदर तुझ शरीर आहे. त्याला अंगभर कपडे घालून Cover केल तर त्याचे सौंदर्य अजून वाढेल… ?
मुलगी निरुत्तर झाली.

गंगीचा उपचार

ghost story

झपाटलेली गंगीचा पुढील भाग

आणि आजोबा सुद्धा तिथे आले व त्यांनी सांगितले की बाळ्या…. ए … पोरा. हे अमानवीय दिसतया गड्या हा सगळा खेळ त्योच आहे… आणि ते घरात निघून गेले. मामा उठले आणि एवढ्या रात्रीच निघाले मामीने विचारले अव कुठी चालले इतक्या राती ? तर मामा काई बोलले नाई. आज्जी बोलली की जा बाळ्या यळ झाली आता त्या माय ले बोलवायची तेच लावीन आता एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष. मी तस आईला वीचारलं की आज्जी कुठल्या माय बद्दल बोलतेय. आईचा सुद्धा स्वर मंद झाला आई सुद्धा बोलली सोनू बाळा तू खरच यात पडू नकोस ती माय महाकालीची एकनिष्ठ भक्त आहे. तीला खूप काही समजते. मी लहान होती तेव्हा पासून तिला बघते एकदा आजोबांना भूत दिसलं होत तेव्हा घर गावात होत आणि आजोबा रात्री शेताहून पाणी देवून येत होते तेव्हा त्यांना नाल्यातून येताना एक माणूस भेटला होता आणि त्याने चक्क आजोबांना तंबाखू मागीतली होती आजोबांनी तंबाखू दिली तर त्याने ती घेतली आणि खाल्ली आणि आजोबांसोबत गप्पा करू लागला जेव्हा वेस जवळ आली तेव्हा तो बोलला की थांबा थोड मी पाणी पेतो मले तहान लागली आजोबांनी त्याला सांगीतले की एवढ्या रात्री कुठे दोर-बकेट शोधणार आणि पाणी काढणार…. घर जवळच आहे घरी चला चहा प्या, तसाच तो खीदी-खीदी हसायला लागला आणि त्याने आजोबांना वेसीजवळच्या वीहरीत ढकलले आणि झाडावर जाऊन बसला असे काहीतरी घडले होते तेव्हा आजोबा खूपच आजारी पडले होते काहीही केले तरी त्यांची तब्येत सुधारत नव्हती तेव्हा याच मायने त्यांचा उपचार केला होता.
ठीक आहे सोनु बाळा तू झोप आता रात्र फार झाली आहे. व आई झोपली पण मला कशाची झोप येते माझी उत्सुकता आणखी वाढली.आणि रात्र कल्पना करण्यातच गेली.
सकाळ झाली थोडा काळोखच होता मामा एका काळ्या कपड्यावाल्या बाईला घेऊन आले त्यांच्या गळ्यात काही वेगवेगळ्या मण्यांच्या माळा होत्या त्या काळोखात सुद्धा चमकत होत्या. हातात भारी वजनाची वाकडी तिकडी काडी होती. त्यांच्या खांद्यावर झोळी होती. मी दुरूनच हे सर्व पाहत होतो. मामा आले तसे घरातील सर्व तसे रात्रभर जागीच होते ते सर्व ओसरी मध्ये जमा झाले त्या मायने आजी-आजोबांना जय मा काली म्हटलं आणि ओसरीच्या बाहेरच उभी राहली आणि बोलू लागली हे जागा आवेशीत होयेल हाये….. आठीसाक काई असल्याचा मले भास हुन रायला…. . बाहीरच हाये बंद…. उपरी हवा वायते आठीसाक…. डाक… डाक…. डाक… डाकीण शाकिन काई बी असू शकते. लय बेक्कार हालत होयेल हाये ढोरायची. हूंम…. हुं…. नाय नाय अशी काही विचित्रच ती माय बोलत होती…. म्या काई वस्तू सांगते त्या आताच्या आता मायाजोळ आणून द्या अन आज्जी-आजोबा मामा सोडून बाकीचे बंदे घरात निगुन जा… आम्ही सर्व तीथून घरात गेलो मी खीडकीतून सर्व बघत होतो त्या माय ने एक ठिकाणी चार लिंबू ठेवले त्यावर काही तरी उच्चार करत ते घराच्या चारही कोपऱ्यात जमिनीत दाबायचे सांगीतले. मामाने तसे केले. मग त्यांनी काही लाकडे पेटवली व तिथे बसल्या आणि विस्तव तयार केला आणि तो विस्तवावर राय टाकली आणि धूप घेऊन फिरत असतानाच त्यांना चिंचेच्या झाडाखाली काहीतरी दिसलं आणि अचानक त्या झाडाखाली थांबल्या आणि मोठं-मोठ्याने ओरडू लागल्या बाळ्या….ओ….बाळ्या…. पोरा हे पाय रे…. तसे मामा तिकडे धावत गेले.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

काही तांत्रिक कारणामुळे एप मध्ये अडचण

buldana mobile application

सर्वाना सूचित करण्यात येते की, आपल्या एमएच २८.इन च्या सर्वर मध्ये काही काम चालू असल्याने वेबसाईट वर आणि एप वर काही अडचणी येत आहेत. तरी आपणा सर्वानाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित तुम्हाला ‘अपडेट’ मिळत नसतील. तसेच आपल्याला मोबाईल\मध्ये “null rsponse” मेसेज मिळत असेल. काम चालू असल्याने अशी अडचण येऊ शकते. तात्पुरती खंडित झालेली सेवा पूर्ववत सुरु झाली असून काम प्रगतीपथावर आहे. तरी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. अधिक वेगवान आणि जलद सेवा देण्यासाठी एमएच २८ टीम कार्यरत असून त्यास थोडा कालावधी लागू शकतो.

धन्यवाद !
– टीम एमएच २८

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन शेगाव येथे संपन्न.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन वर्ष २३ वे.

