बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.

हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला

khamgaon jalna railway route sanctioned in Buldhana

अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य स्थितीत असेलेल्या रेल्वे च्या प्रश्नास सोडवण्यास त्यांचा अधिक कल होता.

खामगाव – जालना रेल्वे झाल्याने विदर्भ आणि मराठवाडा यांस जोडणारा हा एकमेव मार्ग होणार असून जिल्ह्यास विकास कामास मदत होणार आहे. अनेक प्रवाशांनी लावून धरलेली खामगाव – जालना रेल्वे मार्गाची मागणी अखेर पूर्ण झाली असून आनंद व्यक्त होत आहे. अखेर बीजेपीच्या काळात हा प्रश्न मार्गी निघाल्याने खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांना ही अनोखी भेट दिली आहे. खामगाव – जालना रेल्वे मार्गास साधारण ३००० कोटी खर्च अपेक्षित आहे

महाराष्ट्राच्या वाटेस या वेळी खामगाव – जालना रेल्वे मार्गासह पुणे-नाशिक 265 किमी प्रकल्पाला मान्यता, वैभववाडी-कोल्हापूर 107 किमी, जळगाव-भुसावळ चौपदरीकरण 24 किमी, दौंड-मनमाड दुपदरीकरण, मनमाड-जळगाव तिसरी लाईन 160 किमी, वर्धा-नागपूर चौपदरीकरण 76 किमी इंदौर-मनमाड व्हाया मालेगाव 368 किमी, लातुर-नांदेड व्हाया लोहा, गडचिंदुर-आदिलाबाद 70 किमी आदि मार्गांवर रेल्वे चालू करण्यात आली आहे. मागच्या बजेट प्रमाणेच यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. मागील बजेट मधील १३९ योजनांना सुरुवात झालेली आहे.