हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला

khamgaon jalna railway route sanctioned in Buldhana

अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य स्थितीत असेलेल्या रेल्वे च्या प्रश्नास सोडवण्यास त्यांचा अधिक कल होता.

खामगाव – जालना रेल्वे झाल्याने विदर्भ आणि मराठवाडा यांस जोडणारा हा एकमेव मार्ग होणार असून जिल्ह्यास विकास कामास मदत होणार आहे. अनेक प्रवाशांनी लावून धरलेली खामगाव – जालना रेल्वे मार्गाची मागणी अखेर पूर्ण झाली असून आनंद व्यक्त होत आहे. अखेर बीजेपीच्या काळात हा प्रश्न मार्गी निघाल्याने खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांना ही अनोखी भेट दिली आहे. खामगाव – जालना रेल्वे मार्गास साधारण ३००० कोटी खर्च अपेक्षित आहे

महाराष्ट्राच्या वाटेस या वेळी खामगाव – जालना रेल्वे मार्गासह पुणे-नाशिक 265 किमी प्रकल्पाला मान्यता, वैभववाडी-कोल्हापूर 107 किमी, जळगाव-भुसावळ चौपदरीकरण 24 किमी, दौंड-मनमाड दुपदरीकरण, मनमाड-जळगाव तिसरी लाईन 160 किमी, वर्धा-नागपूर चौपदरीकरण 76 किमी इंदौर-मनमाड व्हाया मालेगाव 368 किमी, लातुर-नांदेड व्हाया लोहा, गडचिंदुर-आदिलाबाद 70 किमी आदि मार्गांवर रेल्वे चालू करण्यात आली आहे. मागच्या बजेट प्रमाणेच यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. मागील बजेट मधील १३९ योजनांना सुरुवात झालेली आहे.

अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

Buldhana District official website

अनेक प्रस्ताव आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. तसे दाट संकेत मिळाले असून प्रस्तावित नव्या गाडीचे वेळापत्रक देखील इंटरनेटवर झळकू लागले आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

सध्या अमरावतीहून पुण्यास जाण्यासाठी एकच गाडी असून लातूर मार्गे जाणारी ही गाडी १८ तास घेते. परंतु नवी गाडी सुरू झाल्यास अमरावतीहून पुण्याचा प्रवास सुमारे साडेअकरा तासात पूर्ण करता येणार आहे. या आधी अमरावतीहून मनमाडमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे त्यात लक्ष घालून होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यास आले असून अलीकडेच या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार आनंदराव अडसूळ, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनिल देशमुख व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अमरावतीहून पुण्यासाठी पनवेलमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यावर सकारात्मक विचार सुरू झाला.ही नवी रेल्वेगाडी पनवेलमार्गे सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. लवकरच या नव्या गाडीचा मुहूर्त ठरेल असे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र ह्या गाडीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही त्यामुळे रुळावरून ही गाडी केव्हा धावेल ह्याची सर्व जन आतुरतेने वाट बघत आहेत.

साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार!

no-chain-to-stop-train in buldana news

अनेक वर्षापासून असलेली रेल्वेतील ‘साखळी’ आता काढून टाकण्यात येणार आहे. होय, रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार आहे. काही रेल्वेंसाठी याचे काम सुरू झाले आहे.

विनाकारण कुठलीही गंभीर परिस्थिती नसताना साखळी ओढण्याचे प्रकार सातत्याने घडून येत असल्याने रेल्वेला तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. परन्तु अचानक आणीबाणी सारखी परिस्थिती आली तर काय करता येणार ? तर त्या साठी आता रेल्वे थांबविण्यासाठी यापुढे रेल्वेचा चालक आणि सहचालकाचे मोबाइल नंबर रेल्वेच्या डब्यांमध्ये फलकांवर लावले जाणार असून, या क्रमांकावर फोन करून रेल्वे थांबविता येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या स्थितीमध्ये दर तीन डब्यांमागे एक वॉकीटॉकी असलेले कर्मचारीही कार्यरत असतील. प्रवाशांच्या अडचणीच्यावेळी हा कर्मचारी रेल्वेच्या ‘इंजिन केबिन’शी संपर्क साधेल.’ या निर्णयामुळे रेल्वेत प्रवाशांकडून होणारे गैरवर्तन कमी होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रवाशांकडून कोणतेही कारण नसताना रेल्वे थांबविल्यामुळे दररोज अंदाजे २५ रेल्वे विलंबाने धावतात. याचा मोठा फटका रेल्वेला बसतो आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात येणार आहे. उत्तर भारतात याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. कुठलेही कारण नसताना केवळ गंमत म्हणून किंवा वैयक्तिकरित्या साखळी खेचण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे जास्त आढळून आले आहेत. त्यामुळे रेल्वे हा निर्णय घेत आहे.