माळी सेवा मंडळ खामगांव, माळी समाज बहुउद्देशीय मंडळ शेगांव व युग पुरुष महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन शेगांव येथे दि. १४ ते १५ जानेवारी २०१७ दोन दिवसीय आयोजित केले होते. आयोजनाचे स्थळ महात्मा ज्योतिबा फुले मंगल भवनाची नियोजित जागा, संत श्री सावता नगर, नवोदय विद्यालयाजवळ, खामगांव रोड शेगांव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र येथे संपन्न झाले.
येथे प्रमुख मान्यवर म्हणुन माजी. आमदार श्री. कृष्णरावजी इंगळे जळगांव जामोद,
माजी. आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे बाळापुर, मा. अध्यक्ष श्री. संजय अवधुतराव वानखेडे अकोला, इंजी. श्री. सुभाष नामदेवराव निखाडे खामगांव आणि इतरही अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.
महासंमेलनाची सुरुवात दिप प्रज्वलनाने मा. प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर मान्यवरांचे पुष्प हाराने स्वागत करण्यात आले. येथे प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. त्यानंतर राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री कमल तायडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी.आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे, उद्योजक मनोज महाजन हे हि उपस्थित होते. उदघाटन पर कमल तायडे यांनी आपले विचार मांडले मुला – मुलींनी रंग रूप न पाहता एक मेकांचे गुण पाहावे. असे करणार तरच संसारात सुख व सौख्य मिळेल. मुलींनी मुलाची नौकरी न पाहता निर्व्यसनी, गुण व त्याचे विचार पहावेत असे केल्यास तुम्ही महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार व एका चांगल्या समाजाची निर्मिती होईल. एवढे बोलून त्यांनी आपल्या विचारांना पूर्ण विराम दिला. व इतर मान्यवरांनी हि आपले विचार व्यक्त केले. तसेच ना. श्री. भाऊसाहेब फुंडकर, आ. श्री.आकाशजी फुंडकर व आ. श्री. बळीरामजी सिरस्कार यांनी हि महासंमेलनाला भेट दिली. त्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. माळी समाज सभागृहा साठी १५ लाख रुपये दिलेले असून आ. श्री आकाशजी फुंडकर यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयचा निधी दिला जाईल अशी घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली. या महामेळाव्यात चि. राहुल सदानंद खंडारे तसेच दिशा खंडारे यांचा विवाह योग जुळला. या राज्यस्तरीय महामेळाव्यात ८५७ युवक युवतींचा परिचय संपन्न झाला. या महामेळाव्याचे आभार प्रदर्शन श्री अनिल गिऱ्हे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घोषण वनिता उंबरकर, नीलिमा इंगळे व कल्पना तायडे यांनी केले. अशा प्रकारे १४ ते १५ जानेवारी २०१७ रोजी चे २३ वे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन संपन्न झाले.

अम्याचा दिमाख..

गुरुजी: कारे बॉ हुंडा म्हंजे काय ?

अम्या: ज्या वाक्ती एखांदा पोऱ्या एखांद्या पोरीले जिंदगीभर पोश्यासाठी तयार व्हतो,
त्याले प्रोत्साहन म्हणून त्याले जे काई रक्कम दिल्या जाते त्याले हुंडा म्हणत्यात.

गुरुजीन घरदार सोडलं अन वैरागी झाले..

कडक मास्तर

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो….
चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
गण्या- “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

तिच्या मिलनाची आतुरता…….

