वेशीवरच्या भूतांची जत्रा

वेशीवरच भूत तिसरा भाग
आज अमावस्या हाये अन बबन्या वेशीवरच भूत हाये हा तमाशा नाई हे तर या भूतांची जत्रा आहे. सगळे विचार करू लागले की इथून निघायचं कस ? त्यातील कुणालाच माहिती नव्हत की त्या जत्रेतून ते घरी जातील की नाही तर…. आता पुढे
महादू बुआ बोलले पोरहो आपुन चांगलच गोत्यात आलो आपलाच नाद आपल्याला भवला मले पहिले सांगा तुमाले अठीसाक काय काय दिसून रायल. त्यावरच पुढचं ठरवता येईल.
किशऱ्या बोलला मले अठी तंबू नाई दिसत हे स्मशान आहे. अन अठी सर्व दूर मांस, रक्त, हाड, कवट्या पडून आहेत. जे फुल हातात बांधली ते हाडा-मासाचे कुजलेले तुकडे हायेत. त्या घुबळा बबन्याच्या अंगावर बसून हायेत. बबन्या रक्त पीत आहे.
जाक्र्या बोलू लागला मी तर पहिलेच सांगितलं की मले अठी स्मशान दिसते, हा तमाशा एखांद्या स्मशानात हाये म्हणून.
वीराट्या बोलू लागला की मले अठी दूर दूर लोक भूत रगत-मास विकताना दिसत हायेत अन बाकीचे भूत ते इकत घेऊन रायले.
सुन्या बोलला अबे मले त लयच भीती वाटून रायली अठी… मी तमाशात आल्तो तहाच बोललो होतो की मले अठी घुबळा दिसून रायल्या म्हणून. आता त आकाशी पायना बी दिसून रायला भूतायची पोर त्यात बसून मजा घेऊन राय्लेत. किशाऱ्या बोलला काई भी म्हणत काबे भूत कुठून आन्तीन आकाशी पाळणा ? अन मले कावून दिसत नाई मंग अस काई ?
मन्या बोलला अबे मले त अठी हाटेली दिसून रायल्या बॉ…त्यात ले मोठे पदार्थ बनवेल हायेत काई लोक जेलेबी तउन रायलेत. त काई इकत घेऊन खाऊ लागलेत.
दिप्या बोलला अबे मले अठीसाक अस काहीच दिसून नाई रायल फकत अंधार हाये अन त्यात रोजच्या सारखे कुत्तळे भूकून रायले अन काई माजरी, रानकुत्रे, हिंडून रायले अन आपुन सध्या गावाच्या लयच दूर आहोत जंगलात आहोत आपुन. अठीसाक स्मशान नाई हाये. स्मशान त गावाच्या बाहेर हाये. हे जंगल हाये जंगल. गावाच्या बाहेर सुन्याच्या वावरात उभ रायल की जे टेकडी दिसते त्या टेकडीच्या खाली दरीत उभ असू आपुन.
मानकू बोलला हा दिप्या बरोबर बोलते मले भी तुम्ही लोक सांगता तस काई दिसत नाई हा दिप्या म्हणते तसच वाटते मले भी.
