कथा महाशिवरात्रीची

प्राचीन काळी एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एक दिवस शिकारीसाठी तो जंगलात गेला. जंगलात खुप फिरला पूर्ण दिवस निघून गेला पण एकही शिकार त्याच्या हाती नाही लागली. तो एका नदी काठी पोहचला तेथे तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला व एखादा प्राणी पाणी पिण्यास आल्यास आपण त्याची शिकार करू असा त्याने विचार केला. बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते बेलाच्या पानाने झाकल्या गेलेले होते. याची शिकाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. तो तेथे झाडावर बसला व वाट बघू लागला. पण बराच वेळ झाला तरी तिथे एकही प्राणी फिरकला नाही. तो अस्वस्थ झाला. व अस्वस्थतेत तो बेलाचे पान तोडत असे व फेकत असे ते पान शिवलिंगावर पडत होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

तो सकाळ पासुन उपाशीच होता. त्यामुळे त्याचा उपास घडला. व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित झाले. न कळत पुण्याची प्राप्ती त्याला झाली.  मध्य रात्री एक हरीण पाणी प्यायला आली. शिकाऱ्याने धनुष्यावर तिर लावला नेम धरला आणि तो तिर सोडणार तर ती हरीण बोलली की मी गर्भिणी आहे मी बाळाला जन्म देणार आहे. माझी शिकार करू नको मी माझे बाळ झाल्यावर लगेच परत येईल तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याला तिचे सत्यवाचन वाटले त्याने तिला जाऊ दिले.  काही वेळाने आणखी एक हरीण पाणी पिण्या करता तेथे आली. ती हरीण बोलली माझी शिकार करू नको. मला माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा आहे. मी माझ्या पतीस भेटून येते तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने तिला पण जाऊ दिले. दोन्ही शिकार जाऊ दिल्यामुळे त्याचे डोके आणखी खराब झाले.  काही वेळाने पुन्हा एक हरीण तिच्या पिल्लांना घेऊन पाणी पिण्या करता आली. तेव्हा शिकाऱ्याने लगेच तिच्या वर नेम लावला व तो बाण सोडणार तर ती हरीण बोलली की माझी शिकार करू नको मला माझ्या पिल्लांना माझ्या पती जवळ सोडून परत येते. शिकारी हसला आणि बोलला हातातली शिकार सोडून देऊ एवढा मी मूर्ख नाही. पुन्हा हरीण बोलली की मला माझ्या पिल्लांची चिंता होत आहे मला जाऊ दे. मी माझ्या पिल्लांना घरी सोडून लगेच येते शपथ घेऊन सांगते. त्याला तिच्या पिल्लांना पाहुन दया आली त्याने तिला जाऊ दिले .

शिकारी त्या हरिणीची वाट पाहत होता व बेलाचे पान तोडत शिवलिंगावर फेकत होता. तेवढ्यात एक मोठा हरीण तेथे आला. शिकारी आनंदित झाला व त्याने त्याच्या वर नेम लावला व बाण सोडणारच तर तो हरीण बोलला की माझे जर तू पिल्लं व तीन पत्नी ची शिकार केली असेल तर माझी शिकार कर व मला मारून टाक. जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला पण काही वेळे करता जीवन दान दे. मी त्यांना भेटून लगेच येतो तेव्हा माझी शिकार कर.  तेव्हा शिकाऱ्याच्या समोर संपूर्ण रात्रीचे दृश्य समोर आले. दृष्टी समोर जे घडले ते दृश्य फिरू लागले  त्याने जे झाले त्या हरिणांस सांगितले. हरीण बोलला की जसे माझ्या पत्नीने तुला वचन दिले मी पण तुला वचन देतो की मी त्यांना भेटून त्यांना येथे घेऊन येतो तेव्हा तू आमच्या सर्वांची शिकार कर. तेव्हा शिकाऱ्याने त्याला पण जाऊ दिले.

थोडयाच वेळाने तो हरीण सहकुटूंब त्याच्या समोर आले. उपवास, रात्री जागरण व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित केल्याने त्याचे मन निर्मळ झाले. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडला. त्याला त्याच्या आता पर्यंतच्या कर्माचा पश्चाताप होत होता. भगवान शिव शंकरच्या कृपेने त्याचे मन द्रवित झाले त्याचे हृदय परिवर्तन झाले होते. हिंसक प्रवृतीतून करुणेचा भाव निर्माण झाला होता.  हरिणाच्या कुटुंबीयांची प्रामाणिकता, सत्यता व सामूहिक प्रेम भावना पाहून तो धन्य झाला होता. त्याने हरणाच्या कुटूंबाला जिवंत सोडून दिले. तेव्हा पासून शिकार पण सोडून दिली असा तो बोलला. वरून समस्त देवी देवता हे पाहत होते. समस्त देवी देवतांनी त्याच्या वर व हरीण परिवारावर फुलांचा वर्षाव केला. व भोले बाबांचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. अशाप्रकारे अजाणतेपणाने पण ईश्वर सेवा घडली तरी करुणामयी भोलेबाबा प्रसन्न होतात. आणि आजच्या दिवशी आपण हि महाशिवरात्रीची कथा वाचणार म्हणजे त्यांचे अजाणतेपणे स्मरण होणार त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपणास नक्कीच लाभेल.

महाशिवरात्रीच्या सर्व एमएच २८. इन सदस्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.