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीवचा – दुसरा भाग

तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती ….. आता पुढे

तो तिच्याकडे सरकला पण त्याने कधी कल्पना सुद्धा केलेली नसावी कि असे काही होऊ शकते म्हणून. जसा तो तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरसावला तसाच त्याच्या घराजवळ राहणाऱ्या आजीबाईने त्याला थांबवलं….. “आजी बाई बोलल्या पोरा कुठं रे चालला… दिसत नाई व्ह्यय पुढं नाला हाय त्यो” जा बाबा जा थकून आला असशीन तू काई खाल्लंय कि नाई सकाय पासन. आणि आजीबाई निघून गेल्या. हा सुद्धा घरात आला फ्रेश झाला आणि विचार करू लागला कि ती आली होती कि हा आपला भास आहे, तेवढ्यात त्याला घरात रोजप्रमाणे मांजरींचे रडणे एकू आले. एका मांजरीने त्याच्यावर झेप घेतली तो दचकला. तेवढ्यात आजीबाई आल्या पोरा हा घे च्या…… पी. काई खाल्ल की नाइ आणि तवा कुठ रे चालला होतास ? पुढ नाला वायतो हे बी दिसलं नाय व्हय तुला……….. पडला असता त्यात अन काई झाल असत मंग……. काई इचार-बिचार त कराचा की चाल्ल आपलं कुठ बी…….. तो आजीला सांगू लागला की आजी मला इथे या काही दिवसात काही सुचत नाही काय होतंय माझ्या सोबत तर. मला वाटते की गावाकडे जाऊन याव. आजी बोलली मंग जा की लेकरा…… तुझे आई-बाप पण याद करत असतीन बग तुझी, जा कर तयारी. तो पण मनाशी बोलला येऊ २ दिवस राहून थोडं फ्रेश वाटेल व जे घडतेय यावर पण काही उपाय निघेल म्हणून तो गावी जाण्यासाठी तयारी करू लागला त्याने बॅग भरली आणि आजी ला सांगितले कि मी दोन दिवस गावी जाऊन येतो. तो गावी जाण्यासाठी निघाला….. बस ने गावाकडे निघाला बस मध्ये त्याला त्याच्याच गावचे एक बाबाजी भेटले त्यांनी स्वतःहून त्याला येणाऱ्या संकटाचे पूर्वसंकेत दिले त्याच्या गप्पा रात्रभर रंगल्या त्याला सुद्धा थोडा धीर आला तो त्याच्या घरी गेला… गेल्या बरोबर त्याच्या आईच्या गळ्यात पडला व रडू लागला त्याने त्याच्या घरी तिकडे घडत असलेला सर्व वृत्तांत सांगितला तसे त्याच्या आईने तर त्याला तिकडे परत जाण्यास मनाई केली कारण शेवटी ती आई तिची ममता आड आली…… पण त्याच्या वडिलांनी मुलाच्या जीवनाचा विचार केला कि हातची नोकरी सोडून कस चालेल. इथे गावात परत उनाडक्या केल्या पेक्षा बरा आहे तिकडे दोन पैसे तरी कमावतोय. शेवटी ते वडील त्यांना सर्व जबाबदारी बघावी लागते…… त्यांनी सांगितले कि घाबरायचे कारण नाही गावातील बाबाजी यावर काही तोडगा नक्कीच काढतील मग तो दोन दिवस त्याच्या मित्रांना भेटला आणि त्यांना तिच्या बद्दल विचारू लागला त्यांनी ते आधी जिथे भेटायचे त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी केली. शेवटी तो दिवस आलाच सकाळ झाली तशी जाण्याची तयारी करू लागला. तशी त्याची आई बोलली बाळा उद्याची तर अमावस्या आहे तू ती झाल्यावर जा पण तो बोलला की सुट्टी संपली मला कामावर जावच लागेल. त्याची आई म्हणे ठीक आहे आम्ही पण येतो मग तिकडे. तेव्हा त्या बाबाजींनी सांगितले कि गड्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेव. घरात सकाळ संध्याकाळ तरी देवपूजा करत जा. आणि तुला ताईत दिला तो गळ्यात ठेवत जा. बेटाईम कुठे हि फिरत नको जाऊ. निर्जन जागी जाण्याचे शक्यतो टाळावे, आणि इकडे जसा उनाडक्या करायचा,घरच्यांचं एकत नव्हतास पोरांसोबत कुठेही केव्हाही रानमाळात फिरणे,नदी-नाल्यात पोहायला जाणे असे धंदे बंद करायचेत आता. दोन दिवसाने तुझे लग्न करावे लागेल लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार करत जा. त्याचे बाबा बोलले तुला आताच्याच गाडीने जायचं तू जा पण आम्ही व बाबाजी दुपारच्या गाडीनं येतो घरची सर्व काम निपटून. मग बघू तिकडे आल्यावर काय करता येईल ते. तो हो बोलला (पण हा कसला देवपूजा आणि बाकीचे सांगितलेले करतो हा पक्का नास्तिक माणूस,या सर्व गोष्टीला न मानणारा, लोक आपल्याला काय म्हणतील या विचाराने ग्रासलेला) आणि निघाला गाडीत बसला आणि पोहचला तिकडे दुपारी. दरवाजा उघडला घर आवरले थोडा आराम केला आणि उठल्यावर बघतो ते काय त्याला एक चिट्ठी दिसली
त्याने ती उचलली आणि वाचू लागला त्यात लिहिलं होत कि मला तुला भेटायचे आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. मी तुझी या ठिकाणी वाट बघेल. त्याने तिला भेटायला जाण्याचा निश्चय तर फार पूर्वीच केलेला होता. मनोमन एवढा खुश झाला की उघड्या डोळ्याने तिच्या मिलनाचे स्वप्न रंगवू लागला. त्याने विचार केला कि दोन तासात तिला भेटून येऊ तो पर्यंत आई-बाबा काही येत नाहीत. आलेच तर आजी जवळ चिट्ठी देऊन ठेऊ आणि आजीला सांगून पण ठेवले की आई-बाबा आले तर त्यांना तुझ्या जवळ बसवून ठेव मी येतोच बाहेर जाऊन व तिथे तिला भेटायला जाण्याची तयारी केली. घराच्या परसबागेतून गुलाबाचे फुल सोबत घेतले. थंडीचे दिवस असल्याने उबदार व पावसा पासून रक्षण करणारे कपडे घातले,गवतातून जाव लागेल म्हणून चांगले बूट घातले, मोठा टॉर्च सोबत घेतला,सिगारेट चे पाकीट आणि सोबत लायटर तर होतेच पठ्ठयाकडे. सिगारेट साठी पण होते आणि काही काम पडले तर उपयोग पण होते.