महादू बुआ बोलू लागले कशी गोठ करता तुम्ही दोघ भी तुम्ही दोघ त दत्ता आबाचे पेठ आहात मंग तुम्हाले त सगळ दिसाय्ले पाहिजेत. असो बॉ तुम्ही भारी माणस तुम्ही म्हणता तर दिसत भी नशीन. पण मले किशऱ्या म्हणते तसच दिसते अन लयच घाण कुजेल वास येऊन रायला अठीसाक, त्यात आपल्याले अठी उभ भी राहू देत नाई कोणी. किती लोक धक्के-बुक्के देऊन जात हायेत, पाय ठेव्याले भी जागा नाई अठीसाक… अन त्यात मले दिसून रायल की आपल्याले चारही बाजून भूत, चुडेल, आग्या, वेताळ अशा सैन्याचा वेढा हाये हे आत्मे हातात अलग अलग चमकणारे गोळे घेऊन उभे हायेत. त्यात ते चमकणारा चाबूक फेकून हाणतात, काळ्या माजरीच्या गयात चामड्याचा दोर बांधून हे आत्मे त्यायले नियंत्रित करत हायेत. कोणी तरी मोठा राक्षस त्या दक्षिणे कडून एका काया घोड्यावर बसून येऊन रायला असे दिसते. त्याच्या अंगात भारी लोखंडाचे व काया रंगाचे कपडे हायेत, त्याच्याजोळ अलग अलग हत्यार हायेत. त्यान एक अलगच कवट्याचा मुकुट डोक्यात घालेल हाये. तो राक्षस आता घोड्याहून खाले उतरला. त्याच्या समोर सर्व भूत वाकून हायेत. तो सर्वांच्या अंगावर पाय देऊन पुढे जात हाये सगळे भूत त्याच्या समोर झुकू रायलेत. तो यायचा राजा अशीन वाटते. हा बबन्या भी गेला आता त्याच्या जोळ तो राक्षसराजा बबन्या ले इचारून रायला की कशी हाये तुई वेस बबन्या म्हणते की त्या वेशीवरच राज्य करण चालू हाये अजून तर, असे बाकी सगळे पिशाच्च, भूत, आग्या, वेताळ, ब्रह्मराकेस, चुडेल, हाकीन, डाकिन, चकवा, मुंज्या, असे सगळे अलग अलग अतृप्त आत्मे हजेरी लावून रायलेत त्याच्याजोळ. सोम्या अन रेखीच्या घरचा बॉ भी तठी दिसून रायले त्या दोघायले अन ले मोठ्या लोकायले तकलीफ देन सुरु हाये. अन घुबळ, वटवाघूळ, कावळे, अलगच प्रकारचे मिठ्ठू, कधी न पायलेले प्राणी अठीसाक दिसून रायलेत. त्यान सर्व भूतायले एक एक टीप भरून काई तरी देल. सर्व ते आता पीत हायेत मले वाटते ते पिऊन त्यायच्या अंगात आल म्हणजे ते दारू असावी. सर्व आता कुजेल मास खात हायेत.
अन जोर जोरात बोंबलत हायेत अशुद्ध अन घाण तेच आमची जान ….. तेवढ्यात एक त्यायच्यातलाच भूत उभा रायला तो जरा राज्याच्या खालोखाल दिसून रायला मले त्यान भी तसेच काये कपडे अन लोखंडाचा डरेस घालेल हाये. तो म्हणते की राकेसराज आजकाल आपल्याला पछाडता येईल असे लोक भेटत नाईत काय उपाय करता येईन त सांगा ? तो राकेसराजा कडाडला त्या भूतावर अरे आता नाई भेटत म्हणता त मंग काय सतयुगात भेटतीन अरे हे युग सध्या बयकेल हाये अठीसाक आता कोणी एवढ धर्माच-शास्त्राच पालन करत नाई. जागोजागी त अशुद्ध, अपवित्र लोक हायेत. आज या लोकांसाठी त सन्मानाचा विषय हाये मदिरा पिणे, व्यसन करणे, आपल अनुकरणच तर करत हायेत हे लोक…आता तेच पाय तिकडे उभे हवस, कामाग्नीने प्रदीप्त झालेले लोक तमाशा पहायच्या नादात आपल्या जवळ स्वताच येऊन पोहचलेत. त्यांच्यात काहींच्या नावराशी होत म्हणून काही आपल्या तडाख्यात सापडले तर काही स्वताहून आपल्या जवळ आलेत. काही लोभ, मोहाने ग्रासलेले आहेत तर काही काम, क्रोधाने ग्रासलेले तर काहींना अतिरिक्त अहंकार आहे की मी धार्मिक आहे मंग मले काहीच होऊ शकत नाही. पण त्यांना हे माहित नाही की सात्विकता महत्वाची असते आणि आज या तमाशाला आलेल्या लोकांजवळ एकाकडेही सात्विकता नाही. असे महादू बुआ सर्वांना सांगू लागले तेवढ्यात सोपान्या सायकलवाला बोलला बरोबर हाये महादू बुआ आपल्यात जास्त अनुभवी हायेत ते जे सांगतात ते सर्व त्यांना दिसत असेल. महादू बुआ बोलले सोपान्या आपल्या सारखेच या तमाशाले लय लोक येल हायेत गड्या अन सगळे या राक्षसांच्या तडाख्यात आलेत. तसा जनाबुढा बोलू लागला महाद्या मले वाटते गड्या आता आपुन काई आठून जितं जाऊ शकत नाई मले भी तू जे सांगत ते थोड अस्पष्ट दिसून रायल पण नेमक काय दिसते हे तून सांग्ल्या वर समजल. आता अपुन काय कराव. महादू बुआ बोलले की अठून कस निघता येईल ते पहा आता. तेवढ्यात महादू बुआ बोलले किशऱ्या पय बाबू त्या राकेसान आताच तुव नाव घेतलं किशऱ्या म्हणे हाव हो काका मीनं भी आयकल पण या भूतायचा अन माया काय संबंध ? हे माय नाव काहून घेऊ लागलेत ? तेवढ्यात एका भुताने किशऱ्याला पकडले आणि किशऱ्या ला ओढत नेऊ लागला आणि किशऱ्या राक्षसराज समोर उभा होता. राक्षस बोलू लागला याला आपल्या दुनियेतील सुखद आनंद द्या याची चांगली खातिरदारी करा.