वेळ संध्याकाळची होती त्याला फक्त तिचाच ध्यास कि एकदा तिला कधी भेटतो असं झालेलं तो निघाला पावसाळ्याचे दिवस त्यात सर्वत्र पाऊस पडून गेलेला आणि आजू बाजूने ठीक ठिकाणी डबके साचलेले त्यामधील बेडकांचा डराव….डराव आवाज, काजव्यांचे चमकणे, लाइटावरील किड्यांचा तो नकोसा वास,वातावरणातील गारवा,झाडाखालून जातांना अंगावर पडणारे पाण्याचे थेंब हे सर्व त्याला तिला भेटण्याचा उत्साह वाढवत होते, पण त्याला माहित नव्हते कि हे सर्व त्याच्यावर येणाऱ्या संकटा पूर्वीची शांतता आहे. हातात टॉर्च आणि गुडघ्या पर्यंत वाढलेल्या गवतातून वाट शोधत तो निघाला, गवतातून सळसळणारा आवाज जीवाचा थरकाप उडवत होता. तरी देखील नदी-नाले ओलांडत त्याचे पावलं सरसावत होती. नियोजित जागी पोहचला तेव्हा रात्र झाली होती पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरलेले. तिथे दूर दूरवर कुणीच नव्हते तो त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबला बघतो तर आजूबाजूला कुणी चिट-पाखरू सुद्धा दिसत नाही मनातच पुटपुटला हिला पण काय हीच जागा मिळाली भेटायला. मस्त बागेत भेटलो असतो. तेवढ्यात त्याच्या पाठीला कडक स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले. त्याला एखाद्या वजनदार माणसाचा मोठा पहाडी आवाज त्याला आला, थोडा तो घाबरला. त्याचे मागे वळून पहायचे धाडस होईना पण त्याने हिम्मत करून मागे वळून बघितले. तर एक कुणी स्मशानात काम करणारा भला मोठा धिप्पाड माणूस तिथे उभा दिसला. तो बोलला कि ए……….. पोरा…….. इतक्या रातच्यान….या म्हसनात काय करून रायला ?
भ्याव वाटत नाई काय तुले…… एकट्या-दुकट्या न आस रातच्या बेरात्च्या फिरू नाइ……….. हे जागा कशी कोणी चीट-पाखरू बी दिस्ते काय तुले अठी, जागा पाय्न नाई……………टेम पाय्न नाइ…………दिस बी पावसायाचे अन चाल्ला मारे फिरयाले………… अरे लेका माय-बाप, घरची लोक वाट पायत असतीन न तुई…………..अठी बाजून नाला वाय्ते हातभर गवत वाढेल हाये………..इषारी जीव-जंतू असत्यात इचू-काटा काई निंगला त मंग कस करशीन……………..अठून जंगल चालू व्हते……………गाव संपल……….. अन आजची त्यातल्या त्यात अमावश्या आहे लेका……… अमावश्याच्या दिशी अस कोणी फिरते काय बाबू……..तुले काई कयते की नाइ……अठी जंगली कुत्रे, रानमाजरी असत्यात वटवाघुळ रायतात, त्या घुबळा पाय कश्या बोंबलुन राय्ल्या…… लगन-बिगन व्हयल आहे की संटया हायेस लेका…… अमावसेचा अंधार चांगला नसते, या दीशी कोणीच अस कुपा-काट्यात हिंडत नसते बॉ………………तू त काई अलगच धुंदीत दिसू रायला मले…… मी अठीच जरा दूरवर म्हसंखाईत काम करतो म्या बी म्हणून त चाल्लो लोकर घराकड……..चालतु काय………ओ…………..पोऱ्या चाल मी चाल्लो घराकड……………अबे लेका इतक्या टेम चा मी बोलू रायलो तू जरसाक बी घन घनत नाइ बे………………….तू बी चाल माया संग………एकाले दोन सोब्ती बरे रायतात. एवढ समजवल्या वर पण हा कशाचा ऐकतो. बोलला जा काका तुम्ही कशाला फालतू डोक लावता मी काय लहान आहे, काही झाल तर माझ मी बघून घेईल. तशी त्याची टरकलेलीच होती. पण याने बनावट हिंमतीचे प्रदर्शन केले. याने इथे पण स्वताच्या स्वभावाला महत्व दिले कुणाचे एकून न घेण्याचा स्वभाव आड आला. याने त्यांच्या कडे लक्ष दिले नाही व आपला तिथेच बसला तिची वाट बघत.
वेळ झाली असावी अकरा ची बरीच रात्र झालेली हा तिच्या विचारात बुडालेला अधून मधून वटवाघुळांचा किलकिलाट जो मनाला कधीच भावात नाही, किर्रर्र.करणारे कीटक, त्यात पंख फुटलेल्या मुंग्या अंगावर पडायच्या यामुळे तो परेशान झाला, वरून थंडी व कधीही पाऊस पडेल अशी स्थिती, सिगारेट वर सिगारेट फुकन सुरूच. त्याचा पूर्ण मूड ऑफ झाला होता, त्याला भूक पण जोराची लागली होती, त्याने घराकडे निघायचे असे ठरवले तितक्यात कुणीतरी समोरून धावत आणि कर्कश…अजिब आवाजात हूंह्ण ही ही हीही हीहिं ह्रो व्ह्या हूंह्ण हीहिं ही ही ही हीहिं ही ह्रो असे विचित्र स्वर त्याला कानी पडत होते…त्याला कोणी धावत आहे असे जाणवले. तसा तो थबकला त्याची तर पूर्ण “टांगा पलटी घोडे फरार” अशी अवस्था झाली होती……….कुठे पळाव…………काय कराव काही सुचेनास झाल……….कोण असाव ओरडणार ? का ओरडत असाव ? आपल्या मागे का लागल ते ? पूर्ण घाबरला….पळता पळता….ओल्या गवतावरून किती वेळा घसरून पडला. बघतो तर आवाज येन बंद झाला होता. त्याच्या हातातील टॉर्च पण कुठेतरी पडला. इकडे तिकडे बघत होता त्याच्या लक्षात आल की आपण तर खूपच दूर आलो तिने दिलेली जागा कुठे आहे ती पण दिसत नाही. आणि तेवढ्यात राज्या….ओ…..राज्या…… असा आवाज आला. आवाज हा ओळखीचा वाटतो असे त्याला वाटले पण ओरडण्याचा व भेदरलेला आवाज कुणाचा असावा ? त्याने आवाजाच्या दिशेने जायला पावलं उचलले……..थोडा समोर गेला तेव्हा त्याला ती दिसली एका पडक्या वाड्याजवळ उभी….. तिथे त्याला झाडे रंगीबेरंगी प्रकाशाने उजळलेली दिसली तो विचारात पडला की त्या काकाने तर सांगितले होते की आज अमावस्या आहे मग इथे एवढा प्रकाश कसा काय ?
आणि झाड सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे वाटते म्हणून हे दृश्य अनुभवायला मिळत असेल असा तो मनाशीच पुटपुटला…..आज तर ती आणि मी दोघच आहोत आज कुणीच नाही थांबवू शकत आमच्या मिलनाला……पण भयावह रात्र त्याची प्रतीक्षा करत होती याची त्याला कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात…..

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीव

Horror story in buldana

राज्या हा गावचा मुलगा. घरची परिस्थिती उत्तम. घरच्या सर्वांचा हा लाडका नेहमी हसत खेळत राहणारा, रोज मित्रांसोबत पारावर गप्पा टप्पा करणारा अतिशय बोलक्या स्वभावाचा. नेहमी स्वप्नातील परीला वास्तव्यात शोधण्याच्या प्रयत्नात, मित्रांसोबत उनाडक्या करणे मनाला भावेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकायचे नाही आपले तेच खरे. बाकी कुणी काहीही बोलो आपण आपल्या मनाप्रमाणेच वागणार असे त्याने त्याचे ठरवलेले. कुठेहि भांडणे होवोत त्यात याचा पहिला नंबर, अभ्यासा कडे फारशे लक्ष नाही. शाळेत असतांनाच प्रेमात पडला. कॉलेजात असताना तिला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती मिळाली आणि काही दिवस तो खूप खुश होता पण काही दिवसानेच त्याच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कुणास ठावूक ? एक दिवस रोज प्रमाणेच पारावर आला आणि रडू लागला, म्हणे तिला तिच्या घरच्यांनी बाहेरगावी पाठवले. त्या दिवसा पासून बोलका राज्या अशांत झाला अबोला झाला. आणी बाहेर गावी गेला काही दिवसासाठी तिकडून परतला कुणाला काही कळायच्या आतच त्याने सर्वांना सांगितले की मी पण मोठा होणार चांगला पैसा कमवणार स्वतःचे स्वप्न आणि तिला मिळवण्यासाठी कसे-बसे शिक्षण पूर्ण केलेले होतेच. घर सोडले, मी बाहेरगावी एका मिल मध्ये नोकरी शोधली.
त्याने त्याच्या उनाडक्या करणाऱ्या मित्रांना सांगितले की, मला बाहेर गावी नोकरी मिळाली मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय आहे. मला सकाळच्या गाडीने निघावं लागेल. ठरल्या प्रमाणे तो त्याच्या प्रवासाला निघाला तिथे पोहोचला तर यक्ष प्रश्न पडला इथे राहायचे तर कुठे ?
त्याने राहण्यासाठी घर शोधणे सुरु केले फार प्रयत्नांती त्याला घर मिळाले. घर अशा ठिकाणी मिळाले की घराबाजूला एक नाला वाहायचा घरा जवळ स्मशान शांतता पसरलेली होती अर्थात तुरळक वस्ती त्याने पूर्ण घर बघितले त्याला ते आवडले कारण ते त्याचे भाडे त्याला परवडणारे होते. त्याने ते घर भाडयाने घेतले आणि तिथे तो एकटाच राहू लागला. त्याचा त्या घरातील पहिला दिवस. संपूर्ण दिवसभर साफ सफाई करण्यात गेला. रात्री घरातील कामे आटपून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु नवीन जागा असल्याने त्याला शांत झोप येईना. हे रोज असं चालायचं. कसातरी तिथे तो रूळला. तसा त्याला शेजार पण चांगला मिळाला होता शेजारीच आजीबाई आणि त्यांचा मुलगा राहायचा. आजीबाई मन मिळाऊ होत्या त्यांनी त्याला पहिल्याच दिवशी मदत केली होती, अधून मधून त्याच्याकडे यायच्या त्याच्याशी बोलायच्या त्यामुळे त्याला आपलं कुणी आहे असे वाटायचे. तो त्याचा निवांत वेळ आजीबाईच्या गोष्टी ऐकण्यात घालवायचा.
त्या दिवशी घरी यायला जरा उशीरच झाला. शांत वातावरण आणि अंधाराचे साम्राज्य त्यातच कुत्र्यांचे भुंकणे अजूनच काळजात धस्स करायचे. सोबतीला घरा जवळून वाहणाऱ्या नाल्याचा घाणेरडा वास घरात डोकावू पाहत होता. एकंदरीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होत. आज अमावस्या आहे हे नंतर कळून आलं आणि त्याची अजून टरकली.
घर आवरुन तो जेवायला बसला तर पुन्हा कुत्र्यांचे रडणे सुरु. तो जेवण सोडून कुत्र्याला हाकलायला निघाला तर समोर एकही कुत्रा नाही. अचंबित होऊन तो घरात आला आणि पुन्हा जेवायला बसला. थोडक्यात जेवण उरकून हातावर तंबाखू मळत असतानाच घराच्या छतावर ठक…ठक असा ठोकण्याचा आवाज आला पण त्याने दुर्लक्ष केले. झोपण्यापूर्वी त्याच्या मनात आले कि आपण हे आजीबाईंना सांगावं का ? पण त्या आपल्याला काय म्हणतील या विचाराने तो शांत बसला.
झोपण्यासाठी अंथरुणात शिरला तेव्हा त्याच्या मनात न राहवून येत होते कि आज रोज पेक्षा काहीतरी वेगळं घडतंय, रात्रीचे २ वाजले त्याला झोप येत नव्हती घरात काही वेगळाच भास त्याला होत होता त्याला जवळ कुणी असण्याची जाणीव होत होती, जशी जशी रात्र वाढत होती तसा तसा तो भिंतीचा व घराच्या छताचा आवाज वाढत होता जणू कोणी घर ठोठावतेय…त्यात त्याच्या हृदयाचे पण ठोके वाढत होते त्या असह्य जाणिवेतच हा झोपी गेला. सकाळी नेहमी प्रमाणे उठून घरात झाडू मारत असतांना त्याला एक लांबच लांब… काळा… केस दिसला त्याने तो केस उचलून बघितला तर तो घाबरला कि आपण इथे एकटे राहत असतांना हा एवढा मोठा केस इथे आला कुठून ? इथ तर आजूबाजूला कुणी मुलगी राहत नाही मग घरात केस कसा काय? यावेळी त्याने पक्का विचार केला कि आपण आजीबाईंना विचारू त्या आपल्याला काहीही म्हणो…. तसाच तो आजीकडे गेला व त्याने घडत असलेले सर्व सांगितले… त्यावर आजीबाई बोलल्यात … पोरा असं काई बी नसत… तुला भास झाला असावा…. आपुन कि नाई दिसभर जे काई मनात इचार करतो तेच आपल्याले सप्नात दिसते. म्हणून तर म्हणत्यात ना “जे मनी वसे ते कल्पी दिसे” आजीबाई ने त्याची समजूत काढली व त्याला मस्त चुलीवरचा च्या दिला प्याला. मस्त बशीतून च्या पिला अन मनातच विचार करत घरी आला तयारी केली अन कामाला गेला.
हे रोजच व्हायला लागलं. त्याचे दिवस रात्र या विचारताच निघून जायचे आणि रोज त्या घरात काहींना काही विचारांच्या पलीकडे घडायचे, कधी त्याला झोपल्यावर आपल्या बाजूला कुणाचे अस्तित्व जाणवायचे तर कधी मांजरींचे रडण्याचे आवाज ऐकू यायचे असेच दिवस जात होते तशी तशी त्याची चिंता वाढत होती. एकदा सकाळी तो कामावर जायची तयारी करत असताना दरवाज्यावर थाप पडली….. पाहतो तर काय एक सुंदर मुलगी त्याच्या दृष्टीस पडली…तिचे ते लांब रेशमी केस…त्या केसांच्या लटा चेहऱ्यावर येत होत्या एक सुंदर असे प्रतिबिंब. तिची छाप त्याच्या मनावर कोरल्या गेली, जणू त्याला त्याची तीच परी भेटावी…!
असा त्याला आनंद झाला होता. त्याचे मन सारखं तेच तेच खुणवत होत कि हि आपलीच आहे इथे अचानक कशी आली, शोधत आली असावी आपल्याला. पण दरवाज्या जवळ जाताच ते प्रतिबिंब काहीसे अस्पष्ट होतांना त्याला जाणवले व एकाएकी नाहीसे झाले त्याला वाटले भास झाला असावा. स्वताशीच बडबडत आपण जास्तच मूर्खपणा करायला लागलो. तो कामावर निघाला एका पानपट्टी वर थांबला चहा पीत-पीत सिगारेट ओढत असतांना त्याला तीच परत एका झाडा खाली उभी दिसली पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस सुरु आहे म्हणून उभी राहिली असावी असे त्याच्या मनात वाटले. तसे त्याने तिच्या कडे जाण्यासाठी पावलं उचलले तेवढ्यात तिथून एक गाडी गेली आणि बघतो तर काय ती दिसे-नाशी झाली. पण मनात सारखे अंतर्द्वंद्व सुरु होते की का कुणास ठाऊक आपल्याला हे का दिसते ? कोण असावी ती मुलगी ? आपली तीच असती तर असे का वागली असती घरच्यांची भीती वाटत असेल कदाचित. पण आपल्याला पाहून का दूर झाली. असे कित्येक प्रश्न त्याच्या मनात सुरु होते. परत तो त्याच्या मार्गी लागला कामावर पोहचला काम सुरु झाले पण कामात लक्ष लागत नव्हते दिवसभर सारखे ते प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात तरळायचे. तिच्या त्या आठवणीत तो जगत होता. त्याला ती जाणीव अस्वस्थ करायची. संध्याकाळी सुट्टी झाली तेव्हा रिम झिम पाऊस सुरु होता तरी तो निघाला वाटेत असतांनाच पाऊस थांबला. पंख फुटलेल्या मुंग्या सर्वत्र उडत होत्या, त्याला कुणीतरी मागे असल्याचा भास झाला पण त्याने दुर्लक्ष केले घरी पोहचला.
वेळ रात्रीची होती गेट जवळ जाताच त्याला वाटले कुणी तरी बाजूला आहे त्याने न राहवून बाजूला बघितले तर चिंब पावसाने न्हाहून निघालेली नवतरुणी त्याच्या दृष्टीस पडली…. त्याला खूप आनंद झाला की तू आलीस मला भेटायला असा तो पुटपुटला…..तिचे ते लांब केस पाण्याने ओले झालेले आणि आंब्याच्या मोहोरा सारखी मोहरून निघालेली ती तरुणी तिचे लावण्य जणू मोहवून टाकत होते, तिचे आरक्त डोळे त्याला जणू काही सांगत होते…तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि तो अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात ….