मग किशोर ला आकाशी पाळण्यात बसवले त्याला गर गर फिरवले….नंतर घोड्यावर बसवले अतितीव्र गतीने फिरवले किशऱ्या उलट्या करत होता….त्याचं पोटातल सर्व तोंडात येत होते…. त्याला विस्तवावर चालवले….. आता त्याला सडलेल कुजलेल खायला दिल किशऱ्या ते खायला तयार होईना…..तेवढ्यात राक्षसराज बोलला तुला आठवत नसेल मागचा जन्म पण मी आठवण करून देतो. मागच्या जन्मात लय माजला होतास तू ? तुवा भाऊ एक राज्या होता तहा तून आम्हा सर्व भूत प्रजातीले खाऊ की ठू करून सोडलत पण आता पाय या जन्मात न तुवा भाऊ संग हाये न तुले कोणी वाचवणार.. अन तो तुवा दुसरा लहान बिघडलेला भाऊ भी दुसऱ्याच कोण्या ठिकाणी जन्माले येल हाये. त्याचा लय लाड करायचे न तुम्ही आता परत पोरीचाच नाद करीन तो……अन स्वताहून येईन आमच्या तडाख्यात…. अन हासायले लागला हा हा हा हा हा……हुन्ह्छछ्छ्ह्ह…..व्हान्न्न्नन्न्न्नन्न…….हे हे हे हे …… तुवा हिशोब करून झाला की आम्ही त्या तुया भावले भी समजावू त्यान मागच्या जन्मात अतिरिक्त अशुद्ध अपवित्र आचरण ठेवलंत बायायचा नाद केलता, अनाचार, व्यभिचार केलते पण तुम्हीन त्याले आमच्या दुनियेत घेऊन जाण्या पासून वाचवल होत आता तो अन तुम्ही सगळे आपापल्या कर्मान जनम घेऊन अलग अलग ठिकाणी आलेत. तुम्हाले समझीन की केलेल्या चुकांचे फळ हे जन्म संपला की संपल सगळ असे कधीच होत नसते. ते भोगावेच लागते तुम्ही सुटले असान वरच्याच्या हातून पण मी सोडणार नाई. तुम्ही मेले की दुनिया विसरत असते तुमच्या केलेल्या कार्माले. पण आमच्या सारखे अतृप्त आत्मे कधीच विसरत नाहीत. अन बदला घेणे हि तर आमची मुख्य प्रवृत्ती आहे.
या महाद्याले भी माहित नाई की हा पहिले कोण होता तर हा भी लय खेटेल हाये माया संग मी आता याले भी नाई सोडणार. अन परत हसायला लागला हा हा हा हा…. ते दानवीय….राक्षसी…..असुरी हास्य बघून सोपान सायकलवाला बोलला महादू बुआ हे काय ऐकू येत हाये. हे भूतांची जत्रा तर लयच बेकार हाये आणि तेवढ्यात सोपान्याच्या छातीवर भर भक्कम आघात झाला व सोपान्या कोसळला……तसा महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती सर्वांचे नेत्र त्या शक्ती कडे लागून होते. काय होईल पुढे हे कुणालाच माहित नव्हत.. एक महाभयंकर रात्र त्यांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.