संग्रामपूर येथे पत्रकार दिन संपन्न

sangrampur

बुलडाणा जिल्ह्यात नुकताच पत्रकार दिन संपन्न झाला. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जागतीक पत्रकार दिना निमित्ताने आज संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्याम सावतकर यांचा सत्कार करण्यात आला. पळशी झाशी येथील शंकरगिरी महाविद्यालय येथे आयोजीत या कार्यक्रमासाठी संघटनेचेे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार केशवरावजी घाटे, श्याम देशमुख, रामेश्वर गायकी, प्रल्हाद दातार, विजय दादा पोहनकार, प्रल्हाद सावतकर, अभयसिंह मारोडे, संतोषभाऊ देऊकार, पंजाबराव ठाकरे, युसूफभाई तसेच सामाजिक कार्यकर्ते व समस्त पत्रकार बांधव उपस्थित होते.

साद माणुसकीची मित्र परिवाराची 'माणुसकीची भिंत '

buldana news

बुलडाणा शहरात अनेक गोरगरीब भटकतांना दिसून येतात ज्यांना घालायला कपडे नाहीत. थंडी, ऊन वारा पाऊस सर्व अंगावर झेलत ही लोक आपला बचाव करताना दिसून येतात. त्यांची गरज जाणून त्यांना मदत व्हावी या हेतूने साद माणुसकीची मित्र परिवार बुलडाणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना क्षणभर थांबायला लावणारी भिंत सध्या चर्चेत आहे. ज्याला लोकांनी पागल म्हणून हिनवले होते त्याला त्याच माणसानंमध्ये वावरण्या योग्य बनविले याचे समाधान साद माणुसकीची परिवाराच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

प्रत्येकाकडे जुने कपडे असतात जे आपण टाकून देतो अथवा दाराशी आलेल्याना देऊन त्या बदल्यात काही तरी वस्तू घेतो. हेच कपडे जर ह्या गरजुंना दिले तर त्यांची गरज पण भागेल आणि काही केल्याचं समाधान पण मिळेल. या विचारातून बुलडाणा येथील साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने शहरातील,आसपाच्या खेड्यातील वंचितांना गरजेच्या वस्तू, कपडे,स्वेटर, भांडी, लहान मुलांचे,पुरुषांचे,स्त्रियांचे कपडे व इतर साहित्य दान करण्याचा उपक्रम राबविला आहे. इथे उभारलेल्या ‘माणुसकीच्या भिंतीवर’ आपल्याला नको असेलेले ती वस्तू देतात तर गरजवंत ‘घेऊन जातात’. प्रशंसनीय असलेल्या उपक्रमात रितेश खडके, सुरेश कावळे, महेंद्र सौभागे, अजय दराखे, योगेश सुरडकर, राहुल दराखे,न रेंद्र लांजेवार यांचा समावेश आहे.

ज्यांच्या जवळ जे जास्त असेल त्यांनी ते द्यावं,आणि ज्यांना नसेल त्यांनी घेऊन जावं. बस्स येव्हड साधं सोप्प गणित आहे ! आपण दान करू शकतो ते सर्व आपल्याला इथे देता येतील!! मोठ्या मनाने दान करा! दिल्याने कधी कमी होत नाही!! तरी आम्हाला हात द्या,वंचितांना साथ द्या आणि माणुसकी जपण्यास मदत करा असे आवाहन साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

केळवद च्या युवकाचा प्रशंसनीय उपक्रम

uddhav gadekar

मुलींची घटणारी संख्या ही गंभीर बाब आहे. याला आळा घालण्यासाठी अनेक क्लुप्त्या तसेच गर्भलिंगनिदान बंद करण्यात आले आहे. आधी सर्रास दिसणारी सोनोग्राफी सेंटर सुद्धा बंद झाली आहे आणि कारवाई होण्याची भीती असल्याने अनेक डॉक्टर सुद्धा यापासून दूर राहणेच पसंद करू लागलेले आहेत. गर्भपात आणि त्यामुळे होणारी मुलींची कमी संख्या यामुळे शासनाने ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ ही योजना सुद्धा चालू आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना यावर कार्य करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर डॉक्टर सुद्धा मुलगी झाल्यास दाम्पत्याकडून फी घेत नाहीत.

असंच काही केळवद ता. चिखली येथील युवकाने ठरविले आणि मुलगी वाचण्यासाठी आपले योगदान दिले आहे. केळवद ता. चिखली येथे उद्धव गाडेकर यांचे हेअर कटींग सलून आहे. याठिकाणी त्यांनी जर कुणाला मुलगी झाली तर त्या मुलीच्या पित्यास सहा महिने दाढी-कटिंग मोफत तर त्या मुलीचे जावळे सुद्धा मोफत काढून देऊ अशी संकल्पना करून ‘बेटी बचाओ’ या अभियानास त्यांनी साद दिली आहे. त्यांचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. इतरांनी सुद्धा त्यांच्या ह्या उपक्रमातून शिकले पाहिजेत. अशा प्रकारे जर प्रत्येकाने आपला सहभाग दिला तर नक्कीच लवकर मुलींच्या घटत असलेल्या गंभीर समस्येला आळा बसण्यास मदत होईल.

संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

Buldana News

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आणि महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, माटरगाव तसेच पूर्णाकला महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचायत समिती शेगांव येथील श्री. जाधव सर यांच्या निदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक बस स्थानक परिसरात आज सकाळी ११ वाजता ग्राम स्वच्छतेचे प्रणेते संत श्री गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरकर) यांच्या महानिर्वाण प्रसंगीचे स्मृती वाहन लोकांना स्वच्छतेकडे प्रेरित करीत होते. ज्या वाहनामध्ये संत गाडगेबाबा यांनी प्रवास केला ते त्यांचे स्मृतिचिन्ह ट्रकमध्ये सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा आपल्या हातात खराटा घेऊन गावोगावात स्वच्छता करीत आणि आपल्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून स्वच्छतेसह जनजागृती करीत असत. त्याचप्रमाणे आज रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन स्मरीत ग्राम स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला

गावागावात जाऊन ग्राम स्वच्छतेचा संदेश देणे आणि ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने माटरगाव सह जलंब, पहूरजिरा यांसह इतर छोट्या मोठ्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Official website of Buldhana district

आपल बुलडाणा, आपली साइट

विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या व मां जिजाऊच्या माहेर असणार्‍या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आम्ही ही साईट तमाम बुलडाणेकारांसाठी व वैदर्भिय जनतेसाठी तयार केली आहे. ही वेबसाइट म्हणजे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. तुमच्या प्रश्नासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी तसेच इतर घडामोडी, नोकरी, आरोग्य, शिक्षण ई. माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा थोडा प्रयत्न करतोय.

एम एच २८. इन च्या नावाखाली तुम्हाला चांगली व तडक सेवा देण्याचा आमचा मानस असून आम्ही इंटरनेट, प्रिंटिंग, मोबाइल या क्षेत्रात काम करतोय. जिल्ह्याच्या व आसपासच्या सर्व क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, नोकरदार वर्ग, गृहिणी ई. ना दोन पाउल पुढे नेण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतोय. उद्या आपण सर्व हक्काने सांगू शकाल की, माझ बुलडाणा, माझी वेबसाइट असा आमचा प्रयत्न आहे.

आपल बुलडाणा, आपली साइट

हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार

Buldhana

आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटस गाव म्हणजे भेंडवळ. एकण्यात आहे की येथील घट मांडणी ही प्राचीन परंपरा सुमारे ३००-४०० वर्षा पासून चालत आलेली आहे. या परंपरेची सुरुवात केली होती चंद्रभान महाराज यांनी आणि ही परंपरा पूर्ण विश्वासाने आजही जोपासली जाते. जी अक्षय तृतीयाच्या महापर्वावर वाघ परिवाराच्या वतीने साजरी केली जाते.

घट मांडणी दोन वेळा केली जाते :
ही घट मांडणी वर्षातून दोन वेळा केली जाते पहिली गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गावातील पारावर तर दुसरी अक्षय तृतीया या महा पर्वावर गावाजवळच्या पूर्वेकडील शेतात ही घट मांडणी केली जाते. असे असले तरी या दोन्ही मांडणी यामध्ये महत्वाच्या आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मांडणीतून मिळालेले संकेत आणि अक्षय तृतीया या महापार्वावर केलेल्या घट मांडणीतून मिळालेले संकेत या दोन्ही मांडणीतील संकेत जुळवून निष्कर्ष काढल्या जातो व भविष्य वर्तवले जाते.
ही मांडणी त्याकाळा पासून सुरु आहे जेव्हा हवामान खाते,पाऊस पाण्याची माहिती देणारे कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा पण जन सामान्यांपर्यंत ही माहिती पोहचवण्याचे कार्य केले आहे या भेंडवळ च्या मांडणीने. ही भेंडवळ ची घट मांडणी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे या घट मांडणी कडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार या मांडणीवर विश्वास ठेवतो. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा,विश्वासाचा भाग आहे.

अशा प्रकारे केली जाते घट मांडणी :
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी गावाजवळच्या पूर्वे कडील शेतात जे घट मांडणीसाठी निवडून ठेवलेले असते तिथे जातात. तिथे चंद्रभान महाराजांचा जयजयकार करतात. तिथे मोठे रिंगण आखतात त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार करतात त्या खड्ड्यात घट मांडणी करतात. वर्षा ऋतूतील चार महिन्यांची प्रतीके म्हणून चार मातीची ढेकळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेली छोटी घागर ठेवतात. घागर ही समुद्राचे प्रतिक मानल्या जाते. या घागरीवर पुरी पृथ्वीचे प्रतिक. पापड,सांडोयी-कुरडई चाऱ्याचे प्रतिक. वडा-भजा चवीचे प्रतिक. करंजी आर्थिक संपन्नतेचे प्रतिक. असे पदार्थ ठेवण्यात येतात. तसेच विड्याचे पान व सुपारी सुद्धा ठेवण्यात येते हे राजा व त्याच्या गादीचे प्रतिक आहे.
खड्ड्याच्या भोवती गोलाकार १८ धान्यांची रास मांडण्यात येते त्यात अंबाडी,सरकी,ज्वारी,तूर,मुग,उडीद,तीळ,भादली,बाजरी,हिवाळी मुग, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा,करडी,मसूर. संध्याकाळी ही सर्व पूजाअर्चा विधिवत केली जाते. त्यानंतर सर्व घरी येतात रात्रभर याकडे कुणीही येत-जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी घट मांडणी ची बारकाईने पाहणी केली जाते रात्रभरात मांडणी मध्ये जो काही बदल घडून आला असेल त्यानुसार पिक पाणी, पर्जन्य, याविषयावर अंदाज व्यक्त करण्यात येतो.
चंद्रभान महाराजांचा जयजयकार करण्यात येतो. त्यांचे वंशज एक एक करीत सर्वच अंदाज व्यक्त करतात आणि शेतकरी बांधव ते लिहून घेतात व त्या प्रमाणे पिक पाण्याचे नियोजन केले जाते.

भेंडवळ च्या घट मांडणीतील यावर्षी २०१६ चे अंदाज : हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार असल्याचे भेंडवळ घट मांडणीतून दिसून येते. यंदाचा पाऊस साधारण स्वरूपाचा राहील तसेच पहिल्या महिन्यात साधारण पण अधून मधून पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगल्या पावसा सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तिसरा महिना उत्तम पावसा सह अतिवृष्टी चा इशारा. अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आलेत. संपूर्ण देशात गुरांसाठी चारा-पाणी टंचाई राहील,तीळ हे पिक साधारण असून मुग,उडीद या पिकांची काही भागात नासाडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. जवस तांदूळ या पिकांची सुद्धा नासाडी संभवते,गहू,हरभरा या पिकांना बाजारपेठेत तेजी मंदी असू शकते.
तसेच परकीय शत्रूंमुळे देशावर संकट येऊ शकते त्यामुळे संरक्षण विभागावर ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशावर आर्थिक स्थितीचे सावट येऊ शकते. राज्याला हे वर्ष ठीक नसून त्याच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकट येऊ शकतात. असेही अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. हे कितपत तंतोतंत खरे होऊ शकते हे ईश्वराला माहित. कारण आपण ईश्वर नसून आपण सामान्य माणूस आहोत त्यामुळे आपण विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर फक्त तर्क वितर्क लावू शकतो. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा श्रद्धेचा विषय आहे.

बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

पित्यानेच केली सोनालिका ची हत्या

Buldhana

क्रूर पित्यानेच आपल्या ‘सोनालिका’ चा गळा चिरून हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे घडली. काल घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपीला जेरबंद केले आहे. खामगाव तालुक्यातील नांद्री येथील लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी लता हिचा विवाह सारोळा येथील लहू धंदरेसोबत मे २०१५ ला झाला होता. परंतु लहू हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तिचे सातत्याने माहेरी जाणे यामुळे तो लताचा शारीरिक मानसिक छळ करत होता. या त्रासामुळे लता ही मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांद्री येथे आपल्या माहेरी आईवडिलाकडे राहू लागली. तिथेच लता ने एका मुलीस जन्म दिला. सर्वांनी ‘सोनालिका’ असे तिचे नाव ठेवले. मात्र कित्येक दिवस झाले पत्नी घरी येत नसल्याने संतप्त लहूने २६ एप्रिल रोजी माहेरी जावून २७ एप्रिलच्या पहाटे च्या सुमारास आईजवळ झोपलेल्या ‘सोनालिका’ चा घराजवळ काही अंतरावर नेवून गारगोटीने खून केला. ‘सोनालिका’ दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह शेतात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवीत अवघ्या ६ तासांत आरोपीस पकडले.

विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले पक्षी रोधक यंत्र

Buldhana : pakshirodhak yantra in Buldhana

शेतात उभ्या असलेल्या पिकास पक्षापासून रोकण्यासाठी आता पक्षी रोधक यंत्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यातील विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पक्षी रोधक यंत्र बनवले आहे. अत्यल्प खर्चात हे यंत्र बनविण्यात आले असून यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. टीनपत्रे आणि लोखंडी रॉड बनवून हे यंत्र बनविण्यात आले आहे. यासाठी ५० वॉट ची मोटार वापरण्यात आली असून १ हेक्टर चा एरिया हे यंत्र व्यापते. २ हजार रुपये खर्चून करण्यात आलेल्या या यंत्राची आंतरराज्यीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली आहे.

वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

अचानक छातीत तीव्र वेदना होवून सुद्धा आपल्या प्रसंगावधानाने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना व्याळा जवळ घडली. अकोला येथून बुलडाणा ही बस घेवून चालक यू. जी. रोम निघाले. मात्र थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या तरीही त्या परिस्थितीत गाडी सावकाश बाजूला घेवून त्यांनी गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र ते वाचू शकले नाहीत.

अकोला आगाराची एमएच-४0-५३९९ क्रमांकाची बस घेवून उत्तमराव गंगाधर रोम (रा. कौलखेड) हे बुलडाणा कडे निघाले असताना व्याळाजवळ त्यांना यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांनी संयमाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांचे प्राण वाचविले; बसमध्ये ३0 प्रवासी होते. मात्र त्या नंतर दोन मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

ऐतिहासिक : बाळापूर किल्ला

Buldhana district official website

आपल्या बुलडाण्यापासून जवळच असेलला बाळापूर किल्ला आपण बघितलाच असेल. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूर येथे हा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

महाराष्ट्रातील अकार्यक्षम खासदार यादीत प्रतापरावजी जाधव व अडसूळ

Buldhana district official website

मोदी सरकार सत्तेवर येवून १ वर्ष लोटलं आहे. या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा खुद्द पंतप्रधानांनी ‘अच्छे दिन’ असा केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू बदल घडून येतील असे म्हणणे आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस ने मात्र मोदी ला १०० पैकी ० गुण देवू केले. या वर्षभरात प्रत्येक खासदाराला आपल्या मतदार संघात विकास कामे करण्यासाठी दिलेला निधी हा पडून असल्याचे दिसून आले आहे. लोकसभेतील ५४२ खासदारांपैकी तब्बल २९८ खासदारांनी खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केला नसल्याचे उघड झाले आहे. यात उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

विद्यमान २९८ खासदारांनी आपल्या वार्षिक ५ कोटी निधीपैकी एक रूपयाही खर्च केलेला नाही. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ३० खासदारांचा समावेश आहे.आपल्या जिल्ह्याचे मा. प्रतापरावजी जाधव यांचे सोबत अमरावतीचे आनंदराव अडसूळ यांचा सुद्धा ह्या मध्ये समावेश आहे. यांच्या शिवाय नाना पटोले भंडारा व गोंदिया, बीडच्या प्रितम मुंडे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, नाशिकचे हरिश्चंद्र चव्हाण , हिंगोलीचे राजीव सातव असे एकूण ३० खासदार आहेत.
मतदारसंघ विकासासाठी खासदारांना पाच कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जातो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच १६ वी लोकसभा स्थापन झाल्यानंतर, केंद्र सरकारने खासदार निधीसाठी १७५७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी फक्त २८१ कोटी रुपये म्हणजेच १६ टक्के निधी खर्च झाला आहे. १५ मे २०१५ पर्यंत तब्बल १४७६ कोटी रुपये पडून होते